विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; पालकांना धडा!
अलिकडे वरचेवर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचनात आल्या. अभ्यासाचे टेन्शन, परिक्षेत अपयशाची भिती आणि मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या अतिमहत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर लादल्यामुळे त्या आपण पुर्या करू शकू की नाही; या भितीपायी विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होतात.
माझ्या मते हा सर्व पालकांना एक प्रकारचा धडाच मिळाला आहे. निदान या पुढे तरी पालक आपल्या अतिमहत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर लादणार नाहीत असे वाटते.
आता तरी असे काही अतिमहत्वाकांक्षी पालक सुधारतील काय? त्यांच्यावर आपले अपत्य गमवायची वेळ येऊ नये असे वाटते.
मिपाकर वाचकहो, हा तसा गंभीर विषय आहे.
मिसळपाव