Skip to main content

मांगल्याचे औक्षण करूनी..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 25/10/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदी भरले पाऊल घेऊन पहाट अवतरली.. अलगद नाजूक, धरतीवरती चाहूल थरथरली.. जागी झाली सृष्टी सारी ऐकून भूपाळी निळेजांभळे क्षितिज तेव्हा झाले सोनसळी क्षितिजावरती डोकावुनीया हळूच तो हसला आळसावल्या चराचराला सूरही गवसला लगबग झाली दहादिशांतुन तया पाहण्याला ओलेत्याने सज्ज जाहल्या जणू स्वागताला धरतीवरती शिंपण झाले सडा रांगोळ्यांचे मनी मानसी दीप उजळले नविन आशांचे काळोखाची संपून जाईल मुजोर बळजोरी आकांक्षांची किरणे येतील हसून सामोरी नविन आशा आकांक्षांनी भरु दे ही झोळी मांगल्याचे औक्षण करूनी हसेल दिवाळी.. - प्राजु
काव्यरस

तुझ्यविना आज.....!!!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 25/10/2011 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाही भेटले मी दिवसभर तर त्याने खूप बेचैन व्हावे , भेटण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी त्याने नेहमी आधी यावे ! रोज भेटण्याची ओढ नित्य नेमाची पण नवीन असावी , रोज काहीतरी नवीन बोलण्यासाठी शब्दांची घाई असावी ! डोळ्यांसमोर असावा सतत चेहरा त्याचा हसणारा , आकाश शुभ्र असले तरी, ढग ओढून बरसणारा ! ‘तुझ्याशिवाय मी ’ आता कल्पनेतही नसावी , कल्पनेतील तुझी साथ आता अस्तित्वात असावी ! ज्याची कल्पनाही केली नाही इतकी प्रेमाने भरलेली असावी , माझ्या आठवणीत त्यानेही अशीच कविता लिहिलेली असावी ! सत्य मात्र अबाधित पणे दोघांकडे पाहत असेल , तुम्ही थांबता कुठे कि मी थांबऊ म्हणत असेल ! गुंत

प्रवास .....

लेखक फिझा यांनी मंगळवार, 25/10/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवरून चालताना हलकीच ठेच लागते, कुणीतरी “जा” म्हणाले तरी थांबावेसे वाटते थांबताच मनातल्या आठवणी काहूर करतात , आणि कधीचे दाटलेले पाणी डोळे भरून टाकतात , जड जड पायांनी परत आपण चालू लागतो वाट , अंधारातून चालता चालता होऊ लागते पहाट , ओंजळ भर मोगरा बाकी पारिजताकाच सारा , निळ्या निळ्या आकाशात शुभ्र ढगांचा पसारा , मन सकाळीच तेवढे प्रसन्न , मग गहिवरून येते , वाऱ्यासंगे वाहता वाहता परत फुलापाशी थांबते , मेघ येतात दाटून मग ,बरसून जातात संध्याकाळी , तेव्हाच बहरतो निशिगंध आठवणींच्या वेळी , विसरव म्हणले तरी विसरता येत नाही , दिवस संपून जातो पण मन कुठंच लागत नाही , पाउस पडून गेल

गोष्ट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 25/10/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी ती गोष्ट शोधतोय बर्‍यासश्या हाताला लागतायत . . लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची, शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची, इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची, आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास, आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची, अशा किती सार्‍या गोष्टींनी वेढलंय मला . . पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये निळ्या डोळ्यांच्या, उडणार्‍या परीची, पर्‍यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी . . कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस, निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना....
काव्यरस

अक्साई चीन्

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 25/10/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा "अक्साई चीन" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित "हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे" अशी माहिती मला तावातावाने देत होते. अर्थातच या भागाबद्दल बाकी कोणतीही माहिती न देता सदर परिचितांच्या चर्चेची गाडी नेहरूंवर घसरली आणि जणू काही नेहरू नसते तर अक्साई चीन आपल्याकडून सुटला नसता अश्या आविर्भावात ते तावातावाने बोलत होते. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या मात्र त्या इतक्या खोलापर्यंत पोचल्या होत्या की त्यांच्या लेखी सत्य काय हे जाणण्यापेक्षा तत्कालीन राजकारण्यांवर राग व्यक्त करण्याचे साधन इतकेच महत्त्व 'अक्साई चीन' चे राहिले होते.