लेख लिहावा की न लिहावा हे नक्की होत नव्हतं, पण माझ्या सर्व जालीय मित्रांच्या हे नजरेला पडलं असेलच असं नाही म्हणून मुद्दाम लिहितोय.
मिडीयावर, जालावर, वृत्तपत्रांमधून आणि एकूणच सर्व समाजचव्हाट्यावर बलात्कार, पीडीतांना न्याय, बलात्कार्यांची मानसीकता यावर उहापोह चालू आहे. ह्या सर्व मंथनातून काही चांगले कायदे, अंमलबजावणीत सुसूत्रता व कठोरता, समाजाच्या एकूण मनोवॄतीत सुधारणा वगैरेर फायदे झाले तर ते निश्चीतच चांगले ठरेल.
भेदरलेली जनता सध्यातरी रोज न्यूज चॅनलवर कोकलणार्या पॅनेलीस्टना पाहाणे याखेरीज काहीही करू शकत नाही.