Skip to main content

साहेबाचे, "गर्वसे कहो हम..."

लेखक विकास यांनी बुधवार, 21/12/2011 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
"पवित्र बायबल" हा ख्रिस्ती धर्मग्रंथ मुळचा हिब्रू आणि त्याहूनही अधिक ग्रंथस्वरूपात कोऑइन (Koine) ग्रीक भाषेत लिहीला गेला होता. ख्रिस्ती धर्माच्या युरोपातील प्रचाराप्रमाणे तो विविध भाषांमधे देखील अनुवादीत होऊ लागला. ब्रिटनमधे त्याचे राजमान्य भाषांतर १६११ साली केले गेले, त्याला कालपरत्वे "किंग जेम्सचे बायबल" असे अधिकृत नाव मिळाले. या किंग जेम्स बायबलच्या लेखनपुर्तीस ४०० वर्षे पूर्ण झाली म्हणून ऑक्सफर्ड विद्यापिठात १६ डिसेंबरला सोहळा साजरा करण्यात आला. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन ह्यांचे तेथे भाषण झाले.

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (बेल्लुर) भाग - ३

लेखक दशानन यांनी बुधवार, 21/12/2011 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण होयसाळ / होयसाल साम्राजाची राजधानी द्वारसमुद्र (हैलेबिडु) बद्दल माहिती व छायाचित्रे पाहिली आता त्रिकोणातील २रा कोन. बेल्लुर. मंदिराचे प्रवेशद्वार द्वारसमुद्र पासून १२-१३ किलोमीटर बेल्लुर वसलेले आहे, एकेकाळी ही जुळी शहरे संपन्न व पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून समजली जात. राजाचा वरदहस्त व राजकोष मुक्त हस्ताने वितरीत करण्याची उदारता यामुळे अनेक कलांचा प्रसार होयसाळ साम्राज्यात झाला.

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

मागे वळून पाहताना

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 21/12/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा क्षणभर, मी थबकले याच ठिकाणी पूर्वी, मी तुला भेटलेले हलकेच झाली पानांची सळसळ हृदयात माझ्या पुन्हा ती खळबळ इतक्या दिसांनी मी परत जुनेच हसले हरवलेले ते प्रेम, कधीच नव्हते मिळाले तू नि मी, इथूनच, येण्यासाठी निघालो वचने देऊनही, पुन्हा कधीच नाही भेटलो वाट तुझी पाहून मी होते थकले ना कळे तू प्रेम आपले, कुठे हरवले ? किती दिवस न रात्री, मी एकटीनेच पाहिल्या तुझ्याविनाच सर्व आठवणी पुनःपुन्हा आठवल्या दूरवर कुठेच तुझी चाहूल नव्हती सगळे आप्तेष्ट मात्र मला सतावत होती काय त्यांना सांगावे कळेना कुठे तुला शोधावे, उमजेना मी पण मग माझ्यावर चिडले पुन्हा एकदा मनाविरुद्ध लढले जुन्या आठवणींना कोंडून
काव्यरस

"इजय असो"

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 21/12/2011 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?) गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली. कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं.

बबडू ची कविता !!

लेखक फिझा यांनी बुधवार, 21/12/2011 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ट्विन्स वर केलेली कविता !!

झोपला का ग?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 21/12/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
झोपला का ग? तेंव्हा आमच घर लहान होत. वन बेडरुम, किचन.. बेडरुम मधे बेड भिंतिला लागुन होता मी त्यावेळी २-३ रीत असेल बाबा भिंतिच्या बाजुला, मी मधे,आई कडेला ,अस झोपायचो. झोपल्यावर आई कडेला ठेवायची मला.. मी रात्री जाम झोपायचो नाहि.. ति मांडिवर घेउन दामटुन झोपवायची.. सारखे दोघेपण झोप झोप करायचे... उद्या सकाळी शाळा आहे अस म्हणायची मधुनच बाबा झोपला का ग? म्हणायचे.. झोपतोय.. आई म्हणायची,"लहान आहे ना, दमतो" मी मानांत हसायचो.... मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते..... [कल्पना स्त्रोत.प्रतिसाद.. मित्रवर्य ली] अविनाश....

मदत हवी आहे

लेखक वाटी यांनी बुधवार, 21/12/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मदत हवी आहे मला येथे माझ्याकडे असलेले महाराष्ट्रातील गड कील्यांचे फोटो कलादालन या विभागात डकवायचे आहेत.

भविष्यात आपली गरज आहे का?

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 21/12/2011 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्‍याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील.