बेधुंद (भाग ५ )
बेधुंद (भाग ५ )
'सुऱ्याने' केलेल्या तक्रारीने विद्यापीठाचे सगळे वातावरण तापले .सगळीकडे उदासी पसरली होती . सेनिअर्स जुनिअर्स कडे बघेनासे पण झाले ! ' फर्स्ट एअर ' मधेच तीन प्रकारचे ग्रुप बनले .पहिला - जो सुऱ्या ला तक्रार मागे घ्यायला सांगत होता , दुसरा - जे नित्या अन सुऱ्या च्या बाजूने होते अन तिसरा - जे कोणाच्याच बाजूने नव्हते . रेक्टर ने 'अजीत' ला एका आठवड्याची मुदत दिली होती , की जर सुऱ्या ने तक्रार मागे घेतली नाही तर अजित ला कॉलेज मधून काढलं जाईल ! अन ताकीद दिली कि जर नित्या किंवा सुऱ्या ला कोणी काही केले तर सरळ त्याच दिवशी त्याला काढून टाकले जाईल .
सिनिअर्स ने लगेच सभा बोलावली .
मिसळपाव

