गाभा:
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.
केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?
प्रतिक्रिया
1 Mar 2026 - 12:03 pm | तिता
इराणने शेजारी देशांवर हल्ला केला आहे. इराण होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न करू शकते. याचा तेल पुरवठ्यावर आणि किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. हे युद्ध २-३ दिवसांत थांबले तर बरे. नाहीतर संपूर्ण जगाला बरेच दिवस बराच त्रास होऊ शकतो.
1 Mar 2026 - 2:19 pm | मदनबाण
युद्धः
सगळीकडे अशांतता पसरताना दिसत आहे. शिया इराण वरील हल्या नंतर आता मिडल इस्ट पूर्णपणे अशांत झालेला दिसत आहे. दुबईत ड्रोन हल्ले झाल्याने बरीच चर्चा झालेली दिसली. कालच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने काल VHF रेडिओद्वारे संदेश पाठवले होते की, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला जाण्याची परवानगी नाही. यामुळे या मार्गात असलेल्या अनेक ऑईल टँकर्सनी त्यांचा मार्ग बदलला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी ७२ हुरांकडे गेल्यामुळे हा मार्ग अजुन किती काळ विस्कळीत राहील हे सांगता येत नाही व याचा परिणाम तेलाच्या किंमतीवर होईल असे दिसते. मी काही लाईव्ह ट्रॅकिंग इमेजेस पाहिल्या होत्या त्या नुसार त्या भागातील जाहजांची हालचाल आणि संख्या रोडावली आहे. इराणने यावेळी एकत्रीतपणे बहारीन, कुवैत,कतार आणि युएइ यांच्यावर हल्ले केले असुन मुख्य लक्ष या ठिकाणी असलेले अमेरिकन बेस होते.
एआय स्टोरी : आधी एका ठिकाणी दिलेल्या प्रतिसादात मी सांगितले होते की अँथ्रोपिक च्या क्लॉड एआय चा वापर करुन व्हेनाझुएलाच्या मादुरोला अमेरिक मेलिटरी ने पकडले होते. याच Claude AI चा वापर इराणच्या विरोधात देखील केला गेला आहे.
अँथ्रोपिक आपल्या अस्तित्वाची लढाई देखील लढत असुन ही लढाई खुद्द अमेरिकन सरकारच्या विरोधात आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अँथ्रोपिक कंपनीला Supply Chain Risk घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.अँथ्रोपिकने अमेरिकन सरकारला त्यांचे AI मॉडेल क्लॉड (Claude) वापरताना दोन गोष्टींना नकार दिला होता, त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
वाद होण्याचे मूळ कारण :
अँथ्रोपिक कंपनीचे म्हणणे आहे की, सध्याचे AI मॉडेल्स पूर्णपणे स्वयंचलित शस्त्रांसाठी सुरक्षित नाहीत व त्यांचा तसा वापर केल्यास नागरिक आणि सैनिक दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो.तसेच,सामान्य अमेरिकन नागरिकांवर पाळत ठेवणे हे त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे.अँथ्रोपिकने स्पष्ट केले आहे की कोणत्याही दबावाखाली किंवा शिक्षेच्या भीतीपोटी ते त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाहीत.
संदर्भः
Statement from Dario Amodei on our discussions with the Department of War
Statement on the comments from Secretary of War Pete Hegseth
कोबी न्यूजः
कोबी जी नुकतेच इजरायला जावुन आले. कोबींजींना विवध पदके गळ्यात घालुन घ्यायची फार हौस आहे आणि इजरायला अर्थातच हे नीट माहित असल्याने त्यांनी कोबीजींची हैस भागवण्यासाठी एक नवेच पदक निर्माण केले आणि कोबीजींच्या गळ्यात घातले, कोबीजींना मग हर्शवायु झाला आणि त्यांनी इजराईल हे आपले फादर नेशन असल्याचे घोषीत करुन टाकले.आता या विधानामुळे वाद निर्मीती होऊ पाहत आहे.
हिंदुस्थानी आयटी इंडस्ट्री:
सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले क्षेत्र आणि या क्षेत्रातुन जाणार्या नोकर्या यावर युट्युबर भरपुर प्रमाणात व्हिडियो आले आहेत. येत्या काळात कंपन्या कोणत्या कोणत्या मार्गांनी कर्मचार्यांना घरी पाठवता येईल यावर विचार करत असल्याचे आणि त्याचे टारगेट आता सेट केले जात आहे अशी चर्चा / माहिती मिळत आहे. एआय एजंट्स डिप्लॉयमेंट हा मुख्य मुद्दा आता तरी दिसत आहे. मुंबई,पुणे,बँगलोर,हैद्राबाद ही शहर या सेक्टरच्या जोरात मोठी झाली आणि सर्वच प्रकारच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळाले होते, त्याचे आता काय होईल? असे प्रश्न आता सामान्य लोकांना देखील भेडसावु लागले आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Mukkuthi... : Mamangam
1 Mar 2026 - 2:22 pm | कांदा लिंबू
सोन्याच्या किमती पुन्हा उसळी घेऊन आज पावणेदोन लाखांच्या घरात गेल्या आहेत.
पेट्रोकेम कंपन्यांच्या स्टॉक्स् वर लक्ष ठेवायला हवे.
1 Mar 2026 - 3:04 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सध्याच्या या युद्धात भारताची भूमिका काय? की नेहमीप्रमाणे नरो वा कुंजरो वा? काहीच भूमिका न घेणे ही पण एक भूमिकाच असते असे एकदा नरसिंह राव म्हणाल्याचे वाचले होते!सध्या तरी अमेरिका/ईस्रायलला न दुखवता गुळगुळीत बोलणे हे धोरण दिसते. आता कदाचित अड्कलेल्या भारतियांना आणण्यासाठी एयर ईंडियाची विमाने पाठवतील. कदाचित त्याला 'ऑपरेशन तेलदूत/ऑपरेशन कॅकटस' असे नाव देतील.
1 Mar 2026 - 3:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
यु.एन. सुऱ़क्षा परिषदेची तातडीची बैठक झाली. ईराणच्या प्रतिनिधीनी अमेरिकेचे/ईस्रायलचे त्यांच्यासमोरच वाभाडे काढले.
ईराणने चीन्/रशिया/पाकिस्तान ह्या तीन देशांचे स्पष्ट भूमिका घेतल्याबद्दल आभार मानले.
https://www.youtube.com/watch?v=6KYWJNWgVdI
2 Mar 2026 - 7:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विश्वगुरु व्हायचं तर, भूमिका घ्यावी लागेल. 'वार रुकवा दी पापा' अशा जाहिराती करून विश्वगुरु होता येत नसतं.
कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला युद्ध घोषित न करता अशा प्रकारे मारणे हे 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सनदेचे थेट उल्लंघन मानले जाते. याला बऱ्याचदा कायद्याबाहेरील हत्या म्हटले जाते. असेच म्हणून रशियाने या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
जागतिक राजकारणात एक अत्यंत धोकादायक पायंडा पडला आहे. जर आज महासत्तांनी राष्ट्रप्रमुखांना मारणे सामान्य केले, तर भविष्यात इतर देशही त्यांच्या सोयीनुसार याचे अनुकरण करू शकतील, असे म्हटल्या जात आहे.
-दिलीप बिरुटे
2 Mar 2026 - 10:18 am | माईसाहेब कुरसूंदीकर
अमेरिका/ईस्रायल ह्यानी शाळेवर हल्ला करुन ५७ लहान मुलांना ठार मारले . ही मोठी चूक आहे. हा दहशतवाद आहे. सत्तेची सूत्रे आता कोणच्याही हातात गेली तर ईराण ह्याचा हळुहळु बदला घेणार. ह्यातुन ईराणमध्ये दहशतवादी संघटना जन्माला येतील आणि मग आय्सिस-अल-कायदा जे करत होते, त्याचीच पुनराव्रुत्ती होईल. मध्य-पूर्व भागात ईस्रायल-अमेरिकेला 'अरे ला का रे' करणारा कोणताही देश नको आहे.
खेमेनी ह्यांचा मृत्यु झाला म्हणुन यु-ट्युबवरच्या काही मराठी पत्रकारांना आनंद झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताची थट्टा करतात,"भारत-पाक' युद्ध मीच थांबवले म्हणतात त्यावर हे 'देशप्रेमी' पत्रकार मूग गिळुन गप्प असतात.
4 Mar 2026 - 9:52 am | साहना
आगामी युद्धांत भारताने अत्यंत खंबीर अशी भूमिका घेतली आहे. कोबी सरकारने त्वरित हालचाल करून खालील गोष्टी केल्या आहेत.
१. बटलर साहेबानी आपले ChatGPT subscription प्लस ला अपडेट केले आणि लेसर आय चे नवीन अत्याधुनिक मिम्स बनवले आहेत.
२. कोबीजी नी विविध मंदिरांत लोटांगण घालून त्याचे ड्रोन ने फोटो काढून प्रकाशित केले आहेत.
३. युद्ध कुणीही जिंको पण सर्व मीडिया मध्ये विश्वगुरू भारताचे विश्वविद्यार्थी जे इराण सारख्या देशांत शिकतात त्यांना माघारी आणण्याचे विशेष ऑपरेशन विश्वगुरू बुमरेंगच २४x७ दाखविण्यात येईल ह्याची संपूर्ण खबरदारी घेतली गेली आहे.
४. ह्या युद्धांत कुवेत ने चुकून आपलीच (अमेरिकन) जेट्स पडली ह्यावर सखोल चर्चा घडवून भारताने फक्त एकाच राफेल पाडले आणि ह्यातून भारत कसा विश्वगुरू आहेत हे सिद्ध करण्याची संपूर्ण योजना IT Cell ने आखली आहे.
५. संघाने आणीबाणीच्या स्वरूपांत बैठक बोलावून स्वयंसेवकांना दंड फिरवून राष्ट्ररक्षण करण्यास सज्ज केले आहे.
६. टॅक्सी ताईनी इराणी चहा वर GST वाढविण्याचीही घोषणा केली आहे.
७. दुबई मध्ये ज्योतिषाचार्य मंडळींची परिषद भरली होती तिथे ते अडकून पडले आहेत नाहीतर त्यांची तातडीची बैठक बोलावून पुढील वाटचाल काय असावी ह्यावर कोबी त्यांचा सल्ला घेणार होते.
८. असंख्य क्षेपणास्त्रे पडून सुद्धा तेहेरान शहर मुंबई पेक्षा स्वच्छ का ह्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे पथक बँकॉक मध्ये जाण्यास सज्ज.
९. इतक्या कचर्यात मानवी जीवन कसे राहू शकते ह्याचा अभ्यास करण्यासाठी इराणी नेत्यांचे पथक फरिदाबाद मध्ये दाखल पण कॉलरा झाल्याने ते एम्स मध्ये भरती झाले आहेत.
1 Mar 2026 - 8:16 pm | कंजूस
अमेरिकेतील तेल साठे आटू लागले आहेत का?
त्यासाठी काहितरी कुरापत काढून आणि कारण शोधून तेलाचे देश ताब्यात घेण्याची मोहिम आहे का? व्हेनेझुएला देश फुकटात मिळवला आणि कुणी काय बोलले नाही. अमेरिकेचा उत्साह वाढला आहे.
(हे केवळ तर्क आहेत.)
1 Mar 2026 - 9:07 pm | रामचंद्र
आणि तेलाचे साठे असलेल्या कॅनडावरही ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.
1 Mar 2026 - 9:10 pm | अमरेंद्र बाहुबली
इराण ह्या देशाचे एक कळत नाही, सुन्नी देशानी घेरलेला शिया देश, वास्तविक त्याची नी इस्राईल ची मैत्री हवी. इस्रायल सारख्या आगीत कारण नसताना इराणने हात का पोळून घेतले?
1 Mar 2026 - 10:35 pm | Bhakti
पण खोमनी गेला हे खूप चांगलंच झालं. तिथल्या स्त्री्यांचं आयुष्य थेट नरक केल होतं. पण तो त्याच रणरागिणीकडून संपायला पाहिजे होता. असो!
1 Mar 2026 - 10:43 pm | अमरेंद्र बाहुबली
खरं आहे.
2 Mar 2026 - 1:00 am | गामा पैलवान
अमरेंद्र बाहुबली,
इराणने शिया अवतार धारण केला तो उस्मानी ( ओटोमन ) साम्राज्याच्या विरोधात. ते साम्राज्य आज अस्तित्वात नाही. त्यामुळे शिया विरुद्ध सुन्नी हा संघर्ष राजकीय दृष्ट्या कालबाह्य झाला आहे. आज जो संघर्ष आहे तो भूराजकीय ( जियोपॉलिटिकल ) आहे.
इराण बाजूच्या अनेक प्रांतांवर वांशिक एकतेच्या आधारावर आपला हक्क सांगतो. त्यात बहारीन व कतार येतात. तसंच आजच्या इराकचा बराच मोठा भाग पूर्वी पर्शियन साम्राज्याचा भाग होता. त्यावरही इराण आपला अधिकार आहे असं मानतो. आपण जसं बांगलादेश व श्रीलंकेत परकीय हस्तक्षेप एका मर्यादेच्या बाहेर जाऊ देत नाही, तशाच धर्तीवर इराण शेजाऱ्यांच्या बाबतीत जागरूक आहे.
याच कारणास्तव अमेरिकी आक्रमणाच्या प्रत्युत्तरादाखल इराणने शेजारच्या देशांतल्या अमेरिकेच्या सैनिकी तळांवर आक्रमण केलं आहे. हे आक्रमण इराककडून व्हायची भीती अखाती देशांना वाटंत असे. ते शेवटी केलं इराणने.
आ.न.,
-गा.पै.
2 Mar 2026 - 10:17 am | कंजूस
१. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे समर्थन काय? [[ अणु शस्त्रे बनवली तर त्यांचा विरोध का? अमेरिकेनेही शस्त्रे बनवली आहेत.]]
२. भारताची भूमिका काय?
इराण, अमेरिका आणि इजरायल तिघांशीही व्यापारी करार भारताने केले आहेत, संबंध ठेवले आहेत. कुणाची बाजू घेणार?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतात की भारताने धोरण स्पष्ट करावे, खोमेनीच्या मृत्यूचा निषेध व्यक्त करावा, इराणची बाजू घ्यावी. स्वतः अमेरिकेत जाऊन भारतविरोधी भाषणे ठोकताना ते अमेरिकेची बाजू घेतात का? किंवा अमेरिकेला मित्र समजतात का? खाडी देशांत जाऊन तिकडच्या लोकांना भेटतात का? त्यांचेही धोरण स्पष्ट नाही.
2 Mar 2026 - 10:29 am | आग्या१९९०
भारतात परराष्ट्रीय धोरणे सत्ताधारी पक्ष ठरवत असतो, विरोधी पक्ष नाही
2 Mar 2026 - 1:45 pm | कंजूस
बरोबर. तीन वर्षांत विरोधी पक्ष सत्तेवर येणार आहे. त्यांनीही त्यांचे मत सांगावे. असेही नको तिथे भाषण ठोकतातच ना?
आता इंग्लंड फ्रान्स जर्मनी अमेरिकेच्या बाजूने आहेत. आमच्या जनतेची नवी पिढी इकडे सर्व देशांत आणि खाडी देशांतही नोकऱ्या करत आहेत. मग कोणाच्या विरुद्ध बोलणार?
2 Mar 2026 - 2:43 pm | आग्या१९९०
बरोबर. तीन वर्षांत विरोधी पक्ष सत्तेवर येणार आहे. त्यांनीही त्यांचे मत सांगावे. असेही नको तिथे भाषण ठोकतातच ना?
काहीही!
सत्तेत नसताना मनरेगाला मूठमाती देणारी भाषा करणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर काय केले ? ११ वर्ष झाली सत्तेत येऊन.
सध्याचे आपले सत्ताधारी युद्धखोर अमेरिकेला घाबरून आहेत. त्यासाठी राहुल गांधी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट भूमिकेबद्दल प्रश्न विचारत आहेत. राहुल गांधीनी काय करावे ते सत्तेत आल्यावर विचारा,आज नव्हे. आज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करा. (आयटी सेलचे अनुकरण केलेच पाहिजे अशी सक्ती असेल तर करा )
2 Mar 2026 - 10:57 am | विजुभाऊ
राहूल गांधीच्या आज्जी ने इस्राईल ला पाकिस्तानी अणुभट्ट्ट्या नष्ट करण्यास मदत द्यायला नकार दिला.
अन्यथा पाक आज आहे इतकाही प्रभावी बनला नसता. त्यांची तेंव्हाच जिरली असती.
त्या उलट त्यानी नेहमीच पॅलेस्टाईनला सपोर्ट केला. यासर अराफतला सख्खा भाऊ असावा इतका सन्मान दिला.
2 Mar 2026 - 10:40 am | पाषाणभेद
वास्तविक पाहता भारत एक तटस्थ देश अशी भुमिका घेवून वडीलधार्याच्या नात्याने देशोदेशींच्या अनेक प्रसंगांत निर्णायक भुमिका बजावू शकला असता. पण आपले नेतृत्व केवळ जाहिराती करत बसले, खॅ खॅ खॅ करत बसले. परराष्ट्रीय धोरण साफ कोसळलेले आहे.
तरीदेखील कोणतेच युद्ध करणे हा पर्याय नाही. युद्ध नकोच.
2 Mar 2026 - 11:17 am | अमरेंद्र बाहुबली
+१
2 Mar 2026 - 11:20 am | अमरेंद्र बाहुबली
खामेनी मेल्याचे दुःख नाही, पण ज्या प्रकारे अमेरिकेने हल्ला केला तो नक्कीच निषेधार्ह आहे. चिन रशिया ह्यांनी इराणच्या बाजूने मैदानात उतरायला हवे! इराण हा काही अतिरेकी देश नाही, अमेरिकेची अशी दादागिरी जगणे खपवून घेऊ नये. तात्या युद्धखोर होत चालले आहेत, असे कसे नोबेल मिळेल तात्या?
2 Mar 2026 - 11:29 am | पाषाणभेद
तात्याला नोबेलची फिकीर नाही. त्याचा मुळ स्बभावच उद्दामपणाचा आहे. बरे अशांना सल्ले देणारे देखील जगाचे, परिस्थितीचे भान का राखत नसावेत?
जेत्यांना आणि पराजितांनाही युद्ध करणे सोपे नसते. त्याचे दुरगामी परिणाम सार्या जगाला भोगावे लागतात. अनेक कुटूंबियांची हानी होते ते निराळेच.
2 Mar 2026 - 12:39 pm | विजुभाऊ
हमास, हुती , हिजबुल , शिया अमाल मिलेशिया हे सगळी इराणचीच पिलावळ आहे.
2 Mar 2026 - 3:12 pm | मदनबाण
इराण युद्ध:
इराणसाठी करो या मरो ही स्थिती असल्याने त्यांनी यावेळी वेगळी रणनीती आखलेली दिसत आहे. युएइ मधील हल्ल्या ने आज तिथले स्टॉक मार्केट बंद ठेवले गेले आहे. तिथल्या इमारतींवर ड्रोन हल्ले करुन एक सेफ टॅक्स फ्री हेवनच्या प्रतिमेला तडा देण्यात इराणला बर्यापैकी यश आलेले दिसत आहे.
इस्रायल
युएइ
सौदी अरेबिया
कतार
कुवेत
बहरिन
जॉर्डन
इराक
सायप्रस
ओमान
सिरीया
अश्या ११ देशांवर हल्ला करणारा इराण हा जगातला पहिलाच देश असावा. [ निदान मी जी माहिती वाचली त्यानुसार ]
विविध ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर वर हल्ले चढवण्याचा बहुधा इराणने निर्धार केलेला दिसतोय.
ताकः इराणच्या ड्रोन ने सौदी अरेबियाच्या अरामको च्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्लांट वर हल्ला केला त्यामुळे ५,५०,००० बॅरल प्रति दिन क्षमतेचा हा प्रकल्प बाधित झाला आहे व तेलाची किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समजत आहे.जगातील सगळ्यात जुन्या आणि सगळ्यात मोठ्या तेल शुद्धीकरण प्लांट पैकी हा एक आहे.
कोबी न्यूजः युजीसीचा विरोध तीव्र होत असुन देश भरात विवध ठिकाणी कोबींच्या विरोधात आंदोलने होताना दिसत आहेत,अनेक सभां मध्ये माजपाच्या नेत्यांना विरोध आहे.काही ठिकाणी कोबींचे फोटो,पुतळे जाळले गेले आहेत.कोणी उपोषणाला बसले आहेत तर कोणी कोबींचे पिंड दान करताना दिसुन आले आहे.युजीसी प्रकरण माजपाचा माज उतरवरणार असे दिसते.हल्लीच साक्षी महाराजांची ऑनलाईन व्यवस्थित ठासल्यावर ते लायनीत आलेले दिसले,तरी पुढील निवडणुकीत त्यांना हरवणार अश्या पोस्ट दिसुन आलेल्या आहेत.
कोबी सध्या तमिळनाडु मध्ये आहेत,बहुतेक येत्या काळात तिथे निवडणुका होणार आहेत... त्यामुळे भाषणबाजी,उद्घाटन आणि मुख्य म्हणजे फोटोबाजी + नौटंकी करताना दिसत आहेत.काल पर्यंत बुद्ध बुद्ध करत होते आता मंदिरात साष्टांग लोटांगण घालताना फोटोत दिसुन आले आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : J Balvin, Willy William - Mi Gente (Official Video)
2 Mar 2026 - 5:02 pm | कॉमी
यूजीसी मध्ये असे नक्की काय अन्यायकारक आहे वाचायला आवडेल.
2 Mar 2026 - 5:04 pm | अमरेंद्र बाहुबली
वर्चस्वाला धक्का!
2 Mar 2026 - 5:18 pm | कॉमी
काही मोदी समर्थकांचा टर्निंग पॉईंट हा युजिसी होता हे नोटवर्दी आहे.
2 Mar 2026 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
3 Mar 2026 - 10:18 am | रात्रीचे चांदणे
भारता बद्द्लची खामेनीची गेल्या काही वर्षाची भुमीका पाहता भारताने त्याच्या मुर्त्यूचा निषेध केला नसावा. त्यात एकीकडे इस्राएल सारखा देश म्हणजे कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी असणारा.
खेमेनीने काही गरज नसताना तीन चार वेळा आपल्या विरोधात टीका केलेली. तसा आपण निषेध केला कांय किंवा नाही कांय काही फरक पडत नाही पण काही भारतीय मात्र नक्कीच दुःखी झालेत.
3 Mar 2026 - 12:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
खरे आहे. ईस्लाम धर्म भारतात अनेकांच्या नावडीचा असला तरी त्या धर्माचे धर्मगुरु आणी देशप्रमुख म्हणुन मान देणे गरजेचे होते.विकिपीडियानुसार भारत-ईराण संबंध २००५ पासुनच बिघड्ण्यास सुरुवात झाली होती. तेव्हाही अमेरिका/ईस्रायलने भारताला सध्यासारखाच दम भरला असावा. त्यानंतर भारत-ईराण संबंध ठीक म्हणावेत असेच होते. दोन देशांतली आयात-निर्यातही हळुहळु कमी होत जाताना दिसते.
२०१४ सालापासुन सध्याच्या सरकारने संबंध चांगले व्हावेत म्हणुन प्रयत्न केलेले दिसतात. खालच्या व्हिडियोत पंतप्रधान मोदी, ईराणकडुन अधिकाधिक तेल आयात करु असे जाहीर करतात. हे २०१६ सालचे आहे. त्यानंतर २०१७ साली अध्यक्ष हसन रौहानी ह्यांचा भारत दौरा.मग त्यानंतर खेमेनी ह्यांचा भारत दौरा.
फक्त कश्मीर प्रश्नावर ईराणचे मत आवडले नाही म्हणुन भारत-ईराण संबंध बिघडतील असे वाटत नाही कारण ईराण भारताला तुलनेने स्वस्तात ईंधन देत होता. भारतातर्फे अर्थात वेगळ्या वस्तु निर्यात केल्या गेल्या असणार.
करोना काळातही संबंध चांगले दिसतात. निदान बिघडलेले वाटत नाहीत.
मग असे अचानक काय झाले?
India supplies medical assistance to Iran as part of our ongoing humanitarian assistance
Iran has received a shipment of 150,000 doses of an Indian Covid-19 vaccine, Covaxin, local media reported Thursday, as the Islamic republic combats the Middle East's deadliest outbreak of the illness
https://timesofindia.indiatimes.com/world/middle-east/iran-says-received...
https://www.mea.gov.in/press-releases.htm?dtl/34862/India_supplies_medic...
https://www.youtube.com/watch?v=-RPoekx3fn0
https://www.youtube.com/watch?v=C1Dgt9ewZQU
3 Mar 2026 - 1:42 pm | कंजूस
लहान पोरांचा हात पिरगाळून मोठी पोरं त्याच्याकडच्या गोट्या, भोवरे काढून घेतात तसे अमेरिकेने व्हेनेझुएलाचे केले. आता इराणच्या नेत्यांच्या गोट्या काढणे सोपे नाही. मारामारी करून तेलावर कब्जा करणार.
3 Mar 2026 - 2:04 pm | रात्रीचे चांदणे
आपले इराण सोबतचे संबंध बिघडले म्हणू शकत नाही. पाकिस्तानचा शेजारी म्हणून आपल्याला त्यांची गरज आहेच. उदया खेमेनीच्या जागी दुसरं कोणतही सरकार आलं तरी आपल्याला जुळवून घावेच लागेल.
खरी अडचण आहे ती म्हणजे अमेरिकेची. आपल्याला अमेरिके पासून फार कांय लांब जाता येत नाही. एका मर्यादेनंतर अमेरिकेचा दबाव झुगाराणे अजून तरी शक्य नाही.
जो पर्यंत अमेरिका आणि इराण चे संबंध सुधारत नाही तो पर्यंत भारत इराण संबंध एका मर्यादेतच राहतील.
7 Mar 2026 - 7:35 pm | मदनबाण
उध्या दिल्लीच्या रामलीला मैदानात युजीसी विरोधात होणारा विरोध प्रदर्शीत केला जाणार आहेत.यात मोठ्या प्रमाणात खुल्या वर्गातील / सामान्य वर्गातील विध्यार्थी देखील आहेत.
कोबी सरकार या विरोधाचे दमन करु पाहत आहे, गेल्या काही काळा पासुन एक्स वरील हॅडल्स विरोधात कोबी सरकार कायदेशीर कारवाई करत असुन कोबींच्या विरोधात असलेली काही अकाउंट्स नोटीस देउन बंद केली जात आहेत.
युजीसीच्या विरोधात असलेल्या सवर्ण आर्मीच्या लोकांना आता घरात नरजबंदीत टाकले आहे. मला वाटतं माजपा मधील लोक जे युजीसीच्या विरोधात गेले त्यांना देखील बहुधा नरजबंदीत टाकले गेले होते. स्वामी आनंद स्वरुप् यांना देखील अटक केली गेली आहे किंवा त्यांना देखील नरजबंदीत मध्ये ठेवण्यात आले आहे. करणी सेनेचे अधक्ष राज शेखावत यांची देखील बहुतेक अटक झाली आहे.
युजीसीच्या आंदोलनाची सरकारच्या मनात असलेली भिती या प्रकाराने उघड झाली आहे.
अजित भारती यांना देखील हाउस अरेस्ट करण्यात आले आहे,बराचकाळ कोबींची ऑन लाईन पुंगी वाजवण्याचे काम निष्ठेने करत आहेत. [ बहुतेक ते स्वतः जीसी नाहीत, पण जीसींच्या अन्याया विरोधात बोलण्यात त्यांनी बरेच कष्ट घेतले आहेत, कारण हा प्रकार हिंदुंना विभागण्याचा आणि जीसी मधील विध्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद करणारा आहे.
Nitish Steps Down, Who Now? | UGC Issue Can't Die | Congress Factchecked On Iran | Ajeet Bharti LIVE
Holi Special BJP ROAST: NitinKant DubeyKari Defends UGC, Ethanol, Modi Ji & More | Ajeet Bharti
Case registered against man for calling PM Modi 'traitor' on social media
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/india/case-registered-against-...
कोबी न्यूजः हॅहॅहॅ हसण्याचे मिम्स व्हिडियो लोक बनवुन टाकत आहेत. मोदी म्हणजे हिंदुस्थान नाही असे देखील लोक बोलत आहेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S
8 Mar 2026 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वमान्यांना गॅसचटके; घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ.
युद्धजन्य परिस्थितीच्या निमित्ताने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) घेतला. सिलिंडरचे दर शनिवारी तात्काळ लागू झाले आहेत.
सर्वांना अच्छेदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...
ता.क. च्यायला तो कोणता चहावाला होता ज्याने थेट गटारमधून गॅस निर्माण केला होता त्याचा पत्ता कोणाला मिळाला तर कळवा....!
-दिलीप बिरुटे
8 Mar 2026 - 12:00 pm | आग्या१९९०
सध्या गटारे बंद करून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बंकरसाठी राखून ठेवली आहेत. गटारे वाहण्याची जबाबदारी आयटी सेलने घेतली आहे. त्यामुळे गॅसचे उत्पादन कमी झाले आहे.
8 Mar 2026 - 6:28 pm | मदनबाण
फेंब्रुवारी मध्ये युजीसी च्या समर्थासाठी आंदोलन झाले होते, त्याला सरकार ने आंदोलन करण्यास परवानगी दिली होती. याच युजीसी विरोधात आंदोलन करण्यास मात्र सरकारने परवनगी नाकारली. नीच जतियवादी कोबी जी यांच्या मनात जनरल कॅटॅगरी विरुद्ध किती द्वेष भरलेला आहे, हे आज या आंदोलनाच्या निमित्त्याने उघड झाले.
जनरल कॅटॅगरी मधील लोक जणू काही या देशाचे नागरिकच नाहीत असा एकंदर सुर दिसलेला आहे.
जुमलेंद्र पहा यांचे १ मार्चला एका ठिकाणी मोठे भाषण होते [बहुतेक उत्तराखंड ] त्या सभेत सुरुवातीला बरीच घोषणाबाजी झाली,माजपाच्या इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत जे इतक्या वर्षात झाले नाही ते यावेळी दिसुन आले, बहुतेक तो जुमलेंद्र पहा यांना हा विरोध फार झोंबला असावावा म्हणुन आजचे आंदोलन दाबण्यासाठी कोबी सरकारने सगळे बळ लावले.
कोबी जी आणि जुमलेंद्र पहा यांना हे आता लक्षात घेतले पाहिजे की त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे आणि त्याची किंमत जनरल कॅटॅगरी त्यांना धडा शिकवुन मोजायला लावेल इतके नक्की!
'Self Goal By BJP': Anand Ranganathan Slams House Arrest Of UGC Protesters
Scared Modi Throws Tantrums: House Arrests, Police Detentions, Media Blackout | Ajeet Bharti LIVE
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चादरमोद माजपा मुर्दाबाद!
8 Mar 2026 - 8:10 pm | कांदा लिंबू
@मदनबाण
स्वाक्षरीशी सहमत आहे.
8 Mar 2026 - 9:10 pm | रामचंद्र
कट्टर समर्थक जर कडवे विरोधक होत असतील तर मातृसंस्था नक्कीच हस्तक्षेप करील, परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणार नाही.
8 Mar 2026 - 8:32 pm | कॉमी
युजिसी बद्दल नक्की प्रॉब्लेम काय हे वाचायला आवडेल.
कारण अँटी डिस्क्रीमिनेशन गाईडलाइन हे गुगल केल्यावर दिसते.
सर्वात मोठ्ठा मुद्दा कोणता आहे हे गाईडलाइन सकट दिले तर साधक बाधक चर्चा होऊ शकेल.
8 Mar 2026 - 9:24 pm | कंजूस
एकूण प्रतिसादांवरून असं लक्षात आलं की कुणी तो कोबी जाऊन गोभी येईल तेव्हा अमेरिका तेलाचे नळ लगेच सुरू करणार आहे. तेल धोधो वाहणार. सगळीकडे आनंदीआनंद होणार. मग उशीर कशाला? आणा त्या गोभीला.
9 Mar 2026 - 11:08 am | मूकवाचक
कोबींचा जनाधार सातत्याने टिकून आहे, यात त्यांच्या नतद्रष्ट विरोधकांचा आणि विरोधकांनी केलेल्या निराधार टीकेचा मोठा वाटा आहे. या गोभींमधे काही एक्सपायरी डेट उलटून गेलेले, काही खुजे आणि कोत्या मनोवृत्तीचे, तर काही कुंपणावर बसलेले पलटूराम अशा लोकांचा भरणा आहे. त्यातल्या त्यात जे सक्षम लोक आहेत, त्यांना त्यांच्याच पक्षात किंमत नाही. त्यामुळे जे कोबींवर खुष नाहीत, त्यांनाही एखाद्या गोभीच्या हातात सत्ता जाणे हा पर्याय भुरळ पाडत नसावा. असो.
9 Mar 2026 - 10:46 am | सुबोध खरे
या सर्व प्रकरणात ना अमेरिकेची भूमिका योग्य आहे ना इराणची. तेंव्हा भारताने कोणाची बाजू घ्यायची ?
दोन्ही देश दहशतवादी आणि बेमुर्वतखोर आहेत. तेंव्हा त्यांच्याशी केवळ व्यापारी संबंध ठेवणे हेच शहाणपणाचे आहे.
आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये - व्यंकटेश माडगूळकर
तात्या सारखा बेभरवशी राजकारणी उभ्या अमेरिकेच्या इतिहासात झालेला नाही त्याच्यावर अमेरिकन लोकांचाच विश्वास नाही तेंव्हा भारताने त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही.
राहिली गोष्ट इस्रायलची
त्यांची लढाई अस्तित्वाची आहे त्यामुळे ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. आजूबाजूच्या सर्व इस्लामी देशांनी ( इजिप्त सोडून) इस्रायलचे अस्तित्वच अमान्य केलेले आहे. त्यामुळे इस्रायलचा निर्वंश केल्याशिवाय त्यांची लढाई थांबणार नाही. अशा स्थितीत इस्रायल शक्यतो कोणत्याही इस्लामी देशाला अणुबॉम्ब तयार करू देणार नाही.
पाकिस्तानचा अणुप्रकल्प नष्ट करण्यासाठी इस्रायल ने भारताची मदत मागितली होती. ना मोरारजी देसाई ना इंदिरा गांधी यांनी ती केली.
१९४७ पासून कबुतरे उडवण्याची खाज लागलेल्या राजकारण्यांमुळे आपल्या परसदारी एक भस्मासुर निर्माण झाला आहे.
इस्रायलची धोरणे अरब देशांबाबत कितीही टोकाची असली तर आपल्याला संकट काळी त्यांनी नेहमीच मदत केलेली आहे, ते विसरणे हे कृतघ्न पण ठरेल.
बाकी मिपावर मोरू लोक आपली भडभड रोज बाहेर काढत असतात तेवढीच त्यांच्या जीवाला शांती.
आजच्या कठीण काळात राहुल गांधी सारखा राजकारणी देशाचा पंतप्रधान नाही हे देशाचे केवढे भाग्य.
त्यांच्या सारख्या भंपक माणसाला पंतप्रधान करण्याचा विचार करणाऱ्या माणसांच्या बुद्धीची केवळ किंवा करावी अशी स्थिती आहे.
9 Mar 2026 - 11:16 am | रात्रीचे चांदणे
या सर्व प्रकरणात ना अमेरिकेची भूमिका योग्य आहे ना इराणची. तेंव्हा भारताने कोणाची बाजू घ्यायची ?
कोणाचीही बाजू न घेता आपण खेमेणी आणि शाळेतील मुलींच्या हात्येचा निषेध करायला पाहिजे होता.
खेमेनीच्या प्रेमा मुळे नाहीतर इराण हा पाकिस्तानचा शेजारी आहे ह्या भूमिकेतून. उदया समजा इराणमध्ये खेमेनीच्या मुलाची सत्ता राहिलीच तर याचा उपयोग झाला असता.
9 Mar 2026 - 11:46 am | कॉमी
इराणची अणुबॉम्ब क्षमता पूर्णपणे नष्ट केली असे अमेरिकाच म्हणत होते की.
इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळपासही नाहीये.
9 Mar 2026 - 12:48 pm | सुबोध खरे
"इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळपासही नाहीये."
इतकं सोपं असतं तर मग जग किती सुखी झालं असतं
मग इराण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला सर्व काही दाखवत का नाही?
मागे स्टक्सनेट या व्हायरस चा वापर करून मोसादने जर्मन सिमेन्स कंपनीच्या केंद्रोत्सारी यंत्रात बिघाड निर्माण करून इराणच्या अणुकार्यक्रमात खीळ घातलेली होती.
http://large.stanford.edu/courses/2015/ph241/holloway1/
https://www.csoonline.com/article/562691/stuxnet-explained-the-first-kno...
इस्रायलचा संपूर्ण विनाश करू असे इराणने अनेकदा म्हटलेले आहे त्यामुळे काहीही करून इराणला अणुबॉम्ब नाही हे इस्रायल चे ध्येय धोरण आहे.
9 Mar 2026 - 10:54 am | अमरेंद्र बाहुबली
आजच्या कठीण काळात राहुल गांधी सारखा राजकारणी देशाचा पंतप्रधान नाही हे देशाचे केवढे भाग्य.त्यांची डिग्री खरी आहे तसेच त्यांना इंग्लिशही बोलता येत म्हणे.
9 Mar 2026 - 12:41 pm | पाषाणभेद
ठळक अक्षरांतील अट बघावी.
The U.S. Treasury granted a temporary 30-day waiver (March 5 – April 4, 2026) for Indian entities to purchase, import, and offload specific Russian crude oil cargoes
. This waiver applies only to oil loaded onto vessels before March 5, 2026, aimed at preventing supply disruptions, and requires purchasers to be registered in India.
Key Terms & Conditions for the 30-Day Waiver (March 2026):
Timeframe: The exemption covers transactions from March 5, 2026, to April 4, 2026.
Cargo Scope: Only applies to Russian-origin crude oil and petroleum products already loaded on vessels before March 5, 2026.
Eligibility: The purchasing company must be registered under Indian law.
Purpose: The waiver is intended for stranded oil shipments to ensure continued supply to Indian refineries amid Middle East volatility.
Transaction Status: The waiver applies to the sale, delivery, and offloading of these specific shipments.
9 Mar 2026 - 12:46 pm | अमरेंद्र बाहुबली
मला एक कळत नाही, अमेरिकेशी लढायची इराणची नी रशियाशी लढायची युक्रेनची लायकी नाहीये, तरीही असे पंगे हे देश का घेतात? मूर्ख झेलेनस्की एकवेळ eu मध्ये जायचे म्हणून रशियाशी भिडला असता तर समजू शकतो पण नाटो मध्ये जाऊन काय गावत उपटणार होता का? नाटो तर आले नाही वाचवायला पण युक्रेनची वाट लागली.
तेच इराणबद्दल! अणुबॉम्ब बनवून करणार काय होते? अमेरिकेशी पंगे का घेतले इराणने? मूर्ख कुठले!
9 Mar 2026 - 10:26 pm | लिओ
मला एक कळत नाही
मोरु खरोखरच डोइजड झाले आहेत.
इराण आणि इस्त्राईल संघर्षणात अंधभक्त खरेच डोळस झाले आहेत अभिनंदन
मोरारजी देसाई जेव्हा मोरु लोकांच्या नाकावर टिच्चुन सरकार बनवतात तेंव्हा ते महान आणि पाकिस्तानचा अणुप्रकल्प नष्ट करण्यासाठी इस्रायलला मदत करत नाहीत तेंव्हा ते मुर्ख, बाकी चालु द्या
इस्त्राईल किती चांगला सांगताना मोरु लोक कशी मुर्ख आणि तुच्छ हे सांगताना बाकी अंधभक्त मोरु लोक व त्यांच्या नेत्यानी केलेल्या चुका कशा कुरवाळतात हे सांगण्याएवजी दाढी कुरवाळण्यात धन्यता मानतात. ७५ ते ८० वर्षात अंधभक्त मोरु लोक व त्यांच्या नेत्यानी केलेल्या चुका लपवत आहेत.
इस्त्राईल ला ईतके लाडावत आहेत तर इस्त्राईल साठी एक पुण्यकर्म करा ना
मोरु लोक व त्यांच्या नेत्यानी १९४७ नंतर प्रथम पॅलेस्टाईनला मान्यता दीली नंतर इस्त्राईलला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीररित्या पॅलेस्टाईनची मान्यता का काढत नाहीत??? छप्पनेश्वरांसाठी हा तर डाव्या हाताचा मळ
याने छप्पनेश्वरांची छाती ११२ इच तर नक्कीच होईल ना अंधभक्त
10 Mar 2026 - 9:43 am | सुबोध खरे
मोरारजी देसाई
Former Indian Prime Minister Morarji Desai casually revealed to Pakistan's General Zia-ul-Haq, "We know about your enrichment facility in Kahuta," in an informal conversation. This disclosure, described as an act of indiscretion, effectively alerted Pakistan to India's intelligence capabilities regarding their nuclear program.
Key details of this incident include:
The Conversation: Desai told Zia, "We know about your enrichment facility in Kahuta".
Consequences: This revelation compromised years of intelligence work by the Research and Analysis Wing (RAW), prompting Pakistan to tighten security and move the facility underground.
Background: The remark was made by Desai, who was known to be skeptical of intelligence agencies like RAW.
This action is considered a major setback to Indian efforts to monitor Pakistan's nuclear development.
कबुतरे उडवण्याची हौस असलेले लोक असल्यामुळे भारताचे अपरिमित नुकसान झालेले आहे.
जाता जाता --मोरु ( मोदिरुग्ण सकाळी उठून श्री मोदी याना दूषणे दिल्याशिवाय ज्यांचे पोट साफ होत नाही असे )
10 Mar 2026 - 4:58 pm | रामचंद्र
या माहितीवरून पाकिस्तानने मोरारजीभाईंना निशान-ए-पाकिस्तानचा किताब का दिला, ते समजतं.
10 Mar 2026 - 6:22 pm | अमरेंद्र बाहुबली
जनसंघींच्या काळात पाकिस्तानच्या अणुबॉम्ब प्रकल्पाने वेग घेतला! आताही जनसंघींचेच वंशज सत्तेत आहेत. शत्रू प्रबळ होतोय.
10 Mar 2026 - 9:48 am | सुबोध खरे
आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीररित्या पॅलेस्टाईनची मान्यता का काढत नाहीत.
तुम्ही पॅलेस्टाईन ला मान्यता दिली काय कि नाही दिली कुणालाही शष्प फरक पडत नाही.
केवळ अरब देशांना गूळ लावण्यापुरती ती मान्यता आहे.
अन्यथा ती मान्यता म्हणजे "भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्या ला विश्वेश्वराच्या घाटीवर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे".
वि सू --भाट्ये हे रत्नागिरी जवळील गाव आहे. कोकणात दालदी म्हणून ओळखले जाणारे मुसलमान राहतात.
10 Mar 2026 - 9:54 am | सुबोध खरे
In the early 1980s, Prime Minister Indira Gandhi denied Israel permission to use Indian airspace or airfields for refueling during a planned covert airstrike on Pakistan’s Kahuta nuclear facility.
Despite Israeli intelligence providing details on Pakistan's defense capabilities and offering to help destroy the facility, Gandhi rejected the plan, fearing a retaliatory strike.
The Plan: Israel intended to strike the Kahuta facility, similar to its 1981 bombing of Iraq's Osirak reactor.
The Refusal: Former CIA officer Richard Barlow reported that Gandhi blocked the operation in the early 1980s.
This decision was part of a broader strategy of restraint at that time, though it allowed Pakistan's nuclear program to develop further.
स्वतःला दुर्गा म्हणवून घेणाऱ्या इंदिरा गांधी यांची हि वस्तुस्थिती
10 Mar 2026 - 10:15 am | विवेकपटाईत
दिल्लीत 35 वर्षाच्या संसार ज्या भागात केला अर्थात बिंदापूर भागात होळीच्या दिवशी एका दलित युवकाची शांतिप्रिय तरुणांनी हत्या केली
दोष सहा वर्षाच्या मुलीने टाकलेल्या पाण्याचे काही शिंतोडे एका शांतिप्रिय महिलेच्या अंगावर पडले. दोन तासानंतर जमावाने तिच्या चुलत भावाची हत्या केली. शेजारीबाजारी फक्त बघत राहिले कोणाचे हिम्मत त्याला सोडवायची झाली नाही. एक पुरोगामी नेता दलित दिल्लीत असूनही त्या परिवाराला भेटायला गेला नाही. या घटनेची निंदा सुद्धा केली नाही. भाई आणि चाऱ्याचे उत्तम उदाहरण.
10 Mar 2026 - 3:10 pm | कांदा लिंबू
हिंदूहितवादी असल्याचा दावा करून, हिंदूंची मते प्राप्त करून, पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सारखेच मुस्लिम प्रेमी असलेले, बारा वर्षांपासून प्रचंड बहुमताच्या सरकारचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात असे होणे स्वाभाविकच आहे, नाही का?
10 Mar 2026 - 6:30 pm | लिओ
निशान-ए-पाकिस्तान वरुन आठवले
२०१६ साली Order of King Abdulaziz सौदि अरेबियाकडुन
२०१६ साली Order of Amanullah Khan अफगानिस्तानकडुन
२०१८ साली Order of the State of Palestine पॅलेस्टाईन कडुन
२०१४ साली सत्तेत आल्यावर छप्पनेश्वरांना हे विशेष हिरवेगार सन्मान मिळाले आहेत.
२०१४ नंतर दिवसरात्र मेहनती केली हे आम्ही मान्य करायचे, की सन्मान देणारे २०१४ ची वाट बघत होते. त्यामुळे हे हिरवेगार सन्मान मिळाले, हे काही माहीत नाही...
थांबा २०१६ साली Order of Amanullah Khan अफगानिस्तानकडुन घेऊन येताना लाहोर मध्ये ( लाहोर पाकिस्तानमध्ये ) अस्सल व्हेज बिर्याणी खाल्ली आता या बिर्याणीला काय म्हणायचे ??? एक सन्मान कि इतिहास अनुभव शिकवण बाजुला ठेवुन मैत्रीसाठी घेतलेला एक विश्रांती थांबा की आणि काही.
जाता जाता लाहोरच्या प्युअर व्हेज बिर्याणी मध्ये " गरम बटाटा " काप होते का ??
सकाळी सकाळी नाव घेतल्याने पोट साफ होणारे लोक वाढल्याने पतंजलिचा पोट साफ करणार्या औषधाचा खप कमी झाला असे कळाले, त्यामुळे पतंजलिचे मालक चिंता करत आहेत पतंजलि कसे चालवायचे ?? काम तर नीट केले पाहिजे नाहितर छप्पनेश्वर शांत बसतील आणि सुप्रिम कोर्ट निरोप धाडेल
असो
10 Mar 2026 - 6:57 pm | रामचंद्र
जनरल थोरात असोत वा त्यांचे पूर्वसुरी, मुक्तहस्त न मिळाल्याने बहुतांश भारतीयांच्या मनासारखं शत्रुप्रदेशात आक्रमण करता आलं नाही या वस्तुस्थितीवरून आजही कॉन्ग्रेस सरकारवर टीका होते. मग 'जो उचित समझो वो करो' असा मुक्तहस्त देऊनही मोदी यांच्यावर टीका का होते?
10 Mar 2026 - 7:02 pm | अमरेंद्र बाहुबली
हे घेऊन आले ह्याबद्दल वाद नाही, मिळतय तर का सोडा अशी ह्यांची सवय असावी, पण ह्यांनी असा काय तीर मारला होता कि ह्याना त्या देशांनी पुरस्कार दिले? फक्त भारताचे पंतप्रधान आहे म्हणून? मग देवगौडाना पण द्यायला पाहिजे होते. :)
10 Mar 2026 - 7:53 pm | सुबोध खरे
देवगौडाना पण द्यायला पाहिजे होते.
हायला
जो माणूस बैठकीला केक खायला हजर झाला त्याला अचानक पंतप्रधानपदाची माळ गळ्यात पडली, का तर गांडूळा सारखा निरुपद्रवी आणि निःसंग प्राणी म्हणून.
तुम्ही कधी निराश वैफल्यग्रस्त किंवा आनंदी गांडूळ पाहिलं आहे का? त्याचे दोन तुकडे करा दोन्ही तुकडे वेगवेगळ्या दिशेला जातात आणि परत वाढतात.
ना खंत ना खेद
(तुलना टोकाची आहे आणि वैयक्तिक रित्या मला त्यांच्याबद्दल काहीही आकस नाही आणि उपमा चुकली असेल तर मी अगोदरच बिनशर्त माफी मागतो)
अशा माणसाला कोणता पुरस्कार मिळावा?
10 Mar 2026 - 9:24 pm | अमरेंद्र बाहुबली
माझही हेच म्हणणं आहे, की फक्त पंतप्रधान म्हाजुन पुरस्कार मिळत असतील तर मोदीनाच का? त्यांनी असे काय केले की पुरस्कार मिळावे? मग देवगौडांना का नको? ते ही pm होतेच ना?
10 Mar 2026 - 11:04 pm | लिओ
आज मोरारजी देसाई काय चीज होती ते कळाले
झियाने मोदेला (मोरारजी देसाई ) फोनवर शिवांबु बद्द्ल विचारुन रॉला (रॉ पाकिस्तान सेल) पोखरले आणि स्वतःचा अणु कार्यक्रम सुरक्षित केला याला फक्त आणि फक्त मोदेलाच (मोरारजी देसाई ) जबाबदार ठरवले पाहिजे.
पण पण याच मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे नेते आणि जबाबदार बिलकुल नाहीत.
मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री
पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना ??
आता हे अंधभक्त असे सिध्द करतील कि यात आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे नेते वाजपेयीना अंधारात ठेवले (जे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते)
आता हे अंधभक्त असे पण सिध्द करतील कि त्या काळात रॉ पुर्णपणे पाकिस्तानातील भारतीय दुतावास बाजुला सारुन काम करत होते,
एक सांगा रॉला (रॉ पाकिस्तान सेल) ला पाकिस्तानात काय त्रास होतो, रॉची पाकिस्तानात काय स्थिती होती याबद्द्ल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाकिस्तानातील भारतीय दुतावासामार्फत माहीत होत नव्हते ?? या छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना माहित नव्हते ?? छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना देशहितापेक्षा सत्ता महत्वाची वाट्ली ना ??
मोदे (मोरारजी देसाई ) सरकारच्या चुकांवर अंधभक्त पांघरुन घालत आहे ज्या चुकांमध्ये आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे योगदान मोदेपेक्षा जास्त आहे
छप्पनेश्वर उगीच म्हणत नाहित कि "हम फकीर आदमी है झोला लेके निकल जायेंगे"
हे चार पुरस्कार सांगतात झोला लेके कहा निकल जायेंगे
अंधभक्तांनी लिहावे की मोदेपेक्षा इंदिरा गांधी या पकिस्तानी अणुसंकटाला कशा जबाबदार नक्की वाचु
अंधभक्तांना विशेष सुचना : उन्हाळा वाढत आहे उन्हात फिरताना काळजी घ्या अन्यथा तीव्र उन्हामुळे " अतिसार " होऊ शक्तो.
10 Mar 2026 - 11:42 pm | रामचंद्र
<पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना??>
हा मुद्दा आधी लक्षात आला नव्हता. म्हणजे सरसकटीकरण करून फक्त मोरारजींना दोष देणं योग्य नाही. आपण उल्लेखलेल्या मंत्रिगणाच्या करामतींची काहीच वाच्यता झालेली दिसत नाही. चक्क सुब्रह्मण्यम् स्वामींनीही यावर काही भाष्य केलेलं दिसत नाही.