Skip to main content

मनातला पाऊस

लेखक prasannakumar यांनी शुक्रवार, 15/08/2008 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
विरह व्याकुळ तप्त धरेवर मुक्त बरसले श्यामल जलधर ओलेती मग त्रुप्त धरा ती ल्याली शालू हिरवा सु॑दर हिरव्या रानी दिसती दूरवर शुभ्र रुपेरि रेषा धुसर खडका॑ना हो फुटला पान्हा स्वैर उधळले धुधाळ निर्झर उद॑ड पाणी पिऊन नाले तुड॑ब भरुनी ओढे झाले क॑पित कातर वायु लहरी तर॑ग ऊठले शा॑त जलावर क्रुषीवला॑ची शेतामध्ये लगबग झाली घेऊन ना॑गर पिके कोवळी हिरवे खाचर त्रुप्ती सारया॑ मनामना॑वर माळावरती रानफुला॑ची जमली नक्षी र॑गीत सु॑दर फुलपाखरे इकडून तिकडॅ ऊडू लागली द्रुश्य मनोहर त्रुप्त जाहली स्रुष्टी सारी तुष्ट जाहले जलचर भुचर रानामध्ये कुठे ला॑बवर घुमु लागले पाव्याचे सुर

दगडूचे अभिनंदन!

लेखक चंबू गबाळे यांनी शुक्रवार, 15/08/2008 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाने घेतलेल्या सुट्टीमुळे महाराष्ट्रवासीयांवर जे संकट ओढवले होते, त्यातून आपण आता पुरते सावरलो आहोत. नद्या,धरणे भरुन वाहत आहेत. शेतकर्‍यांनीही आत्महत्यांचे बेत पुढे ढकलले आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही प्यायला आणि धुवायला(कपडे, गाड्या वगैरे...) पाणी पुरत नव्हते. नको तेव्हा धो-धो बरसणारा पाऊस कुठे दडी मारुन बसलाय हेच कलत नव्हते. अशावेळी आमच्या दगडूने( आमच्या नंदीबैलाचे नाव) "पाऊस पडेल काय?" या प्रश्नाला मान हलवून 'हो' असे उत्तर दिले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दगडूने कौल दिल्यावर आम्ही निश्चिंत झालो कारण आमच्या दगडूवर आमची फार श्रद्धा आहे.

पावसाची परी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 15/08/2008 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे लपलीस सरी दु:खी पावसाची परी सरी बसल्या लपून परी गाल फुगवून ये ग सरी ये ग सरी गाते पावसाची परी सरी आल्या भरभरून परी हसली खळखळून नको सरीवर सरी चिंब पावसाची परी बुडे घरे दारे सारी परी जा ग तुही घरी
Taxonomy upgrade extras

नाव शोधून शोधून जोडू नको!

लेखक केसुरंगा यांनी शुक्रवार, 15/08/2008 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर सदस्यांची नावे अशी फिरताना बघून आमचे डोळे फिरले! 8| एकामागून एक सदस्य अशी नावे फिरवून फिरताना पाहून ना.घ. देशपांड्यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द आम्ही फिरवले!

(कहर)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/08/2008 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;) टंच आहे टंकणारी बांधणीला ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला आडलो नाही तसा मी बोलताना आडला येऊन हुद्दा ऐरणीला काय सांगू कहर हा झाला कशाने का पुढे बसवून गेली ढापणीला? ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर बोलवी साहेब कसल्या चाचणीला? ते भले मोठे नको रोखूस डोळे संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे मार खाण्याची अखेरी वळचणीला चतुरंग

अजुन काही फोटोज... :)

लेखक भाग्यश्री यांनी गुरुवार, 14/08/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता.. गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो.. जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे.. सुंदर समुद्र,शांत परिसर.. एकही घर नाही आसपास.. बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट.. सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु, कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र ! उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स.. एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय, कधी एकमेकांच्या विश्वात तर.. कधी नुस्तंच शांतपणे समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात.. कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय.. कोणी चित्र काढताना दिसलं नाही.. कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्य

वैराग्यभावनेचा अभाव.. भारताच्या लोकसंख्या प्रश्नाचे मूळ?

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 14/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
(मागे मुमुक्षू यांनी राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ? हा विचार चर्चेत आणला. त्यांच्या कळकळीला दाद देत मी वेगळी विचारसरणी सांगितली की राष्ट्रभावनेच्या भाव-अभावाबद्दल कोणाला दोष न देताही अडचणींबद्दल कारवाई केली जाऊ शकते. माझा व्यक्तिगत अपवाद मानून [सर्व प्रतिसादकारांस त्याबद्दल धन्यवाद] अनेक प्रतिसादकारांनी या विचारसरणीला भ्रष्टाचाराची भलावणी मानली, आणि रसातळाकडे जाणार्‍या समाजाची नांदी मानली. म्हणून त्या लेखात आणि प्रतिसादातल्या युक्तिवादासारखा दुसरा एक युक्तिवाद मी येथे देत आहे.

एक हट्टी "देशप्रेमी'

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 14/08/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
...तरीही "भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या "ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन्‌ थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला. ""काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी?'' वेताळानं विचारलं. विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला. वेताळ आणखी कावला. म्हणाला, ""बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता.