Skip to main content

बल "सागर" भारत

लेखक विकास यांनी शुक्रवार, 21/11/2008 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच "बलसागर भारत होवो" हे यशोधरा यांचे छानसे संपादकीय आले होते. त्याचा संदर्भ या चर्चेशी अप्रत्यक्ष आहे. पण या चर्चेचे शिर्षक जे आहे त्यात "भारताचे बल आंतर्राष्ट्रीय सागरात" वाढत आहे ह्या बातमी कडे वेधण्यासाठी आहे! निमित्त आहे हिंदी महासागरात विविध ठिकाणी सागरीचाचेगिरी चालते. त्यावर देखरेख करायचे काम प्रामुख्याने (या भागाकरता) भारतावर येते. हाँककाँगच्या "डिलाईट" नामक जहाजाला सोमालीयाच्या सागरीचाच्यांनी वेठीस धरले.

सकाळचा "च्य़ा "

लेखक शितल यांनी शुक्रवार, 21/11/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
"कसला ह्यो च्या म्हणायचा?? दे वोतुन मोरीत...!!!" आबा कडाडले.. .. नवीनच लग्न होऊन आलेल्या आबांच्या सुनेचे डोळे भरून आले ... तरीही मन घट्ट करून तिने विचारलेच, "आबाजी, काय झाल जी? चहा गुळमाट झाला व्हय? पर दिसायस तरी बेस दिसतोया... " "अग बाय, दिसण्यात आणि असण्यात वाईच तरी फरक अस्तो का न्हाय?? तूच पिऊन बघ ह्यो च्या, म्हंजी समजल तुला बी...." "आता उरला नाय, व्ह्ता नव्हता त्यो समदा तुम्हासणीच दिला नव्हं...." सुनेने उत्तर दिले. " सक्काळच्या पारीचा "च्या" कसा पाइजी ठाव हाय का तुला?" आणि आबा चहाच्या वर्णात बुडाले...

तुकोबांचे अभंग (चौकशी)

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 20/11/2008 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काही दिवसांपासून तुकोबांचे काही अभंग शोधत आहे. तुकारामांना समर्थ आणि एक संत एकदा भेटतात आणि त्यांना तुकाराम थोडक्यात आपल्या बद्दल सांगतात अशी एक कथा आहे. तुकोबांचे त्या वेळचे पंधरा एक सुंदर अभंग आहेत. त्या मध्ये ते आपली पहिली बायको गेली, व्यवसायात खोट आली, दुष्काळ पडला वगैरे सांगतात. त्यांना झालेल्या सद्गुरुच्या दृष्टांताबद्दल सांगतात. आणि शेवटी म्हणतात, आता आहे तैसा वाटतो विचार पुढील प्रकार देव जाणे आणि मग विष्णू माझ्या कडुन हे करवून घेतो आहे आणि त्या प्रमाणेच सर्व घडत आहे असा शेवट आहे. नेटावर ते अभंग कुठेतरी आहेत. मला पूर्वी मिळाले होते पण आता मिळत नाहियेत.

साष्टांग दंडवत.......

लेखक उम्मि यांनी गुरुवार, 20/11/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपावरिल मात्तबर मंडळीच ले़खन वाचले.... आणि आपल तर भानच हरपल... बरेच 'जुने'-नविन लेख अधाशासार्खे वाचले... अप्रतिम लेख......"खजाना" मिळाल्यासारखी गत झाली होती माझी..... "तात्यासाहेब, नानासेठ, राजेभौ ---- बाप माणस सगळी......" सोलिड यार....खुश......एकदम..... याचा आस्वाद घ्यावा हि "नविन" सभासदांना विनंती... आपल्याकडुन बरच काहि शिकण्याची उमेद असणारा, उम्मि.

एका `अभिनयसम्राटा'चा अंत!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 20/11/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.indiaprwire.com/downloads/200711295895-3.jpg नि षेध! त्रिवार निषेध!! "देशद्रोही'वरील बंदीनं केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटलेला नाही, तर एका उदयोन्मुख अभिनयसम्राटाचा, भावी सुपरस्टारचा आणि प्रतिभावंत कलावंताच्या उमेदीचा गळा घोटला आहे. एका जातिवंत कलाकाराच्या अभिनयसामर्थ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे... "इसके कहने पे मैं मुंबई छोड दूँ...उसके कहने पे मैं दिल्ली छोड दूँ...क्‍यूँ?

खव्वयांसाठी पुण्या मुंबईतील हॉटेले [त्यातल्या त्यात मासे]

लेखक संताजी धनाजी यांनी गुरुवार, 20/11/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, सामीश भोजनासाठी [त्यातल्या त्यात मासे] पुणे आणि मुंबईत अनेक "खव्वयी" हॉटेले आहेत, समर्थ भोजनालयासारखी. माझी अश्या हॉटेलांना भेट देण्याची जाम ईच्छा आहे [नुसती नव्हे ;)]. तुम्हाला अशी कुठली हॉटेलं माहीत असतील तर सांगा ना! अशी एक मस्त यादी बनवायची आणि मग जमेल तसे एकेका हॉटेलचा आस्वाद घ्यायचा. कशी वाटली कल्पना? सुरुवातः १. समर्थ भोजनालयः गिरगाव, मुंबई बसने ठाकुरद्वार बसस्टॉपला उतरा आणि "मिरबत लेन"ची चौकशी करा. बस रुट पासुन दोन मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल. जरा शोधावे लागते. हं करा सुरु :) -संताजी धनाजी

हिशोब

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 20/11/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले. दान दिले पण परताव्याचे योग ठेवले. पाणी आता साधन झाले लढण्यासाठी, पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले. दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही. रोज पार्वती अन तुलसीचे “सोप” ठेवले. विचार मांडायाला त्यांनी दिली मुभा पण, छातीवरती तलवारीचे टोक ठेवले. देवा तुजला नवसाचा बघ चेक फाडला. गार्‍हाणे मी मात्र आपुले “रोख” ठेवले. चित्रगुप्तही मला म्हणाला कमाल झाली. हिशोब होते मीही ऐसे “चोख” ठेवले..! – अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

माझ्यातल्या कवीला सूचना.... (माझ्या पुरत्याच इतरांनी राग मानू नये )

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 20/11/2008 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
नाद सोड यमकाचा लेका, वजन विचारा देशील का ? पुरे शब्दांची कारागिरी, अन आतुन येई ते लिहीशिल का ? मुखड्याच्या दो शब्दांची, दोरी तू ओढसी किती ? शब्दांचे भरताडच होते, भाव दाटला त्यात किती ? सुखे बैसुनी गादीवरती, कविता जन्मा येत नसे ! पांघरुन वेदनेचे जगणे, दु:खाचे लागेल उसे ! -- आपला दळण छाप लहरी सागर
Taxonomy upgrade extras