Skip to main content

कधी असे ...

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 06/02/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असे मलाही वाटले होते नभ हे मेघांनी दाटले होते | शिशिरात कसे फूल उमलले होते ओलावा शोधीत मूळ पसरले होते | भासले वळणावरती कुणी थांबले होते हात घेण्या हाती मी ही चालले होते | र्‍हुदयी या मायेने गारुड घातले होते सर्वस्वसही माझे पणास लावले होते | आत्म्यास मोहाने असे जखडले होते मार्गावरी माझ्या काटे पसरले होते | भय, लोभ, द्वेषा चे रण पेटले होते अंध अहंकाराने चित्त गोठले होते | कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते |
लेखनविषय:

वाचने 2717
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते | हे सगळ्यात जास्त आवडले. काही कडव्यांमध्ये ओळींची वीण आणखी घट्ट बसली असती, तर मजा वाढली असती, असे वाटले. चू. भू. द्या. घ्या. (सूचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रकाशनापूर्वी जाणत्या लोकांकडून तपासून घेतल्यास अधिक उत्तम. बाकी कविता ठीक. -- सर्किट

सुंदर कविता !!! अजुनही वाचायला आवडतील !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

कोलाहलात सार्‍या गाणे हरवले होते गर्दीने माणसाला पुन्हा फसवले होते | व्वा... मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.