Skip to main content

शूरवीर

लेखक निश यांनी सोमवार, 19/03/2012 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा सीमेवर गोळी वर गोळी चालली तेव्हा तेव्हा मॄत्युची गिधाडे आस पास वावरली. झेलले घाव छातीवर होउन रक्तबंबाळ कितीदा घेतले पाय मागे न कधीही लढलो परी शूरासारखा. घर ठेवले मागे, नाती सगळी विसरलो झुंजता झुंजता शत्रुशी, नमकहराम दोस्तामुळे घायाळ हा झालो. श्वास असे जोपरी तनात, करीन शत्रुवरी मात. मेलो जरी रणात तरी, अमर होउन राहिन नेहमी जिवंत तुमच्या मनात. राहिल देशभक्ति मनात राहिल देशभक्ति मनात
काव्यरस

सामान्य !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 19/03/2012 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी, उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी । सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'? चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती (मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती !

त्याला ती हवीये...

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 19/03/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री कशीही असली तरी शेवटी पुरुषांना काय हवं असतं... बायकोच्या हातचा डबा.. ऑफिस मध्ये मिरवायला.. तिचा मउसुत हात.. केसातुन फिरवायला... तिची लांबसडक बोटं...मस्त तेल जिरवायला.. तिचे नाजुक ओठ.. गालावर फिरवायला.. आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला.. तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला.. तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला... तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला.. त्याला बहीण हवी..हट्ट पुरवायला.. त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला... त्याला ती हवीये... माधुर्य टिकवायला... तिला तो हवाय.. गोडी वाढ्वायला... खुप भांडण चालु आहेत.. चालु रहातील..
काव्यरस

शिवस्मारक – मुंबई

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 19/03/2012 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
२००२ साली लोकसभा निवडणुका आधी कोंग्रेस सरकारने शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारक मरीन लाईन्स इथे अरबी समुद्रात बांधायचे, असं पिल्लू सोडलं. शिवाजी महाराजांबद्दल असलेली आत्मीयता, ह्या स्मारकाच्या माध्यमाने जगभर पोचवायची होती. त्याच साली ह्या स्मारकासाठी ३५० कोटींचं बजेट मंजूर झालं देखील होतं (२०१२ चा आकडा नक्कीच हजार कोटींवर असेल, महागाई वाढलीय नं). मरीन लाईन्सला समुद्रात एक किलोमीटर आत समुद्रात भरती टाकून, हे स्मारक बांधायचे नक्की झाले.

उबेची पाखर...

लेखक वेणू यांनी सोमवार, 19/03/2012 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र- मैत्रिणींनो, जरासं मनोगत देतेय! काही दिवसांपूर्वी, नॅशनल जियोग्राफीवर बाळाचा जन्म, अगदी बाळ एक आठवड्याचे असल्यापासून ते जन्मापर्यंतची संपुर्ण प्रोसेस दाखवली.. त्या गर्भातल्या बाळाच्या निर्मितीपासून ते जन्मापर्यंतचा प्रवास अदभूत वाटला.. हे पाहू शकतो, समजू शकतो आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे.. त्यानंतर सुचलेलं काही.. सांभाळून घ्या..

पाटाला भसा भसा पानी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/03/2012 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/21045#comment-381773 समुद्र का विहिर...? बेडकं का खेकडे..? या नस्त्या व्यापाला कटाळुन, जरा नाचगानं करुन शीन घालवावा,,,म्हंन्तो... या मंग करु वाईच डोस्कं ग्गार... (चाल--- पाडाला पिक्कलाय अंबा...) सोडलं हो...आता सोडलं हो...आता सोडलं हो,सोडलं भसाभसा पानी हो...ओ...सोडलं भसाभसा पानी,,,ध--नाजी राव पाटाला भसाभसा पानी ॥धृ॥ धागा ह्यो पडला थंड ,बॉडीत होईल बंड ... ओ धनाजी... थंड कसा पडला जी,,हो ओ,, थंड पडला कसा जी... ओ पाटिल... सोडा ना लवकर पानी... ध--नाजीराव सोडा ना भसाभसा पानी..
काव्यरस

नर्मदे हर!

लेखक पैसा यांनी रविवार, 18/03/2012 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदे हर! काही दिवसांपूर्वी एक मिपाकर आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्‍या यशवंत कुलकर्णीने एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा ही सुंदर लेखमालिका लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं.