Skip to main content

श्रीगणेश लेखमाला ७ : अनुभवांची शिदोरी

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 24/09/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
'अ गुड फील्डवर्कर विल मॅरी इंटू द कम्यूनिटी ही/शी इज वर्किंग विथ, दॅट्स द ऑन्ली वे टु मेक देम ट्रस्ट यू' फील्डवर्कवरच्या व्याख्यानात अंदमानी भाषांवर परिश्रमपूर्वक काम केलेल्या बाईंनी मिश्कीलपणे म्हटलं आणि आमच्या हॉलमध्ये खसखस पिकली. पण फील्डवर्करमध्ये आपल्या कॉलेबरेटर समाजाबद्दल किती आत्मीयता असली पाहिजे, हा मॅडमनी त्यांच्या एकूणच व्याख्यानात सांगितलेला मुद्दा, तो मात्र मनात पक्का ठसला. फील्डवर्क म्हणजे काय, याची काही व्याख्या करण्याइतका माझा अजिबातच अनुभव नाही. प्रत्येक क्षेत्राची काम करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे ही व्याख्या क्षेत्रानुसार बदलत असावी.

लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि,

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 23/09/2015 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय लोकमान्य, खूप दिवस तुमच्याशी बोलावे असे मनात होते. सद्य परिस्तिथी तुम्हाला ठावूक असणे खरच निकडीचे आहे. तुमच्या सारख्या प्रज्ञावंत, दूरदृष्टी असणाऱ्या, खंबीर आणि लोकमान्यता असणाऱ्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. तुम्ही म्हणाल कि, मग तुमच्यात असा कुणी नाही का? असतील हि, पण कोशात गुरफटून बसले असतील, प्रत्येकलाच दुसऱ्यांनी कुणीतरी हि जबाबदारी घ्यावी असे वाटतय. असो. पण आता तुम्हाला आठवण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव. तुम्हीच सुरु केला न हो हा गणेशोत्सव. घरातला उत्सव, सार्वजनिक केल्याचे श्रेय तुम्हाला आहेच. पण दुर्दैवाने आज केवळ उत्सवच उरला आहे, तुम्हाला आम्ही विसरलोच आहोत.

नेता

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 23/09/2015 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या एका हातात खंजीर आहे दुसर्या हातात नागाचा विषारी दंश आहे एका क्षणी शिव्या देतो दुसर्या क्षणी मधाळ बोलतो. धृतराष्ट्री पुतळा तो नेहमीच समोर ठेवतो. तो मित्र आहे कि शत्रू काहीच कळत नाही. एक मात्र खरं तो सीजर नक्कीच नाही ब्रुटस असू शकतो कदाचित् किंवा नेताहि असू शकतो.

तुकारामा-

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?.....

राधा कृष्ण....... जर...

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
"राधा" घननीळा, का अवेळीच तू या राधेला परत भेटला? विराण आता झाले गोकुळ जुना पुराणा कदंब वठला अता न उरली स्वप्नामधली तरल अनामिक धूसर नाती कुठे पाहसी कृष्णा मधुबन भयाण या अवसेच्या राती कालिंदीचे उदासले जळ अता लोपली त्याची खळखळ नि:शब्दाचे पिसाट वारे ठेवून फिरते उरात खळबळ अता न उरल्या काठावरच्या कुरणातिल चरणाऱ्या गायी टपोर त्यांच्या डोळ्या मधली दूर हरवली वत्सल आई तुझ्या करातील सुस्वर मुरली आठवते केवळ प्राचीनता चैतन्याचा सूर हरवूनी फक्त विराणी गाते आता सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन अता कुठे उरला राधेचा तो पूर्वीचा घननिळ मोहन?
काव्यरस

सनबर्न फेस्टीवल , गोवा , २७- ३० डिसेंबर २०१५

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 23/09/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुर्ण कल्पना आहे की मी हा धागा चुकीच्या फोरम वर टाकत आहे . आमचे येथील कंपुबाज मित्र क्राऊडोफोबियाक , स्वमतांध दांभिक ,टनाटनी, अभ्यासु , मुंबैकर चाकरमाने , आणि प्रापंचिक सांसारिक आहेत , इतर ओळखीचे मिपाकर लोकही ज्येष्ठ नागरिक किंव्वा काथ्याकुटविशारद किंवा अध्यात्मिक तत्वज्ञ किंव्वा डु आयडी किंव्वा फिलॉसोफर्स वगैरे आहेत .... पण तरीही वचने किं दरिद्रता म्हणुन आपले विचारत आहे
यंदा गोव्याला सनबर्न- २०१५ फेस्टीवलला जायचे का ?
सनबर्न हा ख्रिसमस नंतर होणारा एक एलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल आहे जो की २००७ साला पासुन होत आहे .

लुटारू..???

लेखक संजय पाटिल यांनी बुधवार, 23/09/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
ताई आणि भाऊजी उद्या येणार म्हणून फोन आला होता. मग काय आईला काय करू नी काय नको असं झालेलं. एक तर जावई पहिल्यांदाच घरी येत होते. त्यात त्यांना रजा नसल्यामुळे सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणार होते. तसेही बाइक वरून एक तासाचा रस्ता होता. त्यामुळे घरातून निघताना ताई फोन करणार होती. म्हणजे आम्ही तयारीत राहणार होतो. स्वागत, पाहुणचार शेजार पाजारी भेट, दुपारचं जेवण त्यानंतर घटकाभर विश्रांती, संध्याकाळी गावदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन, अन सहा- साडेसहाला प्रस्थान असा भरगच्च कार्यक्रम आई ने तयार करून ठेवला होता. ठेवणीतले बेडशीट - कव्हर बाहेर आले होते. इकडे तिकडे पडलेली रद्दी, कचरा साफ करून झाला होता.

माझी पत्रकारिताः माझे अनुभव

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 23/09/2015 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पत्रकारिताः माझे अनुभव मनाची संवेदनशिलता मरु न देणे आणि सकरात्मकता जपून ठेवणे हे पत्रकारितेतील सर्वात मोठे आव्हान आहे. मागील वीस वर्षाच्या प्रवासात अनेक अनुभवांना सामोरे गेले. प्रत्येक वेळी संवेदनशिलता आणि सकारात्मकतेची कसोटी लागली. पत्रकारितेचे ग्लॅमर भल्या भल्यांना वाहवत नेते. मोहाच्या क्षणी कमजोर न पडता आपले उद्दिष्ट साध्य करणे अवघड असते याचा अनुभव घेताना प्रवाहात टिकून राहणेही आवश्यक असते. अशावेळी प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची किंवा आपल्याकडे दूर्लक्ष होण्याचीच शक्यता जास्त. माझी पत्रकारिता सुरु झाली त्यावेळचे वातावरण महिलांनी या क्षेत्रात यावे की नाही याविषयीच सांशकतेचे होते.

स्क्रिन शॉट भाग -२

लेखक राजू यांनी बुधवार, 23/09/2015 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्क्रिन शॉट भाग - २ आतापर्यंत..... असभ्य भाषेतील वेगवेगळ्या प्रकारचे मेसेंजर वरील मेसेजचे स्क्रिन शॉट पाहुन........छातीत आलेली कळ,धूसर झालेली नजर आणि फुटलेल्या घामाने हार्ट अटॅक आल्यावर जशी अवस्था होते तशी त्याची अवस्था झाली. पुढे चालु..... नखशिखांत हादरलेला अमित आता त्या बसलेल्या धक्क्यातून सावरु लागला. जसजसे मन आणि बुध्दी स्थिर होऊ लागली तसे त्याने सर्वप्रथम आपले फेसबुक अकाऊंट लॉगआउट करुन नेमके काय घडले असू शकते याच्या विचारात गुंतवले. काल रात्रीच अमित व त्याचे काही मित्र एका पोस्टवर कॉमेंट्स मध्ये हँसी मजाकची मस्ती करत होते.

|| सांगा आता आम्ही काय करायचं? ||

लेखक नितिन५८८ यांनी बुधवार, 23/09/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजला जाण्यासाठी बस stop वर तीन बस ची वाट बघत थांबायचं, थोड्याच अंतरावर आम्ही नुस्त तिच्याकड बघत थांबायचं. बस आल्यावर तीन पटकन बस मधी चढायच, तिच्याकड बघण्याच्या नादात आम्ही आपल सगळ्यात शेवटी बस मधी चढायच. आता मुलगी असल्या मुळ तिला बसायला जागा कुणीपण द्यायचं, आम्हाला आपल उभच रहाव लागायचं. सांगा आता आम्ही काय करायचं? बस स्टोपवर उतरल्यावर मैत्रिणींसोबत तीन कॉलेज कड निघायचं, आम्हीपण उगाचच आपल तिच्या मग मग जायचं. जाताना वळून तीन आमच्याकड बघायचं, हळूच मैत्रिणींच्या कानात आमच्याविषयी काहीतरी सांगायचं, त्या मैत्रिणीनीसुधा आमच्याकड बघून हसायचं, हासत हासत त्यांनी वर्गात सुद्धा निघून जायचं. सांगा आता
काव्यरस