Skip to main content

बंंगालची झालमूरी अन एका मिपाकराची मनकी बात.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 05/05/2026 19:17 या दिवशी प्रकाशित केले.

पश्चिम बंगालच्या राजकारणात बदल हा अपवाद नसून परंपराच आहे. या भूमीने नेहमीच सत्तेला प्रश्न विचारले, विचारसरणींना आव्हान दिले आणि आवश्यक वाटल्यास प्रस्थापितांना नाकारण्याचे धाडस दाखवले. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीने हा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. या निकालाकडे केवळ सत्तांतर म्हणून पाहणे म्हणजे बंगालच्या राजकीय मानसशास्त्राचा अपमान ठरेल; कारण इथे मतपेटीतून उमटलेला कौल हा नेहमीच अधिक खोल, अधिक सूक्ष्म आणि अधिक बहुपदरी असतो, असे म्हणता येते.

झालमुडी....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 04/05/2026 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,

शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.

 

कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?

जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?

 

तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,

शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!

 

"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,

पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.

 

जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,

‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.

दुत्त,दुत्त,दुत्त......

 

कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट

५ राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल २०२६

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 04/05/2026 09:31 या दिवशी प्रकाशित केले.

आज ४ मे २०२६ रोजी भारतातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती येत आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

​सकाळी ९:३० वाजेपर्यंतचे लाईव्ह कल  खालीलप्रमाणे आहेत:

१. पश्चिम बंगाल (२९४ जागा)

​बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे.

शालेय प्रयोग: एक्झिट पोल चुकतात का?

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 03/05/2026 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पहाटे फिरायला गेल्यावर पार्कमध्ये आमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींची मैफिल जमते. बंगाल निवडणुकीच्या सर्वेक्षणावर चर्चा होत असताना सर्वांचे एकमत झाले — बहुतांश एक्जिट पोल चुकतात.

महाराष्ट्र दिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/05/2026 15:08 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मिपाकरांना शुभेच्छा.

 

कर्णकर्कश डि जे च्या आवाजाने नेहमी पेक्षा पंधरा मिनिट लवकरच झोप उघडली.कुंकवाचे कपाळ शेजारीच  ढाराढूर  झोपलं होतं.अजून दोन तासाची निश्चिंती होती. आळोखे पिळोखे देत अंगावरच्या चादरीची घडी घातली. पलंगावरची  विस्कटलेली चादर  निट केली.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥