मी गेल्यावर
मी गेल्यावर वि़झुनी जातील
रत्नदीप आकाशी
मी गेल्यावर थांबून राहील
वीज तशी मेघाशी
मी गेल्यावर पोर्णिमेसही
चंद्र यायचा नाही
मी गेल्यावर रवी तळपूनी
तेज द्यायचा नाही
मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ
शूरवीर बलशाली राजे
किती जाहले येथे
स्मरण तयांचे या जगताला
कुठे आज रे होते
नररत्नांची ही पहा अवस्था
काय आपुले आहे
आपुल्यानंतर कशास वेड्या
नाव आपुले राहे
चैनीमध्ये दिवस संपला
धुंदीमध्ये राती
भोगून भोगून क्षीण जाहली
आयुष्याची ज्योती
तरीही वाटे मनास माझ्या
नाव इथे होणार
गेल्यानंतर दोन अश्रुही
कोण तुला देणार
- पुष्कराज
Taxonomy upgrade extras
मिसळपाव