मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कधी असे ...

मनीषा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कधी असे मलाही वाटले होते नभ हे मेघांनी दाटले होते | शिशिरात कसे फूल उमलले होते ओलावा शोधीत मूळ पसरले होते | भासले वळणावरती कुणी थांबले होते हात घेण्या हाती मी ही चालले होते | र्‍हुदयी या मायेने गारुड घातले होते सर्वस्वसही माझे पणास लावले होते | आत्म्यास मोहाने असे जखडले होते मार्गावरी माझ्या काटे पसरले होते | भय, लोभ, द्वेषा चे रण पेटले होते अंध अहंकाराने चित्त गोठले होते | कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते |

वाचने 2715 वाचनखूण प्रतिक्रिया 10

बेसनलाडू Fri, 02/06/2009 - 14:59
कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते | हे सगळ्यात जास्त आवडले. काही कडव्यांमध्ये ओळींची वीण आणखी घट्ट बसली असती, तर मजा वाढली असती, असे वाटले. चू. भू. द्या. घ्या. (सूचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Sat, 02/07/2009 - 13:13
प्रकाशनापूर्वी जाणत्या लोकांकडून तपासून घेतल्यास अधिक उत्तम. बाकी कविता ठीक. -- सर्किट

अनिल हटेला Fri, 02/06/2009 - 15:02
सुंदर कविता !!! अजुनही वाचायला आवडतील !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण Sat, 02/07/2009 - 13:06
कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते | व्वा... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.