Skip to main content

दी कॅट इन दी हॅट - अर्थात टोपीवाले मांजर

लेखक चित्रा यांनी मंगळवार, 03/03/2009 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सूस - आजचे गूगलचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हा लक्षात आले की आज डॉ. सूस यांचा वाढदिवस. आज असते, तर ते १०५ वर्षांचे झाले असते. डॉ. सूस हे त्यांचे खरे नाव नव्हे, खरे नाव थिओडोर गीजल. सूस हे त्यांच्या आईचे लग्नापूर्वीचे आडनाव (तसेच त्यांचे मधले नाव) त्यांनी लहान मुलांच्या गोष्टी लिहीताना टोपणनाव म्हणून लावले. डॉ. सूस यांच्या पुस्तकांशी माझी तोंडओळख इथे अमेरिकेत आले तेव्हा पुस्तकांच्या दुकानांच्या शेल्फांवरच्या त्यांच्या एकदोन पुस्तकांमुळे झाली.

जीवाशिवाची जोडी

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 03/03/2009 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
जीवाशिवाची जोडी हे ग्रामीण ढंगाचे हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेले व संगीत दिलेले एक सुंदर गीत. ह्याचे शब्द व हे कुठल्या चित्रपटात आहे हे कुणाला माहीत आहे का? असल्यास कृपया सांगा. ह्याचे काही शब्द असे जीवाशिवाची बैलजोडी..... ....... वेध रामाच्या बाणाचा वेध बाणाचा डौल .....

हाती ज्यांच्या शून्य होते

लेखक विकास यांनी मंगळवार, 03/03/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
जैनांची कथा वाचली, मंदी वरील लेख/चर्चा वाचतोय त्यातून अचानक खालील पुस्तकाची आठवण झाली. म्हणून हा पुस्तक परीचयाचा उपद्व्याप. मध्यंतरी भारतात असताना एक आधी माहीत नसलेले पुस्तक हातात पडले. त्या पुस्तकाची नावाप्रमाणेच असलेली कल्पना मला आवडली आणि संग्राह्य वाटल्याने घेयचे ठरवले. तसे त्याची प्रथमावृत्ती २००५ च्या शेवटात झालेली पण ही द्वितियावृत्ती २००८ मधली मला विकत घेताना मिळाली... पुस्तकाचे नाव आहे: हाती ज्यांच्या शून्य होते. संपादक - अरूण शेवते, ऋतुरंग प्रकाशन. किंमत २०० रुपये.

मटार-पालक पराठे

लेखक समिधा यांनी मंगळवार, 03/03/2009 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : मटार २ वाट्या पालक २ वाट्या आल १ पेरा एवढं लसुण ४ पाकळ्या मिरची /तिखट आवडीनुसार मीठ चविनुसार कणिक अंदाजे तांदुळाचे पिठ ४ चमचे पिठ मळुन घेण्यासाठी तेल ( हे थोड नेहमी पेक्षा जास्ती लागेल) पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. कृती:

<तूच आहेस तो!!>

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 03/03/2009 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: शरदिनी यांची याच नांवाची कविता! कृपया ह. घ्या!) शिजत जाणारे लुसलुशीत तुकडे मोगलाई रश्श्यात रटरटतांना.... कुणी धाडलंय तुला अन्वर खाटकाच्या दुकानी माझ्या सुखावलेल्या देहसावलीवर आणखी मस्ती चढवायला.... पण चालेल, मुखात विरघळणारा तुझा तो स्पर्श आणि ती रुचकर देणगी पचवतांना तृप्त समाधानाचा चोरटा ढेकर... (गेल्या रविवारी आमच्यासाठी बलिदान करणार्‍या त्या अनामिक बोकडास अर्पण!!!!)
Taxonomy upgrade extras

तूच आहेस तो...

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 03/03/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे तणावाच्या पसार्‍यात गरगरताना कोणी धाडलंय तुला कल्पनेपलिकडील जगातून माझ्या विसविशीत देहसावलीवर हळूवार फुंकर घालायला पण चालेल, काळजात रुतलेला तुझा तो स्पर्श आणि ती क्षणभंगुर भीक पेलताना वृथा वैफल्याचा चोरटा सूर...

लोकसभा निवडणुका-२००९ उत्तर भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 02/03/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच हा लेख लिहायचे मनात होते. गेले काही दिवस मी माझ्या भविष्य आणि करियरविषयी काही गोष्टींमध्ये गुंतलेलो असल्याने मिसळपाववर येऊनही काही लिखाण करणे शक्य झाले नव्हते. देवदयेने सर्वकाही ठरविल्याप्रमाणे पार पडल्यास मिसळपाववर ते जाहिर करेनच. गेल्या शनीवारी (२१ फेब्रुवारीला) मला मुंबईत एक छोटा अपघात होऊन माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे आणि दीड-दोन महिन्याची निश्चिंती झाली आहे. ते एका अर्थाने बरेच आहे कारण त्यामुळे हा लेख मला अधिक सविस्तर लिहिता येईल आणि त्यासाठी जास्त वेळ देता येईल.

इतर भाषिक आणि मराठी लोक

लेखक त्रास यांनी सोमवार, 02/03/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पंजाबी, बंगाली, मद्रासी वगैरे लोकांबद्दल, त्यांच्या सवयींबद्दल बरे-वाईट बोलत असतो. इतर भाषिक (भारतातले) मराठी लोकांविषयी काय बोलतात?

करार

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 02/03/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
करार माझे कधी तुझ्याशी काही करार होते तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे, ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी, गेले मिटून जितके हळवे विचार होते वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली काळोख पान्गताना उघडेच दार होते हातून सावलीचा निसटून हात गेला, आयुष्य फाटलेले मी सान्धणार होते

मंदी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 02/03/2009 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय? हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा.