Skip to main content

" निरंतर "

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शुक्रवार, 18/01/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
विसरुन सर्व गेले इतक्यात लोक मजला ह्रदयी कधी जयांच्या मी वस्ती करुन होतो.. कोण राहीले निरंतर येथे हे मलाच का ऊमजेना अस्तित्व पुसुनी जाण्याची का मी भिती धरुन होतो.. बांधती जीवा ह्या अजुनी चार धागे त्या विश्वासाचे धावतात शरीरामधुनी वेग बनुनी ते श्वासांचे.. आहेस तु सन्निध स्वरसाज बनुनी ह्या गीताचा जाणवे आधार अजुनी त्या समर्थ हातामधल्या हाताचा.. राहिल अस्तित्व माझे शाश्वत सखे तुझ्या दोन नेत्रांमधुनी येइल तुलाही प्रचिती नकळत ओघळणारया त्या दोन आसवांमधुनी..

" एकान्त "

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शुक्रवार, 18/01/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
बाहेर मिटट काळोख अन आत प्रकाश दाटावा.. असा एकान्त मिळावा प्रत्येक श्वास ही ऐकू यावा.. अशा एकान्ताच्या क्षणी ती बसते समोर येऊनी.. मग तीच होते कविता माझी व्यक्त होते शब्दातुनी.. मनात वाजत राही आठवणीचा पावा.. वेदना सगळ्या जुन्याच परि चेहरा नवा.. नव्या त्या चेहरयाचे नवे नवेच ते पाणी.. ओठावरती येते तरी का जुनीच विराणी.. असा एकान्त हवा विसर जगाचा पडावा.. स्वतःमध्येच हरवूनी मी पुन्हा मलाच भेटावा..

ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?

लेखक वरदा यांनी शुक्रवार, 18/01/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता? आज शुक्रवार आहे म्हणून काम नाही आणि त्यात हा नवा जॉब्...खूप बोर होतय म्हणून मी मिपा वर लोकांना सल्ले देत बसलेय. सगळे लेख आणि कविता वाचुन झाल्यात्..तुम्ही अशा मोकळ्या वेळात काय करता? मला काहीतरी आयडीया द्या ना.

दहावा... त्या गेलेल्या दिवसा॑चा....

लेखक छत्रपति यांनी शुक्रवार, 18/01/2008 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
दहावा घालण॑ म्हणजे काही फार चा॑गली गोष्ट आहे अस॑ म्हणण्याच॑ धाडस निदान मी तरी करू शकत नाही... पण मला सा॑गा की, जर आपल्या आयुष्यातुन काही दिवस कायमचे गेलेले असतील तर त्या॑चा दहावा घालून त्या॑ना तिला॑जलि द्यायला काय हरकत आहे...??? आम्ही सगळ्या मित्रा॑नी मिळुन आमच्या आयुष्यातुन कुठलेही कारण न देता निघून गेलेल्या मुली॑बरोबर व्यतीत केलेल्या दिवसा॑चा दहावा घालायचा ठरविलेले आहे... तरी आमच्या या ठरवावर मि. पा. वरील सदस्या॑नी मते द्यावीत असे मला वाटले म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप करत आहे.....

शिवाजी महाराज

लेखक छत्रपति यांनी शुक्रवार, 18/01/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराज खर॑ तर शिवाजी महाराजा॑बद्दल लिहायच॑ कस॑ हा प्रश्नच आहे.... मी इथे काही लिहिणार नाहिये... मला त्या॑च्या बद्दल माहिती हविये... (तुमच्याकडुन) पण इथे लिहिणार्‍या॑ना काहि स॑केत पाळावे लागतील... १) कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी आणि जबाबदारी लिहिणार्‍या॑ची असेल. २) कृपया साइट ची अमूल्य जागा लक्षात घेता उगाचच कुठलीही माहिती देवु नये.... उदा. जन्म,जन्मठिकाण, आइचे नाव, वडिला॑चे नाव वगैरे वगैरे वगैरे...

" सखी "

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शुक्रवार, 18/01/2008 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
भंगलेल्या शब्दास माझ्या सप्तस्वराची साथ तू . . वेदनेच्या वादळातही सावरणारा तो समर्थ हात तू . . दिवस उजळून टाकणारी प्रसन्न ती पहाट तू . . संपूच नये प्रवास जिचा ती रम्य वाट तू . . सुख तू दुःख तू सकाळ तू दुपार तू . . मन पुलकित करणारी तीच श्रावणधार तू . . काय सांगू माझ्याकरिता काय आहेस तू . . गुदमरलेल्या जीवनाचा श्वास तू विश्वास तू . . सखी माता भगिनी सर्व नात्यांचे नाव तू . . दाटतो देवासमोर जो तोच सात्त्विक भाव तू ..

(झुलवा)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 18/01/2008 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुरेख गझल झुलवा रात्रीला पोरांना निजवा बेत जरा मग जंगी घडवा तुमची गोची, त्यांची वळवळ काय करावे लवकर ठरवा कुणीच येईनासे झाले! अहो जरा जोराने हलवा नसे पाहण्या कोणी आता जरा दमाने खिंडी लढवा बाई, बाटली आणिक आम्ही युगायुगाचा चालू झुलवा... "केश्या" मेला, आहे टपलेला (कुणीतरी साल्याला बडवा!)" पुलस्तिशेठनी मुळ गझलेत प्रकाशना नंतर बदल केले आहेत.. त्यामुळे आम्हाला अजून दोन शेर वाढवावे लागत आहेत त्यांची गोची पाने पिकली देठ तरी वळवळतो हिरवा त्याच उड्या अन त्याच कसरती दमलो, थोडे पडतो अडवा...

गावची वारी

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 18/01/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
करकचून ब्रेक दाबत एस.टी थांबली. दरवाजा उघडला. एका हाताने गॉगल नीट करीत आणि दुसर्‍या हाताने खांद्यावरील बॅग सावरीत रमकांत उतरला. त्यापाठोपाठ रश्मी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अमेय हेही उतरले. सभोवती एक दृष्टीक्षेप टाकून त्याने गावात जाणारा रस्ता पकडला.

विरोप

लेखक अनिला यांनी शुक्रवार, 18/01/2008 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तुज पत्र लिहाया झाले मी आधिरा टिचकीने एका ताव मिळे लिहाया @च्या गोलात पत्ताही दडे नेमका टपटपली अक्षरे उलगडती भाव मनीचे अक्षरेही घेती आकार रंग निराळे मज भासे ते ते लिहिले विद्युत डाकी टिचकीने एका क्षणात तुजला धाडी पावली लगोलग मज रे पोच पावती भासली जणू रे तुझीच ही सावली या कृती जरी असती यांत्रिक तावातिल शब्द सुवासिक मंत्रित मी मंत्रमुग्ध अन धुंद भान गंधित तुज होईल का रे आशीच ही लागण उघडली गवाक्षे फिरू लागली धरा तव पत्र पहाया झाले मी अधिरा
Taxonomy upgrade extras

किनारा..

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी गुरुवार, 17/01/2008 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा.. लाटेसार्खे येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा.. किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा... त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी.. पण त्या लाटेत गुन्तायचे नसते किनारयाने कारण निमिशात त्याची स्वप्ने भन्गतात एका नविन आघाताने... म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्शा व्हावे किनारा शेवटी तोच असतो सोबती दुखः प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...