Skip to main content

चावडीवरच्या गप्पा – रेडी रेकनर

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 03/01/2013 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “नाहीतर काय?

ड्रॅगनच्या देशात १२ - शांग्रीलाची लामासरी आणि गुईलीनमधले निसर्गाचे चमत्कार

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 03/01/2013 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१...

शांती नवं वर्षातली

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 03/01/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नावातकायआहे... यांनी ख.फ...सुना सुना झाल्याचे पाहुन तिथे शांति करायचे आंमंत्रण आंम्हास दिले..http://www.misalpav.com/user/7405 पण आमच्या मनातुन आज ही वेगळीच शांति बाहेर आली,,, तिचे बीजंरोपण केंव्हा झाले?-ते शोधायची हुरहुर लाऊन...
काव्यरस

माझ्या घरचा नवीन गुंड

लेखक आर्णव यांनी गुरुवार, 03/01/2013 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
कामाच्या कागदांची होते भेळ तुरु तुरु तुझ्या गत पळतेय वेळ तुझ्यासंग वेळ मुळी काळतच नाय वेळेला फुटतात सश्याचे पाय हवी असते मला जेव्हा झोपेची कुशी तू मारत असतेस या बाबाला ढुशी बाबाच्या कडेवर होते तुला ख़ुशी आवडते तुला माझ्या खांद्याची उशी कीबोर्ड चे माझ्या तोडतेस बटण बाहुल्यांचे तुझ्या करतेस मटण हे पाहून आईला फुटतो घाम काय माझी लेक; टेन्शन येत जाम आजी आजोबांची लाडकी तू नात असतात ते तुझे गुण-गान गात आजीने तुझ्यास्ठी केला मासे-भात जेव्हा दिसला तुझा पहिला दात तुझ्या जवळ, म्हणजे boxing रिंग powerful आहेत तुझ्या डोळ्यांची भिंग हातात येईल ते मारतेस फेकून बाबाच्या डोक्याला टेंगळानची शिंग

वाघ्या हौश्या (एक आठवण)

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 03/01/2013 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या सकाळी जाग आली नि मी उठून झोपेच्या तंद्रीतच गोठ्यात गेलो. हिरव्या वैरणीचा भारा सोडला नि दोन पेंड्या वाघ्या हौश्या पुढे सोडल्या. नि तिथच जोत्यावर टेकून वाघ्या हौश्याच्या देखण्या डौलदार रुपाकड पाहत बसलो. गेल्या शनिवारीच आण्णांनी चाकणच्या बाजारातून हि देखणी चौषी गोऱ्ही खरेदी केली होती. आख्खा गाव बघाया लोटला होता. आम्ही घरातली पोरं तर येडीच झालो होतो. दोन दिवस शाळला सुदिक दांडी हाणली होती. पर घरची लयच ओरडायला लागली तव्हा शाळेत जायला लागलो. पर मी मात्र सकाळी त्यांना वैरण टाकायचा नेम धरला होता.

तो आणि ती

लेखक शैलेंद्रसिंह यांनी गुरुवार, 03/01/2013 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
तिला पक्कं माहित होतं की तो भोळसट आहे. जगातल्या प्रत्येकावर सारखंच प्रेम करणारा असा तो...त्याच्या आयुष्यात आपलं स्थान तरी काय याची तिला खात्री नाही....त्याच्या आजुबाजुला वावरणारे सगळेच त्याच्या जवळचे भासतात...मग आपणंही त्याच गर्दीतले एक तर नाही ना असं तिला सारखं वाटायचं. कोणालाही दुखावू नये हेच त्याचं तत्व....त्याला भेटणारा प्रत्येक स्त्री-प्ररुष/आबालवृद्ध यांच्याशी जणु त्याचे जन्मांतरीचे नाते असल्यागत आपुलकिने विचारपुस हा करतो...भावनाविवश होऊन काहितरी बोलतो...काही आश्वासनं देतो..पण मग ती आश्वासनं पाळतो ही...त्यासाठी पुढचा-मागचा काहीही विचार करत नाही.

"ते" - ४

लेखक स्पा यांनी गुरुवार, 03/01/2013 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" -१ "ते" -२ "ते" -३ 'जयदीप .. हो जयदीपच. तू परत आलायस इथे , माझा अजूनही विश्वास बसत नाहीये . दत्त दत्त ' अगदी योग्य वेळी आलास , जसा मागे आलेलास तसाच , मागच्यावेळी एकट्याने युद्ध हाती घेतलेलस, वेडा जीव , एकट्याने "त्यांच्याशी" लढायला गेलेलास ,माझं काही एक न ऐकता.

जगी हा खास वेड्यांचा पसारा..

लेखक नानबा यांनी बुधवार, 02/01/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच लोकलने कामावर जात होतो. काही कारणांमुळे गाड्या उशिराने धावत(?) होत्या. (मुंबईत राहणार्‍यांना याची सवय असतेच म्हणा.) गाडीतल्या सर्वांनाच कामावर जायला उशीर होणार असल्यामुळे कार्यालयातल्या परिस्थितीचा अंदाज बांधत सगळेच जण रेल्वेवर शिव्यांची लाखोली वाहत होते. (त्यात मीपण होतोच.) तेव्हा गर्दीत उभ्या उभ्या मनात विचार आला, जसं मुंबईला आणि मुंबईकरांना वेळ या वस्तूत फार रस आहे, तसाच भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहराला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल आहेच की. मग मी पाहिलेल्या शहरांबद्दल विचारचक्र सुरु झालं. पहिल्यांदा अर्थातच आठवली आमची मुंबई. पुलंनी म्हटल्याप्रमाणे, मुंबईला वेळेचं महत्त्व फार.

घडवून आण मग बोल…

लेखक आर्णव यांनी बुधवार, 02/01/2013 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
जग बदलण्याची जिद्ध तुझी, कुठेतरी मनातच आहे खोल. आधी स्वतःला बदल मित्रा, घडवून आण मग बोल. विचारांच्या गर्दीत वाहून जाताना, तुझे कोणते, तुलाच कळेनात. तुलाच बदलावं लागणार आहे राजा कळून देखील का बर वळेना निर्धाराचे शीड प्रयत्नांची नाव आणि नावाड्या तूच अनमोल पैलपार जाणे आहे घडवून आण मग बोल पायाभरणी कल्पनेची क्रियेचा कळस मग देईलच यश तुला देव पण आळसाच्या दलदलीतून वाट आहे पाय जमिनीवर जपून ठेव प्रत्येक तुझ्या कृत्यामागे विचार तुझे असोत सखोल अरे पूर्ण होईल, तू सुरु तरी कर घडवून आण मग बोल तुझ्यासारख्यांनी इथे कल्पनेतच रमायचं त्यात हरवून, त्या साकारण्या आधीच दमायच न केलेल्या प्रयत्नातून न मिळा