शूरवीर
जेव्हा जेव्हा सीमेवर गोळी वर गोळी चालली
तेव्हा तेव्हा मॄत्युची गिधाडे आस पास वावरली.
झेलले घाव छातीवर होउन रक्तबंबाळ कितीदा
घेतले पाय मागे न कधीही लढलो परी शूरासारखा.
घर ठेवले मागे, नाती सगळी विसरलो
झुंजता झुंजता शत्रुशी, नमकहराम दोस्तामुळे घायाळ हा झालो.
श्वास असे जोपरी तनात, करीन शत्रुवरी मात.
मेलो जरी रणात तरी, अमर होउन राहिन नेहमी जिवंत तुमच्या मनात.
राहिल देशभक्ति मनात
राहिल देशभक्ति मनात
काव्यरस
मिसळपाव