Skip to main content

आज ग. दि. मा यांचा स्मृती दिन

लेखक psajid यांनी शनिवार, 14/12/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ग. दि. मा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये शेटफळे या गावी झाला. अभंग, भावगीत, बालगीत, लावणी, आरत्या, भूपाळी, अंगाई, समूहगीते, राष्ट्रगीते इत्यादी बरोबरच 'दो आंखे बारह हाथ', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' यासारखे दर्जेदार चित्रपट लिहणारे अद्वितीय शब्दप्रभू ! 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'कानडा राजा पंढरीचा' या सारखे अभंग, 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' या सारखी बालगीते, 'जाळीमंधी पिकली करवंध', 'बुगडी माझी सांडली गं' यासारख्या लावण्या लिहणाऱ्या गदिमांनी 'जग हे बंदिशाळा' सारखे कटू सत्य जगापुढे मांडले.

जात कुठून आली ह्या गोष्टीत

लेखक विदेशी वचाळ यांनी शनिवार, 14/12/2013 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ मध्ये देवयानी खोब्रगाडे यांच्याबद्दल बातमी वाचली. थोडेसे खटाकले. नाचक्की झाली वैइगेरे लिहून आले होते. पण काही गोष्टी जाणीव पूर्वक किंवा अजाणतेपणी वगळल्या होत्या. प्रतिक्रिया बघताना लक्षात आले की त्या येथे येऊन केवळ २० दिवस झले आहेत. एवढ्यात वीसा गैर व्यवहार आणी मानवी तस्करी करणे शक्या तरी आहे का? तासेही मानवी तस्करी हा शब्द भलताच जोरदार आहे. तस्करी म्हणजे, माझ्या मते, बिना वीसा चे लोका देशात घुसवणे. पण सदराहू कामवली (जिला त्या कमी पगार देत होत्या हा त्यांच्यावर आरोप आहे. माहिती नाही की २० दिवसात हा आरोप कसा लागू शकतो. पगार पण ३० दिवसानंतर मिळतो.

फसवणूक

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 13/12/2013 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका डॉक्टरांशी गप्पा मारत होतो ,डॉक्टर तसे जवळचे मित्रच आहेत ,पण बोलता बोलता त्यांनी जे संगितले ते अतिशय धक्कादायक होते ... आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्‍या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे . पण या उपचारात जे पुरुषाचे बीज वापरले जाते , ते नक्की त्याच जोडप्यातील पुरुषाचे असते का? तर याचे उत्तर धक्कादायक आहे. हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे . मूल कशासाठी हवे असते ? तर आपला जेनेटिक वारसा /डीएनए / वंश पुढे चालू राहावा यासाठी.

ढाण्या वाघ सुटला

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 13/12/2013 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आया रे आया रे आया आरे आया रे आया रे आया बॉडीगार्ड... दुख भरे दिन बीते रे भईया, अब सुख आयो रे.. sher ki dahaad ये देश है वीर जवानों का, अलबेलों का मस्तानों का इस देश मे यारो.. लोकहो, आनंदाने नाचा, गा. आज बब्बर शेर बाहेर येणार.
कृष्ण भगवान को भी जेल कि दीवारें कभी रोक नही पायी. एकेक करते सभी ताले टुटते गये.. भईया, उसी कृष्ण यादव का ललवा भी उसी नक्शेकदम पे चलके बाहर आया है. जेठ राम थे साथ में.

घायाळ मी हरिणी...

लेखक शोधा म्हन्जे सापडेल यांनी शुक्रवार, 13/12/2013 19:10 या दिवशी प्रकाशित केले.

हा लेख खूप दिवस डोक्यात होता. पण लिहायला जमले नाही आणि माझा पिंड लेखकाचा नाही असं मला वाटायचं. पण सध्या असं वाटायला लागलं की लिहिण्याची गरज आहे. गेले काही दिवस समलैंगीकतेवरून चर्चांचा बाजार उठला आहे. काही बुद्धीवादी, “पटाइत” लोकं तर स्वत:लाच निसर्ग समजून, जगातील सर्व गोष्टींना नैसर्गिक आणि अनैसर्गिक, उत्कर्ष-विनाश, असं वेगळं करू लागली आहेत. म्हणून मग विचार केला की आपणसुद्धा का नाही चार शब्द लिहावेत? म्हणून हा खटाटोप.....

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 13/12/2013 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत. या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही.

माझे सल्ले

लेखक सदासुखि यांनी शुक्रवार, 13/12/2013 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
काहि दिवसांपासुन मला (उगाचच) असे वाटत आहे कि मी सल्ले (प्रवचन?) छान देऊ शकते.उदा. ऑफीस चा ताण कमी कसा करावा, बॉसचा त्रास कसा टाळावा,मुलांबद्द्ल जास्त काळजी वाटल्यास काय करावे,आई रागवल्यास काय करावे? इ. पण कसे आहे आपण दिलेला सल्ला लिखित रुपात राहिला तर्?असे मला वाटले म्हणुन इथे लिहित आहे.(खरं तर तसे मी सल्ले(मुलाच्या शब्दात प्रवचन ) खूप देत असते नवरोजींना.पण ते तुळ राशीचे असल्याने प्रतिक्रिया देत नाहीत.कदाचित त्यांना बॉस खूप त्रास देतो म्हणून माझे सल्ले काम करत नसतील.असो म्हणूनच इथे प्रतिकिया काय मिळतात ते पहायचे आहे!) सल्ला १- काहि बॉस उगाचच रागवत असतात(आणि रोजच) .

अत्तर

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 13/12/2013 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
बादशहांच्या दरबारात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमंत्रितां समोर दौलतीची शान मिरविण्यासाठी बादशहा, बीरबल समारंभाच्या तयारीकडे जातीने लक्ष पुरवित होते. काही नोकर चांदीच्या अत्तरदाण्या घेऊन आले. बादशहांना पाहून सलाम करत होते. या गोंधळात एकाच्या हातातील अत्तरदाणी पडून अत्तर उंची गालीचावर सांडले. न राहवून बादशहाने ते चटकन बोटाने टिपून आपल्या अंगरख्याला लावले. बीरबलाकडे पाहताच बादशहा खजील झाले. बीरबल मिश्कीलपणे हसत होता. बादशहाने रागारागाने आपल्या अधिकार्‍याला हुकूम फर्मावला, की तेथे असलेल्या हौदात पाण्याऐवजी अत्तर भरा.

गाणं की खाणं?

लेखक बुडबुडा यांनी शुक्रवार, 13/12/2013 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि.१२/१२/१३ पासून सुरु झालेल्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये 'गानप्रेमी' रसिकांपेक्षा 'खाणं'प्रेमी रसिकच जास्त होते असं मला वाटत.पोट भरण आणि ते रिकाम करण हे नैसर्गिकच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याचा गाजावाजा किती आणि कुठे करावा याचे मात्र भान राखले पाहिजे. जर या दोन्ही पैकी एकही गोष्ट होत नसेल तर गाजावाजा करण ठीक आहे. :P मध्यंतरामध्ये निवेदक काही जाहिराती वाचून दाखवत होते आणि माझ्या शेजारी बसलेल्या टिपिकल पुणेरी नाकात बोलणा-या कुटुंबातील एक जण 'वाह.. व्वा.. Heaven' अस ओरडला. आता जाहिरातीमध्ये याला काय भारी वाटले म्हणुन त्याच्याकडे बघितले तर महाशय थालिपिट खात होते..बर तो मराठी नसता..

('अ-विचारजंती'- एक विकृती - बद्धकोष्ठ विनाशाचा मार्ग)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 12/12/2013 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
'अ'विचारजंतांवर काही म्हणायचा आधी इंटरनेट (आंतरजाला)च्या निर्मीती प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या संगणकीय भाषेत म्हणायचे झाले तर अर्पानेटच्या पहिल्या वापरापासून इंटरनेट वापर प्रक्रिया सुरु आहे. ह्याच इंटरनेटचा वापर करून 'विभिन्न तत्व' लेखकू कपाळकरंटेपणाणे (वैचारिक भाषा) एकत्र आले आणि आजची आंतरजालिय लेखन सृष्टी डोळ्यांसमोर आहे. आमच्या सारखे असंख्य लोक आंतरजालाच्या व्यासपीठाला मानणारे, लोकांच्या मते ह्याच व्यासपीठाच्या माध्यमातून अनेकाविध विचारधारा एकत्र होण्याची इच्छा निर्माण झाली आणि आंतरजालिय लेखनाची सुरवात झाली.