Skip to main content

भयकथा १ : ऋण

लेखक साहना यांनी मंगळवार, 16/03/2021 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या गोष्टींना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता एक नवीन मालिका सुरु करावीशी वाटली. गावाच्या गोष्टी संपल्या नसून आणखीन अनेक गोष्टी आहेत. यथावकाश प्रकाशित करेन. ह्या आधी भयकथा लिहिल्या नसल्याने हा नवीन प्रयोग करत आहे. नेहमीप्रमाणे चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. भयकथा लिहिणे कठीण गोष्ट आहे. विनोदी लिहिणे किंवा कारुण्यपूर्ण लिहिणे त्यामानाने सोपे, कारण एक चांगला विनोद सर्वानाच विनोदी वाटतो किंवा एखादी दुःखद कथा बहुतेकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. पण भयाचे तसे नाही. काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना अंधाराची. काहींना उंचीची भीती वाटते तर काही लोकांना विदूषकाची.

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज - विजय सिंह गायिकांच्या संगीताचा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 16/03/2021 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
आस्वाद घेत आहेत असे दाखवणारे हे राजस्तानी शैलीचे पेंटींग आहे. ओक आणि मनोज दाणींचा व्हॉट्स अॅपवरचा संवाद ओक- ४९ वरील चित्राचे सूक्ष्म निरीक्षण करताना पाहून वाटते की त्यातून वेगवेगळ्या घटनांचा, काळाचा संदर्भ असावा. दाणी - paan 47 na? ti mulgi nasun rani asnyachi shakyataa pan aahe ! ओक - पसंद अपनी अपनी... ते चित्र असेच आहे कि त्यातून अनेक शक्यता दिसाव्यात. दाणी - museum title says a harem scene ... ओक - प्रत्येक गोष्टीला काळ वेळ लागते. सायंकालीन नृत्य, नाट्य, संगीत महफिल सकाळच्या लोटा परेडच्या वेळी शोभत नाहीत.

ॐभवति! डोसां देहि!

लेखक आजी यांनी मंगळवार, 16/03/2021 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
भुकेवरुन आणखी एक गंमत आठवली. एम.ए.नंतर मला जर्नालिझम करायचं होतं. त्याकाळी प्रत्येक घरात फोन नसायचा. आमच्याही घरी नव्हता. माझं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. त्यामुळे मैत्रीणींचाही संपर्क राहिला नव्हता. मला जर्नालिझमची माहिती काढायची होती. प्रवेशाची प्रोसिजर समजावून घ्यायची होती. पण कशी घेणार? त्यावेळी मोबाईल, गुगल वगैरे काही नव्हतं. व्होकेशनल गायडन्सचे कोर्सेस कधी सुरू व्हायचे, कधी संपायचे कळायचं नाही. मी एका निमशहरातून पुण्यासारख्या शहरात एखाद वर्षापूर्वी आले होते. अजूनही घराबाहेर पडलं की बावचळल्यासारखं व्हायचं. जर्नालिझमची इन्स्टिट्यूट कुठं आहे हे माहीत होतं. एप्रिल महिना.

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/03/2021 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत प्रकाशित झालेला हा माझा लेख. अलीकडे सोशल मीडियावर माझं नाव वगळून फिरत आहे. म्हणून हा लेख आजच्या ब्लॉगवर मुद्दाम देत आहे. या लेखाचं आता पुनर्लेखनासह संपादन करायचं होतं, पण लेखकाच्या नावाशिवाय फिरणार्‍या लेखाशी तो तंतोतंत जुळावा म्हणून जसाच्यातसा...): अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो.

३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण

लेखक चौथा कोनाडा यांनी सोमवार, 15/03/2021 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग: २. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर शनारांची ही परिस्थिती जगासमोर मांडावी या चांगल्या हेतूने त्यांनी "तिरुनेलवेलीचे शनार्स" ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यामुळे शनारांची दखल घेतली जाऊन त्याच्या मित्रांनी आणि इंग्लंडच्या लोकांनी मदत केली. पण हे करताना शनार समुदायाचाच काहीतरी गैरसमज झाला आणि ते दुखावले गेले. जड अंतःकरणाने पुस्तिका मागे घ्यावी लागली. त्यांच्या मते सवर्णांच्या काटकारस्थानामुळे शनारांच्या प्रगतीत बाधा आली.

लाल इश्क

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 15/03/2021 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
"तू त्याच्या प्रवासातली चुकलेली पाउलवाट आहेस. आणि मी त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे. ...आणि तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. पाउलवाटेची भीती वाटली, की प्रवाशावरचा विश्वास उडाला?" या संवादावर जाऊ नका. ही वैचारिक प्रेमकथा नाही. ही मर्डर मिस्टरी आहे पण साहित्यिक वाली. म्हणजे लोक नॉर्मल बोलत असताना मधेच कधी एकदम साहित्यिक वाक्ये पॉपकॉर्नसारखी फट्कन फुटतील सांगता येत नाही. त्यामुळे एखादे पुस्तक वाचत असताना मधेच व्हॉट्सअ‍ॅप बघितल्यासारखे वाटते. दुसरे म्हणजे यातील सस्पेन्स फक्त खून कोणी केला याबद्दल नाही. खून कोणी केला याबद्दल सस्पेन्स कोणीही दाखवतात.

भटकंती बंद काळातली - माथेरान

लेखक कंजूस यांनी रविवार, 14/03/2021 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती बंद काळातली मार्च २०२० पासून मुंबईतील लोकल ट्रेनस , बाहेरगावच्या गाड्या आणि पसेंजर ट्रेन्स बंद झाल्याने भटकंती इमारतीच्या गच्चीपुरतीच राहिली होती. फेब्रुवारी १ पासून मुंबईतील लोकल ट्रेनस सर्वसामान्यांसाठी दोन ठराविक वेळांत सुरू झाल्या. मग जवळपासची भटकायची हुकमी जागा माथेरान नक्की केली. दिलेल्या लोकल ट्रेन्सच्या वेळांत जाऊन येणे शक्य झाले. इतर ठिकाणे म्हणजे राजमाची, भिमाशंकर येथेही जाता येईल पण तिथले गाववाले पर्यटकांसाठी तयार आहेत का माहिती नाही. कारने जाणारे कोकणात जाऊ लागले दिवाळीपासूनच. पण कुरबुर सुरू झाली. हे मुंबईतील पाहुणे आले आणि आमच्या गावात करोनाची धाड आली.

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही अन्य पेंटींग्ज -शनिवार वाडा सन १८२०

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 14/03/2021 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत कष्टपूर्वक मिळवलेल्या जुन्या वास्तूंपैकी मराठी मनाला भावणारी शनिवार वाडा वास्तू सन १८२० साली एका चित्रकाराच्या दृष्टीतून कशी दिसत होती याची झलक मिळते. मुख्य प्रवेश द्वारावरील जयपूर शैलीतील कलाकुसर १९ झुपकेदार फुलांंचे डिझाईन वरच्या पट्टीतील सजावट मोहक दिसते. 2 सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते. मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग.

कोरोना लसींची चाचणी

लेखक केदार भिडे यांनी रविवार, 14/03/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतात कोविड-१९ लसीकरण मोहीम चालू आहे. मी स्वतः सध्या त्याकरता पात्र नाही. मित्रांशी बोलत असताना असे जाणवले की ते ही सध्या उपलब्ध असलेल्या लसींबद्दल थोडे साशंक आहेत. त्यामुळे मी या लसींच्या चाचण्यांबद्दल जर्नल्स मध्ये उपलब्ध असलेले संशोधन-लेख वाचले आणि लसींच्या चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ती माहिती आपल्या समोर ठेवण्याचा हा माझा प्रयत्न आहे. ICMR Covid Vaccine येथे चाचणी अवस्थेत किंवा वापरात असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती उपलब्ध आहे. मला वैद्यक किंवा औषध निर्माण या शाखांचे कोणतेही शिक्षण नाही. kool.amol यांनी या आधीच कोरोना लसीबद्दल (misalpav) लिखाण केलेले आहे आणि त्याखालील चर्चेत विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत.

सापशिडी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 13/03/2021 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
सापशिडीचा खेळ लहानपणी आपण सर्वांनीच खेळला. कधी भावा बहिणीं तर कधी मित्रांन आणी अगदीच कोणी नसेल तर आजी आजोबान बरोबर. भांडणे झाली, सापाच्या तोंडातून वाचण्यासाठी अगदी खोटारडेपणा केला. आजकाल नातवंडा बरोबर, कुणी कुणी लग्नानंतर नवीन बायको बरोबर सुद्धा खेळले असतील. सोगंटी ९८ वर पोहचल्यावर सगळ्यांच्या छातीत धडधड झाली असेल आणि, देवा दोनच च दान दे, आशी प्रार्थना केली असणार तर बाकीच्या खेळाडूंनी देव याला एकाच च दान देणार म्हणून चिडवले असणार. कारण ९९ वरचा साप पाचवर खाली घेऊन येतो. थोडक्यात काय तर हा सर्वकालिक,सर्वाधिक आवडणारा खेळ आहे. पण कधी प्रश्न पडलाय का :- खेळाचा जनक कोण?