Skip to main content

चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/03/2026 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌ आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.‌ हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?

वाचने 9724
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

इराणने शेजारी देशांवर हल्ला केला आहे. इराण होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न करू शकते. याचा तेल पुरवठ्यावर आणि किंमतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. हे युद्ध २-३ दिवसांत थांबले तर बरे. नाहीतर संपूर्ण जगाला बरेच दिवस बराच त्रास होऊ शकतो.

युद्धः सगळीकडे अशांतता पसरताना दिसत आहे. शिया इराण वरील हल्या नंतर आता मिडल इस्ट पूर्णपणे अशांत झालेला दिसत आहे. दुबईत ड्रोन हल्ले झाल्याने बरीच चर्चा झालेली दिसली. कालच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने काल VHF रेडिओद्वारे संदेश पाठवले होते की, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला जाण्याची परवानगी नाही. यामुळे या मार्गात असलेल्या अनेक ऑईल टँकर्सनी त्यांचा मार्ग बदलला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी ७२ हुरांकडे गेल्यामुळे हा मार्ग अजुन किती काळ विस्कळीत राहील हे सांगता येत नाही व याचा परिणाम तेलाच्या किंमतीवर होईल असे दिसते. मी काही लाईव्ह ट्रॅकिंग इमेजेस पाहिल्या होत्या त्या नुसार त्या भागातील जाहजांची हालचाल आणि संख्या रोडावली आहे. इराणने यावेळी एकत्रीतपणे बहारीन, कुवैत,कतार आणि युएइ यांच्यावर हल्ले केले असुन मुख्य लक्ष या ठिकाणी असलेले अमेरिकन बेस होते. एआय स्टोरी : आधी एका ठिकाणी दिलेल्या प्रतिसादात मी सांगितले होते की अँथ्रोपिक च्या क्लॉड एआय चा वापर करुन व्हेनाझुएलाच्या मादुरोला अमेरिक मेलिटरी ने पकडले होते. याच Claude AI चा वापर इराणच्या विरोधात देखील केला गेला आहे. अँथ्रोपिक आपल्या अस्तित्वाची लढाई देखील लढत असुन ही लढाई खुद्द अमेरिकन सरकारच्या विरोधात आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अँथ्रोपिक कंपनीला Supply Chain Risk घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.अँथ्रोपिकने अमेरिकन सरकारला त्यांचे AI मॉडेल क्लॉड (Claude) वापरताना दोन गोष्टींना नकार दिला होता, त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. वाद होण्याचे मूळ कारण : अँथ्रोपिक कंपनीचे म्हणणे आहे की, सध्याचे AI मॉडेल्स पूर्णपणे स्वयंचलित शस्त्रांसाठी सुरक्षित नाहीत व त्यांचा तसा वापर केल्यास नागरिक आणि सैनिक दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो.तसेच,सामान्य अमेरिकन नागरिकांवर पाळत ठेवणे हे त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे.अँथ्रोपिकने स्पष्ट केले आहे की कोणत्याही दबावाखाली किंवा शिक्षेच्या भीतीपोटी ते त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाहीत. संदर्भः Statement from Dario Amodei on our discussions with the Department of War Statement on the comments from Secretary of War Pete Hegseth कोबी न्यूजः कोबी जी नुकतेच इजरायला जावुन आले. कोबींजींना विवध पदके गळ्यात घालुन घ्यायची फार हौस आहे आणि इजरायला अर्थातच हे नीट माहित असल्याने त्यांनी कोबीजींची हैस भागवण्यासाठी एक नवेच पदक निर्माण केले आणि कोबीजींच्या गळ्यात घातले, कोबीजींना मग हर्शवायु झाला आणि त्यांनी इजराईल हे आपले फादर नेशन असल्याचे घोषीत करुन टाकले.आता या विधानामुळे वाद निर्मीती होऊ पाहत आहे. हिंदुस्थानी आयटी इंडस्ट्री: सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेले क्षेत्र आणि या क्षेत्रातुन जाणार्‍या नोकर्‍या यावर युट्युबर भरपुर प्रमाणात व्हिडियो आले आहेत. येत्या काळात कंपन्या कोणत्या कोणत्या मार्गांनी कर्मचार्‍यांना घरी पाठवता येईल यावर विचार करत असल्याचे आणि त्याचे टारगेट आता सेट केले जात आहे अशी चर्चा / माहिती मिळत आहे. एआय एजंट्स डिप्लॉयमेंट हा मुख्य मुद्दा आता तरी दिसत आहे. मुंबई,पुणे,बँगलोर,हैद्राबाद ही शहर या सेक्टरच्या जोरात मोठी झाली आणि सर्वच प्रकारच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळाले होते, त्याचे आता काय होईल? असे प्रश्न आता सामान्य लोकांना देखील भेडसावु लागले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Mukkuthi... : Mamangam

सोन्याच्या किमती पुन्हा उसळी घेऊन आज पावणेदोन लाखांच्या घरात गेल्या आहेत. ‌ पेट्रोकेम कंपन्यांच्या स्टॉक्स् वर लक्ष ठेवायला हवे.

सध्याच्या या युद्धात भारताची भूमिका काय? की नेहमीप्रमाणे नरो वा कुंजरो वा? काहीच भूमिका न घेणे ही पण एक भूमिकाच असते असे एकदा नरसिंह राव म्हणाल्याचे वाचले होते!सध्या तरी अमेरिका/ईस्रायलला न दुखवता गुळगुळीत बोलणे हे धोरण दिसते. आता कदाचित अड्कलेल्या भारतियांना आणण्यासाठी एयर ईंडियाची विमाने पाठवतील. कदाचित त्याला 'ऑपरेशन तेलदूत/ऑपरेशन कॅकटस' असे नाव देतील.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यु.एन. सुऱ़क्षा परिषदेची तातडीची बैठक झाली. ईराणच्या प्रतिनिधीनी अमेरिकेचे/ईस्रायलचे त्यांच्यासमोरच वाभाडे काढले. ईराणने चीन्/रशिया/पाकिस्तान ह्या तीन देशांचे स्पष्ट भूमिका घेतल्याबद्दल आभार मानले. https://www.youtube.com/watch?v=6KYWJNWgVdI

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विश्वगुरु व्हायचं तर, भूमिका घ्यावी लागेल. 'वार रुकवा दी पापा' अशा जाहिराती करून विश्वगुरु होता येत नसतं. कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाला युद्ध घोषित न करता अशा प्रकारे मारणे हे 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सनदेचे थेट उल्लंघन मानले जाते. याला बऱ्याचदा कायद्याबाहेरील हत्या म्हटले जाते. असेच म्हणून रशियाने या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे. जागतिक राजकारणात एक अत्यंत धोकादायक पायंडा पडला आहे. जर आज महासत्तांनी राष्ट्रप्रमुखांना मारणे सामान्य केले, तर भविष्यात इतर देशही त्यांच्या सोयीनुसार याचे अनुकरण करू शकतील, असे म्हटल्या जात आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमेरिका/ईस्रायल ह्यानी शाळेवर हल्ला करुन ५७ लहान मुलांना ठार मारले . ही मोठी चूक आहे. हा दहशतवाद आहे. सत्तेची सूत्रे आता कोणच्याही हातात गेली तर ईराण ह्याचा हळुहळु बदला घेणार. ह्यातुन ईराणमध्ये दहशतवादी संघटना जन्माला येतील आणि मग आय्सिस-अल-कायदा जे करत होते, त्याचीच पुनराव्रुत्ती होईल. मध्य-पूर्व भागात ईस्रायल-अमेरिकेला 'अरे ला का रे' करणारा कोणताही देश नको आहे. खेमेनी ह्यांचा मृत्यु झाला म्हणुन यु-ट्युबवरच्या काही मराठी पत्रकारांना आनंद झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताची थट्टा करतात,"भारत-पाक' युद्ध मीच थांबवले म्हणतात त्यावर हे 'देशप्रेमी' पत्रकार मूग गिळुन गप्प असतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आगामी युद्धांत भारताने अत्यंत खंबीर अशी भूमिका घेतली आहे. कोबी सरकारने त्वरित हालचाल करून खालील गोष्टी केल्या आहेत. १. बटलर साहेबानी आपले ChatGPT subscription प्लस ला अपडेट केले आणि लेसर आय चे नवीन अत्याधुनिक मिम्स बनवले आहेत. २. कोबीजी नी विविध मंदिरांत लोटांगण घालून त्याचे ड्रोन ने फोटो काढून प्रकाशित केले आहेत. ३. युद्ध कुणीही जिंको पण सर्व मीडिया मध्ये विश्वगुरू भारताचे विश्वविद्यार्थी जे इराण सारख्या देशांत शिकतात त्यांना माघारी आणण्याचे विशेष ऑपरेशन विश्वगुरू बुमरेंगच २४x७ दाखविण्यात येईल ह्याची संपूर्ण खबरदारी घेतली गेली आहे. ४. ह्या युद्धांत कुवेत ने चुकून आपलीच (अमेरिकन) जेट्स पडली ह्यावर सखोल चर्चा घडवून भारताने फक्त एकाच राफेल पाडले आणि ह्यातून भारत कसा विश्वगुरू आहेत हे सिद्ध करण्याची संपूर्ण योजना IT Cell ने आखली आहे. ५. संघाने आणीबाणीच्या स्वरूपांत बैठक बोलावून स्वयंसेवकांना दंड फिरवून राष्ट्ररक्षण करण्यास सज्ज केले आहे. ६. टॅक्सी ताईनी इराणी चहा वर GST वाढविण्याचीही घोषणा केली आहे. ७. दुबई मध्ये ज्योतिषाचार्य मंडळींची परिषद भरली होती तिथे ते अडकून पडले आहेत नाहीतर त्यांची तातडीची बैठक बोलावून पुढील वाटचाल काय असावी ह्यावर कोबी त्यांचा सल्ला घेणार होते. ८. असंख्य क्षेपणास्त्रे पडून सुद्धा तेहेरान शहर मुंबई पेक्षा स्वच्छ का ह्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे पथक बँकॉक मध्ये जाण्यास सज्ज. ९. इतक्या कचर्यात मानवी जीवन कसे राहू शकते ह्याचा अभ्यास करण्यासाठी इराणी नेत्यांचे पथक फरिदाबाद मध्ये दाखल पण कॉलरा झाल्याने ते एम्स मध्ये भरती झाले आहेत.

अमेरिकेतील तेल साठे आटू लागले आहेत का? त्यासाठी काहितरी कुरापत काढून आणि कारण शोधून तेलाचे देश ताब्यात घेण्याची मोहिम आहे का? व्हेनेझुएला देश फुकटात मिळवला आणि कुणी काय बोलले नाही. अमेरिकेचा उत्साह वाढला आहे. (हे केवळ तर्क आहेत.)

इराण ह्या देशाचे एक कळत नाही, सुन्नी देशानी घेरलेला शिया देश, वास्तविक त्याची नी इस्राईल ची मैत्री हवी. इस्रायल सारख्या आगीत कारण नसताना इराणने हात का पोळून घेतले?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण खोमनी गेला हे खूप चांगलंच झालं. तिथल्या स्त्री्यांचं आयुष्य थेट नरक केल होतं. पण तो त्याच रणरागिणीकडून संपायला पाहिजे होता. असो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अमरेंद्र बाहुबली, इराणने शिया अवतार धारण केला तो उस्मानी ( ओटोमन ) साम्राज्याच्या विरोधात. ते साम्राज्य आज अस्तित्वात नाही. त्यामुळे शिया विरुद्ध सुन्नी हा संघर्ष राजकीय दृष्ट्या कालबाह्य झाला आहे. आज जो संघर्ष आहे तो भूराजकीय ( जियोपॉलिटिकल ) आहे. इराण बाजूच्या अनेक प्रांतांवर वांशिक एकतेच्या आधारावर आपला हक्क सांगतो. त्यात बहारीन व कतार येतात. तसंच आजच्या इराकचा बराच मोठा भाग पूर्वी पर्शियन साम्राज्याचा भाग होता. त्यावरही इराण आपला अधिकार आहे असं मानतो. आपण जसं बांगलादेश व श्रीलंकेत परकीय हस्तक्षेप एका मर्यादेच्या बाहेर जाऊ देत नाही, तशाच धर्तीवर इराण शेजाऱ्यांच्या बाबतीत जागरूक आहे. याच कारणास्तव अमेरिकी आक्रमणाच्या प्रत्युत्तरादाखल इराणने शेजारच्या देशांतल्या अमेरिकेच्या सैनिकी तळांवर आक्रमण केलं आहे. हे आक्रमण इराककडून व्हायची भीती अखाती देशांना वाटंत असे. ते शेवटी केलं इराणने. आ.न., -गा.पै.

१. अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे समर्थन काय? [[ अणु शस्त्रे बनवली तर त्यांचा विरोध का? अमेरिकेनेही शस्त्रे बनवली आहेत.]] २. भारताची भूमिका काय? इराण, अमेरिका आणि इजरायल तिघांशीही व्यापारी करार भारताने केले आहेत, संबंध ठेवले आहेत. कुणाची बाजू घेणार? विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणतात की भारताने धोरण स्पष्ट करावे, खोमेनीच्या मृत्यूचा निषेध व्यक्त करावा, इराणची बाजू घ्यावी. स्वतः अमेरिकेत जाऊन भारतविरोधी भाषणे ठोकताना ते अमेरिकेची बाजू घेतात का? किंवा अमेरिकेला मित्र समजतात का? खाडी देशांत जाऊन तिकडच्या लोकांना भेटतात का? त्यांचेही धोरण स्पष्ट नाही.

In reply to by आग्या१९९०

बरोबर. तीन वर्षांत विरोधी पक्ष सत्तेवर येणार आहे. त्यांनीही त्यांचे मत सांगावे. असेही नको तिथे भाषण ठोकतातच ना? आता इंग्लंड फ्रान्स जर्मनी अमेरिकेच्या बाजूने आहेत. आमच्या जनतेची नवी पिढी इकडे सर्व देशांत आणि खाडी देशांतही नोकऱ्या करत आहेत. मग कोणाच्या विरुद्ध बोलणार?

In reply to by कंजूस

बरोबर. तीन वर्षांत विरोधी पक्ष सत्तेवर येणार आहे. त्यांनीही त्यांचे मत सांगावे. असेही नको तिथे भाषण ठोकतातच ना? काहीही! सत्तेत नसताना मनरेगाला मूठमाती देणारी भाषा करणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर काय केले ? ११ वर्ष झाली सत्तेत येऊन. सध्याचे आपले सत्ताधारी युद्धखोर अमेरिकेला घाबरून आहेत. त्यासाठी राहुल गांधी सत्ताधाऱ्यांना स्पष्ट भूमिकेबद्दल प्रश्न विचारत आहेत. राहुल गांधीनी काय करावे ते सत्तेत आल्यावर विचारा,आज नव्हे. आज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करा. (आयटी सेलचे अनुकरण केलेच पाहिजे अशी सक्ती असेल तर करा )

In reply to by कंजूस

राहूल गांधीच्या आज्जी ने इस्राईल ला पाकिस्तानी अणुभट्ट्ट्या नष्ट करण्यास मदत द्यायला नकार दिला. अन्यथा पाक आज आहे इतकाही प्रभावी बनला नसता. त्यांची तेंव्हाच जिरली असती. त्या उलट त्यानी नेहमीच पॅलेस्टाईनला सपोर्ट केला. यासर अराफतला सख्खा भाऊ असावा इतका सन्मान दिला.

वास्तविक पाहता भारत एक तटस्थ देश अशी भुमिका घेवून वडीलधार्‍याच्या नात्याने देशोदेशींच्या अनेक प्रसंगांत निर्णायक भुमिका बजावू शकला असता. पण आपले नेतृत्व केवळ जाहिराती करत बसले, खॅ खॅ खॅ करत बसले. परराष्ट्रीय धोरण साफ कोसळलेले आहे. तरीदेखील कोणतेच युद्ध करणे हा पर्याय नाही. युद्ध नकोच.

खामेनी मेल्याचे दुःख नाही, पण ज्या प्रकारे अमेरिकेने हल्ला केला तो नक्कीच निषेधार्ह आहे. चिन रशिया ह्यांनी इराणच्या बाजूने मैदानात उतरायला हवे! इराण हा काही अतिरेकी देश नाही, अमेरिकेची अशी दादागिरी जगणे खपवून घेऊ नये. तात्या युद्धखोर होत चालले आहेत, असे कसे नोबेल मिळेल तात्या?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तात्याला नोबेलची फिकीर नाही. त्याचा मुळ स्बभावच उद्दामपणाचा आहे. बरे अशांना सल्ले देणारे देखील जगाचे, परिस्थितीचे भान का राखत नसावेत? जेत्यांना आणि पराजितांनाही युद्ध करणे सोपे नसते. त्याचे दुरगामी परिणाम सार्‍या जगाला भोगावे लागतात. अनेक कुटूंबियांची हानी होते ते निराळेच.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इराण हा काही अतिरेकी देश नाही
हमास, हुती , हिजबुल , शिया अमाल मिलेशिया हे सगळी इराणचीच पिलावळ आहे.

इराण युद्ध: इराणसाठी करो या मरो ही स्थिती असल्याने त्यांनी यावेळी वेगळी रणनीती आखलेली दिसत आहे. युएइ मधील हल्ल्या ने आज तिथले स्टॉक मार्केट बंद ठेवले गेले आहे. तिथल्या इमारतींवर ड्रोन हल्ले करुन एक सेफ टॅक्स फ्री हेवनच्या प्रतिमेला तडा देण्यात इराणला बर्‍यापैकी यश आलेले दिसत आहे. इस्रायल युएइ सौदी अरेबिया कतार कुवेत बहरिन जॉर्डन इराक सायप्रस ओमान सिरीया अश्या ११ देशांवर हल्ला करणारा इराण हा जगातला पहिलाच देश असावा. [ निदान मी जी माहिती वाचली त्यानुसार ] विविध ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर वर हल्ले चढवण्याचा बहुधा इराणने निर्धार केलेला दिसतोय. ताकः इराणच्या ड्रोन ने सौदी अरेबियाच्या अरामको च्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्लांट वर हल्ला केला त्यामुळे ५,५०,००० बॅरल प्रति दिन क्षमतेचा हा प्रकल्प बाधित झाला आहे व तेलाची किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समजत आहे.जगातील सगळ्यात जुन्या आणि सगळ्यात मोठ्या तेल शुद्धीकरण प्लांट पैकी हा एक आहे. कोबी न्यूजः युजीसीचा विरोध तीव्र होत असुन देश भरात विवध ठिकाणी कोबींच्या विरोधात आंदोलने होताना दिसत आहेत,अनेक सभां मध्ये माजपाच्या नेत्यांना विरोध आहे.काही ठिकाणी कोबींचे फोटो,पुतळे जाळले गेले आहेत.कोणी उपोषणाला बसले आहेत तर कोणी कोबींचे पिंड दान करताना दिसुन आले आहे.युजीसी प्रकरण माजपाचा माज उतरवरणार असे दिसते.हल्लीच साक्षी महाराजांची ऑनलाईन व्यवस्थित ठासल्यावर ते लायनीत आलेले दिसले,तरी पुढील निवडणुकीत त्यांना हरवणार अश्या पोस्ट दिसुन आलेल्या आहेत. कोबी सध्या तमिळनाडु मध्ये आहेत,बहुतेक येत्या काळात तिथे निवडणुका होणार आहेत... त्यामुळे भाषणबाजी,उद्घाटन आणि मुख्य म्हणजे फोटोबाजी + नौटंकी करताना दिसत आहेत.काल पर्यंत बुद्ध बुद्ध करत होते आता मंदिरात साष्टांग लोटांगण घालताना फोटोत दिसुन आले आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : J Balvin, Willy William - Mi Gente (Official Video)

भारता बद्द्लची खामेनीची गेल्या काही वर्षाची भुमीका पाहता भारताने त्याच्या मुर्त्यूचा निषेध केला नसावा. त्यात एकीकडे इस्राएल सारखा देश म्हणजे कठीण प्रसंगात आपल्या पाठीशी असणारा. खेमेनीने काही गरज नसताना तीन चार वेळा आपल्या विरोधात टीका केलेली. तसा आपण निषेध केला कांय किंवा नाही कांय काही फरक पडत नाही पण काही भारतीय मात्र नक्कीच दुःखी झालेत.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे. ईस्लाम धर्म भारतात अनेकांच्या नावडीचा असला तरी त्या धर्माचे धर्मगुरु आणी देशप्रमुख म्हणुन मान देणे गरजेचे होते.विकिपीडियानुसार भारत-ईराण संबंध २००५ पासुनच बिघड्ण्यास सुरुवात झाली होती. तेव्हाही अमेरिका/ईस्रायलने भारताला सध्यासारखाच दम भरला असावा. त्यानंतर भारत-ईराण संबंध ठीक म्हणावेत असेच होते. दोन देशांतली आयात-निर्यातही हळुहळु कमी होत जाताना दिसते. २०१४ सालापासुन सध्याच्या सरकारने संबंध चांगले व्हावेत म्हणुन प्रयत्न केलेले दिसतात. खालच्या व्हिडियोत पंतप्रधान मोदी, ईराणकडुन अधिकाधिक तेल आयात करु असे जाहीर करतात. हे २०१६ सालचे आहे. त्यानंतर २०१७ साली अध्यक्ष हसन रौहानी ह्यांचा भारत दौरा.मग त्यानंतर खेमेनी ह्यांचा भारत दौरा. फक्त कश्मीर प्रश्नावर ईराणचे मत आवडले नाही म्हणुन भारत-ईराण संबंध बिघडतील असे वाटत नाही कारण ईराण भारताला तुलनेने स्वस्तात ईंधन देत होता. भारतातर्फे अर्थात वेगळ्या वस्तु निर्यात केल्या गेल्या असणार. करोना काळातही संबंध चांगले दिसतात. निदान बिघडलेले वाटत नाहीत. मग असे अचानक काय झाले? India supplies medical assistance to Iran as part of our ongoing humanitarian assistance Iran has received a shipment of 150,000 doses of an Indian Covid-19 vaccine, Covaxin, local media reported Thursday, as the Islamic republic combats the Middle East's deadliest outbreak of the illness https://timesofindia.indiatimes.com/world/middle-east/iran-says-receive… https://www.mea.gov.in/press-releases.htm?dtl/34862/India_supplies_medi… https://www.youtube.com/watch?v=-RPoekx3fn0 https://www.youtube.com/watch?v=C1Dgt9ewZQU

लहान पोरांचा हात पिरगाळून मोठी पोरं त्याच्याकडच्या गोट्या, भोवरे काढून घेतात तसे अमेरिकेने व्हेनेझुएलाचे केले. आता इराणच्या नेत्यांच्या गोट्या काढणे सोपे नाही. मारामारी करून तेलावर कब्जा करणार.

आपले इराण सोबतचे संबंध बिघडले म्हणू शकत नाही. पाकिस्तानचा शेजारी म्हणून आपल्याला त्यांची गरज आहेच. उदया खेमेनीच्या जागी दुसरं कोणतही सरकार आलं तरी आपल्याला जुळवून घावेच लागेल. खरी अडचण आहे ती म्हणजे अमेरिकेची. आपल्याला अमेरिके पासून फार कांय लांब जाता येत नाही. एका मर्यादेनंतर अमेरिकेचा दबाव झुगाराणे अजून तरी शक्य नाही. जो पर्यंत अमेरिका आणि इराण चे संबंध सुधारत नाही तो पर्यंत भारत इराण संबंध एका मर्यादेतच राहतील.

उध्या दिल्लीच्या रामलीला मैदानात युजीसी विरोधात होणारा विरोध प्रदर्शीत केला जाणार आहेत.यात मोठ्या प्रमाणात खुल्या वर्गातील / सामान्य वर्गातील विध्यार्थी देखील आहेत. कोबी सरकार या विरोधाचे दमन करु पाहत आहे, गेल्या काही काळा पासुन एक्स वरील हॅडल्स विरोधात कोबी सरकार कायदेशीर कारवाई करत असुन कोबींच्या विरोधात असलेली काही अकाउंट्स नोटीस देउन बंद केली जात आहेत. युजीसीच्या विरोधात असलेल्या सवर्ण आर्मीच्या लोकांना आता घरात नरजबंदीत टाकले आहे. मला वाटतं माजपा मधील लोक जे युजीसीच्या विरोधात गेले त्यांना देखील बहुधा नरजबंदीत टाकले गेले होते. स्वामी आनंद स्वरुप् यांना देखील अटक केली गेली आहे किंवा त्यांना देखील नरजबंदीत मध्ये ठेवण्यात आले आहे. करणी सेनेचे अधक्ष राज शेखावत यांची देखील बहुतेक अटक झाली आहे. युजीसीच्या आंदोलनाची सरकारच्या मनात असलेली भिती या प्रकाराने उघड झाली आहे. अजित भारती यांना देखील हाउस अरेस्ट करण्यात आले आहे,बराचकाळ कोबींची ऑन लाईन पुंगी वाजवण्याचे काम निष्ठेने करत आहेत. [ बहुतेक ते स्वतः जीसी नाहीत, पण जीसींच्या अन्याया विरोधात बोलण्यात त्यांनी बरेच कष्ट घेतले आहेत, कारण हा प्रकार हिंदुंना विभागण्याचा आणि जीसी मधील विध्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद करणारा आहे. Nitish Steps Down, Who Now? | UGC Issue Can't Die | Congress Factchecked On Iran | Ajeet Bharti LIVE Holi Special BJP ROAST: NitinKant DubeyKari Defends UGC, Ethanol, Modi Ji & More | Ajeet Bharti Case registered against man for calling PM Modi 'traitor' on social media Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/india/case-registered-against… कोबी न्यूजः हॅहॅहॅ हसण्याचे मिम्स व्हिडियो लोक बनवुन टाकत आहेत. मोदी म्हणजे हिंदुस्थान नाही असे देखील लोक बोलत आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S

सर्वमान्यांना गॅसचटके; घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ. युद्धजन्य परिस्थितीच्या निमित्ताने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) घेतला. सिलिंडरचे दर शनिवारी तात्काळ लागू झाले आहेत. सर्वांना अच्छेदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... ता.क. च्यायला तो कोणता चहावाला होता ज्याने थेट गटारमधून गॅस निर्माण केला होता त्याचा पत्ता कोणाला मिळाला तर कळवा....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या गटारे बंद करून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बंकरसाठी राखून ठेवली आहेत. गटारे वाहण्याची जबाबदारी आयटी सेलने घेतली आहे. त्यामुळे गॅसचे उत्पादन कमी झाले आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गटार किंवा सांडपाण्यापासून गॅस तयार करण्याची प्रक्रिया ही घरगुती बायोगॅस निर्मिती आहे. दोन प्लास्टिक घ्या ज्यामध्ये एक मोठी ५०० लिटर आणि दुसरी त्यापेक्षा थोडी लहान ४०० लिटर चा प्लास्टिक ड्रम पण गेह्ता येईल. लहान टाकी मोठ्या टाकीत उपडी बसून वर-खाली व्हायला पाहिजे. मोठ्या टाकीचा वरचा भाग कापून तिला डायजेस्टर म्हणज कचरा कुजवायला म्हणून तयार करा आणि लहान टाकीला उलट करून तिच्या मध्यभागी एक छिद्र पाडून तिथे गॅस व्हॉल्व्ह आणि नळी जोडा. ही लहान टाकी गॅस होल्डर म्हणून काम करेल आणि तयार झालेला मिथेन वायू यात जमा होईल. मोठ्या टाकीच्या खालच्या बाजूला एक पीविसी पाईपाचा इनलेट बसवा. या पाईपाच्या इनलेट ने घरातील ओला कचरा किंवा सांडपाणी आत सोडता येईल. टाकीच्या दुसऱ्या बाजूला, वरच्या थराजवळ एक 'आउटलेट' पाईप लावा, जेणेकरून प्रक्रिया झालेले जास्तीचे पाणी किंवा स्लरी बाहेर पडू शकेल. हे चांगले खत फुकटात मिळते. ही सर्व जोडणी करताना एम सील किंवा सिलिकॉन गमचा वापर करून पूर्णपणे हवाबंद करणे अत्यंत आवश्यक आहे हे वे सां न लगे. कारण ऑक्सिजनचा संपर्क झाल्यास गॅस तयार होण्याची प्रक्रिया थांबते. एकदा ही रचना तयार झाली की, मोठ्या टाकीत सुरुवातीला शेण आणि पाण्याचे १:१ प्रमाणातील मिश्रण भरा, कारण शेणातील जीवाणू मिथेन निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू करतात. हे तयार झाल्यावर, दररोज स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, भाज्यांचे अवशेष किंवा सांडपाणी इनलेट पाईपमधून आत टाकत रहा. साधारणपणे १० ते १५ दिवसांत गॅस तयार होऊन वरची लहान टाकी तरंगू लागेल. टाकी तरंगणे महत्त्वाचे आहे. हेच गास जमा झाल्याचे लक्षण आहे. हा गॅस वापरताना तो थेट शेगडीला जोडण्यापूर्वी गळतीची तपासणी पाहून घ्या नको तिथे आग लागायला नको. हे नसेल करायचे तर हे डायरेक्ट सार्वजनिक उघड्या गटारातून थेट गॅस पण कढता येतो पण हे जरा डेंजर असू शकते. कारण आपल्याला माहित नाही की काय नक्की वहात आलेले आहे. त्यात विषारी वायूंचे मिश्रण असले तर लफडी नको. त्या पेक्षा तर सेप्टिक टँकला किरकोळ बदल करून त्याचे रूपांतर बायोगॅस डायजेस्टरमध्ये करता येते. पण सिमेंटच्या स्लॅबला कोठेही तडे गेलेले असल्यास ते सिमेंट किंवा वॉटरप्रूफिंगने नीट भरून घ्यावे लागतात. गळती नको. गॅस बाहेर काढण्यासाठी टँकच्या वरच्या भागात एक होल पाडून तिथे २ इंची पाईप बसवायचा. त्याला एक गॅस कंट्रोल वाल्व बसवा. पण या वायू ला फार वास असतो. सेप्टिक टँकमध्ये तयार होणाऱ्या गॅसमध्ये मिथेनसोबतच कार्बन डायऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फाइड (?) (ज्यामुळे दुर्गंधी येते) यांचे मिश्रण असते. हा वास कमी करता येतेओ. त्यासाठी हा वायू पाण्यातून सोडायचा म्हणजे वॉटर स्क्रबर वापरायचे. पण... पण सेप्टिक टँकमध्ये साबण किंवा जंतूनाशक फिनाईल गेले तर ग्यास कमी होईल किंवा येणार नाही. सेप्टिक टँकमधून येणारा गॅस हा अत्यंत ज्वालाग्राही असतो, त्यामुळे सर्व पाईप फिटिंग्ज अत्यंत मजबूत आणि गळतीमुक्त असती असे पहा. आता बायोगॅस बनवल्यावर फोटो नक्की टाका!

In reply to by निनाद

आदरणीय प.मोदी यांचे फोटो आणि गटर गॅस शोध देशभर व्हायरल होत आहेत आपण काळजी करू नका. आपण सांगितलेली 'गॅसकृतीनी'च लोक सध्या गटारीत नळी टाकून गॅसची गरज भागवत आहेत धन्यवाद. =)) बाकी गोबर युगाच्या प्रारंभापासूनच गोबर गॅसचा पाया रचला गेला होता. तर, थेट गटारीतून नळी टाकून गॅस ही नॉनबायजिकल माणसाचा सद्य काळाचा अचाट शोध आहे. आपण ज्याचा उल्लेख करता त्याची मुळं "गोबर गॅस' मधे दडलेली आहे. हिंदीत गोबर म्हणजे गाईचे शेण, आणि हा वायू प्रामुख्याने शेणापासून तयार केला जातो म्हणून त्याला गोबर गॅस नाव देण्यात आले. भारतात बायोगॅस तंत्रज्ञानाचा पाया १९४२ मध्ये एन.व्ही. जोशी (N.V. Joshi) यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) येथे पहिला बायोगॅस प्लांट डिझाइन करून रचला. ( AI ) पहिली यंत्रणा: जगातील पहिला ज्ञात अॅनारोबिक डायजेस्टर (anaerobic digester) प्लांट १८५९ मध्ये मुंबई, भारत येथे उभारला गेला होता. ( AI ) बाकी, थेट डायरेक्ट सार्वजनिक उघड्या गटारातून थेट गॅस पण कढता येतो त्यासाठीची गोबर नामांकने मागितली जाणार आहेत त्यातलं आमच्याकडून नोबेल आम्हालाच आहे यात काही वाद नाही. =)) -दिलीप बिरुटे

फेंब्रुवारी मध्ये युजीसी च्या समर्थासाठी आंदोलन झाले होते, त्याला सरकार ने आंदोलन करण्यास परवानगी दिली होती. याच युजीसी विरोधात आंदोलन करण्यास मात्र सरकारने परवनगी नाकारली. नीच जतियवादी कोबी जी यांच्या मनात जनरल कॅटॅगरी विरुद्ध किती द्वेष भरलेला आहे, हे आज या आंदोलनाच्या निमित्त्याने उघड झाले. जनरल कॅटॅगरी मधील लोक जणू काही या देशाचे नागरिकच नाहीत असा एकंदर सुर दिसलेला आहे. जुमलेंद्र पहा यांचे १ मार्चला एका ठिकाणी मोठे भाषण होते [बहुतेक उत्तराखंड ] त्या सभेत सुरुवातीला बरीच घोषणाबाजी झाली,माजपाच्या इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत जे इतक्या वर्षात झाले नाही ते यावेळी दिसुन आले, बहुतेक तो जुमलेंद्र पहा यांना हा विरोध फार झोंबला असावावा म्हणुन आजचे आंदोलन दाबण्यासाठी कोबी सरकारने सगळे बळ लावले. कोबी जी आणि जुमलेंद्र पहा यांना हे आता लक्षात घेतले पाहिजे की त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे आणि त्याची किंमत जनरल कॅटॅगरी त्यांना धडा शिकवुन मोजायला लावेल इतके नक्की! 'Self Goal By BJP': Anand Ranganathan Slams House Arrest Of UGC Protesters Scared Modi Throws Tantrums: House Arrests, Police Detentions, Media Blackout | Ajeet Bharti LIVE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- चादरमोद माजपा मुर्दाबाद!

In reply to by कांदा लिंबू

कट्टर समर्थक जर कडवे विरोधक होत असतील तर मातृसंस्था नक्कीच हस्तक्षेप करील, परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणार नाही.

युजिसी बद्दल नक्की प्रॉब्लेम काय हे वाचायला आवडेल. कारण अँटी डिस्क्रीमिनेशन गाईडलाइन हे गुगल केल्यावर दिसते. सर्वात मोठ्ठा मुद्दा कोणता आहे हे गाईडलाइन सकट दिले तर साधक बाधक चर्चा होऊ शकेल.

एकूण प्रतिसादांवरून असं लक्षात आलं की कुणी तो कोबी जाऊन गोभी येईल तेव्हा अमेरिका तेलाचे नळ लगेच सुरू करणार आहे. तेल धोधो वाहणार. सगळीकडे आनंदीआनंद होणार. मग उशीर कशाला? आणा त्या गोभीला.

In reply to by कंजूस

कोबींचा जनाधार सातत्याने टिकून आहे, यात त्यांच्या नतद्रष्ट विरोधकांचा आणि विरोधकांनी केलेल्या निराधार टीकेचा मोठा वाटा आहे. या गोभींमधे काही एक्सपायरी डेट उलटून गेलेले, काही खुजे आणि कोत्या मनोवृत्तीचे, तर काही कुंपणावर बसलेले पलटूराम अशा लोकांचा भरणा आहे. त्यातल्या त्यात जे सक्षम लोक आहेत, त्यांना त्यांच्याच पक्षात किंमत नाही. त्यामुळे जे कोबींवर खुष नाहीत, त्यांनाही एखाद्या गोभीच्या हातात सत्ता जाणे हा पर्याय भुरळ पाडत नसावा. असो.

या सर्व प्रकरणात ना अमेरिकेची भूमिका योग्य आहे ना इराणची. तेंव्हा भारताने कोणाची बाजू घ्यायची ? दोन्ही देश दहशतवादी आणि बेमुर्वतखोर आहेत. तेंव्हा त्यांच्याशी केवळ व्यापारी संबंध ठेवणे हेच शहाणपणाचे आहे. आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये - व्यंकटेश माडगूळकर तात्या सारखा बेभरवशी राजकारणी उभ्या अमेरिकेच्या इतिहासात झालेला नाही त्याच्यावर अमेरिकन लोकांचाच विश्वास नाही तेंव्हा भारताने त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. राहिली गोष्ट इस्रायलची त्यांची लढाई अस्तित्वाची आहे त्यामुळे ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. आजूबाजूच्या सर्व इस्लामी देशांनी ( इजिप्त सोडून) इस्रायलचे अस्तित्वच अमान्य केलेले आहे. त्यामुळे इस्रायलचा निर्वंश केल्याशिवाय त्यांची लढाई थांबणार नाही. अशा स्थितीत इस्रायल शक्यतो कोणत्याही इस्लामी देशाला अणुबॉम्ब तयार करू देणार नाही. पाकिस्तानचा अणुप्रकल्प नष्ट करण्यासाठी इस्रायल ने भारताची मदत मागितली होती. ना मोरारजी देसाई ना इंदिरा गांधी यांनी ती केली. १९४७ पासून कबुतरे उडवण्याची खाज लागलेल्या राजकारण्यांमुळे आपल्या परसदारी एक भस्मासुर निर्माण झाला आहे. इस्रायलची धोरणे अरब देशांबाबत कितीही टोकाची असली तर आपल्याला संकट काळी त्यांनी नेहमीच मदत केलेली आहे, ते विसरणे हे कृतघ्न पण ठरेल. बाकी मिपावर मोरू लोक आपली भडभड रोज बाहेर काढत असतात तेवढीच त्यांच्या जीवाला शांती. आजच्या कठीण काळात राहुल गांधी सारखा राजकारणी देशाचा पंतप्रधान नाही हे देशाचे केवढे भाग्य. त्यांच्या सारख्या भंपक माणसाला पंतप्रधान करण्याचा विचार करणाऱ्या माणसांच्या बुद्धीची केवळ किंवा करावी अशी स्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

या सर्व प्रकरणात ना अमेरिकेची भूमिका योग्य आहे ना इराणची. तेंव्हा भारताने कोणाची बाजू घ्यायची ? कोणाचीही बाजू न घेता आपण खेमेणी आणि शाळेतील मुलींच्या हात्येचा निषेध करायला पाहिजे होता. खेमेनीच्या प्रेमा मुळे नाहीतर इराण हा पाकिस्तानचा शेजारी आहे ह्या भूमिकेतून. उदया समजा इराणमध्ये खेमेनीच्या मुलाची सत्ता राहिलीच तर याचा उपयोग झाला असता.

In reply to by सुबोध खरे

इराणची अणुबॉम्ब क्षमता पूर्णपणे नष्ट केली असे अमेरिकाच म्हणत होते की. इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळपासही नाहीये.

In reply to by कॉमी

"इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या जवळपासही नाहीये." इतकं सोपं असतं तर मग जग किती सुखी झालं असतं मग इराण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला सर्व काही दाखवत का नाही? मागे स्टक्सनेट या व्हायरस चा वापर करून मोसादने जर्मन सिमेन्स कंपनीच्या केंद्रोत्सारी यंत्रात बिघाड निर्माण करून इराणच्या अणुकार्यक्रमात खीळ घातलेली होती. http://large.stanford.edu/courses/2015/ph241/holloway1/ https://www.csoonline.com/article/562691/stuxnet-explained-the-first-kn… इस्रायलचा संपूर्ण विनाश करू असे इराणने अनेकदा म्हटलेले आहे त्यामुळे काहीही करून इराणला अणुबॉम्ब नाही हे इस्रायल चे ध्येय धोरण आहे.

आजच्या कठीण काळात राहुल गांधी सारखा राजकारणी देशाचा पंतप्रधान नाही हे देशाचे केवढे भाग्य. त्यांची डिग्री खरी आहे तसेच त्यांना इंग्लिशही बोलता येत म्हणे.

ठळक अक्षरांतील अट बघावी. The U.S. Treasury granted a temporary 30-day waiver (March 5 – April 4, 2026) for Indian entities to purchase, import, and offload specific Russian crude oil cargoes . This waiver applies only to oil loaded onto vessels before March 5, 2026, aimed at preventing supply disruptions, and requires purchasers to be registered in India. Key Terms & Conditions for the 30-Day Waiver (March 2026): Timeframe: The exemption covers transactions from March 5, 2026, to April 4, 2026. Cargo Scope: Only applies to Russian-origin crude oil and petroleum products already loaded on vessels before March 5, 2026. Eligibility: The purchasing company must be registered under Indian law. Purpose: The waiver is intended for stranded oil shipments to ensure continued supply to Indian refineries amid Middle East volatility. Transaction Status: The waiver applies to the sale, delivery, and offloading of these specific shipments.

मला एक कळत नाही, अमेरिकेशी लढायची इराणची नी रशियाशी लढायची युक्रेनची लायकी नाहीये, तरीही असे पंगे हे देश का घेतात? मूर्ख झेलेनस्की एकवेळ eu मध्ये जायचे म्हणून रशियाशी भिडला असता तर समजू शकतो पण नाटो मध्ये जाऊन काय गावत उपटणार होता का? नाटो तर आले नाही वाचवायला पण युक्रेनची वाट लागली. तेच इराणबद्दल! अणुबॉम्ब बनवून करणार काय होते? अमेरिकेशी पंगे का घेतले इराणने? मूर्ख कुठले!

मला एक कळत नाही मोरु खरोखरच डोइजड झाले आहेत. इराण आणि इस्त्राईल संघर्षणात अंधभक्त खरेच डोळस झाले आहेत अभिनंदन मोरारजी देसाई जेव्हा मोरु लोकांच्या नाकावर टिच्चुन सरकार बनवतात तेंव्हा ते महान आणि पाकिस्तानचा अणुप्रकल्प नष्ट करण्यासाठी इस्रायलला मदत करत नाहीत तेंव्हा ते मुर्ख, बाकी चालु द्या इस्त्राईल किती चांगला सांगताना मोरु लोक कशी मुर्ख आणि तुच्छ हे सांगताना बाकी अंधभक्त मोरु लोक व त्यांच्या नेत्यानी केलेल्या चुका कशा कुरवाळतात हे सांगण्याएवजी दाढी कुरवाळण्यात धन्यता मानतात. ७५ ते ८० वर्षात अंधभक्त मोरु लोक व त्यांच्या नेत्यानी केलेल्या चुका लपवत आहेत. इस्त्राईल ला ईतके लाडावत आहेत तर इस्त्राईल साठी एक पुण्यकर्म करा ना मोरु लोक व त्यांच्या नेत्यानी १९४७ नंतर प्रथम पॅलेस्टाईनला मान्यता दीली नंतर इस्त्राईलला. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीररित्या पॅलेस्टाईनची मान्यता का काढत नाहीत??? छप्पनेश्वरांसाठी हा तर डाव्या हाताचा मळ याने छप्पनेश्वरांची छाती ११२ इच तर नक्कीच होईल ना अंधभक्त

In reply to by लिओ

मोरारजी देसाई Former Indian Prime Minister Morarji Desai casually revealed to Pakistan's General Zia-ul-Haq, "We know about your enrichment facility in Kahuta," in an informal conversation. This disclosure, described as an act of indiscretion, effectively alerted Pakistan to India's intelligence capabilities regarding their nuclear program. Key details of this incident include: The Conversation: Desai told Zia, "We know about your enrichment facility in Kahuta". Consequences: This revelation compromised years of intelligence work by the Research and Analysis Wing (RAW), prompting Pakistan to tighten security and move the facility underground. Background: The remark was made by Desai, who was known to be skeptical of intelligence agencies like RAW. This action is considered a major setback to Indian efforts to monitor Pakistan's nuclear development. कबुतरे उडवण्याची हौस असलेले लोक असल्यामुळे भारताचे अपरिमित नुकसान झालेले आहे. जाता जाता --मोरु ( मोदिरुग्ण सकाळी उठून श्री मोदी याना दूषणे दिल्याशिवाय ज्यांचे पोट साफ होत नाही असे )

In reply to by रामचंद्र

जनसंघींच्या काळात पाकिस्तानच्या अणुबॉम्ब प्रकल्पाने वेग घेतला! आताही जनसंघींचेच वंशज सत्तेत आहेत. शत्रू प्रबळ होतोय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीररित्या पॅलेस्टाईनची मान्यता का काढत नाहीत. तुम्ही पॅलेस्टाईन ला मान्यता दिली काय कि नाही दिली कुणालाही शष्प फरक पडत नाही. केवळ अरब देशांना गूळ लावण्यापुरती ती मान्यता आहे. अन्यथा ती मान्यता म्हणजे "भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्या ला विश्वेश्वराच्या घाटीवर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे". वि सू --भाट्ये हे रत्नागिरी जवळील गाव आहे. कोकणात दालदी म्हणून ओळखले जाणारे मुसलमान राहतात.

In the early 1980s, Prime Minister Indira Gandhi denied Israel permission to use Indian airspace or airfields for refueling during a planned covert airstrike on Pakistan’s Kahuta nuclear facility. Despite Israeli intelligence providing details on Pakistan's defense capabilities and offering to help destroy the facility, Gandhi rejected the plan, fearing a retaliatory strike. The Plan: Israel intended to strike the Kahuta facility, similar to its 1981 bombing of Iraq's Osirak reactor. The Refusal: Former CIA officer Richard Barlow reported that Gandhi blocked the operation in the early 1980s. This decision was part of a broader strategy of restraint at that time, though it allowed Pakistan's nuclear program to develop further. स्वतःला दुर्गा म्हणवून घेणाऱ्या इंदिरा गांधी यांची हि वस्तुस्थिती

दिल्लीत 35 वर्षाच्या संसार ज्या भागात केला अर्थात बिंदापूर भागात होळीच्या दिवशी एका दलित युवकाची शांतिप्रिय तरुणांनी हत्या केली दोष सहा वर्षाच्या मुलीने टाकलेल्या पाण्याचे काही शिंतोडे एका शांतिप्रिय महिलेच्या अंगावर पडले. दोन तासानंतर जमावाने तिच्या चुलत भावाची हत्या केली. शेजारीबाजारी फक्त बघत राहिले कोणाचे हिम्मत त्याला सोडवायची झाली नाही. एक पुरोगामी नेता दलित दिल्लीत असूनही त्या परिवाराला भेटायला गेला नाही. या घटनेची निंदा सुद्धा केली नाही. भाई आणि चाऱ्याचे उत्तम उदाहरण.

दिल्लीत 35 वर्षाच्या संसार ज्या भागात केला अर्थात बिंदापूर भागात होळीच्या दिवशी एका दलित युवकाची शांतिप्रिय तरुणांनी हत्या केली दोष सहा वर्षाच्या मुलीने टाकलेल्या पाण्याचे काही शिंतोडे एका शांतिप्रिय महिलेच्या अंगावर पडले. दोन तासानंतर जमावाने तिच्या चुलत भावाची हत्या केली. शेजारीबाजारी फक्त बघत राहिले कोणाचे हिम्मत त्याला सोडवायची झाली नाही. एक पुरोगामी नेता दलित दिल्लीत असूनही त्या परिवाराला भेटायला गेला नाही. या घटनेची निंदा सुद्धा केली नाही. भाई आणि चाऱ्याचे उत्तम उदाहरण.
हिंदूहितवादी असल्याचा दावा करून, हिंदूंची मते प्राप्त करून, पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सारखेच मुस्लिम प्रेमी असलेले, बारा वर्षांपासून प्रचंड बहुमताच्या सरकारचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात असे होणे स्वाभाविकच आहे, नाही का?

निशान-ए-पाकिस्तान वरुन आठवले २०१६ साली Order of King Abdulaziz सौदि अरेबियाकडुन २०१६ साली Order of Amanullah Khan अफगानिस्तानकडुन २०१८ साली Order of the State of Palestine पॅलेस्टाईन कडुन २०१४ साली सत्तेत आल्यावर छप्पनेश्वरांना हे विशेष हिरवेगार सन्मान मिळाले आहेत. २०१४ नंतर दिवसरात्र मेहनती केली हे आम्ही मान्य करायचे, की सन्मान देणारे २०१४ ची वाट बघत होते. त्यामुळे हे हिरवेगार सन्मान मिळाले, हे काही माहीत नाही... थांबा २०१६ साली Order of Amanullah Khan अफगानिस्तानकडुन घेऊन येताना लाहोर मध्ये ( लाहोर पाकिस्तानमध्ये ) अस्सल व्हेज बिर्याणी खाल्ली आता या बिर्याणीला काय म्हणायचे ??? एक सन्मान कि इतिहास अनुभव शिकवण बाजुला ठेवुन मैत्रीसाठी घेतलेला एक विश्रांती थांबा की आणि काही. जाता जाता लाहोरच्या प्युअर व्हेज बिर्याणी मध्ये " गरम बटाटा " काप होते का ?? सकाळी सकाळी नाव घेतल्याने पोट साफ होणारे लोक वाढल्याने पतंजलिचा पोट साफ करणार्‍या औषधाचा खप कमी झाला असे कळाले, त्यामुळे पतंजलिचे मालक चिंता करत आहेत पतंजलि कसे चालवायचे ?? काम तर नीट केले पाहिजे नाहितर छप्पनेश्वर शांत बसतील आणि सुप्रिम कोर्ट निरोप धाडेल असो

In reply to by लिओ

जनरल थोरात असोत वा त्यांचे पूर्वसुरी, मुक्तहस्त न मिळाल्याने बहुतांश भारतीयांच्या मनासारखं शत्रुप्रदेशात आक्रमण करता आलं नाही या वस्तुस्थितीवरून आजही कॉन्ग्रेस सरकारवर टीका होते. मग 'जो उचित समझो वो करो' असा मुक्तहस्त देऊनही मोदी यांच्यावर टीका का होते?

In reply to by लिओ

हे घेऊन आले ह्याबद्दल वाद नाही, मिळतय तर का सोडा अशी ह्यांची सवय असावी, पण ह्यांनी असा काय तीर मारला होता कि ह्याना त्या देशांनी पुरस्कार दिले? फक्त भारताचे पंतप्रधान आहे म्हणून? मग देवगौडाना पण द्यायला पाहिजे होते. :)

देवगौडाना पण द्यायला पाहिजे होते. हायला जो माणूस बैठकीला केक खायला हजर झाला त्याला अचानक पंतप्रधानपदाची माळ गळ्यात पडली, का तर गांडूळा सारखा निरुपद्रवी आणि निःसंग प्राणी म्हणून. तुम्ही कधी निराश वैफल्यग्रस्त किंवा आनंदी गांडूळ पाहिलं आहे का? त्याचे दोन तुकडे करा दोन्ही तुकडे वेगवेगळ्या दिशेला जातात आणि परत वाढतात. ना खंत ना खेद (तुलना टोकाची आहे आणि वैयक्तिक रित्या मला त्यांच्याबद्दल काहीही आकस नाही आणि उपमा चुकली असेल तर मी अगोदरच बिनशर्त माफी मागतो) अशा माणसाला कोणता पुरस्कार मिळावा?

In reply to by सुबोध खरे

माझही हेच म्हणणं आहे, की फक्त पंतप्रधान म्हाजुन पुरस्कार मिळत असतील तर मोदीनाच का? त्यांनी असे काय केले की पुरस्कार मिळावे? मग देवगौडांना का नको? ते ही pm होतेच ना?

आज मोरारजी देसाई काय चीज होती ते कळाले झियाने मोदेला (मोरारजी देसाई ) फोनवर शिवांबु बद्द्ल विचारुन रॉला (रॉ पाकिस्तान सेल) पोखरले आणि स्वतःचा अणु कार्यक्रम सुरक्षित केला याला फक्त आणि फक्त मोदेलाच (मोरारजी देसाई ) जबाबदार ठरवले पाहिजे. पण पण याच मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे नेते आणि जबाबदार बिलकुल नाहीत. मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना ?? आता हे अंधभक्त असे सिध्द करतील कि यात आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे नेते वाजपेयीना अंधारात ठेवले (जे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते) आता हे अंधभक्त असे पण सिध्द करतील कि त्या काळात रॉ पुर्णपणे पाकिस्तानातील भारतीय दुतावास बाजुला सारुन काम करत होते, एक सांगा रॉला (रॉ पाकिस्तान सेल) ला पाकिस्तानात काय त्रास होतो, रॉची पाकिस्तानात काय स्थिती होती याबद्द्ल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाकिस्तानातील भारतीय दुतावासामार्फत माहीत होत नव्हते ?? या छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना माहित नव्हते ?? छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना देशहितापेक्षा सत्ता महत्वाची वाट्ली ना ?? मोदे (मोरारजी देसाई ) सरकारच्या चुकांवर अंधभक्त पांघरुन घालत आहे ज्या चुकांमध्ये आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे योगदान मोदेपेक्षा जास्त आहे छप्पनेश्वर उगीच म्हणत नाहित कि "हम फकीर आदमी है झोला लेके निकल जायेंगे" हे चार पुरस्कार सांगतात झोला लेके कहा निकल जायेंगे अंधभक्तांनी लिहावे की मोदेपेक्षा इंदिरा गांधी या पकिस्तानी अणुसंकटाला कशा जबाबदार नक्की वाचु अंधभक्तांना विशेष सुचना : उन्हाळा वाढत आहे उन्हात फिरताना काळजी घ्या अन्यथा तीव्र उन्हामुळे " अतिसार " होऊ शक्तो.

In reply to by लिओ

पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना??> हा मुद्दा आधी लक्षात आला नव्हता. म्हणजे सरसकटीकरण करून फक्त मोरारजींना दोष देणं योग्य नाही. आपण उल्लेखलेल्या मंत्रिगणाच्या करामतींची काहीच वाच्यता झालेली दिसत नाही. चक्क सुब्रह्मण्यम् स्वामींनीही यावर काही भाष्य केलेलं दिसत नाही.

In reply to by लिओ

मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना ?? आता हे अंधभक्त असे पण सिध्द करतील कि त्या काळात रॉ पुर्णपणे पाकिस्तानातील भारतीय दुतावास बाजुला सारुन काम करत होते, एक सांगा रॉला (रॉ पाकिस्तान सेल) ला पाकिस्तानात काय त्रास होतो, रॉची पाकिस्तानात काय स्थिती होती याबद्द्ल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाकिस्तानातील भारतीय दुतावासामार्फत माहीत होत नव्हते ?? या छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना माहित नव्हते ?? छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना देशहितापेक्षा सत्ता महत्वाची वाट्ली ना ?? लिओ साहेब थोडी वस्तुस्थिती ची माहिती घ्या. असे बेताल लेखन करू नका. उगाच लोक हसतील आपली रॉ हि गुप्तचर संघटना थेट पंतप्रधानाच्या हाताखाली काम करते आणि त्यांचा परराष्ट्र मंत्रालयाशी संबंध किंवा ते त्यांना (परराष्ट्र मंत्रालयाला) जबाबदेही नाहीत. रॉ केवळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराशो संपर्क ठेवून असतात.जे आता श्री अजित डोव्हल आहेत परराष्ट्रमंत्र्यांशी नाही. the Research and Analysis Wing (R&AW or RAW), India's external intelligence agency, reports directly to the Prime Minister of India. It operates under the Cabinet Secretariat, which is directly under the Prime Minister's Office (PMO), ensuring that intelligence is directly communicated to the national leadership. Direct Reporting: The Chief of RAW (designated as Secretary (Research)) reports directly to the Prime Minister and often works closely with the National Security Advisor (NSA). Administrative Structure: RAW is a wing within the Cabinet Secretariat, not a ministry itself, allowing it to bypass some of the bureaucratic hurdles and maintain high secrecy. Accountability: The head of RAW is responsible for submitting reports directly to the Prime Minister on matters concerning national security. Independent Functioning: Unlike other agencies, it does not fall under the Ministry of Defence or Ministry of Home Affairs, which helps maintain its autonomy दुर्दैवाने परराष्ट्र खाते आणि सचिव आणि रॉ यामध्ये बेबनाव असतो याचे कारण तिथले सचिव आणि भारताचे राजदूत हे आय एफ एस केडरचे असतात. जे स्वतःला एलिट समजतात. याउलट रॉ चे बरेचसे अधिकारी आय पी एस केडरचे असतात, ज्यांना आय एफ एस केडरचे अधिकारी कमअस्सल समजतात. जसे शिवनेरीचे प्रवासी लालपरीच्या प्रवाशांकडे पाहतात. श्री इंद्रकुमार गुजराल हे माजी पंतप्रधान अशाच आय एफ एस केडरचे होते आणि त्यांनी तर रॉ मोडीत काढावी अशी कल्पना काढली होती. it is a commonly reported claim and a subject of intense debate that former Prime Minister I.K. Gujral ordered the dismantling of the Research and Analysis Wing’s (RAW) covert network in Pakistan during his tenure in the late 1990s. Critics, including former RAW officers, argue that this action was part of the "Gujral Doctrine" of unilateral goodwill, which led to significant damage to India's intelligence capabilities. याच साखळीतील एक हलकट माणूस म्हणजे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी. यांनी तर एवढ्या उच्च पदावर राहून भारतात मुसलमानांना असुरक्षित वाटतं असाही दावा उघडपणे केला होता Exposing RAW's setup: Retired RAW officer N.K. Sood publicly alleged in 2019 that Hamid Ansari cooperated with Iranian intelligence (SAVAK) during his tenure, exposing the RAW setup in Tehran and endangering agents' lives. Inaction during abductions: According to R.K. Yadav's book Mission R&AW, Ansari was non-cooperative and unmoved when Indian diplomatic personnel and a RAW agent were systematically kidnapped, tortured, and harassed by Iranian intelligence. Recommendation to shut down RAW unit: Ansari reportedly sent a report to the Indian government suggesting the closure of the RAW unit in the Indian embassy, citing their exposure as detrimental to relations with Iran. Pakistani spy connection: In 2022, a Pakistani journalist named Nusrat Mirza claimed in a TV interview that he visited India multiple times during the UPA government era, spied for Pakistan's ISI, and was invited to conferences in India through Hamid Ansari. हे आपले दुर्दैव आहे कि आपल्याला मोरारजी देसाई आणि गुजराल सारखे पंतप्रधान आणि अन्सारी सारखे उपराष्ट्रपती लाभले. तेंव्हा आपण असे प्रतिसाद लिहिण्यापूर्वी व्यवस्थितपणे वस्तुस्थिती समजून घ्यावी हि विनंती. उगाच भुजबळांसारखे उचलला हात आणि बडवला कळफलक असे करू नये.

@ रामचंद्र पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना??> The R&AW operates under the Cabinet Secretariat and reports to the Prime Minister through the National Security Advisor. Covert Operations: If agents are not under official diplomatic cover, their reporting, if any, to a local mission would be strictly confidential and part of covert, clandestine operations. रॉ चे अधिकारी जर "राजनैतिक अधिकारी" (duel agent) म्हणून गेले असतील तरच ते दूतावासाला जबाबदेही असतात आणि त्यांना राजनैतिक संरक्षण असते (सी आय ए चे बहुतांश अधिकारी असे ड्युएल एजन्ट असतात.) तसे नसले तर त्यांना हायकमिशनरला रिपोर्टींग करावे लागत नाही.अन ते थेट पंतप्रधान कार्यालयालाच रिपोर्ट करतात. अर्थात त्यांना असे राजनैतिक संरक्षणही नसते. काहूता मधील रॉ चे सदस्य असे भारतीय दूतावासाच्या अखत्यारीत नव्हते यामुळेच मोरारजी देसाई यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांना "नाही चिरा नाही पणती" अशा स्थितीत पाकिस्तानात हुतात्मा व्हावे लागले. (कारण त्यांना राजनैतिक संरक्षण नव्हते आणि भारत सरकार त्यांचे अस्तित्व मान्य करू शकत नव्हता). झिया उल हक सारख्या चाणाक्ष लष्करप्रमुखाशी बोलताना एक एक शब्द तोलून मापून बोलायला हवा होता. केवळ एवढ्या शब्दांनी झिया यांनी संपूर्ण चौकशी करून आपले हेर शोधून काढले आणि ठार केले अशा देशद्रोही कारवायांबद्दल ना मोरारजी देसाईंना काही झाले ना गुजराल वा हमीद अन्सारींना शिक्षा झाली. देशासाठी काम करणाऱ्या माणसांचे जीव गेले तरी राजकारण्यांना आणि बाबू लोकांना "ना खंत ना खेद" असतो. नौदलात असताना एकदा रेल्वेचा प्रथम वर्गाच्या डब्यात माझ्याबरोबर संरक्षण सचिव प्रवास करत होते. त्यांच्याशी सियाचेन मध्ये असणाऱ्या सैनिकां बद्दल बोलताना ते कोरड्या थन्डपणे म्हणाले कि man power is expendable. मी केवळ अवाक झालो.

In reply to by सुबोध खरे

या माहितीबद्दल धन्यवाद. आता २०१४नंतर तरी याबाबतीत सुधारणा झाली असेल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रणव मुखर्जींची एक आठवण सांगताना वरील विधानाची थोडीफार प्रचिती यावी असा एक अनुभव (कुलदीप नय्यरांच्या पुस्तकातही याच प्रकारचा उल्लेख आहे) सांगितल्याची आठवण आहे. याउलट डॉ. अब्दुल कलाम मात्र सियाचिनसदृश परिस्थितीतही भारतीय जवानांशी, त्याच परिस्थितीत आपल्यासाठी कोणताही वेगळा सरंजाम न मागवता, मोकळेपणाने आणि आपुलकीने वागल्याची आठवण त्या अधिकाऱ्यांनी सांगितली होती.

गुप्तहेरी हि फक्त शत्रु देशाची नाही तर ती मित्रदेशाची सुध्दा केली जाते. १९४८/४९ नंतर भारत आणि फ्रान्स / जर्मनी यांचे काही वैर असावे अशी एक हि घटना एकीवात नाही १९७०/७१ च्या दरम्यान युध्द तयारीच्या दरम्यान भारत फ्रान्स / जर्मनी युध्दसाहित्याच्या खरेदिसाठी फ्रान्स / जर्मनी च्या संपर्कात होता. जेव्हा जेव्हा भारतीय अधिकारी फ्रान्स / जर्मनी च्या शिष्टमंडळासोबत वाटाघाटि करत तेव्हा तेव्हा ही शिष्टमंडळ एक तर खरोखरच गरज असलेल्या वस्तुंची किंमत आवाक्याबाहेर वाढवुन सांगत कींवा त्या गरज नसलेल्या वस्तु भारतीय अधिकार्यांच्या पदरात घालत. भारतीय अधिकारी अचंबित तेव्हा व्हायचे जेव्हा परदेशी शिष्टमंडळ मागणी केलेल्या वस्तु कुठे आणि कशा वापराव्यात याबद्द्ल ज्ञान पाजळायचे याला कारण एकच या शिष्टमंडळाचे हेर भारतीय संरक्षण मंत्रालयात होते. म्हणुन असे घडायचे. असॉ १. खरे साहेब जेंव्हा मुंबईत २६/११ ला हल्ला झाला तेंव्हा अतिशय महाग पण GPS उपलब्ड होते. एखाद्या अडाणी माणसाला काही महिन्रे घोकमपट्टी करुन पाहिजे त्या ठिकानी पाठवता येते (जे खरोख्रर घडले आहे.) या हल्लेखोरांना काय बोटाला धरून लिओपोल्ड , ताज सीएसटी ला सोडण्यात आले होते का ?? तुम्ही स्वतः नौद्लामध्ये काम केले आहे, तुम्ही सांगा कसाब सारखा अडाणी माणुस कोणत्याही सपोर्ट चेन शिवाय पाकिस्तानाहुन मुंबईला येईल का ते पण समुद्रामार्गे ?? २. खरे साहेब एक वेळ तुमचे म्हणणे आपण योग्य मानुयात कि काहुटात अणुप्रकल्पावर काम करणारी रॉ टिम हि पुर्णपणे स्वतंत्र होती तीचा पाकिस्तान रॉ सेल शी सुध्दा काहीही संबंध नव्हता. मग या टिमने काम कसे केले ??? भारताचे विमान काहुटावर गेले, काहुटा रॉ टिमने पॅराशुटने न्हाव्याच्या दुकानात उडि मारली केसाचे सॅम्पल घेतले. ज्या विमानातुन उडि मारलि त्याच विमानात केसाचे सॅम्पल ठेवले आणि ते विमान परत भारतात आले. पण काहुटा रॉ टिम काहुटाच राहिली. गुप्तहेर असेच काम करतात का ?? ३, खरे साहेब जर खरोखर तुम्हाला गुप्तहेर विश्वाबद्दल काही माहिती असेल तर खुशाल म्हणा कि इराणी अणु शास्त्रज्ञाला मारायला मोसादने १ दिवसात गाडि / ट्रक उभा केला. १ मिनिटात गाडि / ट्रक मधल्या रिमोट बंदुकीने गोळि मारली आणि झाले मिशन सक्सेसफुल. एक सपोर्ट चेन असते गुप्तहेरांसाठी जी कोणताही देश कधीही उघड करत नाही, म्हणुन या संर्दभात असे म्हणता येत नाही कि गुप्तहेर आणि दुतावासाचा काही संबंध नाही खरोखर गुप्तहेर काम असे करतात. जाता जाता खरेसाहेब एक गोष्ट मी तुमची मान्य करतो कि मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला बर मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमधील वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री यांचा रॉ टिम काहुटाशी काही संबंध नाही. जर तर्क आणि संबंध आणि जबाबदारी समजत असेल तर तथ्य सत्य जबाबदारी बद्द्ल काही बोला १. मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला ( सत्य ) २. मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री होते. ( सत्य ) ३. मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री होते. कारण त्यावेळचे जनसंघ आताचे भाजपाने मोदे (मोरारजी देसाई ) सरकारला पाठींबा दिला होता. ( सत्य ) तरिही तरिही, मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला याला जबाबदार फक्त आणि फक्त मोदे (मोरारजी देसाई ), पाठींबा देणारे जबाबदार, त्यावेळचे जनसंघ आताचे भाजपा नाही तथ्य असेल तर सिध्द करा.