एक कविता आठवतांना...My Sorrow
यशवंतच्या कविता वाचल्यावर माझ्या काही जुन्या कविता उगाच चाळल्या...गंमत म्हणजे, पहिलीच जी कविता चाळली ती (मला तरी) आजही फार हास्यास्पद नाही वाटली. १९९७ ला लिहलेली. ती मनस्थिती आजही व्यवस्थित आठवतेय. विशीतच होतो आणि ज्या वयात 'लाथ मारेल तिथे पाणी काढेल' असा आत्मविश्वास असतो तेंव्हाच आलेल्या असंख्य अडचणींमुळे आणि अपयशामुळे खूच खचलो होतो आणि नाउम्मेदही झालो होतो. मित्रही पांगले होते...खूपच एकटा, एकटा झालो होतो. आणि कुठेतरी आत खोलवर डिचवलोही गेलो होतो, आणि त्यातूनच एक जिद्द थोडीशी उगवत होती.
मिसळपाव