Skip to main content

अंबरनाथ ते कल्याण-माझा पहिला लोकल प्रवास

लेखक महामाया यांनी मंगळवार, 08/11/2016 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
(रेस-पार्ट-टू) ‘तिकिट...’ ‘दादा जवळ मागच्या डब्यांत आहे...’ ‘फर्स्टक्लास चं आहे कां...?’ ‘सॉरी, मी मध्यप्रदेशातून आलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्टक्लास असतो...’ ‘पकडलं गेल्यावर लोक असंच काहीतरी सांगतात...’ ------------- वराती सोबत पुण्याहून परतलो...त्या लग्नाची पार्टी रात्री साडे बारा ला संपली. घरी येऊन झोपलो तर दीड वाजला होता. सकाळी नवरया मुलाच्या मोठ्या भावाने मला उठवलं, म्हणाला-‘चल, राम काकांना स्टेशनपर्यंत सोडून येऊं. तू साइकिलीवर त्यांची सूटकेस ठेवून घे.’ मी तसाच पैंट-शर्ट घालून निघालो. पर्स बैग मधेच राहून गेली (त्यांत रेलवेचा फ्री पास होता).

!! माझ्या सवता !!

लेखक कवि मानव यांनी मंगळवार, 08/11/2016 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता, माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!! सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना, दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!! सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी, नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!! दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी, तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!! सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण, वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!! दुःख - जेव्हा आली ती नांदाया, काळ होता तो कठीण, धुंदी डोळ्यातली गेली, तेव्हा आले मज जाण !!६!! दोघे प्राणवायू माझे, नच कर्मे त्यांच्या वाचून, असे समान
काव्यरस

डी फॉर डान्सबार (१)

लेखक वरुण मोहिते यांनी मंगळवार, 08/11/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
तर ती मला भेटली. असं कधी झालं नव्हतं.म्हणजे विचार करणारे माझे कित्येक मित्र घाटावरून उतरून यायचे खाली पनवेलला. पण मी नुसता टाईमपास करायचो. पार सोलापूर मोडनिंब पासून ते लातूरच्या पुढे. बारीच्या कहाण्या अजून वेगळ्या, सांगेन ती गम्मत. बाकी असं कसं होऊ शकत असं नेहमी वाटायचं. कारण (तिथे) गेलो तरी माझं माझ्या बायकोवर होणाऱ्या जीवापाड प्रेम.. मी बोलू पण शकणार नाही तिला सोडून कुठल्या मुलीशी, अशी परिस्थिती. पण झालं. थोडे पैसे उडवल्यावर ती मला मॉल मध्ये भेटली. नुसती चॉकलेटचं माझ्या भावाला आवडतात म्हणून २-३ हजारांची घेतलेली. बाकी खरेदी तर विचारू नका. पण मला तेव्हापण चाललं. घे हवा ते.

काटा रुते कुणाला…..भाग ४

लेखक Jabberwocky यांनी मंगळवार, 08/11/2016 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला…..भाग ३ http://www.misalpav.com/node/37949 आई नेहमी मला आणि रेवाला अशीच चिडवत असे. तिलाही रेवा फारच आवडत असे. का नाही आवडणार रेवा होतीच तशी. ती ज्यांच्या संपर्कात येत त्या लोकांवर तिच्या व्यक्तित्वाची अशी छापच पडायची. या क्षणी मला रेवाशी बोलायचं नव्हतं पण आईसमोर असल्यामुळे मला तिच्याशी बोलणं भाग होत. मी बाहेरच्या हॉल मध्ये जायला निघालो तशी आई म्हणाली व्यवस्थित बोल तिला. कदाचित आईने ओळखलं असावं कि माझं डोकं बिक काही दुखत नाहीये आणि हे काहीतरी वेगळं दुखणं आहे. मी हो म्हणालो आणि हॉल मध्ये आलो. मी रिसिव्हर कानाला लावला. हॅलो.

१०,००० पाऊले रोजची

लेखक निओ१ यांनी सोमवार, 07/11/2016 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या १४-१५ व्या वर्षी कधीतरी सवय लागली व मी स्मोक करु लागलो, व वयाच्या २२-२३ व्या वर्षीपासून हार्ड ड्रिन्क देखील सुरु झाले. रोज ३०-४० सिगरेट, सिगार. किमान ३६०mL ड्रिक. वयाच्या ३८ व्या स्टेप पर्‍य्न्त हे सगळे सोडण्यासाठी अनंत उपाय केले चालू आहेत. पण गेल्या २०१२ मध्ये मला कुठे तरी वाचताना समजले की रोज किमान १०,००० पाऊले चालावेत जेणे करुन तुमची आज पर्य्न्त झालेली हानी भरुन निघते. १३०० नियमित पाऊले म्हणजे १ किलोमिटर. वाचले व सोडून दिले, पण एकदा शरिराने सगळ्याच गोष्टीला नकार देण्यास सुरुवात केली, अगदी पाणी देखील पिले तर बाहेर येत होते वेळ होती २०१५ जुलै.

प्रेम....?

लेखक Bhagyashri satish vasane यांनी सोमवार, 07/11/2016 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
भेटत....ती पण नाही, भेटत....मी पण नाही... निभवणे तिला जमत नाही, आशेवर ठेवणे मला पटत नाही. फसवत ती पण नाही, फसवत मी पण नाही... तिला रुसण्याचे दु:ख आहे, मला एकटेपणाची भीती आहे... समजत...ती पण नाही, रागवत... मी पण नाही... कुठल्यातरी वाटेवर भेट होत असते नेहमी बघत... ती पण नाही... थांबत... मी पण नाही... जेंव्हा पण बघतो तिला, ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी... ऐकत... ती पण नाही, सांगत.. मी पण नाही... पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रेम माझे आजही आहे तिच्यावर नाकारत.. ती पण नाही, सांगत.. मी पण नाही...!
काव्यरस

एकमेकांना सोडून जातांना...!

लेखक Bhagyashri satish vasane यांनी सोमवार, 07/11/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
एकमेकांना सोडून जातांना एक गोष्ट माझ्यासाठी करशील, आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत माझी आठवण जपून ठेवशील, जातांना फक्त शेवटी मला तुझा चेहरा मन भरुन बघू देशील, स्मरणात तो न मिटण्यासाठी... जाता जाता तुझा हात माझ्या हातात देशील, तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी... जाता जाता तुझ्या डोळ्यातील अश्रु मला वेचायचे आहेत पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर .....शिंपडण्यासाठी.....
काव्यरस

सलोना सा साजन है और मै हूँ

लेखक शान्तिप्रिय यांनी सोमवार, 07/11/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका वाग्दत्त वधूचे किंवा प्रेयसीचे भावविश्व व्यक्त करणारी एक सर्वश्रेष्ठ गझल ! सलोना सा साजन है और मैं हूँ आता माझा सुंदर सजणा आणि मी हेच माझे विश्व आहे असे सांगत आपल्या भावविश्वाचे सुंदर वर्णन या गजलेत ही तरुणी करते. शबी अब्बास यांचे शब्द , गुलाम अली यांचे स्वर्गीय संगीत आणि आशा भोसले यांची अष्टपैलू गायकी यांनी सजलेली हि गजल रसिकांना भावून गेली नाही तरच नवल! व्हायोलिन चा लाजवाब प्रयोग संगीतात आहे. मिराज ए गजल या अल्बम मधील ही गजल !

वैज्ञानिक दृष्टीकोण

लेखक सोहम कामत यांनी सोमवार, 07/11/2016 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती.. Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती.. Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय.. Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय.. Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं.. Computer वरील  प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं.. वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला.. Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला.. विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय.. Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन.. जहाज

काटा रुते कुणाला…..भाग ३

लेखक Jabberwocky यांनी सोमवार, 07/11/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी दार उघडून आतमध्ये गेलो, तोच आई समोर आली. फ्रेश हो, जेवण वाढते, आई म्हणाली. मी आत जात म्हणालो, नाही भूक नाहीये,आम्ही जेवलोय रुश्याच्या घरी. खरं का? आई मी म्हणालो खरच ग विचार त्याच्या आईला फोन करून. ती फोन करणार नाही हे मला माहित होत म्हणून मी थाप मारली. माझं डोकं खूप दुखतंय, मी झोपतो. कुणी आलं तर सांग झोपलोय. मी म्हणालो मी माझ्या रूम मध्ये गेलो ते थेट बिछान्यावर आडवा झालो.खूप थकून गेल्यासारखं वाटत होत. पण हा थकवा शरीराचा नव्हता, हा मनाचा थकवा होता.