Skip to main content

खबरदारी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 09/10/2012 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुला असे मुळूमुळू रडतांना पाहून, मी थोडातरी विरघळेन, असे वाटले असेल तुला - माझ्या य:कश्चित जिवासाठी तू तुझे हे अनमोल अश्रू ढाळतेस... माझ्या रुक्ष चेहऱ्यावर जाऊ नकोस माझ्या कठोर काळजातही ते अश्रू जपून साठवताना - माझी किती तारांबळ होत आहे हे तुला न दिसण्याची मी खबरदारी घेत आहे ! .
काव्यरस

वर्षा भोसले यांची आत्महत्या

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 09/10/2012 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक दुर्दैवी घटना. वर्षा भोसले ह्या प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले ह्यांच्या कन्या. त्यांनी डोक्यात गोळी मारुन घेऊन आत्महत्या केली. एक उत्तम स्तंभलेखिका म्हणून त्यांचा एक मोठा चाहता वर्ग होता. पण गेले अनेक वर्षे त्यांनी ते लेखनही बंद केले होते. त्यांनी काही मोजकीच पण चांगली गाणी गायली आहेत. आशाबाईंना सिंगापूरमधे मिफ्टाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या तेव्हा त्यांच्या लेकीने हे भयंकर कृत्य केले. बहुधा आत्यंतिक नैराश्यामुळे हे झाले असावे. एका गुणी व्यक्तीचा असा अंत व्हायला नको होता.

एका मुलाखतीतील मुक्ताफळे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 08/10/2012 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : हापिसातील बॉस क्र. १ ची प्रशस्त वातानुकूलित केबिन. वेळ : हापिस सुरु होऊन १ तासानंतर. काळ : लवकर पुढे सरकत नसलेला कंटाळवाणा . प्रसंग : अकौंटस क्लार्कच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी (तब्बल) ६५ उमेदवारांच्या मुलाखतीचा. पात्रे : मुलाखतकार : १. बॉस क्र. १ २. सदस्य , लेखा विभाग ३. सदस्य , प्रशासन विभाग ४. मी , महिला सदस्य उमेदवार : ५८ मुली व ७ मुले १७ ते २० वयोगटातील. बॉस क्र. १ समोरच्या फायलीतली उमेदवारांची माहिती चाळून पाहत आहेत. बॉस प्रशासन सदस्यांकडे पाहून विचारतात.

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

जंगलातले चालणे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 07/10/2012 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
(c) pashanbhed
जंगलातले चालणे
दुर रानात रानात शीळ घुमली कानात पाखरांची किलबील पानात पानात उभा बाजूला डोंगर झरा वाहतो समोर पाणी पिण्यासाठी त्यात सोडले कुणी जनावर शिवालय शांत भग्न गुंतले त्यात मन थेंब थेंब पाण्याचा होई अभिषेक अर्पण होती बरोबर शिदोरी झाली तीची न्याहरी दुपारी होईल काहीबाही त्यालाच काळजी सारी एकटेच चालायाचे स्वत:शीच बोलायाचे जंगल मोठे निबिड निघून एकटेच जायचे आला सुर्य माथ्यावर थेंब घामाचे अंगावर पाय
काव्यरस

झटपट पौष्टिक वड्या

लेखक नूतन यांनी रविवार, 07/10/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
vadi साहित्यः ओट्स २ वाट्या पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड, शेंगदाणे यांचे जाडसर कूट १ वाटी वेलची पूड १/४ चहाचा चमचा चिरलेला गूळ २ वाट्या पाणी २ चहाचे चमचे साजुक तूप १ चहाचा चमचा पिस्ता बदाम काप सजावटीसाठी कृति १ तव्यावर मंद आचेवर ओट्स हलके

ट्रेन आणि थुंकी

लेखक वडापाव यांनी रविवार, 07/10/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा संपली; दहावी पास झालो. चांगल्या कॉलेजात प्रवेशही मिळाला. आणि ओघानेच ट्रेनने नियमितपणे प्रवास करण्याचे दिवस सुरु झाले. ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यापेक्षा बस बरी - अशा मताचा मी होतो. पण माझं हे मत, मला लहान असताना आईबरोबर लेडिज कंपार्टमेंटात दरवेळी चढावं लागल्याने तयार झालं होतं, तेव्हा आता ते मत बदलून, जनरल डब्यातला माझा रोजचा प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सुखमय होऊ लागला. कधी जास्त गर्दीतून जावं लागलं, तरी मजा यायची. आणि मग ट्रेनपेक्षा बसचा प्रवासच कितीतरी जास्त क्लेशकारक आहे, अशा मताचा मी झालो. पहिला महिनाभर सेकंडक्लासात घालवला.