Skip to main content

साधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा!!!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 28/05/2017 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या वर्षावात न्हायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण मी तुम्हाला आता एक असा खरा घडलेला प्रसंग सांगणार आहे, ज्यात अशा एका गोष्टीच्या वर्षावात काही जणांना न्हायचा योग आला होता, ज्याची कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकणार नाही. त्याचे असे झाले, की मी एकदा लोकलट्रेनने सकाळी साधारण सात साडेसात वाजता गर्दीच्या उलट दिशेने प्रवास करीत होतो. अशावेळी गाडीत अगदी तुरळक माणसे असतात. त्यातले बरेचसे रात्रपाळी करून, डुलक्या काढत घरी जाणारे असतात. आणि जे जागे असतात तेही पेंगूळलेल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर बघत शांत बसलेले असतात. गाडी सुसाट पळत असते. नुकताच सूर्योदय होत आलेला असतो.

कथुकल्या ९ [ बोलीभाषा विशेष ]

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 27/05/2017 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
( शंभर ते दोनशे शब्द लांबीच्या ह्या कथुकल्या आहेत. बोलींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे ) --------------------------------------------- १. अमावशेची रात ( मालवणी ) “मजा आली का नाही.” “हाव गड्या. थयसून निघायचं मनच होत नव्हतं बघ. पोटभर जेवलो आज.” “आता चालायचाबी वेग वाढव. सकाळ होईलोक ठिकाण्यावर पोहचायचय.” “बरं बरं.” “सध्या आपण कुठपर्यंत पोहचलो?” “हडळीच्या माळावर” “एवढं अंतर कसं निघून गेलं समजूकच नाय.” “मका आठवतो तो रात. आजच्यासारखीच अमावशा होती. मी एकटा चाललो होतो इथून.

परीकथा - भाग १४ - फेसबूक स्टेटस २.९ - २.१० वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 27/05/2017 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
२० नोव्हेंबर २०१६ आठवड्याभराचा खोकला म्हणून आमचे आईसक्रीम बंदच आहे. आज नेमके तिला सोबत मार्केटमध्ये घेऊन गेलो आणि सोलकढी घेण्याच्या निमित्ताने तिची नजर आईसक्रीम वर पडली. एवढ्या दिवसांचा आतला सुप्त शैतान जागा झाला. आणि त्या बॉम्बे टू गोवा मधील "पकौडा पकौडा" सारखे "आईसक्रीम आईसक्रीम" सुरू झाले. खोकला ताजा असल्याने विकत घेऊन देण्याचा प्रश्नच नव्हता. त्या नादात माझी सोलकढीही राहिली. तिला कसाबसा गुंडाळून तिथून निघालो. आणि तिथेच चुकलो. जेवढे तिला आवरायचा प्रयत्न करत होतो तेवढी ती जास्त दंगा घालू लागली. आईसक्रीमच्या दुकानापासून जसा लांब जाऊ लागलो तसा मला थडाथड लाथाबुक्यांचा प्रसाद मिळू लागला.

अनवट किल्ले ९ : जंगलाने गिळलेला, मुडागड ( Mudagad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 26/05/2017 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला , सह्याद्रीच्या एन कण्यावर एक छोटे गाव वसलेले आहे,"पडसाली". गावाच्या आजुबाजूला घनदाट जंगल आहे आणि पश्चिमेला खोल दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुका येतो. पेशव्यांच्या काळात राजापुर, आचरा, देवगड, विजयदुर्ग या बंदरातून करवीरला येणारा माल निरनिराळ्या घाटाने चढविला जाई. त्यापैकी राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून काजिर्डा घाटाने मालाची ने आण केली जाई. यासाठी नानासाहेब पेशव्यानी सन १७४२ ते १७४७ या दरम्यान करवीरकरांच्या प्रदेशाजवळ मुडागड बांधला असावा. नानासाहेब पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात बिनसले होते. वाडीचे सांवत पेशव्याना मदत करीत.

जपुन टाक पाउल

लेखक Vinayak sable यांनी शुक्रवार, 26/05/2017 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
"जपून टाक पाउल ... इथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेव विश्वास इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपून घे निर्णय इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन......!
काव्यरस

मन से बाता अर्थात मनोगत...

लेखक उपेक्षित यांनी शुक्रवार, 26/05/2017 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बराच उकाडा आहे सगळीकडे त्यामुळे सगळीकडे कुलर/एसी नाहीतर निदान फॅन ची तरी प्रचंड मागणी आहे. थोडा वेळ जरी वीज गेली तरी आपला जीव कासावीस होतो. परवा रात्री दिवसभर दमून मस्त झोप लागली होती पण नेमकी पहाटे २/२.३० ला वीज गेली आणि घामाच्या धारांनी जीव पार कासावीस झाला. कुठे पेपर ने वारे घे कुठे पाणीच मार चेहऱ्यावर असे उद्योग चालू होते. अचानक पेपरने वारे घेता घेता मन भूतकाळात गेले. तेव्हा मी साधारण ७/८ वीत असेल आम्ही पुण्यात कर्वेनगरला हिंगणे होम कॉलोनीत एका बैठ्या चाळीत राहायला होतो. काही कारणास्तव चाळीचे वीजेचे कनेक्शन तोडले होते आमच्या.

कोकणात कुठे फिरावे ? काय बघावे? कुठे रहावे ?

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/05/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, येत्या ऑगस्ट महिन्यात साधारणतः १२ ते १६ तारखेच्या दरम्यान कोकणात फिरायला जावे असा बेत आहे. आम्ही दोघे, मुलगा-सून आणि ६ वर्षांचा नातू असे पाच जण असू. गणपतीपुळे व आसपासचा परिसर पूर्वी बघितलेला आहे. गर्दीच्या जागा किंवा प्रसिद्ध देवस्थाने वगैरे नकोत. शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा, धबधबे, किल्ले, लहान खेडी, अप्रसिद्ध पण सुंदर मंदिरे/लेणी असे काही बघायला मिळाले तर बरे. या संदर्भात कुठे कुठे जात येईल, रहाण्याची/जेवण्याची सोय कुठे करावी, पुण्यापासूनच गाडी करून जावे किंवा कसे ? गाडीचा खर्च अदमासे किती येईल ? वेळ किती लागेल ? (पुण्यातून निघून परत पुण्यालाच यायचे आहे).