✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 10/13/2025 - 11:11  ·  लेख
लेख
नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा. आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही. १. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी ) २. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५ ३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24331 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

नव्या घडामोडीत राज उद्धवर

विजुभाऊ
Mon, 10/13/2025 - 11:53 नवीन
नव्या घडामोडीत राज उद्धवर एकत्र येणार अशा बातम्या येताहेत. पण ते एकत्र येऊन काय होणार आहे हेच कळत नाही. वर्तमानपत्राना बातम्या दाखवता येतील इतकेच. उद्धवनी कितीही जाहीर केले तरी राज मात्र कोणत्याच बातमीवर मत प्रकट नाहियेत. उबाठांच्या पक्षाचे प्रतोद मात्र रोज वेगवेगळ्या विषयावर कुणी न विचारताच मतप्रदर्शन करत आहेत
  • Log in or register to post comments

बदल होत राहिले पाहिजेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/13/2025 - 18:17 नवीन
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राने आता इतके बदल पाहिले आहेत की त्याची काही मर्यादा राहिली नाही. तेव्हा, हाही बदल महाराष्ट्राने एकदा पाहुनच घ्यावा. स्व.बाळासाहेबांनी उद्धव ऐवजी राज यांचीच तेव्हा निवड करायला पाहिजे होती असे मला कायम वाटले आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.

शाम भागवत
Tue, 10/14/2025 - 14:47 नवीन
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
मलाही असेच मनापासून वाटते. तसे झाले तरच ठाकरे ब्रँडमधे धुगधुगी शिल्लक राहील व शिंदेंकडे सैनिकांचा ओघ वाढून शिंदे आणखीन बळकट होणार नाहीत. भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार जोपर्यंत आणता येत नाही व जोपर्यंत शरद पवार राजकारणात आहेत, तोपर्यंत तरी उध्दवजी, राजजी व अजित पवार राजकारणात शिल्लक राहिलेच पाहिजेत. :) शरद पवार असेपर्यंत तरी वरील तिघांना मोदी अभय देणारच. :) आणि शरद पवारांचे सर्व डावपेच ओळखून ते उधळून लावण्याची क्षमता असणारे देवाभाऊ मुमं म्हणून राहणारच. एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदाका शरद पवारांनी राजकारण

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 10/16/2025 - 07:57 नवीन
एकदाका शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतला की देवाभाऊंना त्यांची इच्छा असो वा नसो, दिल्लीच्या राजकारणात जायलाच लागेल.
शरद पवार साहेब राजकारणातुन संन्यास घेतील हे दिवास्वप्न (देवास्वप्न :) ) आहे. ठाकरे बंधुंचा इगोच इतका मोठा आहे कि त्यापुढे त्यांना बाकीचे पक्षासंबंधित राज्यासंबंधित असलेले फायदे दिसतच नाहीत. जरी दोन्ही बंधु एकत्र आले तर ते दोन्ही पक्षांसाठी एक मोठे अराजक ठरेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

सर आले धावून

अभ्या..
गुरुवार, 10/16/2025 - 16:54 नवीन
राज-उद्धव एकत्र आले पाहिजेत.
भारी निरागस काड्या टाकता हां सर. परफेक्ट ठासलेल्या चिलिमी धुमसू लागतात लगेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

शाम भागवत
गुरुवार, 10/16/2025 - 17:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बैल गेला आणि झोपा केला.

सुबोध खरे
Mon, 10/13/2025 - 19:49 नवीन
बैल गेला आणि झोपा केला. या म्हणीची आठवण झाली. मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

मतदारांचा भ्रमनिरास झालयावर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/13/2025 - 19:57 नवीन
मतदारांचा भ्रमनिरास झालयावर आता युती करून काही होईल असे वाटत नाही. . निवडणूक आयिगाने भाजपला मदत न करता प्रामाणिक निवडणूक घेतल्या तर नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राज आणि उद्धव दोघेही आळसी

रात्रीचे चांदणे
Mon, 10/13/2025 - 21:53 नवीन
राज आणि उद्धव दोघेही आळसी आहेत. ऐन निवडणुकीतही दोन नाहीतर तीन सभा घेतेत. शक्यतो एकच. त्यामुळे एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments

तेव्हा, लक्षात आलं की, महसुल

कानडाऊ योगेशु
Tue, 10/14/2025 - 08:33 नवीन
तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे.
सगळीकडे हीच समस्या आहे. जवळचा एक नातलग अश्या अधिकारी पदावर कार्यरत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार काम केले अथवा नाही केले तरी संबंधित अधिकार्यावर कारवाई करणे हे नित्याचेच झाले आहे. म्हणजे अश्या अटी पुर्या करताना वरुन प्रेशर येते कि अटी शिथिल करा व कालांतराने त्याच शिथिल केलेल्या अटींमुळे संबंधित अधिकारी अडचणीत येतो.
  • Log in or register to post comments

तालिबान

सौन्दर्य
Tue, 10/14/2025 - 18:39 नवीन
अफगाणातील तालिबान सरकारला दिलेले समर्थन तसेच त्यांच्या बरोबरची मैत्री घातक ठरणार आहे. 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' हे ऐकायला कितीही गोड वाटत असले तरी काही बाबतीत त्याला अपवाद हा असतोच.
  • Log in or register to post comments

तो शुद्ध व्यापार आहे.

सुबोध खरे
Tue, 10/14/2025 - 19:12 नवीन
तो शुद्ध व्यापार आहे. अफगाणिस्तान बेचिराख झाला आहे त्याची पुनर्बांधणी होईल तेंव्हा तेथे आपल्या अनेक कंपन्यांना कंत्राटे मिळू शकतील याशिवाय तेथे असलेला दुर्मिळ खनिजांचा खजिना हा एक फार महत्त्वाचा भाग आहे Afghanistan possesses significant deposits of rare earth minerals like lanthanum, cerium, and neodymium, along with other valuable minerals such as lithium, cobalt, and niobium. These resources are crucial for modern technologies, but their extraction has been hindered by political instability, security issues, and lack of infrastructure. The Helmand province is known to have some of the most important deposits. चीन वरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने हा एक फार मोठा आधार ठरू शकतो. अमेरिका अफगान युद्धात आणि कोव्हीड मध्ये भारताने मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत केली आहे याबद्दल अफघाण लोक कृतज्ञ आहेत. याशिवाय अगोदर रशिया आणि नंतर अमेरिकेशी युद्ध केल्यामुळे अफघाण लोकांचा या दोघांवर अजिबात विश्वास नाही. तेथील खनिज उत्खननासाठी त्यातनं तंत्रज्ञान हवेच आहे जे भारताजवळ आहे शिवाय स्वस्त आहे हेलमंड प्रांतात असलेली हि खनीजे चाबहार या इराणच्या जवळच्या बंदरातून (होर्मूझ च्या समुद्रधुनीच्या पूर्वेकडून) आपल्याला हि खनिजे आणणे फार सोपे आहे अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाण लोकांना भारताबददल बरीच आत्मीयता आहे हा एक अजून फायदा. जगाच्या इतिहासात कोणताही देश आपला कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन?

स्वधर्म
Tue, 10/14/2025 - 20:03 नवीन
>> अशा स्थितीत चीनने शिरकाव करण्याच्या अगोदर भारत जर आपल्या पूर्वपुण्याईचा उपयोग करून घेत असेल तर त्यात काय चूक आहे? (First-mover advantage) अफगाणिस्तान - चीन व्यापार चीनक्डून आयातः ९६२ मिलियन डॉलर्स चीनला निर्यातः ६३.९ मिलियन डॉलर्स अफगाणिस्तान - भारत व्यापार भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही भारताला निर्यातः ६६७ मिलियन डॉलर्स याचा अर्थ चीनचा अफगाणिस्तानशी व्यापार आपल्यापेक्षा खूपच जास्त असून अफगाणिस्तान चीनकडून जेवढ्या वस्तू आयात करतो, त्याच्या जवळ्पासही भारताकडून काही घेत नाही परंतु भारताला चीनपेक्षा १० पटीहून अधिक निर्यात करतो. हे खूपच विषम चित्र आहे. त्यामुळे आपल्याला फर्स्ट मूव्ह वगैरे काहीही फायदा नाही. चीनबरोबरचा त्यांचा व्यापार आपल्यापेक्षा १० पट जास्ती आहे. शिवाय ते आपले ग्राहक नसून आपण त्यांचे ग्राहक आहोत. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्याला खूष ठेवायला हवे. अफगाणिस्तानची एवढी दाढी कुरवाळण्याची काय गरज आहे? समर्थन म्हणजे काहीही केले तरी सरकारचे समर्थन करायचेच, हे अजब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

संदर्भ

स्वधर्म
Tue, 10/14/2025 - 20:03 नवीन
https://oec.world/en/profile/country/afg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

India Exports to Afghanistan

सुबोध खरे
Tue, 10/14/2025 - 21:37 नवीन
India Exports to Afghanistan was US$333.52 Million during 2024, according to the United Nations COMTRADE database on international trade. बाकी चालू दया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

Based on recent reports in

सुबोध खरे
Tue, 10/14/2025 - 21:50 नवीन
Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. While past exports have been limited due to instability, these new developments signal Afghanistan's desire to significantly expand its mineral trade with India.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दुवा द्या

स्वधर्म
Tue, 10/14/2025 - 21:54 नवीन
कृपया दुवा द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

https://youtu.be/HKR9ZzlOGDc

सुबोध खरे
Tue, 10/14/2025 - 22:05 नवीन
https://youtu.be/HKR9ZzlOGDc?si=SXGJlpaocTjHtPrJ https://www.oneindia.com/international/afghanistan-invites-india-to-invest-in-1-trillion-mineral-sector-agriculture-and-sports-7886989.html https://www.news18.com/world/afghanistan-sees-new-delhi-as-close-friend-invites-indian-firms-for-mining-ops-taliban-fm-muttaqi-ws-kl-9626920.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

धन्यवाद

स्वधर्म
Wed, 10/15/2025 - 15:00 नवीन
चीनबरोबरचे अफगाणीस्तानचे व्यापारी संबंध भारतापेक्षा निश्चितच जास्त आहेत असा माझा मुद्दा होता. त्यावर तुंम्ही दिलेल्या दुव्यांमध्ये चीनच्या तुलनेत भारताला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हान्टेज मिळेल असे काहीही आढळले नाही. बाकी त्यांनाही आपली तितकीच गरज आहे. आपण ग्राहक म्हणून तालिबानला वाकवूच शकतो. त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चान

अभ्या..
Wed, 10/15/2025 - 16:10 नवीन
हे सरकार का सगळ्यांसमोर सरपटतंय काही कळत नाही. खनिजे वगैरे म्हटलं की दुखणं कुठलं आहे त्याचा थोडा अंदाज येतो खरा. त्यातल्या त्यात २००१ साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी "तालिबान्यांकडून बामियानच्या बुध्दमूर्तीच्या नाशामुळे" मानवतेच्या आवाजासाठी तत्कालीन कित्येक सरकारांना आणि युनायटेड नेशन्स ला आवाहन केलेले होते, मोदी आणि योगीकडून ज्या तालिबानी कृत्याची निर्भत्सना कित्येक वेळी केली गेली आहे त्याच घटनेचे बुध्द मूर्ती विनाशानंतरचे पेन्टींग पार्श्वभूमीवर लावणे ह्यात तालिबानचा कोणता गौरव घेऊन ते भारतात आले आहेत हेच स्पष्ट होते. नॉर्मल भेट ठिकच आहे पण महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणे आणि मुद्दामून तेच पेंटींग घेऊन येणे (कारण ते भारतात कुणी दिले असेल त्यांना तर अधिक गंभीर आहे) आणि त्याचे प्रदर्शन करणे हेच तालिबानच्या हेतूमधील खोच आणि आपल्या सरकारचे सरपटणे दाखवते. बाकी सौदीचा देवबंदींना पतपुरवठा थांबल्यापासून ते आता सौदीचा पाकिस्तानसोबतचा संयुक्त सुरक्षा करार आणी तालिबानचा भारतासोबतचा करार, पाकिस्तानचे चीनसोबतचे भारतावरच्या अक्रमणातले सहाय्य आणि ज्या रशिया अमेरिकेने अफगाणी दगडांवर डॉके फोडून घेतलेले आहे त्या रशिया अमेरिकेचे भारतासंबधात बदलेलेले संबध हा प्रवास रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

त्यांचे ऐकून महिला

सुबोध खरे
Wed, 10/15/2025 - 18:44 नवीन
त्यांचे ऐकून महिला वार्ताहरांना प्रवेशबंदी करण्याचा मध्ययुगीन मागासपणा करण्याची काही एक गरज नव्हती. त्यांच्या देशात गेल्यावर जर त्यांचे कायदे आपल्याला पाळावे लागत असतील तर आपल्या देशात आल्यावर त्यांना आपले कायदे पाळायलाच पाहिजेत. पूर्वग्रह असला कि मूलभूत गोष्टींचा विसर पडतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. विकिलीक्स वाला ज्युलियन असांजे हा लंडन मध्ये सात वर्षे इक्वेडोर देशाच्या वकिलातीत राहत होता. तेथे ब्रिटनचा कायदा चालत नाही. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. त्याचे राजकारण काँग्रेसच्या राजकारण्यांनी केले यात नवल नाही. कारण इथे मिपा वर सुद्धा मूलभूत माहिती न घेता तोंड सोडणारे लोक कमी नाहीत मग सामान्य लोकांची काय कथा? सरकारबद्दल कमालीचा द्वेष असला तरी परराष्ट्र धोरण, लष्कराबाबत किंवा इसरो अणुऊर्जा इत्यादीसाठी घेतलेली दूरगामी धोरणे एका रात्रीत बदलत नाहीत. काँग्रेसचे सरकार असते तरी येथे तालिबान बरोबर संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेच प्रयत्न केले गेले असते याबद्दल मला शंका नाही. जर १९७१ मध्ये युद्ध लष्कराने लढले असले तरी त्याचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधी यांना च दिले जाते तद्वत आज ऑपरेशन सिंदूर चे श्रेय श्री मोदी यांनाच मिळणार आहे मग आपण कितीही आदळ आपट किंवा चिडचिड करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

काहीही

अभ्या..
गुरुवार, 10/16/2025 - 12:40 नवीन
परराष्टीर्य वकिलातीवर त्या देशाचा कायदा चालत नाही हे मूलभूत तत्व आहे. तेंव्हा अफगाणिस्तानच्या वकिलातीत पत्रकार परिषद घेताना आपला कायदा तेथे चालत नाही हे आपण लक्षात घ्या. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
. काहीही काय फेकताय? मूळ अधिकृत वकिलात असली तर तेथे ती इम्म्युनिटी आणि स्वातंत्र्य. भारताने २०२१ लाच अफगाणिस्तानातली वकालत बंद केली आणि सगळे डिप्लोमॅट्स, विद्यार्थी, जमेल तेवढे नागरिक परत आणले. परत ह्या महिन्यात ती चालू केलेली आहे पण अद्याप तालिबान सरकारला अधिकृतता दिलेली नाहीये. अफगाणिस्तानची भारतातली एम्बसी २०१५ ला उद्घाटन झाले. जमीन १९५६ ला घेतलेली होती. ऑगस्ट २०२१: तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, नवी दिल्लीतील अफगाण दूतावास हा बहिष्कृत प्रजासत्ताक सरकारमधील राजदूतांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहिला. बहुतेक आंतरराष्ट्रीय समुदायाप्रमाणे भारतानेही तालिबान प्रशासनाला मान्यता दिली नाही. नोव्हेंबर २०२३: नवी दिल्लीतील दूतावास कायमचा बंद झाला. माजी सरकारच्या राजदूतांनी भारत सरकारकडून पाठिंबा नसणे आणि तालिबानचा दबाव हे बंद करण्याचे कारण असल्याचे सांगितले. २०२४-२०२५: तालिबान नियंत्रण आणि पुन्हा सुरू होण्याची शक्यता शोधत आहे २०२४: तालिबान प्रशासनाने मुंबईतील अफगाण दूतावासात एक वाणिज्य दूत नियुक्त केला, ज्यामुळे भारतात त्यांची वाढती राजदूतीय उपस्थिती दिसून आली. मुंबई आणि हैदराबादमधील अफगाणिस्तानचे वाणिज्य दूतावास मर्यादित सेवांसह कार्यरत राहिले. ऑक्टोबर २०२५: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील ऐतिहासिक बैठकीनंतर, दोन्ही देशांनी पूर्ण राजदूतीय दूतावास पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली. दूतावास पुन्हा सुरू करण्यासाठी तालिबान राजदूत आता नवी दिल्लीत येण्याची अपेक्षा आहे . मग कुठली आलीय इम्म्युनिटी? . सध्या रशिया हे एकमेव राष्ट्र आहे कि ज्यानी तालिबान सरकारला अधिकृतता बहाल केली आहे. बाकी सर्वानी कंडीशनल अ‍ॅक्सेस आणि काही बोलणी चालू आहेत. . म्हणजे ही कुठली पध्दत की घराचे अ‍ॅग्रीमेंट करायला घरात बोलवायचे आणि अद्याप काही व्यवहार न होता त्याला मालकी बहाल करुन चाव्या सोपवायच्या, नवीन मालकांने पण स्वतःच्या नेमप्लेटसहीत, पेंटींग्स लावून घर सजवायचे तेही मालकाचा अपमान करुन आणी जुन्या मालकाच्या पाळीव लोकांनी त्याचा घरमालक म्ह्णणून अधिकारच आहे असा उदोउदो करायचा. सरपटणे ह्यालाच म्हणतात. जळजळीला ओवा चालतो, पाठीचा कणाच मोडला की सरपटावेच लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१००% सहमत

स्वधर्म
गुरुवार, 10/16/2025 - 17:08 नवीन
अभ्या, तुंम्ही लिहिलेले मुद्दे १००% टक्के बरोबर आहेत. त्यामुळे या प्रकारच्या वागणुकीस सरपटणे असेच म्हणावे लागेल. पहिले असे की, भारताने अजून इस्लामिक इमिरेट ऑफ अफगाणिस्तान या तालिबान नियंत्रित सरकारला अधिकृत मान्यताच दिलेली नाही. भारताने अजूनही वकालतीची मालकी इस्लामिक रिपब्लीक ऑफ तालिबान या पूर्वीच्या सरकारकडून तालिबान सरकारकडे वर्ग केलेलीच नाही. Taliban representatives claim full control over the embassy, although India has not officially transferred authority to Taliban-appointed diplomats. दुसरे असे की पंतप्रधान भारतात कधीही खुली पत्रकार परिषद घेत नाहीत, पण अमेरिकेत गेल्यावर त्यांना तिथले नियम पाळावेच लागलेले आहेत. त्यामुळे टेलिप्रॉम्प्टर वापरून का असेना, तिथल्या नॉन-गोदी मिडीया समोर त्यांना खुल्या पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागतात. (त्यात काय होते हा मुद्दा वेगळा). त्यामुळे भारतात आल्यावर तालिबानींना इथले नियम पाळले पाहिजेत. तिसरे असे की, अफगाणिस्तान पेक्षा भारत हा जवळजवळ सर्व दृष्टीने विकसित, बलवान व मोठा आहे. तरीही आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर का कच खावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सरपटणे ह्यालाच म्हणतात.

सुबोध खरे
गुरुवार, 10/16/2025 - 18:21 नवीन
सरपटणे ह्यालाच म्हणतात. मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता. हे वाचलंच नाहीये म्हणून अशी जळजळ होते आहे. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

धन्य हो....

अभ्या..
गुरुवार, 10/16/2025 - 19:22 नवीन
मुळात हि पत्रकार परिषद अफगाण वकिलातीने घेतली होती आणि त्यात आपल्या परराष्ट्र खात्याचा सहभाग नव्हता.
लोकांची जळजळ तपासण्यातली तुमची तळमळ समजू शकतो पण हे बघा. टाइम म्हणतेय : संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत असलेले मुत्ताकी यांना गेल्या गुरुवारी आठवडाभराच्या भारत भेटीसाठी प्रवास सूट मिळवावी लागली. भारताने त्यांना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणून संबोधले, त्यांना दिल्लीतील अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी दिली, जिथे अजूनही मागील पाश्चात्य समर्थित अफगाण सरकारचे अधिकारी काम करतात आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसवले. . बोलावले कुणी? भारत सरकारने.. त्यांना अफगाणचे परराष्ट्र मंत्री म्हणून भारतात दर्जा कुणी दिला? भारत सरकारने.. अफगाण दूतावासाच्या परिसरात पत्रकार परिषदा घेण्याची परवानगी कुणी दिली? भारत सरकारने.. दूतावासात अजूनही जुन्या अफगाणी सरकारच्या लोकांना कुणी ठेवलेय? भारत सरकारने.. दूतावास चालू करण्याची बोलणी अद्याप चालू असताना दूतावास वापरण्याची परवानगी कुणी दिली? तालिबान आणि भारत सरकारने.. मुंबईतले अफगाणी कॉन्सुलेट तालिबान चालवते आणि हैदराबादमधले कॉन्सुलेट जुने अफगाण रिपब्लिक असा कॉन्फ्लिक्ट असतानाही तो क्लीअर करणे सोडून करार मदार, चर्चा घडवून आणल्या कुणी? भारत सरकारने.. प्रेस कॉन्फरन्स मध्ये अफगाणिस्तानचा झेंडा न लावता तालिबानचा झेंडा लावून कॉन्फरन्स घ्यायची परवानगी कुणी दिली? तालिबान भारत सरकारने.. . तालिबानने भारताचा उपयोग करुन लेजिटमसी मिळवायचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्ट दिसत असताना एका प्रेस कॉन्फरन्स मधल्या चुकीसाठी परराष्ट्र खात्याला पर्यायाने मोदी सरकारला क्लीन चीट देण्यासाठी इतक्या कोलांट्या उड्या मारणे म्हणजे खरी भक्ती. धन्य हो...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भारतातील पत्रकार परिषदेत

आग्या१९९०
गुरुवार, 10/16/2025 - 20:45 नवीन
भारतातील पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना न बोलावणे ही एक तांत्रिक बाब होती असे तालिबानी मंत्र्यांनी खुलासा केला. त्यात त्यांनी दूतावासाचा उल्लेख केला नाही ह्यात सर्व काही आले. इकडे काहीजण उगाचच समर्थन करत आहेत. त्या पत्रकार परिषदेवर पुरुष पत्रकार निषेध म्हणून बहिष्कार घालू शकत होते किंवा तालिबानी मंत्र्यांना जाब विचारू शकले असते. परंतु पुरुष पत्रकार " सर तनसे जुदाला " घाबरले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हांटेजचं काय ठरलं?

स्वधर्म
गुरुवार, 10/16/2025 - 17:28 नवीन
तुंम्ही चीनच्या तुलनेत आपल्याला फर्स्ट मूव्ह अ‍ॅडव्हांटेज मिळेल हा मुद्दा मांडला होता. त्यावर मी तसे का नाही हे सांगणारे उत्तर दिले होते. आता आपण तो मुद्दा सोडून फक्त महिलांच्या पत्रकारपरिषदेतील प्रवेश बंदीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फर्स्ट मूव्हचा मुद्दा बरोबर नव्हता हे मान्य केले असे समजायला हरकत नाही. बाकी रेअर अर्थ खनिजांबाबत जे व्यापार युध्द सुरू आहे त्यात हा एक व्हिडिओ पाहिला. Trade war explained: The rare earth metals China dominates and US needsया क्षेत्रात उत्पादक म्हणून भारताचे नांव आहे पण अफगाणिस्तानचे नांवही नाही. त्यामुळे तालीबानचे लाड करण्यामागे तुंम्ही म्हणता तसा शुध्द व्यापार आहे या तुमच्या (एन डी टी व्ही च्या?) मतावर विश्वास ठेवणे कठीण आहे. काही उद्योगपतींना मिळू शकणारी तिथली कंत्राटे हा मुद्दा आणि तालीबान्यांची सरबराई यात काही संबंध आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपली संरक्षण सिध्दता तेल

शाम भागवत
गुरुवार, 10/16/2025 - 18:16 नवीन
आपली संरक्षण सिध्दता तेल विहीरी उत्खननातून स्वयंपूर्णता, देशी विमानांचे इंजिन या गोष्टी पूर्ण होईपर्यंत म्हणजे अंदाजे २०२९ पर्यंत तालाबानशी मर्यादित चुंबाचुंबी करायला काहीच हरकत नाही. मला वाटते आपल्या अस्तनीतले निखारे शोधण्यासाठी तालीबानचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

भारताकडून आयातः '--' (बहुधा

सुबोध खरे
गुरुवार, 10/16/2025 - 18:29 नवीन
भारताकडून आयातः '--' (बहुधा किरकोळ असावी, त्यामुळे दिलेली नाही India Exports to Afghanistan was US$333.52 Million during 2024 Based on recent reports in October 2025, Afghanistan is actively inviting India to invest in and import several minerals, including critical resources like copper, lithium, and rare-earth minerals. हे हि वाचलं नाही Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. https://edition.cnn.com/2021/08/18/business/afghanistan-lithium-rare-earths-mining हे हि वाचलं नाही बाकी आपल्या परराष्ट्र, संरक्षण आणि उद्योग खात्यातील तज्ज्ञ लोकांपेक्षा मिपा वर जास्त हुशार आणि सर्व ज्ञानी लोक आहेत हे पाहून डोळे पाणावले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक

सुबोध खरे
गुरुवार, 10/16/2025 - 18:48 नवीन
चीन अफगाणिस्तानात गुंतवणूक करण्यास उत्सुक नसण्याची करणे याला कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले उत्तर Despite initial expectations, China has not made large-scale investments in Afghanistan due to major obstacles, especially ongoing security risks, contractual disputes, and the country's severe instability. Beijing is prioritizing security along its border and seeking to protect existing investments, adopting a cautious "wait-and-see" approach. Security concerns are the primary reason for China's reluctance to invest, as Afghanistan remains a volatile environment for foreign operations and personnel. Persistent terrorism: The presence and activity of militant groups, particularly Islamic State–Khorasan Province (ISKP), pose a significant threat. ISKP has demonstrated its capability and intent by directly targeting Chinese interests, including an attack on a Kabul guest house in 2022. Xinjiang security: China's main security interest is preventing the East Turkestan Islamic Movement (ETIM), a Uyghur militant group, from using Afghanistan as a base to foment separatist activities in its neighboring Xinjiang province. While the Taliban has made some efforts to relocate these militants, China remains concerned. Regional instability: Attacks on Chinese personnel and projects in neighboring Pakistan, often conducted by groups with ties to Afghanistan like the Tehreek-i-Taliban Pakistan (TTP), have heightened China's fears about regional instability. Beyond security, foreign investment is heavily deterred by Afghanistan's weak economic and political environment. Contractual disputes: Chinese companies have faced major setbacks on projects. In June 2025, the Taliban terminated a $540 million oil deal with a Chinese firm, accusing it of failing to deliver on promised investments and infrastructure projects. Dysfunctional governance: With the Taliban's limited managerial and administrative experience, investors face a lack of reliable regulations and clear legal frameworks. The collapse of a major oil deal suggests that the Taliban is not always a reliable business partner. Lack of infrastructure: Poor infrastructure, inadequate energy supply, and an undeveloped legal and banking system further complicate large-scale investment.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राजकारण

सौन्दर्य
गुरुवार, 10/16/2025 - 00:41 नवीन
खरे साहेब, राजकारणातही कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो असे म्हंटले जाते. तरी देखील तालिबानचे कायदे, त्यांची इतर वर्तणूक पाहता अशा लोकांशी मैत्री ही आज ना उद्या अंगाशी येणारच. स्व:ताच्या देशाचा फायदा, इतर देशांना लांब ठेवणे, खनिजे वगैरे कितीही आकर्षक वाटले तरी देखील ही एक अभद्र युती ठरेल व पुढेमागे आपल्या देशासाठी घातक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

The Taliban are sitting on $1

सुबोध खरे
Tue, 10/14/2025 - 19:15 नवीन
The Taliban are sitting on $1 trillion worth of minerals the world desperately needs https://edition.cnn.com/2021/08/18/business/afghanistan-lithium-rare-earths-mining
  • Log in or register to post comments

Beijing could be skeptical of

सुबोध खरे
Tue, 10/14/2025 - 21:52 नवीन
Beijing could be skeptical of partnering on ventures with the Taliban given ongoing instability, however, and may focus on other regions. Khan pointed out that China has been burned before, having previously tried to invest in a copper project that later stalled. “I believe they will prioritize other emerging/frontier geographies well before Taliban-led Afghanistan,” said RK Equity partner Howard Klein, who advises investors on lithium.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

महत्वाची आणि रोचक माहिती....

चौथा कोनाडा
Tue, 10/14/2025 - 22:48 नवीन
महत्वाची आणि रोचक माहिती.... तालीबानने जुन्या अफगाणीस्थानची धोरणे अवलंबली तर १९८० च्या वेळेचे मैत्रीपर्व पुनर्जिवित होऊ शकते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तळीबान बरोबर आपण चर्चा चालू

रात्रीचे चांदणे
Tue, 10/14/2025 - 22:39 नवीन
तळीबान बरोबर आपण चर्चा चालू केली ती योग्यच आहे. हे आगोदरच करायला पाहिजे होत. त्यांना इतर मदतीबरोबरच सरक्षण साहित्याची मदत पण करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

तालिबान

चंद्रसूर्यकुमार
Wed, 10/15/2025 - 09:24 नवीन
अफगाणिस्तान आणि तत्कालीन ब्रिटिश भारतामधील ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड लाईन पठाणांना अजिबात मान्य नाही. त्या सीमारेषेच्या दोन्ही बाजूंना जर पठाण राहात असतील तर ती कृत्रिम सीमारेषा नको असेच पठाणांना वाटते- म्हणजेच खैबर पख्तुनवा प्रांत आपलाच असे अफगाणिस्तानातील पठाणांना वाटते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मतभेदांचे हे कारण पूर्वीपासून होते. अफगाणिस्तान आपल्या नियंत्रणात ठेवता येईल म्हणून पाकिस्तानने तालिबानची निर्मिती केली पण त्याचवेळेस अफगाणिस्तानातील पठाणांनाही खैबर पख्तुनवा हवा आहे हे ते विसरले बहुतेक. अमेरिकेकडून पैसे खायला मिळतील म्हणून ९/११ नंतर मुशर्रफने अमेरिकेला मदत केली आणि त्यातून तालिबानवर हल्ले करायला पाकिस्तान हा बेस मिळाला तेव्हापासूनच तालिबानचे पाकिस्तानशी संबंध बिघडायला सुरवात झाली. एकीकडे अमेरिकेकडून पैसे खायचे आणि दुसरीकडे ओसामाला लपवून ठेवायचे हा पण डबल गेम पाकिस्तानने खेळला. काहीही असले तरी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उखडली गेली आणि त्याला पाकिस्तानने मदत केली हे पठाण विसरू शकले नसावेत. त्यात तात्यांना काबूलचा बगराम हवाईतळ हवा आहे. त्यांना खूष करायला म्हणून मुनीरने थेट काबूलवर हवाई हल्ले केले. ही गोष्ट तालिबान कसे सहन करतील? ही आपल्याला उत्तम संधी आहे. त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. तालिबान म्हणत असतील की काश्मीरवर भारताचा हक्क आहे तर आपण पण खैबर पख्तुनवावर अफगाणिस्तानचा अधिकार मान्य करावा. आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन पेशावर आणि तो प्रदेश अफगाणिस्तानचा आहे हे आम्हाला मान्य आहे असे म्हटले (म्हणजे उघडपणे म्हटले नाही तरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात भांडणे लावून द्यायला काही केले) तर आपल्या बापाचे काय जाणार आहे? पाकिस्तानात पठाण लोक नुसते खैबर पख्तुनवामध्येच आहेत असे नाही तर इतर भागाताही पसरले आहेत. ते पठाण आणि पंजाबी वर्चस्व असलेली पाकिस्तानी व्यवस्था यांच्यात भांडणे लागून दोघे एकमेकांना मारत असतील तर ते आपल्यासाठी चांगलेच आहे ना? काहीही असले तरी तालिबान हा आपला दीर्घकालीन मित्र वगैरे होणे अशक्य आहे. पाकड्यांना ठोकायला म्हणून ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्याच पठाणांच्या टोळधाडींनी भारतात शेकडो वर्षे नंगानाच चालवला होता हे आपण विसरू शकणार नाही/विसरू नये. एकदम आयडिअल परिस्थिती होईल की एकमेकांना मारताना पाकिस्तान आणि तालिबान दोघेही संपून गेले तर. तसे होणे जरा कठीणच आहे. पण पठाण आणि पंजाबी एकमेकांशी अनिश्चित काळ भांडत राहिले तर ते आपल्यासाठी चांगले होईल. पठाणांनी वर्षानुवर्षे संघर्ष यापूर्वी अनेकदा चालू ठेवला आहे- ब्रिटिश, रशियन आणि अमेरिकनांविरोधात. तसाच पाकड्यांविरोधात पण चालू ठेऊ देत. कदाचित पुढील काही वर्षात पाकिस्तानचे तुकडे पडतील. काहीही झाले तरी त्या पठाणी टोळधाडींच्या मध्ये कमकुवत का होईना कोणतातरी प्रदेश त्या पाकिस्तानच्या तुकड्याच्या निमित्ताने हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

अफगाणिस्थानशी मैत्री नी

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/15/2025 - 08:55 नवीन
अफगाणिस्थानशी मैत्री नी अमेरिकेशी संबंध खराब! :) ह्यामुळेच आजच्या काळाला “गोबरयुग” संबोधले जात असावे का?
  • Log in or register to post comments

Afaganistan is connected to

अप्पा जोगळेकर
Wed, 10/15/2025 - 11:48 नवीन
Afaganistan is connected to POK & it is likely that India is aiming to make use of older silk route to reach Europe. This is way more cheaper than existing Suez Cancal Route and beneficial for Afganistan as well. Hence Indian Army mentioning that Pakistan will have its Geography changeद & Taliban mentioning 'POK is integral part of India' may not be a coincidence.
  • Log in or register to post comments

अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु

विजुभाऊ
Wed, 10/15/2025 - 12:04 नवीन
अफगाणीस्तानशी मैत्री ही शत्रु चा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने आहे. दुसरे हे की अफगाणिस्थानमधे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी भारतीय कम्पन्याना व्यवसाय मिळू शकतो. पाकिस्थानला जर शह द्यायचा असेल / चाप लावायचा असेल तर भारताला इराण आणि अफगाणीस्थान सोबत मैत्रीसंबन्ध ठेवणे गरजेचे आहे
  • Log in or register to post comments

तालिबान आणि भारत चर्चा ......

कंजूस
Wed, 10/15/2025 - 19:53 नवीन
तालिबान आणि भारत चर्चा ....... भेटीमागचं कारण काय असेल? १.पत्रकार परिषदेत दोन तीन महिलाही होत्या हे चानेलवाले दाखवत होते. महिलांबाबत उदार धोरण अवलंबत आहोत हे दाखवायचे आहे का? २. अफगाण सरकारची अमेरिकेतील संपत्ती गोठवली गेली आहे ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतील का? ३. भारतीय गुंतवणुकदारांची बरीच गुंतवणूक बुडीत झाली आहे त्याबद्दल प्रयत्न? काय सांगता येईल?
  • Log in or register to post comments

तालिबान आणि सनातनी

कपिलमुनी
गुरुवार, 10/16/2025 - 07:34 नवीन
यांची स्त्रियाबद्दलची मूळ शिकवण सारख्याच विचारांची असल्याने भाजप्ये समर्थकांना त्याचे समर्थन सोपे जात आहे.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/16/2025 - 10:12 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

इतका द्वेष आणि इतकी जळजळ?

सुबोध खरे
गुरुवार, 10/16/2025 - 10:49 नवीन
इतका द्वेष आणि इतकी जळजळ? कोण सनातनी आज अशा राजकारणात आहेत जे असे स्त्रियांना पायाचे बोट जरी दिसले तरी सार्वजनिक रित्या फटके मारण्याचे समर्थन करत आहेत? केवळ रा स्व संघाचा द्वेष म्हणून हिंदुत्ववाद्यांना सनातनी म्हणून त्यांची तालिबानशी तुलना करायची आज शरिया लागू करा म्हणणारे मुस्लिम नेते निदान ५० % असतील. जरा काही झाले कि इस्लाम खतरे मे है म्हणणारे नेते सहज दिसतात त्यांच्याबद्दल बोलायची तुमच्यात हिम्मत नाही. कारण सर तन से जुदा होण्याची भीती. भेकडपणा आणि दांभिकपणा हि फुरोगामिनची खासियतच आहे इस देश के कितने भी तुकडे हो जाये हम किसी को अपने मझहब से खिलवाड करने नही देंगे म्हणणारा समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. किती हे अध:पतन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

समाजवादी पार्टीचा अबू आझमी

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/16/2025 - 11:19 नवीन
समाजवादी पार्टीचा अबू आझमी तुम्हालाइंडी गठबंधनात चालतो? किंवा १५ मिनिटे पोलीस दूर करा मग आम्ही काय करतो ते दाखवून देऊ म्हणणारा असदुद्दीन ओवेसी तुम्हाला जवळचा वाटतो. उठ सूठ कुणाच्याही मागे इडी लावून त्रास देणाऱ्या भाजपने ह्या दोघांच्या मागे कधी इडी लावली आहे का? काय कारण असावे? सारखीच विचारसरणी आहे म्हणून? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी तालिबान ह्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. संघाने कधीही मनुस्मृतीला विरोध केलेला नाही. संघाचा मनुस्मृतीला छुपा पाठिंबा आहे, मनुस्मृतीत स्त्रियांबद्दल काय लिहिले आहे माहीत करा! तालिबानी नी संघ/भाजप ह्यांची विचारसरणी एकसारखी आहे, नाहीतर महिलांचे शोषण करनारे कुलदीप सेंगर, ब्रिजभूषण सिंह ह्यांचे समर्थन सोशल मीडियावर अंधभक्ताना समर्थन करावे लागले नसते तसेच मोदी सरकारनेही त्याना वाचवायचे आटोकाट प्रयत्न केले नसते! तेव्हा भाजप/ संघ हा महिलाविरोधी नाही, मध्ययुगीन मानसिकता भाजपेयींचो नाही ह्याचे खोटे समर्थन बंद करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल

सुक्या
गुरुवार, 10/16/2025 - 11:21 नवीन
जौ द्या हो. ह्यामुळेच आजकाल धाग्यावर कुणी फिरकत नाही. ह्यांची एकच टेप लागलेली असते. वरुन २/३ होयबा आहेत तळी उचलायला ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

you said it. चपखल

सुबोध खरे
गुरुवार, 10/16/2025 - 11:45 नवीन
you said it. चपखल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

संघाला विरोध करण्याची (अपयशी)

शाम भागवत
गुरुवार, 10/16/2025 - 12:40 नवीन
संघाला विरोध करण्याची (अपयशी) पध्दत १०० वर्षानंतरही चालू ठेवण्याचा ठाम निर्धार खरोखरच कौतुकास्पद आहे. ही केविलवाणी धडपड आहे असे कोणी म्हणेल. पण मी त्याला दुर्दम्य आशावाद समजतो. :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पोटापाण्याची सोय

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 10/16/2025 - 15:45 नवीन
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणत एका तथाकथित पक्षाचे तीन पिढ्या दुकान चालले. तसेच आहे हे. संघाला विरोध करत करत अनेकांची चार पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे- आणि कदाचित आणखी पिढ्यांच्या पोटापाण्याचीही सोय होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

त्यांच्या प्रयत्नांमुळेच

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/16/2025 - 17:03 नवीन
त्यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई महाराष्ट्रापासून तुटली नसेल! चिंता करू नका! त्यांच्या पुढच्या पिढ्याही नाही तुटू देणार! पहिलीपासून हिंदी लाडा किंवा मराठी संपवायचा कितीही प्रयत्न केला तरीही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

भाजपला काय काय चालते ?

कपिलमुनी
गुरुवार, 10/16/2025 - 21:34 नवीन
याची यादी करू का ? किती पवित्र करून घेतलेत ? उगा सोवळेपणाचा आव आणायचं.. मी नाय त्यातली न कडी लावा आतली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा