Skip to main content

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 13/11/2016 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ५)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/11/2016 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
उतार वय होण्या अगोदर जे आयुष्य असतं ते ही मनाची द्विधा करीत असतं त्यावेळच्या आठवणी. सुम्याच्या मुलीची अमेरिकेतली कॉलेजची वर्ष आता संपत आली होती.सुम्याचा एक प्रश्न तिच्या मुलीने सोडवला होता.सुम्याच्या मुलीला अमेरिकेतच एक चांगला जोडीदार मिळाला होता.तो पुण्याचाच होता.

माझ्या प्रेमाचे मनोगत

लेखक सोहम कामत यांनी शनिवार, 12/11/2016 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटे मजला जणु पोट भरून हसावे.. प्रेमाच्या या नात्यामध्ये अलगद हळूच फसावे.. कधी वाटे मजला जणु डोळे पाणवून रडावे.. काय जाहले विचार करूनी जीव आवळून चिडावे.. कधी वाटे मजला जणु तुझ्या प्रेमात रंगावे.. मिठीत घेऊन तुला कानी प्रेमळ गूज सांगावे.. कधी वाटे मला जणु तुलाच पहात बसावे.. नयनी माझ्या तुझे निर्मळ निरागस हसू ठसावे.. कधी वाटे मजला जणु तुझी साथ असावी.. चांदण्या रातीत चंद्राच्या प्रकाशी तुझीच प्रित दिसावी.. कधी वाटे मजला जणु तुला समजून घ्यावे.. तुलाच माझ्या हृदयी ध्यानी मनी स्थान द्यावे.. कधी वाटे मजला जणु तुझे दु:ख गिळावे.. माझे सुख तिरक्या वाटेने तुझ्यापाशी वळावे.. कधी वाटे

नोटा व्हाईट...दारु वाईट.....

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 12/11/2016 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५ मन्याचा व्हाटसपवर मेसेज ५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या. मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते. . अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे. च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही. खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त. रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला. जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण. जास्त विचार करण्यात अर्थ नाही. . रात्री कन्फर्म मिळाली बातमी. वाचून निवांत झोपलो विचार न करता. . दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.०० पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी. आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट.

कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 12/11/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे. अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा. मी जाणार आहेच. आपलाच, (शेतकरी) मुवि ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.

'चले जाव' चळवळः- काही प्रतिक्रिया

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 12/11/2016 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
समजा १९४२ साली आतासारखी उठवळ माध्यमे असती तर काय बातम्या असत्या? १. गांधींनी जनतेस चिथावले ' करो या मरो', जनजीवन विस्कळीत २. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल ३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून! ४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला ५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले ६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय ७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, 'आज चूल कशी पेटणार?' ८. इंग्रज सोडून गेल्यावर त्यांचे आर्दर्ली कुटुंबाचे पोट कसे भरणार?

अपुले प्रधानमंत्री मोदी

लेखक सोहम कामत यांनी शुक्रवार, 11/11/2016 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य) देशाचे प्रेम उसळले.. पाचशेचे नोटच गळले.. हजारला कीड लागली.. भ्रष्टांची गल्लत फसली.. मोदींचा निर्णय एकला.... भुरट्यांना केले कंगाल.. बॅंकांची भलती उलाढाल.. उधळून तो काळा पैसा शेठ मावळले.... अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.. हम्म..

प्रवास ४

लेखक जॉनी यांनी शुक्रवार, 11/11/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास ३ "ऍट टाइम्स यु मे नीड टू ऑपरेट फ्रॉम बिहाइंड दी एनिमी लाईन्स, अँड वी बिलिव्ह यु विल बी एबल टू डु धिस" काय घडतंय त्यावर आशुतोष चा विश्वास च बसत नव्हता. पत्र हातात पडल्यावर त्याने रात्री ते उघडलं आणि त्याला धक्काच बसला. रॉ मुख्यालयातून आलं होतं पत्र. सीओ सरांच्या स्पेशल रेकमेंडेशन वर त्याला रॉ मधून बोलावणं आलं होतं. आज तो आणि दोन इतर तरुण रॉ मुख्यालयात जॉईंट डायरेक्टर सिंघल समोर उभे होते. दोघांपैकी एक जण सिक्कीम केडर चा आयपीएस अधिकारी, तर दुसरा आयबी मधून आलेला. इतके दिवस आशुतोष फक्त रॉ बद्दल विचार करत असे.