Skip to main content

सामुद्रधुनी

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 09/03/2009 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून शांततेची कबुतरे उडताना पाहून गालिब म्हणाला वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव गुंत्यातला तोरा मिरवत घाटातली वळणे घेताना चुकून मॅडोना म्हणाली जितं जितम् जितम् प्रियेच्या झोपड्यामध्ये साजणस्पर्शाचा भावुकदर्प घेताना सजणी म्हणाली "अय्या, याला काय अर्थ आहे?"

लक्षात राहीलेल्या वाक्यांची उत्तरे (स्पर्धा)

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 09/03/2009 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमात लक्षात राहीलेल्या वाक्यांचा धागा बघितला आणि ही कल्पना सुचली. सुप्रसिद्ध संवाद किंवा वाक्यांची विडंबन उत्तरे लिहिण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. स्पर्धेचे पहिले बक्षिस रुपये.१५१ दुसरे रुपये १०१ तिसरे ५१. मराठी वा हीदी सिनेमातील संवाद, लक्षात राहीलेले वाक्य घेउन त्याच्यापुढील उत्तराचे विडंबन करावे. हिंदीचे उत्तर मराठी, मालवणी,नागपुरी,पुणेरी मराठी मधे पण चालेल. आजपासुन ४ दिवसाने निकाल जाहीर होईल. साधारण कल्पना येण्यासाठी उदाहरण देत आहे. सिनेमा: अमर प्रेम राजेश खन्ना: पुष्पा आय हेट टीअर्स. शर्मिला: ठीक आहे.

(तगमग)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्काळी जिवाची एवढी 'तगमग' कधीच झाली नव्हती! सोसवेचना!! :T :O :S हा खून झाला नसता तर दिवसभर कामात लक्ष लागलं नसतं!!

राम आणी वाली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 09/03/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर बागडत असताना एका ठिकाणी प्रभु रामचंद्रानी वालीची हत्या करुन कसे अधर्म चरण वगैरे केले आहे ह्याची मनोरंजक कहाणी वाचायला मिळाली. त्यात सितेकडे केलेली अग्नीपरिक्षेची मागणी कशी अन्यायकारक वगैरे होती हे ही वाचायला मिळाले. रामचंद्र हे आधी राजा असल्याने त्यांनी स्वत:चा आदर्श जनतेपुढे घालुन देण्यासाठी त्यांनी सितेकडे अशी अपेक्षा व्यक्त केली असावी काय ? वाली वधाविषयी मात्र खुप बोलायची इच्छा आहे. खरेतर मागे मिपावर हा प्रश्न उपस्थीत झाल्याचे पुसटसे आठवते पण तेंव्हा भवतेक कंटाळ्यामुळे हे येव्हडे सगळे टंकले नाही. आज वेळ मिळाला आहे तर हा राम आणी वाली संवाद तुमच्या पुढे सादर करत आहेत.

शिफ्ट हॅपन्स....

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 09/03/2009 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षक असाल तर, किंवा शिकवण्याची आवड असेल तर, ही फ़ित जरुर बघा... http://www.youtube.com/watch?v=pMcfrLYDm2U ही फित तुम्हाला येणारे बदल किती वेगाने येणार आहेत व त्यासाठी विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये ह्यांनी स्वतःत काय बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते समजते. पाहून तुमची मते जरुर कळवा. आजच मी ही फित मी एका महाविद्यालयात माझ्या पेपर रिडींग साठी वातावरण निर्मिती साठी वापरली व त्याचा अत्यंत चांगला परिणाम झाला.

तगमग

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 09/03/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
अवहेलनेचे बकासूर टाचा झिजवताय्त.. अन् मी उन्मुक्त रंगबावरी भिरभिरतेय ध्येयवेड्या रूपरेषा धुंडाळत त्याच त्या साजणगहिर्‍या रंगहाका पिंपळरसिकांचा अत्तरटाहो रक्तसूज्ञांचा दंभपराभव अन् प्रतिबिंबांचा जादूटोणा यक् अन् असल्याच शब्दांना कंपूबाजांच्या "छान गं, मस्त गं, पाणी आलं गं, सुंदर कल्पना गं, कसं सुचतं गं.." असल्या छप्परतोड प्रतिक्रिया काहिली काहिली जिवाची वाटते सांगावे मी कोण या सार्‍यांना .. की या तेजतर्रार शून्यमनस्कतेचा उकळत्या तेलात टाकून एक मेदूवडा बनवून खावा खुसखुशीत??...

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 09/03/2009 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस अस्वस्थ होतो. इस्राईलनं केलेल्या हल्ल्यात नाहक बळी पडलेल्या शेकडो पलेस्टिनींबद्दलची ही अस्वस्थता होती का? इथिओपियामधल्या दुष्काळग्रस्तांना खायला अन्न नसताना इथे लोक फुकटच्या मेजवानीतदेखील अन्नाची नासाडी करत असल्याबद्दलची होती का? शेकडो अधाशी, उतावळे उपवर तरुण गुढग्याला बाशिंग बांधून तयार असताना करीना कपूरनं सैफ सारख्या द्वितीय वराशी सूत जमवावं, याबद्दलची ही आर्त वेदना होती का? की आपल्या लेखनाला कुत्रंही विचारत नाही, त्याची व्यथा?? छ्या! ही अस्वस्थता, वेदना, वैषम्य होतं आपली पोरगी काही आपल्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही, त्याचं! एकदा हात मोडणं, एकदा उजव्या बोटावर कोयती, एकदा ड

लोकसभा निवडणुका २००९: पुढे काय?

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 09/03/2009 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्या निवडणुक निकालाच्या अंदाजाविषयीच्या लेखमालेचा पुढचा आणि अखेरचा भाग म्हणजे राज्याराज्यातील अंदाज एकत्र करून पूर्ण देशात काय परिस्थिती असेल हे बघणे. अर्थात मतदान होण्यासाठी सुमारे काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन महिन्यांचा कालावधी आहे. या काळात अनेक बदल होऊ शकतात.तेव्हा सद्यकालीन परिस्थितीचे माझे जे काही आकलन आहे त्यानुसार बांधलेले हे अंदाज आहेत. राज्याराज्यातील अंदाज एकत्र करून मी ते एका एक्सेल शीटमध्ये मांडले. सध्याच्या राजकिय परिस्थितीमध्ये जे पक्ष ज्या आघाडीत आहेत (यु.पी.ए/एन.डी.ए/प्रस्तावित तिसरी आघाडी आणि इतर पक्ष) त्यानुसार वर्गवारी केली.

कधी येणारगं तू सखये

लेखक अडाणि यांनी सोमवार, 09/03/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी वारा वाहता मेघदूत नी गारा होत्या मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये झाडावरचा राऊ मजला हळुच घालतो शीळ स्वरांची जाणुनबुजूनी माझ्याभोवती आठवण करीतो तुझ्या सुरांची रवीराज तो गहीवरलेला सांजवेळी बहरत होता मुक्तहस्ते तळ्याकिनारी तुझा रक्तिमा वाटत होता कोपरावरच्या वळणावरती मोगराही बहरलाय माझ्या वेड्या जिवाबरोबर तो ही तुझ्यासाठी आतुरलाय एक नभ जो जाई सुसाट वाटे तयावर स्वार होउनी मी यावे ऊडीनी अलगद कुशीत तुझया एक क्षणिक सरूनी जाते संध्याकाळ तुझ्या आठवणित नकळत मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये - अडाणि.
Taxonomy upgrade extras