Skip to main content

कदाचित

लेखक जयवी यांनी शनिवार, 16/03/2013 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
सुखासीन आयुष्य अळणी कदाचित चवीला व्यथाही जरूरी कदाचित म्हणावे तशी ती न जगली कधीही जराही असोशी नसावी कदाचित पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी तुझी भेट झाली असावी कदाचित जरा लांबलेलीच ती रात्र होती दिशाहीन झाली असावी कदाचित नको आणखी कोणताही उतारा नशा वेदनांची पुरेशी कदाचित उभा जन्म गेला करूनी गुलामी हिशेबात अजुनी उधारी कदाचित पिते ताक फुंकून फुंकून अजुनी कुणी पोळलेली असावी कदाचित सुखालाच केले म्हणे जायबंदी बरळणे असावे खरेही कदाचित जयश्री अंबासकर
काव्यरस

दुल्हेराजा....

लेखक मन यांनी शनिवार, 16/03/2013 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
गोविंदाचा दुल्हेराजा मी नक्की किती वेळेस पाहिला असेल ह्याचीही नोंद ठेवणं सोडून दिलय. हा चित्रपट म्हणजे जितेंद्रचा कसा "हिम्मतवाला" हा आयकॉनिक चित्रपट होता; "ब्रँड-जितेंद्र" हा दृढमूल कलडरणारा आणि ती क्याटेगरी ठसठशीत मांडणारा होता; तसाच "ब्रँड गोविंदा" स्पष्ट, लख्ख मांडणारा म्हणजे दुल्हेराजा. . दुल्हेराजा म्हणजे गोविंदा -रविना नायक - नायिका असा लक्षात राहण्यापेक्षाही चटकन आठवेल तो कादर खान- गोविंदा ह्यांची जुगलबंदी म्हणूनच.

माझी गडचिरोली सफर - एक थरारक अनुभव.

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 16/03/2013 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
"गडचिरोली" नाव ऐकुनच डोळ्यासमोर काही येत असेल तर ते घनदाट अरण्य आणि नक्षलवादी ... बाकी याबद्दल काही माहित होते तर ते एवढेच की महाराष्ट्राच्या एखाद्या कोपर्‍यात वसलेले गाव.. की जिल्हा... की जंगल असावे.. पण तो नक्की कोणता कोपरा हे देखील मी कधी महाराष्ट्राच्या नकाशावर शोधण्याचे कष्ट घेतले नव्हते.. पण माझ्या गावीही नसलेल्या ह्या गावी मला आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर जावे लागेल हे माहित नव्हते.. मी अभिषेक नाईक, अका तुमचा अभिषेक, शाळेतील एक हुशार मुलगा, पण मुळातच अभ्यासाची आवड नसल्याने आणि आळशी स्वभावामुळे कसेबसे माझे शिक्षण झाले. आणि झालो एकदाचा स्थापत्य अभियंता. मुंबईतील V.J.T.I.

दिवे देत नाही

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 16/03/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका कवीच्या, गाली होत्या खळ्या चष्मा उचलून म्हटले "ते", अल्सर आहे खुळ्या पुन्हा होती कवितेत, काळजामधे चिता पुस्तक काढून म्हटले ते, पोर्शन कुठे होता जास्वंदीच्या ओठांना, भुंगा दंशून गेला स्केच काढून म्हणाले, ओठ कुठे गेला मी ही आता ठरवलंय, हुश्शार जरा होऊ लपून छपून झाडीमधे, टोचा मारत जाऊ.. कविता आता शिकणारै, मेडीकलला जावून कथा लिहून देईन बाई, टॅलीक्लास लावून तरीदेखील म्हणेल कुणी , हद्द झाली बाई म्हणेना का लगेच आम्ही, दिवे देत नाही - संध्या अवांतर :कवितेत काही शास्त्रीय चुका असतील तर कळवाव्यात ही नम्र विनंती. अतिअवांतर :दिवा घेणे हा शब्दप्रयोग अन्यत्र हलकेच घ्यावेसाठी रूढ आहे.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०६ : रेनडियर सफारी आणि हुर्टीग्रुटन क्रूझ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 15/03/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

हा दोष ना कुणाचा (कविता)

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 15/03/2013 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा - संध्या (एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा )

वाट

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 15/03/2013 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची वाट पाहायची तिला सवय झाली होती. नेहमी. येणं नक्की झालंय म्हणताम्हणता किती वेळा रद्दही व्हायचं. आणि मग तो आला की भरपूर गर्दी. ओळखीचे आणि अनोळखीही त्याला भेटायला यायचे. येणा-या गर्दीच्या डोळ्यांत अभिमान असायचा; चेह-यावर हसू असायचं; वातावरणात आनंद भरून जायचा. ते पाहताना ‘तो फक्त आपला नाही’ याचं दु:ख ती विसरून जायची. एक दिवस तार आली. तो गेला होता.

बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 14/03/2013 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग २ - मुल्हेर, उद्धव महाराज समाधी --------------------------------------------------------------------- मोठ्या कष्टानी फोटो टाकलेले आहेत.

गणपतीला जानवे कोणी घातले ?

लेखक शरद यांनी गुरुवार, 14/03/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीला जानवे कोणी घातले ? आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू. महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे.

वाड्यातील भांडणे-भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 14/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी.
काव्यरस