आपल्या या स्पष्टीकरणाने नकळतच आम्हा मिपाकरांच्या मनात जे उलटसुलट विचार चालले होते त्यास आळा बसेल असे सांगावेसे वाटते.
मटा / टाईम्स असेच धोरण स्विकारेल तो दिवस खरा.
आपल्या आवडत्या ई-सकाळबद्दल यापुढेही काही सूचना, तक्रारी किंवा प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत.
ई-सकाळ आवडतोच ! असल्याच काही सुचना तर एक वाचक म्हणून आम्ही आपणास नक्की पत्र टाकू . त्याचबरोबर इथेही उत्तम सामाजिक विचार / उत्तम भावना व्यक्त होत असतात. त्या जर आपल्या दैनिकाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचल्या, शासनापर्यंत पोहचल्या तर मिसळपाव आणि दै. सकाळचा एक वाचक म्हणूनही तितकाच आनंद होईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
( गुगल ऍडसेन्सच्या जाहीराती प्रकारांच्या ) अजाणतेमुळेपण का होईना झालेली चुक आपल्या "धोरणात व तत्वात" बसत नाही आणि ह्या गोष्टी आपल्या संस्कॄतीच्या नैतीकतेच्या व्याख्येत बसत नाहीत ह्याची योग्य वेळी दखल घेऊन त्यावर सत्वर कारवाई करणार्या "ई-सकाळ" चे अभिनंदन आणि आभार ...
आमच्या मनात ह्यामुळे सकाळ पेपरविषयीचा आदर जरा जास्तीच वाढला आहे.
ह्यापुढेही भविष्यात आपल्याकडुन आम्ही अशास "सतर्कतेची आणि परिपक्वतेची" आपेक्षा नक्कीच ठेऊ शकु अशी आम्हाला खात्री आहे.
तुर्तास आपले अभिनंदन करतो व आभार व्यक्त करुन इथेच थांबतो ...
हा विषय चर्चेला आणुन व त्यावर सविस्तर चर्चा घडवुन ह्या अजाणाता झालेल्या चुकीला वाचा फोडुन "मिडीया व सर्वसामान्य जनतेचा दबाव" किती महत्वाचा असतो ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय देऊन "जनमताच्या रेट्याचे" महत्व स्पष्ट करुन दाखवल्याबद्दल "समस्त मिसळपाव्.कॉम च्या जनतेचे" सुद्धा अभिनंदन व आभार ...
मित्रांनो आता आपलीसुद्धा जबाबदारी वाढली आहे. :)
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,
आपल्या प्रतिक्रियेने सर्व शंका मिटल्या आणि हो सकाळ्ने देखील सतत मिपाकडे लक्ष द्यावे आजकाल मिपावर अनेक विषय चर्चेला येतात्.याशीवय अनेक अनिवासी भारतीयाना व्यक्त होण्याचे हे साधन आहे आजकाल लोक पेपर्कडे लेख पाठवणॅ इ.भानगडीत पडत नाहीत्.पण या सहकार्यामुळे दोघांचाही फायदा होइल.
आणि हो इथले लेख हे उच्च दर्जाचेच असतात आपण एकदा जुन्या लेखांवरुन नजर टाकावी.
मध्यंतरी सामनालाही येथील लेखाची व चर्चेची दखल घ्यावी लागली होती.
आपला,
कायमस्वरुपी सकाळ वाचक
(मिपाचा हितचिंतक)कोल्हापुरी दादा
वेताळा मी लोकमत वाचत नाही.मी काय मुर्ख नाही.
मी दररोज वाचतो-सकाळ्,लोक्सता.
शुक्रवारी वाचतो-लोकप्रभा
शनिवारी वाचतो-सा.सकाळ
दर महिन्याला-तनिष्का फक्त चाळतो
आणि कधीतरी प्रीमीअर ,आणि नात्यरन्ग
आणि हो आय्.बी.एन. लोक्मत रोज बघतो.फक्त आजचा सवाल आणि शनिवारी ग्रेट भेट
बस
आपल्या संपूर्ण निवेदनात मिसळपावबद्दलही दोन कृतज्ञतेचे शब्द जर आले असते तर तो आपल्या मनाचा मोठेपणा ठरला असता..!
असो,
ईसकाळ परिवाराला माझ्या व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा..!
आपला,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
आपले (जाहीराती न स्विकारणारे ) तात्या, ई-सकाळवरील खुलासा आणि मा.मनोहर पर्रिकर -गोव्याचे माजी मुख्यमंत्री (पहा: पुढील धागा ( http://www.misalpav.com/node/5056 )), हे म्हणजे कलियूगातपण तत्व पाळणारे तत्व्वेत्तेच नव्हे काय ?
अवांतर: आता मि. पा. ने पण "मि. पा. ईफेक्ट" असे लिहीले पाहीजे. ;)
-( सणकी )पाषाणभेद
प्रतिक्रिया
वाचकाभिमुख असलेले वर्तमानपत्र.
धन्यवाद !!!
अभिनंदन आणि आभार ...
योग्य
दाद्या बदलला रे
हो
एटूझेड
वाचकाभिमुख - सुखद धक्का
उत्तम निर्णय! अभिनंदन!!
आपल्या
तात्यांशी सहमत. ही बाब मलाही जाणवली आणि खटकली सुद्धा!
सहमत ---- सखा
आपले
मिपा ईफेक्ट