Skip to main content

भारत "गॅस" वर

लेखक पेस्तन काका यांनी सोमवार, 26/08/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात गॅस कधीहि फुटु शकतो. सुत्रानुसार सरकार घरगुती गॅस म्हणजेच एलपीजीच्या किमतीचाही आता डीझेलच्या धर्तीवर दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला आढावा घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे दरमहिन्याला गॅसचे किंमत १० रुपयाने वाढण्याची शक्यता आहे. आणि येत्या ३ वर्षात संपूर्ण सबसीडी टप्प्याटप्प्याने तीन वर्षांत पूर्णपणे रद्द करण्याबाबतचे संकेत दिले आहेत.

तुही नाही मीही नाही …………. !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/08/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुही नाही मीही नाही …………. प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ……… पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ……… सहजच घडते अशी असते भेट, पण साधला योगायोग कधीच ….

कट्-वडा!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 26/08/2013 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
काय! काय!! काय!! म्हणायच तरी काय म्हणते मी! ऊठ सुट मिसळ! मिसळ!! अन मिसळ!! नाही म्हणजे आम्ही ऐकायच तरी किती म्हणते मी? अगदी एका आयडीचे नावसुद्धा मिसळ्पाव असाव? कोण मिसळ्प्रेमी ! कोण उठुन नुसते मिसळीचे फोटो टाकून शंभरी गाठतो? ऑ? काय आहे काय? अहो या मिसळीलाच झणका देणारा आणखी एक भन्नाट प्रकार आहे याची कुणाला जाणीवही नसावी? अगदी उड्या मारुन मारुन जाऊन मिसळी खाता तेथे काळ्या फळ्यावर खडुने लिहीलेले हे नाव तुम्हा कुणाला दिसु नये? उगा नव नव्या चवी चाखणार्‍यांना हा ही पदार्थ चाखुन पहायची उर्मी येउ नये? आता म्हणाल अपर्णाबाय एव्हढा का उमाळा फुटलाय या पदार्थाचा? का? का फुटु नये?

एक आगळी वेगळी पाऊस कविता

लेखक जुईचे फूल यांनी सोमवार, 26/08/2013 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसात तुझ्यावर काही लिहिलं नाही लिहावंसं वाटलं. बऱ्याच दिवसात मनासारखं काही केलं नाही करावंसं वाटलं. तू पडतोच आहेस रे माझ्या लहानपणापासून मीच खूप लांब आले तुला तिथेच सोडून बऱ्याच दिवसात मनाची कवाडं उघडली नाहीत उघडावीशी वाटली. बाहेर सगळे चांगलेच आहेत पण माझे कुणीच नाहीत खरंतर मी सुद्धा परकी झालेय माझी उरलेच नाही बऱ्याच दिवसात आपलं कुणी भेटलं नाही भेटावसं वाटलं. मला वाटलं तू खोटा झालास माझा पैसा खरा केलास पण तू अजूनी तसाच माझा पैसा खोटा केलास बऱ्याच दिवसात बालपण जगलेच नाही जगावसं वाटलं आज तुला पाहिलं पूर्वीसारखंच निरखून आज तुला पहिलं पूर्वीसारखंच हरखून बऱ्याच दिवसात स्वत:ला विसरलेच

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 26/08/2013 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)

सेन्टी मेन्टी : Status Update

लेखक सुहास.. यांनी रविवार, 25/08/2013 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
लाईफ म्हणजे स्साला छळ असतो, कधी ते आळसावलेल्या मांजरासारखं निपचिप पडुन असतं, तर कधी चंचल हरिणीसारखं सैरवैर धावत असतं.....कधी सिंहावलोकन करीत चौफैर लक्ष ठेवुन असतं तर कधी दर्ष्टीहीन सापासारख केवळ आशेचा फुत्कारावर अडथळे शोधत वेटोळं चालत असतं ................... सोमवारी पुणे - चेन्नई गो-एयर च्या फ्लाईट ने अक्षरशः छळ मांडला. फ्लाईट हवेत शिरल्यापासुन थडथडत होती. पण शेवटच्या वीस मिनीटात, उतरताना अक्षरश: आपण लामण-झुल्यावरून झुला खाली येताना जशी ग्रिप जाते तशी हाता-पायाची ग्रिप गेली होती. दहा-बारा सेकंदाचा वेळ असेल पण त्या हाय एसीत ही घाम फुटला.

प्रतिज्ञा, दाभोळकरांचा मारुती आणि सान्ताक्लॉज

लेखक पुष्कर जोशी यांनी रविवार, 25/08/2013 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
भारत माझा देश आहे। सर्व भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे। आपण लहानपणी शाळेत असताना हि प्रतिज्ञा रो

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

बळी आणि कत्तलखाना

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 25/08/2013 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
(तथाकथित) धार्मिक कार्यासाठी पशू पक्ष्यांचा 'बळी' देणे ह्यात आक्षेप नेमका कशाला आहे ? सर्वसाधारण पूजा, अर्चा, नवस, व्रत वैकल्ये ह्या वरचे आक्षेप आणि त्यात 'बळी - दान' आले कि येणारे आक्षेप हे एकदम वेगळ्या लेव्हल जाते... नेमके काय होते? जर केवळ हिंसा हा मुद्दा असेल तर व रोज खाटिकखान्यात अश्या पशु पक्ष्यांची कत्तल होणे हा त्याच्या कितीतरी पट मोठा मुद्दा व्हायला हवा ना ? बाय द वे, काही यज्ञ विधींमध्ये कोहोळा एका घावात कापणे असा विधी बघितला आहे...तो काही बळी सदृश प्रकार (प्राणी नाही तर फळ) असावा कि काय असे हि वाटते?

नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 25/08/2013 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
ब देशाचा राजा: तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात. अ देशाचा राजा: आपले कारीगर , आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू. कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले. कारीगराने नाणे बनविले, ब देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते. आता ब देशाला अ देशाच्या एका नाण्यासाठी ४ नाणे द्यावे लागतात.