Skip to main content

विशेष वागणूक

लेखक नितीन पाठक यांनी शुक्रवार, 13/02/2015 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मोठ्या दिमाखात झाले. जगभरातील १४ संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. आपला भारतीय संघ अँडलेड येथे आपल्या होणा-या सामन्यासाठी उतरला आहे. या हॉटेलपासून ३००-४०० मी अंतरावरच अँडलेड ओव्हल स्टेडियम आहे. आपले खेळाडू विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे स्टेडियम वर जाण्यासाठी चालतच निघाले. परंतु या दोघांकडे फारसे कोणीही लक्ष दिले नाही. हे दोघे रस्ता ओलांडत असतांना नेहमीप्रमाणे पादचा-यांसाठी काही क्षण मोटारी थांबत आणि लगेचच पुन्हा वेग घेत होते. या दोघांकडे एकाही नागरिकाने वळूनही पाहिले नाही.

अधूरी एक कहाणी

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 13/02/2015 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
टक् टक्... 'आत्ता एवढ्या सकाळी आणि ते ही इथे मला भेटायला कोण येणार?' थोड़ वैतागत... थोड़ आश्चर्य वाटून लेखक महाशय दार उघडायला आले. एका कादंबरीच्या लेखनासाठी एक प्रकाशकाच्या आग्रहा वरुन ते थंड हवेच्या ठिकाणच्या त्या प्रकाशकाच्या बंगल्यावर काही दिवसांकरता आले होते. येऊन दोन दिवस झाले होते तरी त्यांना कथेचा प्लॉट सुचत नव्हता; त्यामुळे लेखक महाशय थोड़े वैतागले होते; आणि त्यात सकाळीच दार वाजत होते. दार उघडल तर एक माध्यम वयीन महिला कंबरेवर हात ठेऊन उभी होती. दार उघडल जाताच ती तरातरा आत आली आणि एका खिड़कीच्या दिशेने गेली. जाताना एक खाष्ट कटाक्ष तिने लेखकाकड़े टाकला.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/02/2015 00:08 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

भाग 2 इंदूर – देवास - सारंगपूर

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत मध्य प्रदेशात येतात तेंव्हाच्या कथा भागातील मजा मजा सादर...

पान 60 इंदूर ... मध्य प्रदेशाची राजधानी होती. इंदूरवर अस्सल मराठी छाप दिसते. भाषेचा गोडवा कानात साठवावा असा. मराठीला उर्दू-हिन्दी शब्दांची खमंग फोडणी... ‘अरे यार माजरा काय आहे? खमखा चिल्लावून राहिलाय ? इतका शोर मचून का राहिलाय?... ... इंद्रेश्वर मंदिरामुळे याला इंद्रपूर म्हणत. पुढे इंदूर - इंदौर असा अपभ्रंश झाला...राजवाड्या पुढच्या गोयल मंदिरा शेवटी खास मिठाईची गल्ली आहे.

लग्न .... एक घटना

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 12/02/2015 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली घटना.... तारीख:20 डिसेम्बर 1990. स्थळ: साठे कॉलेजच्या जवळील चहाची टपरी वेळ: दुपारी 12.30 पात्र: तृतीय वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सागर:हाय चैताली. चैताली मैत्रिणींबरोबर क्लासला जायला निघाली होती. एकीने तिला कोपराने ढोसल. दुसरीने डोळा मारला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चैताली उत्तरली, "हाय सागर". सागर:कुठे क्लासला का? मी पण निघतोच आहे. एकत्र जाऊ या? चैतालीने काही म्हणायच्या आत मैत्रिणी हसत म्हणाल्या,"बाय चैताली. आलिस तर क्लासला भेटु. तू ये सावकाश. आम्ही पुढे जातो." मैत्रिणींना डोळे मोठे करून दाखवत चैताली सगरच्या दिशेने वळली.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 12/02/2015 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग..यातल्या प्रेम आणि वात्सल्याच्या या आहुतीला.. सांगता कधिच नसते.असूही शकत नाही. कारण ज्या दिवशी ह्याची सांगता होइल..त्या दिवशी लौकिक अर्थानी हे जग संपलेलं असेल.! पुढे चालू.... ============================= तर असं हे आमचं प्रतिवार्षिक अनुष्ठान. आमच्या निरनिराळ्या गमती जमती, गुरुजिंचे आणि त्यांच्या आलेल्या मित्रांचे वादविवादांचे नाना प्रकार..धर्म अधर्माच्या चर्चा..आणि एखादा कार्यक्रम शिस्तबद्ध रितीने कसा करावा? याचं आंम्हाला एक प्रकारचं प्रशिक्षण.., असं सर्वकाहि देऊन संपायचं.

PMPL ने प्रवास का करावा?

लेखक सह्यमित्र यांनी गुरुवार, 12/02/2015 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
PMPL चे वाढते दर आणि खालावत /जाणारा सेवेचा दर्जा ह्या कडे बघता असा प्रश्न मनात येतो. तसेही पुण्यातील बहुतांश लोक PMPL च्या वाटेला जात नाहीतच . तरीही एक गणित मनात आले ते येथे मांडत आहे : १. उदाहरण दाखल धायरी ते राजाराम पूल / स्वारगेट / पुणे स्टेशन / हे तीन दर बघू २. हे तीन दर अनुक्रमे १०/ २० / २५ असे आहेत. अंतर अनुक्रमे (साधारण ) ५/१०/१२ किमी आहे. म्हणजे प्रती किमी २ रुपये दर पडतो आता हेच जर स्वतःच्या दुचाकीने जायचे असेल तर गणित काहीसे असे येईल : १. बजाज डिस्कवर सारखी चांगले मायलेज देणारी गाडी साधारण ५०००० रुपयांना पडते २. पेट्रोल cost : ६५ च्या मायलेज ने १ रुपया प्रती किमी ३.

नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 12/02/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
लाकूडतोड्याची गोष्ट या संजीव खांडेकर यांच्या दीर्घ कवितेचा संक्षेप एका संध्याकाळी एक लाकूडतोड्याटाईप गरीब इसम एका नदीकिनारी आपले कपडे धूत होता. ....... तर घाईमुळे धुता धुता अचानक त्याच्या हातून त्याची 'स्किन' निसटली आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात लांबवर वाहून जाऊ लागली. पोहता न आल्याने व एकुलती एक 'स्किन' वाहून गेल्याने आता आपल्याला नागडेच राहावे लागणार नागडेच शहराकडे परतावे लागणार या जाणिवेने लाकूडतोड्या शहारला ..... तू कशाला काळजी करतोस?" एवढे म्हणून भगवान स्वतःच नदीच्या पाण्यात उतरले. एका डुबकीतच त्यांनी निळ्या रंगाची, नवीकोरी, लेबलसहित असल

भाजपचा बुडबुडा फुटला - लालू प्रसाद

लेखक आकाश कंदील यांनी गुरुवार, 12/02/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला प्रश्न पडतो कि भाजपचा खरेच बुडबुडा आहे का, मला तरी हे पटत नाही. आजच्या घडीला आर्धाच्या वर भारताला कवेत घेणारा पक्ष खरेच बुडबुडयाच्या स्वरुपात आहे काय ? मला वाटते 'आप' आणि भाजप यामध्ये निवड करताना बर्याच जणांची द्विधा मनस्थिती झाली असावी. मला वाटते दिल्लीतील भाजपच्या अवस्थेला तीन प्रमुख मुद्दे असावेत १. राष्ट्रपती शासनाचा मोठा काळ हा निर्नायकी काळ भाजपच्या माथी मारण्यात केजू यशस्वी झाला. २. किरण बेदी यांची मुखमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवड (आतिशय कर्कश्य उमेदवार) ३. कॉग्रेसचे खच्चीकरण भाजपचे मला न पटलेले (अजून तरी) दोनच मुद्दे आहेत १.

<<<< चालचलाऊ मिपा>>>

लेखक जेपी यांनी गुरुवार, 12/02/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी, बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही. खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही. समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे, काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण. पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती. या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग. लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो. लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती , कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती, मिपा म्हणे 'जेपुना | हा कुठला बे पळपुटेपणा ? पहिल्याने तर टणाटणा | उडत होता लिहाया, मारे धाग्यावर बैसला | प्र

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे..

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 12/02/2015 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...

1

मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती.