Skip to main content

हनुमंताची व्यथा !

लेखक चिगो यांनी गुरुवार, 09/09/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशीच्या पेपरात कूठल्याशा गावची खबर होती खबर जरी लहान असली तरी तिची मजा जबर होती.. गाव म्हणे आकारानं तसं जरा छोटं होतं गावकुसाच्या शिवेवर हनुमानाचं मंदिर मोठं होतं.. जेव्हा कधी गावात लग्नाची वरात यायची व-हाडी मंडळी मंदिराच्या सावलीला आडोशाला हायची.. वरातीतल्या बायका मात्र कधीमधी मंदिरात जायच्या हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल अंगावरच्या साड्या बदलायच्या.. सालोसाल असंच घडुन अखेर ती एक रीत झाली मात्र शेवटी हनुमंताच्या ब्रम्हचर्याची जीत झाली.. एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं मुर्तीनं डोळे मिटले होते कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे आता पारणे फिटले होते...!
काव्यरस

ई-पत्र किंवा ई-गप्पा मधल्या गमती जमती

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 09/09/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गणपा शेट बरोबर ग-बोल वर गप्पा करताना टंकन-गल्लती मुळे एक विनोद झाला. त्यावरुन आधीच्या काळचे काही झालेले ग-बोल वरचे गैरसमज आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कधी कंप्युटर च्या प्रॉब्लेम्स मुळे, कधी घाईगडबडीत टंकण्यामुळे आपण कै च्या कैच बोलुन्/टंकुन जातो, पण परिणाम नेहमीच विनोदी असतील असे नाही ना, ;) ************************************************************* एकदा मला माझी जुनी मैत्रीण फब वर भेटली. तिच्याशी १-२ वेळा फॉर्मल बोलणं झालं. मग असंच एका दिवशी.. मी: Hi.

हिंदुत्व आणि भारतीयत्व

लेखक शहराजाद यांनी गुरुवार, 09/09/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
समरमध्ये इथे, म्हणजे अमेरिकेत, फार्मर्स मार्केट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जागोजागी आठवड्याचा बाजार भरतो. आम्ही सबर्बमध्ये राहतो, खरेदी सुपरमार्केटमध्ये करतो. त्याऐवजी एखाद्या शनिवारी किंवा रविवारी सकाळी शहरांमध्ये जागोजागी आसपासच्या शेतांतून येणारा ताजा भाजीपाला व फळं विकण्यासाठी शेतकरी व मळेवाले येतात. खरेदीसाठी भारतीय व चिनी लोक तसेच ऑर्गॅनिक व फ्रेश खाण्याची हौस असलेले अनेक अमेरिकन तिथे येतात. या बाजारातून नुसता फेरफटका मारणे हादेखील अतिशय उल्हसित करणारा अनुभव असतो. परवाच आमच्या इथल्या भाजीबाजारात एका अनोळखी अमेरिकन बाईशी माझे बोलणे झाले.

एक कविता....(हे कवितेचे नाव नाही) पण शीर्षक हवेच...मग काय करा?

लेखक अथांग यांनी गुरुवार, 09/09/2010 05:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच मिपावर काही लिहु धजत आहे. गेले काही दिवस येथे वाचन करत आहे, प्रतिक्रिया बघत आहे..यावर माझी प्रतिक्रिया अशी की आपण आपले वाचक म्हणूनच रहावे. कशाला उगीच काही पोस्ट करण्याचा आटापिटा? पण आज मनाचा हिय्या करुन माझी पहिली कविता आपणांसमोर ठेवत आहे. तिचे पोस्टमार्टम होवु शकते याची पूर्ण कल्पना आहे. ते झाले तरी कवितेचा "आत्मा" माझ्यापुरता तरी मी सांभाळून ठेवेनच!

शिवराज्याभिषेक

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 09/09/2010 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
शिवराज्याभिषेकाचे वर्णन आपण अनेकदा वाचले असेल पण एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून यावर लेखन फार क्वचितच झाले असेल. खास महाराजांच्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका डच वकीलाने लिहिलेले हे वर्णन.हा वकील वेंगुर्ल्यातल्या डच वखारीतला असावा,त्याने हे पत्र बटेव्हियातल्या (?) आपल्या वरिष्ठास लिहिलेले आहे. त्याचा हा गोषवारा. संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२ पुष्कळ दिवस तयारी होऊन जुनच्या सुरुवातीला राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून सुमारे ११ हजार लोक रायगडावर जमा झाले.

खमण ढोकळा

लेखक प्राजक्ता पवार यांनी बुधवार, 08/09/2010 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : डाळीचे पीठ - २ वाट्या बारीक रवा - पाव वाटी हिरवी मिरची,आले , लसुण यांचे वाटण - २ चमचे मीठ साखर - १/२ चमचा तेल - २ चमचे लिंबाचा रस - २ चमचे खायचा सोडा - १/२ चमचा फोडणी - तेल , मोहरी, कढीपत्ता , कोथिंबीर - डाळीचे पीठ , रवा , हिरवे वाटण , मीठ , साखर ,लिंबाचा रस एकत्र करावे. त्यात तेल व गरजेनुसार पाणी घालुन जाडसर असे पीठ भिजवावे.हे मिश्रण अर्धा तास तसेच राहु द्यावे. नंतर त्यात खायचा सोडा घालुन एकत्र करावे. तेल लावलेल्या थाळीमध्ये हे मिश्रण घालुन एकसारखे पसरावे व कुकरमध्ये १५ मिनीटे वाफवुन घ्यावे. थंड झाल्यावर तुकडे कापुन घ्यावेत. तेल ,मोहरी , कढीपत्ता यांची फोडणी वरुन घालावी. कोथिंबीर व ओले खोबरे घालुन सर्व्ह करावे.

आज.........मदर्स डे निमित्त ---- जगातील सर्व मातांना खूप खूप शुभेच्छा ..................

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 08/09/2010 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य, शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!!

आशा भोसलेंचा आज वाढदिवस!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 08/09/2010 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
युवती मना पासून नैना लगाई ले पर्यंत आणि चांदणे शिंपीत जाशी पासून बुगडी माझी पर्यंत अप्रतिहत सहज संचार असलेल्या ह्या सूरसम्राज्ञीला ७७ वर्षे पूर्ण झाली ह्यावर विश्वास बसणे कठिण जाते! आपल्या आवाजातल्या विविधतेच्या जोरावर तब्बल ६७ वर्षे एखाद्या क्षेत्रात उत्तम काम करीत रहायचं म्हणजे खायची गोष्ट नव्हे म्हाराजा! व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढउतार पचवूनही आशाताईंच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. अनेक मानसन्मान मिळूनही साधेपणा टिकवून आहेत त्या.