Skip to main content

मँगो मलई लड्डू/लाडू

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 08/09/2014 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः पाकृत टिन्ड मँगो पल्प/प्युरे वापरलाय. हापुस आंब्याचा सीजन निदान आता तरी संपलाय. ladoo 1 वेल खरं तर बाप्पाच्या आगमनाआधी हि पाकॄ द्यायची होती पण राहून गेली. पण हरकत नाय...एकदा ट्रायल बेसीस वर करुन बघा. जमली/आवडली तर पुढल्या वेळेस करुन दणक्यात पेश करा.

अ‍ॅ अक्षराच्या लेखन वाचनातील समस्या आणि प्रमाणीकरण

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/09/2014 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण काही वेळा समस्यांनाही एवढे सरावलेले असतो कि नियमीत भेडसावणारी गोष्ट समस्या वाटेनाशी होते.

र्‍य आणि ऱ्य पैकी अधीक बरोबर कोणता ? आणि का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 08/09/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
र्‍य आणि ऱ्य हे दोन्ही वेगवेगळे आहेत का ? तर उत्तर होकारार्थी आहे. उदाहरणार्थ इथे मिपावर टाईप होतोय तो पहिला र्‍य आहे. हे दोन्ही साध्या डोळ्यांनी सर्वसाधारणपणे सारखेच दिसतात तर वेगळे ओळखायचे कसे ? न्याहाळकाच्या (ब्राऊजरच्या) कंट्रोल F मध्ये यातला एक एक र्‍य आणि ऱ्य वेगळा वेगळा घेऊन शोध घ्या, दोन्ही र्‍य एकमेकांना शोधात ओळखत नाहीत हे दिसून येईल.

आमचे गणपती-(बसतात..!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 08/09/2014 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
भली पहाट, या शब्दाचा अर्थ मला माझ्या या पौरोहित्याच्या कामात अनेक अंगानी उमगलेला आहे.पण त्याची खरी किंमत कळली, ती या गणपतिच्या प्राणाला-प्रतिष्ठा देणार्‍या त्याच्या उत्सवाच्या,या पहिल्या दिवशीच!.. वेदपाठशाळेतून-सुटून,कामाला लागलेल्या गुरुजिपणाच्या पहिल्या ३ वर्षात (हाय..हाय..!) ही खरी चव चाखायला मिळते. तर...आदले दिवशी संध्याकाळी..आमचा बाप,हा वाड्यात आपले कार्टे जिथे दिसेल तिथून हकलत असतो.

पेरू : भाग ११ : लोकजीवन

लेखक समर्पक यांनी सोमवार, 08/09/2014 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.

कोकणातली भुतं

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोकण, या नावात भरपूर काही साठवलय. त्या महासागरांच्या पोटात ज्या गोष्टी दडल्यात ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी आमच्या कोंकणात आणि इथल्या माणसांमध्ये दडल्यात. आता कोकण म्हणजे नदी नाले डोंगर दऱ्या हे सगळं आलंच पण या सगळ्याबरोबर एक इनबिल्ट गोष्टंसुद्धा येते ती म्हणजे कोकणातली भूतं. लहानपण गेलं ते यांच्या गोष्टी ऐकण्यातच आणि अनुभवण्यातपण त्यातलेच काही मोजके गमतीदार किस्से खाली दिलेत. रात्रीची वेळ होती आणि अचानक वीज गेली. आता कोकणात पाऊस कधी पडेल आणि वीज कधी जाईल याचा काही भरवसा नसतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे लगेचच घामाच्या धारा लागल्या.

आदि कैलास, ॐ पर्वत दर्शन यात्रा, पार्वती सरोवर परिक्रमा. भाग - ११

लेखक खुशि यांनी रविवार, 07/09/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
बारावा दिवस. १४ किमीवरील जॉलिंगकाँग; म्हणजेच आदिकैलास-पार्वती सरोवर. उंची १५,७०० फूट. आधी चहा, नंतर बोर्नव्हीटा आणि आलूपराठ्यांचा नाश्ता करून सहा वाजता निघालो यात्रेच्या सांगतेकडे. वाटेत दोन ग्लेशियर पार करावे लागले, पण आता आम्ही अनुभवाने शहाणे झालो होतो. अगदी सहज पार झालो. कठीण चढ-उतार आहेत, पण फुलांच्या गालिच्यांचे सान्निध्य थकवा जाणवू देत नाही. पहाडाच्या भिंतींवर छोटी छोटी बिळे बनलेली पांडेजीनी दाखवली. जोरात वारा वाहतो, त्याच्या घर्षणाने अशी बिळे तयार होतात, असे म्हणाले पांडेजी. या बिळांमध्ये पक्षी घरटी बनवतात. आम्हांला त्या बिळांतून ये-जा करणारे चिमुकले पक्षीगण बघायला मिळाले.

विवाह मुहुर्त

लेखक भिंगरी यांनी रविवार, 07/09/2014 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो. तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का? मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि मुहूर्त का पहिला जातो? खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? (हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.) साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का? (प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.) भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का? या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?

आठवणी

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 07/09/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात. ७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing.