हा काही तांत्रीक घोळ दिसतोय. संपादनमध्ये गेल्यावर मजकूर तर दिसतोय.
पुन्हा अपलोड करतो.
प्राजु, या प्रयत्नांमध्ये चुकून दोन धागे झाले तर एक उडवण्याची व्यवस्था करा.
नोंद आवडली, सुरेख आहे अशा तुटपुंज्या प्रतिक्रियेवर बोळवण न करता येणारा लेख. तथाकथित शहरी समस्यांत गुरफटलेल्या आमच्यासारख्यांना 'ऐसी भी बातें होती हैं'च्या वास्तवाची जाणीव करून देणारा.
अवांतर - धनंजय वैद्यांचे उदाहरण वाचून 'नावात काय आहे?' हा प्रश्न चुकीचा असल्याची खात्री पटली. :)
सहमत.. अशा गोष्टी असतात्/घडतात कुठे याची तरी जाणीव होते तुमच्या लेखांमुळे.. त्यावर उपाय काय, आणि आपण काय करू शकतो हे न कळल्याने खिन्नता.. :|
बाकी, हा लेख वाचून सतत अतुल कुलकर्णीच्या देवराई मधले म्युझिक वाजत होते कानात.. तुम्ही तो देवराईमधला भाग इतका चित्रदर्शी लिहीला आहे की चित्र पण समोर उभे राहते आणि त्या पिक्चरचे संगीत आठवून आठवून ते अगदी रिअल वाटू लागले वाचताना..
एकेक नोंदी म्हणजे आपण किती क्षुद्र आहोत याची जणू ग्वाहीच देत आहेत.
स्वतःला प्रगत समजताना आपण आपलं जीवन गोठवून टाकत आहोत का? असं वाटून गेलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मोडकसाहेब,
तुमच्या पोतडीतून कधी काय बाहेर काढून वाचायला द्याल सांगता येत नाही.
एवढंच सांगतो की या लेखासाठी मनापासून धन्यवाद.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
>>पर्यावरणीय नीतीशास्त्र याहून वेगळं काय असू शकेल असा सवाल मनात उभा राहतो आणि त्यावर मनच उत्तर देतं, "दुसरं काही नाही. कारण हाच भाग वृक्षवल्ली आम्हा सोयरे... म्हणणारा आहे."
सहमत..खुप सुंदर लिहिले आहे...अजुन असेच लेख वाचायला आवडतील..
विषयाची मांडणी आणि विशेषतः शेवट उत्तम...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अशी लोकं असतात म्हणून अजुनही जगात चांगले घडू शकते हा विश्वास बळावतो.
कोण्त्याही वर्तमानपत्राच्या फ्रंटपानावर यावी अशी आनंद ही व्यक्ति आहे...मग अजुनपर्यंत त्यांच्याविषयी का वाचनात आले नाही?
या नोंदी अशातशा का म्हणता?
महत्त्वाच्या व्यक्तींच्या, महत्त्वाच्या कामांच्या, महत्त्वाच्या स्थानांच्या पण प्रसिद्धी झोतापासून दूर असणार्या या नोंदी आहेत.
जगात माणूस नसता तर अख्खं जग एक देवराई राहिलं असतं असा विचार मनात तरळून गेला.
आणि एक ध्यानी येतं, पाण्याची मुबलकता म्हणजेच स्वच्छता व फ्रेशनेस हे मानसीकच असतं. त्यावर मात करायची असेल तर ती मनातूनच करावी लागेल.
आजअखेर पाण्याचा हा प्रश्न सोसायटीत कायम आहे. तरीही मी फ्रेश आहे!
सह्ही.
at and post : janadu.
कुठेतरि कुणीतरि काहितरि चांगले करते आहे त्याची ओळ्ख झाल्याचे अन त्याने मन उल्हसीत झाल्याच्या भावना जास्ती कि
अशा अनुभवांना पारखे रहाण्याचे जीवन जगत असल्याच्या खेद जास्ती हे सांगता येत नाहि.
धन्यवाद !
लेखन आवडलं म्हणावं की कुंठीत झालेल्या विकासाचं दुःख मानावं असं काहीसं झालंय. लेखनात शिरल्यानंतर वेगळीच भावना मनाचा ताबा घेते. त्यात आपण ज्या ऐहिक पातळीवर जगतो, त्याचीच लाज वाटायला लागते. ज्या गोष्टींचा आपण बाऊ करतो, त्या इतरांसाठी किती दूरच्या असतात, याची जाणव होते. आणि मग अपराधित्वाची भावना पछाडते.
ता.क. बालपण मोखाड्यासारख्या (जि. ठाणे) ग्रामीण भागात गेल्याने यातल्या अनेक समस्यांची कल्पना होती. पण आजही तिथे हीच परिस्थिती आहे, हे पुन्हा पाहिल्यावर फार अस्वस्थ वाटते.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
गुरांसाठी तर या गावची मंडळी तीन महिने तिकडेच मुक्काम करत,
आंबेगाव तालुक्याचा उत्तर भाग म्हणजे जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्याचा पुर्व भाग व पश्चिम भाग यात भौगोलिक फरक. पुर्व भाग नगर जिल्ह्याच्या सीमेवर; दुष्काळाचे प्रमाण मोठे. ७२ च्या दुष्काळात पुर्व भागातील आमच्या बेल्हे भागातील परिसर कोरडा ठणठणीत. आमच्या शेतातील गुरांचे चारा व पाणी अभावी हाल होउ लागले . मग आमची सर्व जित्राबे (गुरे) ओतुर भागात म्हणजे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात माळशेज घाटा जवळ स्थलांतरीत केली होती . काही काळासाठी माझा टिंग्या झाला होता.त्याची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
ह्या प्रकारे गावागावात मुलभूत प्रश्न सोडवणार्या उपायांची आणि कामाची माहिती सर्वांना होइल. लेखात नमूद केलेल्या व्यक्तींची अजून माहिती मिळाली तर चांगले होइल.
-
अफाट जगातील एक अडाणि.
या नोंदी वाचल्या म्हणजे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या समस्या, काळज्या, विवंचना यापासून वेगळ काही जगात घडत असतं याचं भान येतं आणि आपण किती क्षुद्र आहोत, याची जाणीव होते. खरच कमाल!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
संदीप चित्रे वर म्हणतात तसे तुम्ही काय वाचायला द्याल याची कल्पना नसते हेच खरे!
मागेही मी लिहिले होते प्रतिसादात तसेच पुन्हा लिहेन - तुमच्या नोंदी, लेख फार अंगावर येतात. अर्थात त्यात ओलावा असतोच. पण किती त्रासांत माणूस धडपडण्याची पराकाष्ठा करत असतो ते वास्तव जाणवून शहारे येतात.
नोंदी चांगल्या आहेत. अस्वस्थ करणार्या आहेत. बरेचदा वाटते की तुमच्यासोबत येतो म्हणावे म्हणून. पण शक्य होत नाही. (खरे सांगायचे तर: हिंमत होत नाही. कारण एखादी गोष्ट करायची ईच्छा मनापासून असेल तर सारी कारणे दूर सारल्या जातात. असो.)
वर तुम्ही उल्लेखलेली कार्यं बघीतली तर जाणवतं की काम करण्यासाठी कोणत्याही "जाहीरनाम्याची" गरज नसते. ते काम करण्याची गरज असते.
अवांतर: माझे बाबा साकोलीला (भंडारा) होतेत, तेव्हा ते म्हणायचे की, "गावातलं जीवन कठीण असलं तरी तेच आवडतं. " कदाचित त्यांना त्यातला आपलेपणा आवडत असावा.
राघव
सर्वांना धन्यवाद.
प्राजु - अधिक धन्यवाद. लेखाच्या प्रकाशनाचे कष्ट घेतल्याबद्दल.
'काही नोंदी अशातशाच...' या शीर्षकावर हरकती ऐकतो आहे. याआधी पहिल्या भागावेळीही एक हरकत नोंदवली गेली आहे.
असं आहे की, इथे जे नोंदवतो आहे ते खूप वरवरचं आहे. या प्रत्येक ठिकाणी त्याहीपलीकडं घेऊन जाणारं एक मूलभूत काम सुरू आहे. आधीच्या भागांतील जीवनशाळा व शाश्वत-पर्यायी उर्जेवरचे प्रकल्प, आत्ता डिंभे परिसरात सहकारी तत्त्वावर होत असलेली धरणग्रस्तांचीच मासेमारी, पाण्याचे संवर्धन असे ते विषय. हे सारे या जनसुमदायातून आकाराला आलेले असल्याने अधिक महत्त्वाचे. मला लिहावयाचे आहे ते त्या विषयांवर. त्यापैकी जीवनशाळांचा बराच कच्चा मसाला माझ्याजवळ आहे. लेखनाची बैठक जमत नाहीये. शाश्वत-एकजूटच्या कामाचेही तपशील आहेत. त्यावरून त्याविषयीचा लेख होईल. त्याच जोडीने संदिपान बडगिरे या एका अस्वस्थ माणसाशी झालेली तासा-दीडतासाची चर्चा आहे. आधीची सात वर्षे रासायनीक शेती आणि आता पूर्ण सेंद्रिय शेती. त्यांच्याविषयी याआधीही लेखन झाले आहेच, पण तो माझा स्वतंत्र लेख आहे. हे तिन्ही लेख खरे तर त्या विषयाची मूलभूत आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला काही प्रेरणा देणारे ठरतील. इथेच एक प्रतिसाद आलेला आहे. भाग्यश्री यांचा, "सहमत.. अशा गोष्टी असतात्/घडतात कुठे याची तरी जाणीव होते तुमच्या लेखांमुळे.. त्यावर उपाय काय, आणि आपण काय करू शकतो हे न कळल्याने खिन्नता." ही खिन्नता पळून जाऊ शकेल असं सामर्थ्य त्या विषयांमध्ये आहे. ते असे-तसे असणार नाही. या नोंदींना अशातशाच म्हणण्यातून माझ्या मर्यादांची जाणीव स्वतःलाच करून देणे हेही साध्य होते आहे... स्वतःचीही तपासणी होतेच आहे. कारण काही गोष्टी इतक्या किरकोळ, सहजशक्य असूनही माझ्या रोजच्या जगण्यात मी करत नाही, मग त्यापलीकडे तिथल्या जगण्यातील प्रश्न आणि त्यावरचे तोडगे काढण्यातील त्यांचं मानसीक सामर्थ्य कुठून यायचं? स्वतःला ही जाणीव देत राहणं असा भाग त्या शीर्षकामागं आहे. त्याचा एक जिता-जागता दाखला वाटतोय तो धनंजय वैद्य. माझ्याच वयाचा हा गृहस्थ सगळं सोडून जेव्हा धरणग्रस्ताच्या वसाहतीत जगण्यातील साऱ्या कष्टांचा मनमुराद स्वीकार करत राहण्यासाठी जातो तेव्हा तो प्रश्न येतोच, हे भान येतं कुठून? त्याच्याही पलीकडं त्याच्या पत्नीचं खऱ्या अर्थानं जीवनसाथी ही भूमिका निभावण्याचं धाडस... मग कळतं की, खोलवरचं पाहिलं पाहिजे. महामुश्कील काम आहे ते हेच. अशी प्रतिबिंबं लाख टिपेन. आत दडलेल्याचं काय?
जगात माणूस नसता तर... वाटलं ते बरोबर. पण विसुनाना, माणसासह अशी देवराई असेल तर...? ती तिथं दिसते आजच्या या जगण्यातदेखील.
प्रतिक्रिया
मोडक साहेब..
???
अरे...
ठीक आहे.. करते.
नोंद
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सहमत.. अशा
बापरे!!
महान आहात
खरे आहे
हेच म्हणतो,
>>पर्यावरणी
विषयाची
नोंदी..
अशी लोकं
अशातशा कशा?
तरीही मी फ्रेश आहे!
सुरेख लेख
अस्वस्थ
आठवण
कमालीची सुंदर माहिती आहे
जगात असंही काही घडतं
:-)
धन्यवाद.