Skip to main content

स्वामी नित्त्यानंद, स्वामी तात्यानंद आणि आपली रंजिता... :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 21/04/2010 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच्या दुनियेत 'स्वामी', 'बाबा' किंवा तत्सम कुणीही धर्मोपदेशक म्हटला की तो अंमळ बाईलवेडा असतो असे आमच्या पाहण्यात आले आहे.. मग तो स्वामी नित्त्यानंद असो की आणखी कुणी स्वामी तात्यानंद असो..

शुद्ध दाद दे !!

लेखक बाळअमोघ यांनी बुधवार, 21/04/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील माझे पहिलेच लिखाण आहे. (चूभूदेघे) एक कविता आहे .. कलाकाराच्या भूमिकेतून लिहिलेली. हे गाण लवकरच दुवा स्वरुपात देइन. ताल सूर नाद्ब्रह्म , अन्तरात घे मैफल ही ईशदान, शुद्ध दाद दे !! गंधर्वच करिती गान, निर्मळ नि:स्वार्थ दान याचक हो, हो भोगी, शुद्ध दाद दे !! जन्म मला काही क्षण, सार्थक तो होइल पण निर्मि कला तव कारण, शुद्ध दाद दे !!

सावित्रिच्या लेकी ....

लेखक झुम्बर यांनी बुधवार, 21/04/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारण साठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष मिपा वाल्यांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता... अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का?

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 21/04/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
इन्द्रराज पवारांचा (http://misalpav.com/node/12007)पिंडदानाचा अनुभव एक अशीच आठवण जागी करून गेला. त्यांनी पिंडदानाचे दोन वेगवगळे विधी का असा प्रश्न विचारला आहे. मला त्याचे उत्तर असे द्यावेसे वाटते की विधी ज्या समाजाची जशी समूहदृष्टी तसे आकार घेतात. सतरा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव वैकुंठावर घेऊन गेलो तेव्हा त्या दिवशी गर्दी अशी नव्हती पण क्यु मध्ये ४-५ पार्थिवे होती. काकांच्या पार्थिवा अगोदर एका वृद्धम्हातार्‍या मजुराचे पार्थिव होते. तो एका सोसायटीचा वॉचमन म्हणुन काम करत होता.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती!!

लेखक नीधप यांनी बुधवार, 21/04/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे. आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=63… या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं.

दै. प्रहार दक्षिण भारतातसुद्धा?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/04/2010 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या दै. प्रहार ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली. daily prahara 21042010 दै. प्रहार दि. २१/०४/२०१० सकाळी ८ वाजता! (वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै.

युगलगित: रानातले खेळ जरा खेळू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/04/2010 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगित: रानातले खेळ जरा खेळू हिरो: अग ए मैना जरा इकडं ये ना जावूया राना नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा खेळ खेळू ना
गोड गोड पोळं झाडावर उभं काढायंचं कसं म्हणतीस का गं कडेवर तुला घेतो अन लाव त्याला हातं टपटप मध चोखून घे ना चल मधमाश्यांचे पोळं जरा काढू ना आता नको नको म्हणू नको ना गंमत म्हणून जरा रानातले खेळ खेळू ना
हिरवीन: नको रे सजना आले मी राना कुणा सांगता विना सांगल कुणी तर माझा बा येईल ना (दांडकं घेवून माझा बा येईल ना)
काव्यरस

ही लपवाछपवी कशाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 21/04/2010 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
टोपणाचं काम फक्त बूचासारखं, बाटलीबंद करून आतल्या द्रावाची ओळख लपविण्यापुरतं ! मी म्हणतो हे झाकण आपल्या ओळखीला तुम्ही लावताच का म्हणून ? अरे आपण सिँहाचे छावे आहोत, समोरासमोर गर्जना करायची आपण ! आपण सगळे मराठमोळे मावळे आहोत, खऱ्‍या समशेरी घेऊन हल्ला करायचा आपण ! आपल्या आवाजात आसमंत दणाणून टाकणारी जरब असावी, वाघांची ती डरकाळी व्हावी,मांजराची मँव मँव नाही ! मग कशाला हे वाघाचं बेगडी कातडं पांघरता? ही लपवाछपवी कशासाठी? अरे स्वतःची ओळख ठासून सांगा.. अशी पुळचट अन् हसण्यावारी नेणारी नावे धारण करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व दुभंगू देऊ नका. जे बोलायचंय ते स्वतःच्या खऱ्‍या ओळखिनिशी बोला.

मुंज

लेखक प्रभो यांनी बुधवार, 21/04/2010 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात एक पत्रिका आली घरी. गुल्ट्या रूमीला मराठी वाचता येत नसल्याने कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका वाटली त्याला. मी घरी आलो तर बोंबलत विचारलं..'किसका शादी है? इनव्हिटेशन आया है.' त्याच्याकडून पत्रिका घेऊन पाहिली तर ताईने पाठवलेली. राहुलच्या मुंजीची. पत्रिका वाचताना मन हळूच मगे गेलं ...१९९३ मधे. मुलगा आठ वर्षाचा झाला की मुंज करायची असा आमच्या घरचा रिवाज. आजोबा लवकर वारल्याने वडिलांची मुंज खुपच उशिरा झालेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपल्या मुलाची मुंज एकदम धुमधडाक्यात करायची. माझी तिसरीची परिक्षा संपली आणी सगळ्यांनाच वेध लागले मुंजीचे.