Skip to main content

श्राद्ध

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 03/10/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने पुनर्प्रकाशित. श्राद्ध
मी माझ्या आईचे श्राद्ध दरवर्षी घालतो, ती जीवंत असताना ,तीला कधी, प्रेमाने साडी आणली नाही... पण तिच्या पिंडावर रेशमी धागा मात्र, दरवर्षि घालतो....... ती जीवंत असताना, तिला कधी, प्रेमान जेवु घातले नाही, पण तिच्या पिंडाला पक्वानांचा नेवैद्य मात्र दरवर्षि दाखवतो.... ती आजारी होती..

पितृ पंधरवडा!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 03/10/2008 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
"दहा जनपथ'च्या बाहेर पितृपक्ष बराच वेळ खेपा मारत होता. त्याला आत प्रवेश मिळत नव्हता. "भल्याची दुनिया राहिली नाही,' असंच त्याला वाटत होतं. पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड करणाऱ्यांना इथे झटपट आणि बराच वेळ भेट मिळते आणि दस्तुरखुद्द राज्याच्या कारभाऱ्यांना भेटीसाठी दोन-तीन दिवस ताटकळावं लागतं, हे त्यानं ऐकलं होतं. मात्र, हल्ली ते दिवसही सरल्याचंही कुठूनतरी कानावर आलं होतं. त्यामुळं मोठ्या आशेनं तो मॅडमच्या भेटीसाठी आला होता. वर्षानुवर्षं नाहक बदनामी झाल्यानं बिचारा आधीच जाम वैतागला होता. एकतर त्याच्या कारकिर्दीत काही शुभ घडत नसे आणि आणि यदाकदाचित काही अशुभ झालं, की त्याच्याच डोक्‍यावर खापर फुटत होतं.

माझा अनुभव

लेखक आगाऊ कार्टा यांनी शुक्रवार, 03/10/2008 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जीवनातील एक अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. चु.भु.दे.घे. हा प्रसंग म्हणजे माझ्या अनेक नसत्या उचापतींपैकी एक आहे. मे महिन्याचे दिवस होते. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. दिवसभर नुसते उंडराणे, कैर्‍या, चिंचा धोंडे मारुन पाडून खाणे आणि गावभर गजाली करत हिंडणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशातच एक दिवस बातमी समजली की आमच्या गावाजवळच्या जंगलात एक वाघ आला आहे. माझा भाऊ (अभिनव) सुद्धा तेव्हा आमच्याकडे आला होता. मला ही बातमी समजल्यावर मी अभिनवला म्हटले की आपण वाघ बघायला रात्री जाऊया..... पण यात एक मोठा "पण" होता.

दिवस आजचा

लेखक शुभदा यांनी शुक्रवार, 03/10/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अंथरुणात असताना हलकेच सूर्याची तीरीप डोळ्यावर आली, मन आणि शरीर दोघांना खूप छान वाटले. जसे रात्री झोपताना चंद्राचा शीतल प्रकाश आणि वार्‍याची हलकी झुळुक छान झोप देऊन जाते तसेच अशी प्रसन्न सकाळ चांगल्या दिवसाची भेट देऊन जाते. श्रावणातला उन, पावसाचा खेळ चालू होता. मी उठणार तेवढ्यात आवाज कुठून आवाज आला. चक्क सूर्य देव माझ्याशी बोलत होते. "थांब माझीच दमछाक झाली आहे. रोज सगळ्याना वेगवेगळ्या रूपात भेटताना. पण, मला रोज तेजोमय तळपण्यासाठी कुठून ताकद आणतो मी. माझ्या अस्तित्वासाठी रोजचा रोज तळपतो मी" .

सोप्पी शेवेची भाजी

लेखक शिप्रा यांनी शुक्रवार, 03/10/2008 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः जाड शेव, कांदे, दालचिनी, लवंगा, खसखस, जिरे, धने, आले लसुण पेस्ट, सुक्या खोबर्‍याचा किस, लाल तिखट, मीठ, पाणी व फोडणीचे साहित्य. शेव सोडुन सर्व साहित्य एकत्र वाटा... नंतर तेलाची फोडणी करुन त्यावर वरिल वाटण परतुन घेणे..खमंग वास आला की त्यात जेवधी पातळ भाजी हवी असेल तेवधे पाणी घाला...चांगले उकळवा...जेवायच्या आधि थोडा वेळ वरिल आमटित शेव घाला..वरुन लिंबुरस घाला व गरम गरम भाजी, पोळी किंवा फुलक्यावर ताव मारा...

यासुकुनी श्राईन

लेखक सहज यांनी शुक्रवार, 03/10/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्ष यासुकुनी श्राईन[समाधी/स्मारक??] हे नाव बातम्यात अधुनमधुन कानावर यायचे, की चीन सरकारने [द. कोरीया, उ. कोरीया देखील] जपानी पंतप्रधान यांनी यासुकुनी श्राईनला भेट दिली म्हणुन कडकडीत निषेध नोंदवला. तेव्हापासुन मला हा यासुकुनी स्मारक नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे होते. काही मित्रांकडून तसेच आंतरजालावर माहीती मिळाली. त्यात हा दुवा विशेष उल्लेखनीय.

हा भेदभाव-दुजाभाव का बरं?

लेखक येडा खवीस यांनी शुक्रवार, 03/10/2008 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
कालच "गांधीजयंती" झाली....स्वर्गीय महात्मा गांधी यांच्या विचारमुल्यांबाबत आणि ते महात्मा होते याविषयी माझ्या मनात कोणत्याही शंका नाहीत. पण गांधीजयंती ज्या उत्साहात सर्व देशभर साजरी केली जाते तशाच प्रकारे...विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, किंवा अशा अन्य वीरांना ते Glamour का मिळत नाही? त्यांची देशभक्ति किंवा त्यांचे प्रयत्न हे गांधींपेक्षा कमी होते का?

उपवासाचे बटाटावडे

लेखक स्वप्ना हसमनीस यांनी शुक्रवार, 03/10/2008 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य---३-४मोठे बटाटे,मिरच्या,कोथिंबीर्,जिरे,मीठ्,शिंगाडा पीठ्,तिखट, कृति---प्रथम बटाटे उकडून घ्यावेत्.ते कुस्करून घेऊन त्यात वाटलेली मिरची,जिरे,कोथिंबीर,मीठ घालून छोते गोल गोळे करावेत्.शिंगाड्याच्या पीठांत तिखट-मीठ ,पाणी घालून पीठ साधारण जाडसर भिजवावे.बटाट्याचे गोळे पीठात बुडवून तुपात अगर तेलात तळावेत. ह्या वड्यांबरोबर खोबरे किंवा शेंगदाण्याची थोडी पातळ चटणी छान लागते.

..बाकी खरंच काही नाही

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 03/10/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मला आता ,मुळी सुद्धा येत नाही उगीच डोळे भरुन येतात, बाकी खरंच काही नाही.. फूल बघुन मला आता कुणी सुद्धा आठवत नाही हळुच नजर वळवते मी, बाकी खरंच काही नाही.... चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही... पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही... एकटं एकटं वाटतं पण ,तू मुळीच आठवत नाहिस विसरलेच नाही तुला मी ,बाकी खरंच काही नाही...
Taxonomy upgrade extras