Skip to main content

पाउस - मुळ कविता

लेखक sur_nair यांनी सोमवार, 22/02/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाउस असा पाउस पडावा सुक्या मातीस ओलावा धरीत्रीत निजलेल्या बिजा अंकुर फुटावा असा पाउस पडावा पिके जोमाने वाढावी दोन्ही वेळा चुलीवर पुन्हा भाकर शिजावी असा पाउस पडावा त्याचा पैसा झाला खोटा नंदीबैल यावा दारी सांगे 'सुट्टी आज शाळा' असा पाउस पडावा मोरपिसारा फुलावा घरी दारी अंगणात राग मल्हार घुमावा असा पाउस पडावा झिम्मा खेळतील सरी बळीराजा ही खेळेल हिरव्या रंगाची पंचमी असा पाउस पडावा झरे तुडुंब वाहती घेती दरीतून उड्या त्यांची धिटाई केवढी असा पाउस पडावा पुर यमुनेस यावा कुणी गोपिका बावरी
काव्यरस

विंग कमांडर राकेश नंदा

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 21/02/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
जब कोई बात बिगड़ जाए ।जब कोई मुश्किल पड जाए । तब देना हाक मला ओ हमनव़ाज़।।
आप महर्षी का कार्य करते हो। आपको चिंता करने की क्या बात है। महर्षी संभाल लेंगे ना। राकेशचा आवाज व चेहरा आठवत राहिला. माझ्या ट्रेनच्या किश्श्यात भर पडली.
ट्रेन धडाडत पुढे चालली होती. पत्नी अलका, सुनबाई वरदा व चिरंजीव चिन्मय यांच्या समावेत पत्यांचा 'दश्शी पकड' डाव रंगला होता. मधेच गप्पांना रंगत येत होती. रात्रीचे १० वाजून गेलेले. सहज समोरच्यांशी ओळख काढता कळले की ते गुंटकलला उतरणार आहेत.

दडपे पोहे

लेखक प्रभो यांनी रविवार, 21/02/2010 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आज सकाळ सकाळ बेत केला होता दडपे पोहे. साहित्यः १.

वंदे मातरम

लेखक अप्पा जोगळेकर यांनी रविवार, 21/02/2010 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर-०९ किंवा डिसेंबर-०९ मध्ये (नक्की आठवत नाही) 'जमात्-उल्-हिंद' या धर्मांध मुस्लिम संघटनेने 'वंदे मातरम' विरोधात फतवा काढला होता. तेंव्हा मी त्या संदर्भात इंग्रजीमध्ये एक लेख लिहिला होता. (जो कुठेही छापून आलेला नाही.) तो लेख भाषांतरित करून येथे देत आहे. काही वाक्ये आणि शब्द भाषांतरित न करता तसेच वापरले आहेत जेणेकरुन त्यातला जोरकसपणा कमी होणार नाही. तरी या प्रमादाबद्द्ल माफी असावी. वंदे मातरम म्हणण्यास स्पष्ट शब्दांत नकार देऊन मुसलमानांनी त्यांची राष्ट्रविरोधी भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

आधुनिक राष्ट्रवाद, हिंदू आणि मुसलमान

लेखक अप्पा जोगळेकर यांनी रविवार, 21/02/2010 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे ज्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्यांची उत्तरे शोधताना वर्तमानकालीन वस्तुस्थितीचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. राष्ट्रीय ऐक्याच्या दॄष्टीने, हिंदू आणि मुसलमानांचे परंपरागत वैर केवळ याच दृष्टीने हाताळाले जाऊ शकते.

थालिपीठ

लेखक प्रभो यांनी रविवार, 21/02/2010 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
मालकांनी थालिपीठाच्या निवडणूका घेतल्या.

यत्ता ८वी अ

लेखक प्रमोद्_पुणे यांनी रविवार, 21/02/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत यत्ता ८वी ते १० वी च्या मुलांना टेक्निकल/ संगणक/ शेती यापैकी एक ऐछीक विषय शिकवला जाई. संपूर्ण संस्क्रुत आणि टेक्निकल घेतले की 'अ' तुकडीत प्रवेश मिळत असे. माझ्या सर्वच मित्रांना टेक्निकलची प्रचंड क्रेझ आणि आवड.. मला 'अ' तुकडी, टेक्निकल याचे अजिबात सोयरसूतक नव्हते पण संपूर्ण संस्क्रुत आणि जिवाभावाचे मित्र यांच्यासाठी टेक्निकल आणि पर्यायाने 'अ' तुकडी मिळवणे अनिवार्य होते. टेक्निकल 'मिळवण्यासाठी ' ८वी च्या वर्षाच्या सुरुवातीला गणिताची ५० मार्कांची एक परीक्षा द्यावी लागत असे. गणित विषय मला फार्र फार्र आवडत असे, इतका की मी गणिते पाठ करत असे!! परीक्षा झाली आणि 'निकाल' लागला.

मी संपादक झालो तर ?

लेखक टारझन यांनी शनिवार, 20/02/2010 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्‍याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन. तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी . आता २१ अपेक्षित उघडलन् ! प्रश्न पडला कोणत्या विषयावर निबंध गाळू ? तसे ऑप्शन्स बरेच होते, जसे १. संकेतस्थळमालकांच्या दुष्काळी व्यथा २. हिणकसकुमार , संकेतस्थळासाठी शाप की वरदान ? ३. मी संपादक झालो तर ? ४.