Skip to main content

चांगल्या बातम्याही वाईट बातम्या सारख्या प्रसारित होऊ शकतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 29/08/2008 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी एकदा मी कंपनीच्या कामाकरिता राजकोट मधे गेलो होतो.कामाच्या जरूरीमुळे मला काही दिवस तिकडे मुक्काम करायची जरूरी भासली होती.संध्याकाळी काम आटोपून झाल्यावर बाहेर कुठल्यातरी चांगल्या रेस्टॉरंट मधे जेवायला जाताना चालत जायला मी जास्त पसंत करायचो.आणि रस्त्यावर एव्हडा ट्रॅफिक असायचा की छोटे छोटे मॉपेड चालवणारे नेहमी एकमेकाला आपटायचे,घासायचे,पडायचे.म्हणजे अगदी छोटासा अपघात व्हायचा.पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की कुणाचीही बाचाबाची होत नसे.एक्मेकाला सॉरी म्हणून निघून जायचे.कधी कधी सॉरी हा शब्द मोठ्याने ऐकायला यायचा तर कधी कधी ओठांच्या हालचाली वरून सॉरी म्हटल्याचं भासायचं.हे त्यांच फ्रेंडली वागण

जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

लेखक रत्नागिरीकर यांनी शुक्रवार, 29/08/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
जेष्ठ अभिनेत्री श्री.जयश्री गडकर यांचे आज पहाटे निधन झाले. या चतुरस्त्र अभिनेत्रीला माझी आदरांजली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3420004.cms रत्नागिरीकर

खंडांळ्याची पार्टी - एका बातमीच्या निमित्ताने

लेखक विकास यांनी शुक्रवार, 29/08/2008 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेले एक-दोन कस्टममधील २२ अधिकार्‍यांना खंडाळ्याला पार्टीला गेलेले असताना पकडल्याची बातमी (म.टा. मधील मूळ बातमी) येत आहे. त्यातील प्रमुख भाग खाली चिकटवत आहे:
विदेशी मद्य... ब्ल्यू फिल्म... लॅपटॉप... कोऱ्या करकरीत नोटा, अशी सारी तजवीज करून मुंबईतील बारबालांसोबत थंड हवेच्या खंडाळ्यातील खासगी बंगल्यात रंग उधळणाऱ्या कस्टम विभागातील बड्या अधिकाऱ्यांना ११ बारबालांसह मंगळवारी रात्री अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

छायाचित्र क्र. ४ चे परिक्षण

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 29/08/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्र परिक्षण वाचण्याआधी मुळ चित्र येथे पहावे ============== ही नजर की बाण हा, घायाळ करते जीवा त्या मुठित लपविले, घायाळ माझ्या जीवा ते लटकलेले कानचे, की आशा माझ्या मनीची स्वत:संगे झुलविले, घायाळ माझ्या जीवा ती वक्रगती कटीका, की रस्ता माझ्या मनीचा त्या झटक्याने फसविले, घायाळ माझ्या जीवा ती कमरसाखळी हो, की इच्छा माझ्या मनीची त्या विळख्याने भुलविले, घायाळ माझ्या जीवा सर्व असूनही एकटी, की आस माझ्या मनीची तु विश्वामित्र बनविले, घायाळ माझ्या जीवा -ऋषिकेश (रात्री १२ ची वेळ असल्याने छंदाच्या अपेक्षा माझ्यासारख्या
Taxonomy upgrade extras

कर्णपर्व!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी गुरुवार, 28/08/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
कर्णानं अलगद मान वळवण्याचा प्रतत्न केला, पण वेदनेची एक असह्य कळ शरीरात उठली. अर्जुनानं सोडलेल्या बाणनं आपलं काम चोख बजावलं होतं. रथाच रुतलेलं चाक वर काढण्यात गुंतलेल्या कर्णाच्या डाव्या खांद्यातुन घुसुन तो बाण मानेतुन बाहेर आला होता. अर्जुनाला थांबायला सांगितल्या नंतर सुध्दा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन त्याने बाण मारला होता. "तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" हा एकच प्रश्न कर्णाला त्याही अवस्थेत सतावत होता. "धर्म?मी खरच चुकलो धर्म?" पुन्हा कर्णानं मान हलवली मात्र संपूर्ण शरीरच वेदनांच मोहोळ बनल. कर्णाच्या मांडी पासुन ते कानच्या पाळी पर्यंत कर्णाला अनेक जखमा झाल्या होत्या.

गणपती साठी ?

लेखक निसर्ग यांनी गुरुवार, 28/08/2008 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
कालचाच अनुभव. शेजारच्या किराणा दुकानात काही वस्तु आणायला गेलो होतो. ...तेवढ्यात तेथे एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते आले. दुकानदाराला काही न विचारता त्यानीं रु.१००१/- ची पावती तयार केली आणि त्याच्या हातात ठेवली. दुकानदाराने त्याची कैफीयत मांडली की, येथे चार गणेश मंडळाना पैसे द्यावे लागतात एवढे कसे काय देणार ? तेव्हां गणेश मंडळाचे कार्यकर्त्यानी दुकानदाराला दमदाटी केली आणि एवढेही सुनावले कि, जर गल्ल्यात हात घातला तर नक्कीच यापेक्षा जास्त घेऊ....बिचारा दुकानदार. गणेश मंडळाचे कार्यकर्ते गेल्यानंतर दुकानदाराने सांगितले की, "येथे जवळपास चार गणेश मंडळाकडुन अशीच वर्गणी घेतली जाते.

मला आवडलेले पुस्तक ( विस्तारीत)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/08/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले पुस्तक हा धागा प्रतिसादानी ओसंडुन भरुन वाहु लागल्यामुळे नवा धागा सुरु करत आहे कृपया एका प्रतिसादात एकाच पुस्तकाचा उल्लेख करावा एका पुस्तकावर जास्त सदस्य प्रतिसाद देऊ शकतात प्रतिसाद देताना ते पुस्तक तुम्हाला का आवडले/ त्यात वाचनीय काय आहे ते लिहावे ही विनन्ती मिपाकरांना भेटल्यानन्तर एक गोष्ट प्रकार्षाने जाणवते की ही सर्व मंडळी वाचनप्रिय आहेत. पुलंची पुस्तके त्याना पाठ आहेत. त्या व्यतीरीक्तही बरेच वाचन करणारी मंडळी आहेत.

"भेजा म्हणजे रे काय?.... भाऊ"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 28/08/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी सहज म्हणून टी.आय.एफ.आर मधे ( टाटा इनस्टीट्युट ऑफ फंडामेन्टल रिसर्च मधे) सकाळीच गेलो होतो.जुने मित्र भेटतील गप्पा सप्पा होतील आणि वेळ थोडा मजेत जाईल ही एक ईच्छा ठेवून गेलो होतो. तसे बरेच लोक भेटले म्हणा."हाय,हलो" बऱ्याच लोकांशी झालं आणि सह्ज म्हणून लायब्ररीत डोकावून पाहिलं.

भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी.....

लेखक मृगनयनी यांनी गुरुवार, 28/08/2008 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीच्या खेळामधले, राजा आणिक राणी..... अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी..... हातामध्ये हात गुंफुनि, बालपणी ते बागडले .... अल्लडपणे त्या प्रेमाचे, बंध गुंफिले गेले... कधी राजाचे डोळे विचारिती, घरट्यात राहशील माझ्या? राणीला ही कळली त्याची, शब्दावाचूनि भाषा... वचन दिले त्यांनी परस्परांना, मानुनि जीवनसाथी... आयुष्यभर साथ देण्याच्या, बांधल्या रेशीमगाठी... त्यांच्या घरट्यापुढे उमलल्या, सुखस्वप्नांच्या वेली... राणीच्या वेणीत माळे राजा, जाई जुई चमेली... ते दोधे आनंदाच्या डोही रमले, काळ लोटला काही... पण राजा-राणीचा हा संसार, नियतीला बघवला नाही... नियती अचानक एके दिवशी, वादळ घेऊनि आली...