गाभा:
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
२६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/withheld-some-a/cs-within-indi...
प्रतिक्रिया
13 Feb 2021 - 11:23 pm | आग्या१९९०
स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा भारतात आणणार होते हे सरकार , ६ वर्ष झाली आता . काळ्या पैसेवाल्यांच्या नावांची यादी होती ना यांच्याकडे ? काय झाले त्या यादीचे?
14 Feb 2021 - 2:26 am | टीपीके
अगदी बरोबर, अत्यंत कुचकामी, बेकार आणि कर्मदरिद्री सरकार आहे. त्या पेक्षा पुढच्या वेळी माझे मत त्यांनाच ज्यांनी आधी हा पैसा स्विस बँकेत जमा केला होता.
पोलिसांना आपलं काम नीट करता येत नसेल तर त्यांनामदतकरण्यापेक्षा आपण चोरांचेच हात बळकट केले पाहिजेत, आणि आधी जसे चोरांनी कधीतरी टाकलेल्या सडक्या कुजक्या तुकड्यांवर जगत होतो तसे जगू. साल आजकाल तर ते तुकडे पण धड मिळत नाहीयेत, आणि आता ईमानदारी मधे कामही कसे करायचं हेही माहीत नाहीये, जगायचेच वांदे झालेय.
13 Feb 2021 - 11:29 pm | श्रीगुरुजी
https://m.lokmat.com/national/uttar-pradesh-mission-2022-priyanka-gandhi...
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत प्रियांका वड्रा कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असणार.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुक लढण्याचे जाहीर करून शीला दिक्षितांचे नाव संभाव्य मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. परंतु मतदानाच्या एकदीड महिना आधी समाजवादी पक्षाबरोबर युती करून ४०३ पैकी फक्त १०३ जागा लढवून तब्बल ७ जागा जिंकल्या होत्या. २०२२ मध्ये तसेच होणार.
14 Feb 2021 - 8:34 am | श्रीगुरुजी
https://www.indiatoday.in/world/story/donald-trump-statement-impeachment...
ट्रंप वाचले. ट्रंपविरूद्ध महाभियोग चौकशी करण्यास प्रतनिधीगृहाने परवानगी दिली नाही. चौकशीसाठी परवानगी दिली असती तर चौकशीच्या निमित्ताने मोदींचा छळ झाला तसाच ट्रंपचाही छळ झाला असता.
14 Feb 2021 - 8:50 am | Rajesh188
काही समान वैशिष्ट.
१) उथळ स्वभाव जो निर्णय घेतात त्याचे काय परिणाम होतील ह्या विषयी कसलाच खोलवर विचार न करणे.
२) जे पूर्ण करणे अशक्य आहे अशीच आश्वासन देणे.
३) स्वतः ल काहीतरी वेगळाच सुपरमॅन समजून बाकी राष्ट्र शी वागणे.त्या मुळे मित्र तर गमावून बसलेच पण नवीन शत्रू निर्माण केले.
४) जे जाणकार मंडळी सांगतात त्याच्या कडे पूर्ण दुर्लक्ष करणे .
५) समजत फूट पडेल अशीच वक्तव्य करणे.
नेता कसा धीर गंभीर ,विचारी असावा .
पण हा गुण ह्या दोघा मध्ये पण बिलकुल नाही.
महाभियोग चालला च पाहिजे होता.
14 Feb 2021 - 8:55 am | मुक्त विहारि
पण आता दोघेही जिवंत नाहीत ...
जवाहर लाल नेहरू पण नाहीत आणि इंदिरा गांधी पण नाहीत ..
14 Feb 2021 - 9:05 am | आग्या१९९०
१०० % सहमत राजेशजी . जे हयात आहेत त्यांच्याकडे कानाडोळा करायचा आणि दुसऱ्यांची मढी उकरायची हे 'डोंबिवली फिवरचे' लक्षण आहे. ह्या फिवरला ईलाज नाही.
14 Feb 2021 - 9:48 am | मुक्त विहारि
आम्ही मुळाशी हात घालतो...
घराणेशाही कडे, कानाडोळा करायचा आणि सामान्य शेतकरी वर्गाच्या मढ्यावर नाचणार्या मंडळींना पाठिंबा द्यायचा, ही आमची वृत्ती नाही ...
व्यक्तिपूजा करणार्यांना ह्याचा "ताप" होणारच ....
14 Feb 2021 - 9:59 am | गणेशा
एकीकडे घराणे शाही आहे आणि एकीकडे संघाची चाकरी करणारे..
दोघेही चूकच...
कोणाला घराणेशाही चे गोडवे गाणारे योग्य वाटतात.. कोणाला संघाचे झुपे एजंट.. हा ज्याचा त्याचा प्रश्न.
पण जे चूक आहे ते चूक.. बरोबर ते बरोबर यावर न बोलता एक साईड कशी बरोबर हेच बोलत बसायचे..
पेट्रोल वाढले तर तो कर देश सेवेला जातोय.. आणि विरोधात असताना तो कर आमच्या पैश्यातून घेतला जातोय.. देशविघातक शक्ती ला..
मग लगेच या असल्या मेसेज वर विश्वास ठेवायचा..
Are पण विरोधात असताना तुम्ही काय बोलत होता? तुम्ही म्हणाला होता का हा कर आम्ही घेणार आणि असे करणार.. तुम्ही फेकूगिरी करत होता.. मान्य तरी करा..
बाकी घराणेशाही ला घरी बसवले आहे ना..?
मग आताच्या सरकार ला प्रश्न विचारणारच ना.. जर प्रत्येक गोष्टीला आधी असे होते हेच उत्तर असेल तर मग सरकार बदल करून काय उपयोग आहे?
असो..
14 Feb 2021 - 10:15 am | श्रीगुरुजी
एकीकडे घराणे शाही आहे आणि एकीकडे संघाची चाकरी करणारे..
या दोन्हींंची तुलना होऊच शकत नाही. संघात कोणत्याही व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे स्तोम नाही. संघात भ्रष्टाचाराला वाव नाही कारण संघाकडे कोणतेही शासकीय अधिकार नाहीत. संघाला देशासंबंधी कोणताही निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत.
घराणेशाहीत बरोबर उलट असते. मागील काळात संपूर्ण शासन, पंतप्रधान आपली घटनात्मक कर्तव्ये विसरून देशहिताकडे संपूर्ण दुर्लक्ष करून एका विशिष्ट घराण्याची चाकरी करण्यात मग्न होते.
Are पण विरोधात असताना तुम्ही काय बोलत होता? तुम्ही म्हणाला होता का हा कर आम्ही घेणार आणि असे करणार.. तुम्ही फेकूगिरी करत होता.. मान्य तरी करा..
कसली फेकूगिरी? घेतलेल्या कराचा जनतेसाठी कसा विनियोग होतोय याची अनेक उदाहरणे आधी दिली आहेत. मंत्र्यांचे परदेश दौरे, संसदेच्या उपहारगृहातील अनुदानित स्वस्त अन्नपदार्थ, परदेश दौऱ्यावर जाताना सरकारी खर्चाने माध्यम बातमीदारांचा ताफा नेणे अशा अनेक प्रकारच्या उधळपट्टीवर नियंत्रण आणले आहे.
14 Feb 2021 - 10:31 am | काळे मांजर
नेहरू घराणे वाईट आहे
मनेका आणि वरुण आकाशातून पडले का ?
ज्यांचे बाप काँग्रेस , राष्ट्रवादीत आमदार खासदार होते , त्यांची पोरे पळवून भाजपाचे 280 फुगले आहेत
भाजपात घरणेशाही नाही म्हणणारे सतरंज्या उचलत आहेत
14 Feb 2021 - 11:03 am | सॅगी
नाहीतरी दुसरे काय काम आहे तुम्हाला?
14 Feb 2021 - 10:34 am | बाप्पू
सहमत. बऱ्याच मुद्द्यावर मी सरकारच्या बाजूने बोलतो त्यामुळे माझ्यावर बऱ्याच वेळेला लोकं भाजपाई, संघी इ आरोप करतात. पण तसे नाहीये.
सध्याचे सरकार धुतल्या तांदळासारखे नाहीये. पेट्रोल आणि डझेलच्या बाबतीत यांची धोरणे न पटण्यासारखी आहेत.
हेच मोदी, अडवाणी, सुषमा स्वराज इ लोकांनी पेट्रोल डिझेल वरून आकांडतांडव केले होते. रास्ता रोको, रेल रोको, बैलगाडी मध्ये टू व्हीलर नेणे इ सर्व प्रकारचे चाळे केले होते. त्याला फिल्म जगतातील लोक जसे की अनुपम खेर हे पण सामील होते.
पण सत्तेत येताच त्यांनी काहीच केले नाही. उलट अजून टॅक्स वाढवले. जागतिक बाजारातील मंदीचा कोणताही फायदा ग्राहकांना होऊ दिला नाही. उलट त्याचा फायदा घेऊन सरकारची गंगाजळी वाढवत बसले.
त्यांनतर खूप वाजत गाजत GST आणला. जणूकाही आर्थिक क्रांतीच आहे असं वातावणनिर्मिती केली पण प्रत्यक्षात पेट्रोल डिझेल दारू आणि इतर काही "मलिदा" देणाऱ्या वस्तू GST च्या कक्षेतून बाहेर ठेवल्या. One nation one tax असा भ्रामक आणि चुकीचा प्रचार केला गेला.
आज महाराष्ट्रात पेट्रोल १०० री पार गेले आहे. आणि याला केंद्र सरकारची हावरट वृत्ती कारणीभूत आहे. या दरवाढीचा बचाव करणे तेही विकासकामांचा हवाला देऊन.. म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.
चुकीला चूक म्हणण्याची प्रवृत्ती जाऊन आता एखाद्या पक्षाची/व्यक्तीची/ विचाराची गुलामी करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.
आपला तो बाब्या.. आणि दुसऱ्याचे कार्ट असा काहीसा प्रकार आहे.
14 Feb 2021 - 8:30 pm | मुक्त विहारि
2 पुस्तके वाचा
हा तेल नावाचा इतिहास आहे आणि एका तेलियाने ...
तेलावर खूप काही गोष्टी अवलंबून आहेत ....
सुदान, व्हेनेझुएला, गॅस टू लिक्विड प्रोसेस, कतार, युनायटेड अरब एमिरेट्स चा इतिहास .....
एकात एक गोष्ट फसलेली आहे ...
14 Feb 2021 - 8:04 pm | मुक्त विहारि
तुम्ही कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेला आहात का?
मी तुम्हाला काही पत्ते देतो ....
1. मुरबाडच्या आसपास, संघाची गोशाळा आहे. स्वतः जा आणि खात्री करा...
2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही, वनवासी आश्रमात जा...
3. गोळवली, चिपळूण ते संगमेश्र्वर रोड वरती आहे, तिथे जा...
स्वतः तर जाणार नाहीत, स्वतः चौकशी करणार नाहीत, नुसतेच हवेत गोळीबार करू नका...
बाय द वे,
तुम्ही दापोलीला कधी जाणार आहात?
कोकणातील शेतकरी वर्गाला नक्की काय हवे आहे? ते स्वतः विचारा ....
15 Feb 2021 - 11:40 am | कानडाऊ योगेशु
ह्यावर एकाने मला उगाच विषाची परिक्षा कशाला घ्या? म्हणुन निरुत्तर केले होते.
15 Feb 2021 - 12:46 pm | मुक्त विहारि
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इतर राष्ट्रांसाठी, विषासमानच आहेत...
1970 पासून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, काश्मीरच्या बाबतीत सांगत होते, ते 1980 नंतर, काश्मीरच्या पंडितां बाबतीत खरे निघाले....
1960 पासून, सप्त राज्यांच्या बाबतीत, जे संघाचे विचार होते, ते अद्यापही प्रत्यक्षांत येत आहेत ...
ही झाली वैचारिक पार्श्र्वभूमी .....
======================
राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर, कुठलेही संकट येऊ दे... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आधी धाऊन येतात ....
ही झाली सामाजिक बांधीलकी .....
======================
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच जबरदस्तीने देणगी गोळा केलेली नाही...
वैयक्तिक पातळीवरच, देणगी जास्त करून स्वीकारल्या जाते....
एकाही नव्या पैशांचा घोटाळा, ह्या संघटनेत होत नाही ....
ही झाली, आर्थिक जबाबदारी.....
15 Feb 2021 - 12:49 pm | गणेशा
हो, शाळेत असतानाच शाखेत गेलो होतो.
माझे नशिब आहे, मी तेंव्हाच लवकर त्यातून बाहेर पडलोही.
बाकि तुलना करता येत नाही म्हणजे?
घराणेशाही चा आणि लोकशाही ची तुलना करता येती काय मग?
कारण, लोकशाही मार्गाने निवडून आलेले गांधी असो वा मोदी ते निवडणूच आलेले असतात.
मग घराणेशाहीचे लाचार आलेच कुठून?
जर लोकशाहीत घराणेशाही ला नावे ठेवली जातात, तर मग कोणी संघाच्या चाकर असणाऱ्यांना नावे ठेवली तर काय झाले..?
बाकी, तुम्ही लगेच दापोली ला या वगैरे जे बोलताय..
तुम्ही माझ्या शेतात या, सांगतो काय परिस्तिथी आहे, टाकलेले पैसे पण परत निघत नाही, पाउस पाण्यावाचून कसे हाल असतात..
आणि मला कोकण आणी इतर शेतकरी भेदभाव आवडत नाही, प्रत्यकाचे problem वेगळे असतात, प्रत्यकाचे plus point वेगळे असतात.
तुम्ही असा का समज केलाय कि तुम्ही सगळीकडे अनुभव घेताय आणि आम्ही अनुभव हीन बोलतोय?
तुमचे अनुभव वेगळे असतील, त्याबद्दल दुमत नाही, पण आम्ही करतो ते अनुभवहीन हे चूक आहे..
15 Feb 2021 - 12:55 pm | Rajesh188
तुमच्या मता शी पूर्ण सहमत .
मी बोलतो, मला वाटतं तेच खरे ही प्रवृत्ती काही लोकांनी सोडणे गरजेचे आहे.
समोरचा जो मत व्यक्त करतो तो त्याचा अनुभव असतो आणि तो खराच असतो .
मीच खरा ही वृत्ती काही लोकांनी सोडली पाहिजेत.
15 Feb 2021 - 2:04 pm | बाप्पू
गणेश जी आणि राजेश जी.. तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम कळालेत असे एकंदरीत वाटतेय.
तुमच्या मते त्या प्रॉब्लेम चे सोल्युशन्स काय आहेत?? जरा विस्ताराने सांगा. वाटल्यास एखादा धागा काढून त्यावर चर्चा करू. पण दुसरा एखादा उपाययोजना करत असेल तर फक्त विरोधाला विरोध करून चर्चेची चव घालवू नका.
तुमचे मुद्दे पुरावा आणि फॅक्ट्स सोबत मांडत चला. उगाच एखाद्या व्यक्ती किंवा विचारसरणीबद्दल तुमचा एक स्पेसिफिक पूर्वग्रह आहे म्हणून जिथे तिथे कडवट प्रतिसाद टाकून विनाकारण वातावरण गढूळ करू नका..
आणि हो.. ते शेतकऱयांच्या प्रॉब्लेम्स च्या सोल्युशन्स बाबतच्या धाग्यबद्दल विचार करा.
शुभेच्छा.
15 Feb 2021 - 5:02 pm | गणेशा
बाप्पू जी,
कसली चव आणि कसले वातावरण गढूळ केले?
वरचे कुठलेही माझे रिप्लाय सांगा, आणि काय चव घालवली?
असो.. तुम्ही प्रतिसाद वाचले असतील माझे त्यात कुठे कोणाला वयक्तिक आणि कोणाच्या विचारांना तूसडे पणाने उत्तरे दिलेली नाहीत.. तुमच्या विचारां विरोधात मते असतील तर चव घालवणे होते का?
बाकी शेती वरील माझे मत आणि विश्लेषण
http://misalpav.com/node/45446
शेती.. समस्या आणि राजकारण
याच बरोबर, लोकसंख्या आणि शहरी करण.. मेळघाट.. हसदेव अरण्य(जे आडाणी ची घश्यात घातले आहे ), शिक्षण आणि इतर मते ही पुर्ण अभ्यासाने दिलेत..
वाचा...
मते वेगवेगळी असु शकतात.. पण त्यांचा आदर करून स्वतःचे मत मांडणे नेहमी चांगले..
आपले तेच बरोबर इतरांचे चूकच हे मानणे कधीही योग्य नाही..
असो..
15 Feb 2021 - 9:40 pm | बाप्पू
आपल्या लिखाणाची link दिल्याबद्दल धन्यवाद. वाचतो.
माझा प्रतिसाद आपणास आणि राजेश जी दोघांना मिळून तो प्रतिसाद होता त्यामुळे तसा अर्थ निघणे स्वाभाविक आहे.
ते वाक्य राजेश जी यांना उद्देशून होते कारण तुम्ही या चर्चेत फार उशिरा आलात. याआधीही जवळपास एक दीड महिना हेच रहाटगाडगे चालू आहे. आधी सहना यांच्या धाग्यावर आणि मग मंथली धाग्यावर.
असो. तुमच्या बाबतीत मी माझे शब्द मागे घेतो.
15 Feb 2021 - 10:59 pm | गणेशा
धन्यवाद..
आणि sorry जर अनावधानाने काही बोललो असल्यास
15 Feb 2021 - 5:05 pm | गणेशा
राजेश जी,
धन्यवाद...
15 Feb 2021 - 5:30 pm | मुक्त विहारि
कलेले पैसे पण परत निघत नाही, पाउस पाण्यावाचून कसे हाल असतात..
गेली काही वर्षे जर हीच परिस्थिति असेल तर, तुम्हाला शेती जमत नाही...
स्वतःला जमत नसेल, ते काम करू नये ....
मोदी हे घराणेशाही मुळे निवडून आलेले नाहीत, तर काही माणसे ही फक्त घराणेशाही मुळेच निवडून आलेली आहेत...
जो, ढाई हजार पाच सौ क्विंटल, म्हणतो, त्याला मत देणे, ही घराणेशाहीच आहे ....
विश्र्वेश्र्वरैय्या, हे नाव पण ज्याला धड उच्चारता येत नाही, त्याला मत देणे, ही पण घराणेशाहीच आहे .....
पुलावामा हत्याकांड, आपल्याच लोकांनी केले, असे जो म्हणतो, त्यालाच मत देणे, ही घराणेशाहीच आहे .....
आतंकवादी हल्ल्यांच्या सूड घेतला तर त्याचे पुरावे मागणार्या उमेदवाराला, निवडून आणणे, ही घराणेशाहीच आहे .....
स्वतःच पडून, दुसर्याने ढकलले म्हणून कांगावा, करण्याइतपत, घराणेशाही रुजलेली आहे.....
संघात, तुम्हाला काय त्रास झाला? हे जर सांगीतलेत तर उत्तम ...
मला पण, शिवसेनेची ओढ होती, कामे पण करत होतो .... पण ज्या दिवशी, बाळासाहेब ठाकरे यांनी, संजय दत्तला माफी दिली आणि मी शिवसेना सोडून दिली ....
15 Feb 2021 - 6:03 pm | गणेशा
बरं. आपण तुमच्या म्हणण्याने प्रॉब्लेम काय आहे हे न बघता सरळ जमतच नाही हे मान्य करू.
पण याचा अर्थ मला काहीच ज्ञान नाही, उगाच बोलतोय असा नक्कीच होत नाही..
आपण शेती करता.. म्हणुन इतर विषयावर बोलत किंवा मते नोंदवत नाहीत का? नाही म्हणजे सगळ्याचा अभ्यास हा फक्त ते काम करत असल्यावर होतो असे काही नसते..
असो..
निवडून आलेत हे महत्वाचे आहे.. तुम्ही त्यावर त्यांना निवडून देणाऱ्यांना गुलाम, म्हणत असाल तर मग लोक संघाच्या चाकर असणाऱ्यांना पण तेच बोलतील ना..
आपला रोख घराणेशाही नसावी हा असला तर मान्यच आहे, पण घराणेशाही ला निवडून देणारे मूर्ख आणि आपण काय बरोबर हे जे समजणे आहे ते चूक...
हाच न्याय मोदीजींना पण लावा कि..
६०० करोड जनता, श्रीलंकेच्या पाहून्यात mrs. आणि नाव होते.
त्याला भर लोकांसमोर एम आर एस (मिसेस म्हणतात हे वाचताना न कळणारे )
गटारात नळी टाकून लगेच गॅस निर्माण होतो म्हणणारे..हि आलेच कि..
माझे म्हणणे हे आहे कि दुसऱ्यांची चूक दाखवताना स्वतः ज्यांचा उदो उदो करतात त्यांच्या पण चुकांवर पांघरून का मग?
एक voter म्हणुन, हा हत्याकांड कसा झाला हे तपासायची मागणी करणे, airlift करायला गुप्ताचर यंत्रणे ने सांगितले असले तरी तसे न करता येणे..
त्याच वेळेस आपल्या हास्य छटा प्रदर्शित करणे यावर प्रश्न उठवले पाहिजेत..
यात पंत प्रधान कोण आपले मोदी कि काँग्रेस चे यावर आपले प्रश्न उभे राहिले नाही पाहिजे..
यात गैर ते काय आहे? तपास पुर्ण करा आणि मग जे असे म्हणत आहेत त्यांना उत्तरे द्या...
आपण म्हणजे तपास हि पुर्ण करायचा नाही आणी दोष हि द्यायचा हे चुकीचेच आहे...
कट्टरता होती तेथे... आणि कुठलीही कट्टरता मी नाकरतो..मग ती जातीय तेढ निर्माण करणारी असो वा इतर कुठलीही... कट्टरता हि नकोच..
ज्याला आवडते त्याने खुशाल जावे.. मी संघाला नावे ठेवत नाहीच...
पण जर घराणेशाही नको म्हणणारे, संघांचे हस्तक असणाऱ्यांना मात्र झुकते माप देतात तेंव्हा चूक वाटते.. सरळ म्हणा ना तुम्ही घराणेशाही ला वोट देतो आम्ही संघांच्या एजंट ला.. बस्स..
आणि असे नसेल तर लोकशाही मान्य करा जो निवडून येतो तो येतोच.. मग त्यात घराणेशाही, संघ येतोच कुठे.. पण आपण दुसऱ्याला जे बोलतो त्यावर आपल्यावर बोलणारे आले कि तुलना होत नाही असे कसे?
तुमच्या वयक्तिक निर्णयाचा आदर आहेच.. त्यात प्रश्न चिन्ह मी का उचलावे..
संजय दत्त ला माफी दिली म्हणुन तुम्ही शिवसेना सोडू शकता..
कोणी कट्टरता आहे म्हणुन संघ नाकारू शकतो..
कोणी हाथरस मुळे योगी आणि मोदी यांना नावे ठेवू शकतो..
कोणी पुंजीवादाचे तळवे चाटणाऱ्या आताच्या bjp ला सोडचिठठी देऊ शकते...
यात ते त्यांच्या जागेवर योग्यच असतात..
पण आपण मानले ते च योग्य इतर म्हणजे घराणेशाही चे पाईक हे चूकच..
आणि महत्वाचे, मी कधीच काँग्रेस या पक्षाला वोट दिले नाही.. पण मोदी आणि मोदी भक्त यांच्या मार्फत जे राजकारण चालवले गेले आहे त्याला वैतागून मी काँग्रेस ला वोट देणार आहे.. हे माझे मत आहे..
मला, धार्मिक तेढ आणि कट्टरतेपेक्षा काँग्रेस बरी वाटायला लागली आहे..
मला काँग्रेस bjp पेक्षा जास्त सुशिक्षित वाटते... हे माझे मत आहे..
मला फेकूगिरी आवडत नाही..
मला नोटबंदी मुळे केलेले आर्थिक नुकसान मान्य नसल्याने मला काँग्रेस ची अर्थनीती आता योग्य वाटत आहे..
मला अडाणी साठी जे जंगल तोडले आहे ते मान्य नाही.. मला आरे ची झाडे एका रात्रीत तोडणे हि मान्य नाही...
मला महंगाई कि मार कमी करू म्हणुन ज्या गोष्टीं वर मत माहीतले ती फेकू गिरी हि मान्य नाही...
उद्या पुन्हा काँग्रेस चुकली तर आम्ही तिचे हि वाभाडे काढू..
पण हाच एक बरोबर हे कदापि चालणार नाही...
काँग्रेस सत्तेतून जाण्यासाठी असे प्रश्न उपस्तिथ करणारेच जबाबदार आहेत.. ना कि एकाच पक्षाची पालखी उचलणारे ..
आणि प्रत्येक जण वेगळा विचार करतो.. तो आपल्या सारखा विचार करत नाही म्हणजे चुकच हे विचारच किती चूक आहेत...
15 Feb 2021 - 9:15 pm | भंकस बाबा
बातमी खरी आहे,
बाकी चालुद्या.
सावरकरांच्या त्यागाची माहिती ज्याला नाही, बर नसुदे माहिती पण तरीही त्यांच्या कर्तुत्वावर चिखल उडवणे हे आपल्या देशाचा भावी पंतप्रधान करू शकतो तर असा पंतप्रधान फक्त उकिरडे फुंकायच्या लायकीचा आहे
15 Feb 2021 - 10:14 pm | सौंदाळा
कट्टरता होती तेथे.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी शाखेत गेलो, तब्बल ८ वर्षे पण हा अनुभव कधीच आला नाही. काही वर्षांपूर्वी काश्मीर मध्ये आलेल्या पुरात पण संघाने केलेले काम पूर्ण देशाने पाहिले.
माझे चुलत, आतेभाऊ पण वेगवेगळ्या गावात संघात जायचे पण असा अनुभव कोणाचाच नाही.
तुम्हाला आलेला अनुभव हा दुर्दैवी आहे पण त्यावरून पूर्ण संघावर प्रश्नचिन्ह लावणे चूक आहे.
15 Feb 2021 - 10:32 pm | श्रीगुरुजी
मी काही काळ संघात जात होतो. मला सुद्धा कट्टरता अजिबात अनुभवास आली नाही. अत्यंत प्रामाणिक व तळमळीचे कार्यकर्ते संघात भेटले.
अर्थात काही कार्यकर्ते झापडबंद व पढीक विचारसरणीचे होते. संघातील बौद्धिकवर्ग अत्यंत कंटाळवाणे होते. मी कोणत्याच ठिकाणी फार काळ रमत नाही. मग तो संघ असो वा एखादी कंपनी वा एखादे काम. फार मोठी जबाबदारी घेणे माझ्या स्वभावात नाही. त्यामुळे संघातही मी फार काळ रमलो नाही. परंतु अनेक संघकार्यकर्त्यांशी अजूनही परिचित आहे. संघाच्या कार्यक्रमात फारसा जात नसलो तरी संघकार्याला माझा पाठिंबा आहे.
15 Feb 2021 - 11:55 pm | बाप्पू
सहमत.
मीदेखील अत्यंत थोडा काळ संघाशी संबंधित होतो. पण कुठेही कट्टरता नव्हती.
आता कट्टरता मोजण्याची स्केल ज्याची त्याची वेगळी असू शकेल.
उदा. कोणाला आपल्या पूर्वजांचा ( शिवाजी, महाराणा प्रताप, अशोक इ ) इतिहास वाचणे म्हणजे कट्टरता वाटते.. लोकांना इतिहासाच्या आडून धार्मिक कट्टर बनवण्याचे कारस्थान वाटते.. असं असेल तर अवघड आहे.
उदाहरण एवढ्यासाठी दिले कारण मी जेव्हा शाखेत गेलो होतो तेव्हा काही स्वयंसेवकांनी याविषयी 10-15 मिनिटाचे छोटेखानी भाषण किंवा माहिती दिल्याचे आठवते. आता याला तुम्ही कट्टर म्हणणार असाल तर मग एकदा सेकुलर रुपी मदरश्याची फेरी मारून या.. किंवा गेला बाजार दिवसातून 5 वेळा भोंगा वाजवून जो काही भंपकपणा (हो i mean it ) केला जातो त्याचा नेमका अर्थ समजून घ्या. त्याच्या शब्दांवर लक्ष ठेवून अर्थ समजून घ्या.. पण ते तुम्ही करणार नाही.. कारण -- सेकुलरपणाचा किडा.
असो.. बापाला बाप म्हणणे आणि देशाला माझी आई, माझा बाप, माझी कर्मभूमी, माझा भाग्यविधाता म्हणणे हा कट्टरतावाद असेल तर आहोत आम्ही कट्टर.
बाकी तुम्ही ज्या शाखेत गेला होता त्याच नाव आणि पत्ता दिलात तर बरे होईल. व्यनि केला तरी चालेल. नेमकी कोणती कट्टरता पसरवली जातेय त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करेल.
16 Feb 2021 - 12:38 am | गणेशा
मग मुळ मुद्द्याकडे येतो..
घराणेशाही विरुद्ध जर संघांचे चाकर असे जे मी म्हणालोय तर मग इतकी देशभक्ती असेल तर मोदी हे संघांचे स्वयंसेवक आहेत आणि म्हणुन तसे म्हणाल्यावर जाज्वल अभिमान पाहिजेच..
म्हणुन कोणाला घराणेशाही योग्य वाटत अससेल कोणाला संघांचे एजंट यात ज्याचा त्याचा प्रश्न.. शेवटी दोघे लोकांतून निवडून आलेत..
मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का?
त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?
आणि ती जर असेल तर तुमच्याकडे घराणेशाही नाही तर संघांचा बिल्ला घेतलेला आहे..
मग हे दोन्ही हि चूकच...
आणि हि तुलना मान्य नसेल तर लोकशाही तुन निवडून येणारे गांधी असो वा मोदी ते निवडूनच येतात..
आणि त्यांना निवडून देणारे हे मतदारच असतात.. त्यांच्यात भेद का?
असो..
बाकी संघ असो वा ब्रिगेड वा कोणी...
मी प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन पाहतो..
मग तो मुसलमान असो.. हिंदू असो वा अन्य कोणी आणि माझ्या मते हीच खरी देशभक्ती
16 Feb 2021 - 6:04 am | चौकस२१२
त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?"
- घराणेशाही वर बेतलेलं पक्ष म्हणजे "निदवडूं दिलेले नेते नाही तर वारसा हक्क असल्या सारखे राजा नंतर राजपूत्र त्यामुळे सभासदांना काही बदलण्याचा अधिकार कमीच
-एकीकडे जवाहरला, इंदिरा, राजीव आणि राहुल ( अधे मध्ये नाईलाजाने राव साहेब किंवा मनमोहन सिंग )
दुसरीकडे दिन दयाळ उपाध्याय , जोशी, वाजपेयी अडवाणी, मोदी शहा किंवा गोळवलकर पासून ते भागवत
आता सांगा भाजपचं सभासदनां "चॉईस "होता कि "काँग्रेस च्या ?
आणि ती जर असेल तर तुमच्याकडे घराणेशाही नाही तर संघांचा बिल्ला घेतलेला आहे..
मग हे दोन्ही हि चूकच...
गांधी किंवा इतर कोणत्याही घराण्याची राजकीय पक्षातील घराणेशाची आणि मोदी किंवा गडकरी यांची संघ निष्ठा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
ते दोन्ही एकाच ?
संघ आणि भाजप द्वेष जरूर करावं पण असला विचित्र तर्क लावू नये तो हास्यस्पद
- मोदींची संघाशी नाळ म्हणजे जसे राष्ठ्रवादी आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष समाजवादाला बांधलेले आहेत ( आणि यात काह्ही चुकीचे नाही ) तसेच
- संघ जरी एकचालक यावर बेतलेले असले तरी संघचालक पदी कुठे आहे घराणेशाही ?
16 Feb 2021 - 12:41 am | गणेशा
@ बाप्पू
पुन्हा देतो रिप्लाय..
रिप्लाय खूप लहान दिसत आहे म्हणुन
मग मुळ मुद्द्याकडे येतो..
घराणेशाही विरुद्ध जर संघांचे चाकर असे जे मी म्हणालोय तर मग इतकी देशभक्ती असेल तर मोदी हे संघांचे स्वयंसेवक आहेत आणि म्हणुन तसे म्हणाल्यावर जाज्वल अभिमान पाहिजेच..
म्हणुन कोणाला घराणेशाही योग्य वाटत अससेल कोणाला संघांचे एजंट यात ज्याचा त्याचा प्रश्न.. शेवटी दोघे लोकांतून निवडून आलेत..
मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का?
त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?
आणि ती जर असेल तर तुमच्याकडे घराणेशाही नाही तर संघांचा बिल्ला घेतलेला आहे..
मग हे दोन्ही हि चूकच...
आणि हि तुलना मान्य नसेल तर लोकशाही तुन निवडून येणारे गांधी असो वा मोदी ते निवडूनच येतात..
आणि त्यांना निवडून देणारे हे मतदारच असतात.. त्यांच्यात भेद का?
असो..
बाकी संघ असो वा ब्रिगेड वा कोणी...
मी प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन पाहतो..
मग तो मुसलमान असो.. हिंदू असो वा अन्य कोणी आणि माझ्या मते हीच खरी देशभक्ती
16 Feb 2021 - 7:29 am | श्रीगुरुजी
मग गांधी किंवा इतर निवडून देणारे लाचार पण आपण मात्र देशभक्त असे का?
त्यामुळे हि जी घराणेशाही घराणे शाही लावली आहे ती आहे कुठे?
१-२ उदाहरणे देतो.
१९८४ मध्ये इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर, कॉंग्रेसमध्ये अनेक अनुभवी नेते असूनही, कॉंग्रेसने सरपंचपदाचा सुद्धा अनुभव नसलेल्या राजीव गांधींना थेट पंतप्रधान केले. त्यावेळी अनुभवी प्रणव मुखर्जींंनी (जे कॉंग्रेसचे संसदेतील क्र. २ चे नेते होते) आक्षेप घेतल्याने पुढील अनेक वर्षे त्यांची हकालपट्टी झाली होती.
१९९१ मध्ये राजीव गांधींचा खून झाल्यानतर, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसलेल्या व जन्माने भारतीय नसलेल्या सोनिया गांधींना, कॉंग्रेसींनी थेट अध्यक्ष म्हणून निवडले होते. परंतु सोनिया गांधींनी स्वत:च त्यात रस दाखविला नव्हता.
१९९८ मधील लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेता व विरोधी पक्षनेता होते. एप्रिल १९९९ मध्ये वाजपेयी सरकार पडल्यानंतर विरोधी पक्षांंच्या सरकारसाठी विरोधी पक्षनेता व कॉंग्रेसचा विधीमंडळ पक्षनेता या पदांमुळे शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार असणे योग्य होते. परंतु खासदार सुद्धा नसलेल्या व शून्य अनुभव असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान पदावर दावा करून बहुमताची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पवारांनी नंतर १ महिन्यातच सोनिया गांधींविरूद्ध बंड केले होते.
या उदाहरणातून घराणेशाही दिसत नसेल तर सोडून द्या.
16 Feb 2021 - 11:49 am | चौकस२१२
सहमत गुरुजी याशिववाय राष्ट्रीय म्हणवणार्या राष्ट्रवादी मध्ये किती पुढले पवार "लाँच होतात ते मोजला तर ! सेनेची ठाकरे इनकॉर्पर्टेड , काश्मीरचे अब्दुल्ला इत्यादी..
आता अर्थातच अशीही उद्धरणे दिली जातील कि , प्रमोद महाजन , मुंढे यांचं पुढील पिढ्या राजकारणात आल्या भाजपमध्ये मग ती नाही का घराणेशाही.. हो ती हि आहे
फरक एवढा आहे ( अजून तरी) कि भाजपच्या आणि त्यापाठी असणारी संघाच्या सर्वोच्य नेत्यांच्या निवडीत घराणेशाही कमी दिसते.. या मागचे मुख्य कारण हे असावे कि आत्तापर्यंत पंतप्रधान पदी पोचलेले भाजपचे नेते हे संघाच्या कामासाठी मिशनरी सारखे वाहून घेतलेले आहेत अर्थात गडकरी किंवा शाहंचं बाबतीत तसे नाही म्हणा .
15 Feb 2021 - 11:00 pm | Bhakti
मी ९ वी पर्यंत शाखा चालवली आहे.दृर्गावाहिनीची शिबर केली आहे.खुप शिकायला मिळालं.
पण कट्टरता होती तेथे...
या बाबतीत मला थोडेफार अनुभव आले.मी शांतीप्रिय आहे..तसेच प्रत्येक गोष्ट संकुचित वृत्तीने वा पुराणातील वांग्यावर पुढे जाऊ शकत नाही.मी अनेकदा बापूंचे सत्याचे विचार वा भजन पोस्ट केल्यावर ओळखींच्याकडून खुप टीका सहन करावी लागते.
पण आजही मी संघातील कोणालाही हक्काने मदतीला बोलावू शकते,हे देखील सत्य आहे.
16 Feb 2021 - 12:50 am | गणेशा
@भक्ती..
मदतीला येणारे माणसे असतात...
अजूनही ती मदतीला धावून येतात कारण त्यांच्यात माणुस पण असते...
बाकी संघ.. ब्रिगेड.. घराणेशाही.. वा अन्य कोणी हे फक्त मुखवटे आहेत, आपल्या आतील भावानेला चिकटवलेले...
ते उतरले कि कदाचीत माणुस उरत असेल...
मदत जर धर्म पाहून केली जात असेल तर ती मदत नाही उपकार असतो..
आणि मदत जर माणसाला केली जात असेल तर ते उपकार नाही माणुसकी असते.
वयक्तिक :
माझे असंख्य मित्र संघ, ब्रिगेड आणि सेक्युलर आहेत, पण जेंव्हा ते माझ्याबरोबर असतात तेंव्हा ते माणुस असतात..
त्यांना मुसलमान, हिंदू फलाना रंग नसतो...
ना नसतात त्यांच्यात पक्षीय राजकारणाचे दलाल..
असो..
खूपच फिलॉसॉफिकल झाले वाटते..झोपले पाहिजे :-))
16 Feb 2021 - 6:10 am | चौकस२१२
मदत जर धर्म पाहून केली जात असेल तर ती मदत नाही उपकार असतो..
अगदी बरोबर आणि हीच टीका खास करून ख्रिस्ती मिश्नर्यांवर होत असते खास करून ख्रिस्तेतर देशात
पण तेव्हा मात्र सर्व "उदारमतवादी" मूग गिळून गप्पा बसतात
मदर तेरेसांवर पण हि टीका फक्त हिंदू नाही तर इतर हि करायचे
धर्मपरिवर्तन हाच मूळ हेतू असतो मिशनऱ्यांच्या ... पण असं बोलला कि लागेचच सन्नकुचित "पॉलिटिकली इनकॅरेक्ट "
14 Feb 2021 - 10:22 am | Rajesh188
अब्जावधी रुपयांच्या खर्च तसाच चालू आहे आणि बचत अशा क्षेत्रात करत आहेत त्यांचे बजेट काही लाखात असेल.
काय ती काटकसर आणि काय ती स्वामी निष्ठा.
14 Feb 2021 - 10:29 am | सॅगी
देशाचे काही लाख का होईना वाचत आहेत हे तरी मान्य केलेत....
सेम टू यू!!! काय ती काँग्रेस निष्ठा आणि काय ती गांधिनिष्ठा...
14 Feb 2021 - 10:29 am | प्रसाद_१९८२
काय ती काटकसर आणि काय ती स्वामी निष्ठा.
--
उधळपट्टीची एक दोन उदाहरणे द्या पाहू ?
14 Feb 2021 - 10:38 am | Rajesh188
खास विमान त्यांच्या साठी अमेरिका हून मागवले होते .
न्यू ब्रँड.
त्याची किंमत आहे 1 हजार 200 कोटी.
त्यांच्या सुरक्षेवर रोजचा खर्च होतो.
1 कोटी 67 लाख .
ही फक्त दोनच काटकसरी ची उदाहरण सांगितली आहेत.
अजुन बरीच काटकसर सरकार करते .
14 Feb 2021 - 10:56 am | श्रीगुरुजी
ते विमान पंतप्रधान पदासाठी आहे.
उद्या पप्पू पंतप्रधान झाला तर तोसुद्धा ते वापरेल आणि सोनियामाता, वड्रा कुटुंबीय सुद्धा खाजगी सहलींसाठी वापरतील.
14 Feb 2021 - 11:27 am | काळे मांजर
मग काँग्रेसने नेहरू गांधी नावे देऊन शाळा रस्ते विमानतळ बांधली तीही जनतेसाठीच आहेत ना ?
-----
एक भक्ताड नेहरू गांधी नावे असलेली 600 संस्थाची यादी व्हॅटसपवर फिरवत होते व रडत होते .
मी म्हटले ..
तो उसमे बुरा क्या है
हमारा पीजी डिप्लोमा इगणु का है , इंदिरा गांधी
जीस दिन मोदी युनिव्हर्सिटी मुझे एम डी डिग्री या कोई बडा पोस्ट देगी मै उनको वोट दुन्गा
काँग्रेस के 60 साल हुये है
भाजप के भी 15 हुये है
जनता पक्ष 2
व्हीपिसिंग 1
वाजपेयी 5
मोदी 7
तो अब अगर काँग्रेस के नाम पे 600 संस्था है , तो भाजप के भी 150 की लिस्ट दो
ते फरारफुर्र झाले
14 Feb 2021 - 11:34 am | Rajesh188
एवढे मोठे आकडे मागत जावू नका.
त्यांचा वेग तरी बघा अजुन 1 संस्था स्थापन करून चालू करू शकले नाहीत आणि 150 संस्था ची नाव देण्यास सांगत आहात
14 Feb 2021 - 2:16 pm | गणेशा
माझ्या पंतप्रधानाने विमान घेतलेले असणे मला चालेल.. नक्कीच.
मग ते मोदी असो वा काँग्रेस चे कोणी.पंतप्रधानाने उच्च रहावे यात काही गैर नाही..त्याने उलट फकिरा सारखे राहू नये असे मला वयक्तिक वाटते
पण याच १४ डिसेंबर ला जवान लोकांना airlift करावे हे गुप्तचर यंत्रणे ने सांगून ही ते करण्यास असमर्थता दाखवणे मला चालणार नाही..
शोकसागरात सगळे बुडाले असताना आपल्या हसऱ्या कॅमेरा छटा न्यूज माध्यमात प्रसिद्ध करणे मला आवडणारे नाही.
रोड वर हल्ला कसा झाला याचा शोध घेण्यास आम्ही कमी पडलोय..
असे हि मला मान्य नाही..
असो..
14 Feb 2021 - 11:04 am | Rajesh188
एवढे महाग विमान हवंच कशाला.
इथे किती तरी करोड अशी लोक आहेत त्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही .आणि 1200 करोड चे विमान पंतप्रधान ना.
वा छान काटकसर आहे.
14 Feb 2021 - 11:52 am | श्रीगुरुजी
लोकांना २ वेळचे जेवण मिळत नसताना काही जणांना दिवसभर महागडे आंंतरजाल वापरून मोदींना शिव्याशाप देण्यात धन्यता वाटते. बरोबर ना?
14 Feb 2021 - 3:16 pm | भंकस बाबा
विमानाची डील पप्पूची पार्टी सत्तेत असताना झाली होती पण 2014ला ईव्हीएम घोटाळा झाला आणि इटालियन सरकार पायउतार झाले
14 Feb 2021 - 1:58 pm | आग्या१९९०
नोटाबंदीनंतर नवीन चलनाचे प्रमाण कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढतच आहे. GDP घसरतोय. टॅक्स कलेक्शन वाढतंय असा सरकार दावा करतंय तर पेट्रोलजन्य पदार्थांवर अधिक कर का लावतंय? आणि पीएम केअर फंड गोळा का करतंय? पारदर्शकतेचा आव आणतंय तर हा फंड कुठे आणि किती खर्च केला हे का सांगत नाहीं ?
इंफ्रास्ट्रक्चरला लागणाऱ्या निधीची अजिबात कमतरता नाही , आणि गरज पडलीच तर लाखो कोटी बाजारातून आणि तेही छोट्या गुंतवणुकदारांकडून उभे करता येईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात. हे जर खरं असेल तर सरकार इंफ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली अनेक वस्तू व सेवांवर कर का लादतेय?
14 Feb 2021 - 2:30 pm | श्रीगुरुजी
२०२० या वर्षात कोरोनामुळे अनेक महिने संपूर्ण देश, बहुतेक सर्व उद्योगधंदे, उपहारगृहे, पर्यटनस्थळे, चित्रपटगृहे इ. बंद होते हे काही लोकांना माहिती नाही असं दिसतंय.
14 Feb 2021 - 4:13 pm | आग्या१९९०
पेट्रोलजन्य पदार्थांवर कोरोनाच्या आधीपासून कर वाढवले आहेत. पारदर्शकतेचे काय?
नितीन गडकरी खोटे कशाला बोलतील ?
नारायण राणें सारख्याला पावन करणाऱ्या पक्षाकडून काय अपेक्षा करणार?
16 Feb 2021 - 7:51 am | सुखीमाणूस
गेल्या ६० वर्शात. सरळमार्गी माणुस राजकारणात टिकुच शकत नाही,
जर बदल घडवुन आणायचे असतील तर सत्ता हवी म्हणजे निवडुन यायला हवे..
मग जर निवडुन यायला सभ्य माणसे सन्ख्येने कमी पडत असतिल तर असभ्य माणसान्ची साथ घ्यावीच लागणार...
म्हणुन करतात काय काय..
आता सामना नाही का राहुल चे गोडवे गायला लागला
14 Feb 2021 - 3:22 pm | भंकस बाबा
रबिशकुमारच्या बातम्यातून बाहेर पडायला काय घेणार?
जीडीपी वाढते आहे . कोरोनाच्या काळात ती कमी झाली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अंदाज बघा भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल! आकडे बघून डोळे फाटतील.
मोदी आता आंतरराष्ट्रीय संस्थादेखिल मॅनेज करायला लागले आहेत, अशी फुसकुली सोडा ना!
14 Feb 2021 - 3:35 pm | चंद्रसूर्यकुमार
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांना अमेरिकन सीनेटने दुसर्या महाभियोगात दोषी ठरविण्यास नकार दिला आहे. १०० सीनेटर्सपैकी दोन तृतीयांश म्हणजे ६७ सीनेटर्सनी ठरावाच्या बाजूने मत दिले असते तर तात्या इम्पिच झाले असते पण ठरावाच्या बाजूने ५७ तर विरोधात ४३ मते मिळाली. तसेही तात्या अध्यक्षपदावरून आधीच दूर झाले असल्याने या महाभियोगाला तसा काही अर्थ नव्हता. पण हा ठराव पास झाला असता तर माजी अध्यक्ष म्हणून त्यांना जे काही करता आले येईल ते करता आले नसते. तसेच भविष्यात निवडणुक लढविण्यावर बंदी आली असती.
बाकी तात्या समर्थकांनी ६ जानेवारीला अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल लागायच्या वेळेस जो काही प्रकार अमेरिकन कॅपिटॉलमध्ये केला आणि त्याला तात्यांनी पाठीशी घालायचा प्रयत्न केला तो अश्लाघ्य होता आणि तो इम्पिच करण्यायोग्य गुन्हा नक्कीच होता. पण तरीही ते पदावरून दूर झाल्यानंतर हा ठराव आणून अमेरिकन संसदेचा वेळ फुकट का घालवला गेला हे समजले नाही.
14 Feb 2021 - 3:43 pm | चंद्रसूर्यकुमार
ग्रेटा थनबर्गच्या भारतात गोंधळ घालायच्या तथाकथित टूलकिटमध्ये सामील असल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी बंगलोरमधील पर्यावरण चळवळी दिशा रवीला अटक केली आहे. तिच्याविरूध्द देशद्रोह तसेच द्वेषाचे वातावरण पसरवणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ती खरोखरच या प्रकारात सामील असेल तर तो अतिशय गंभीर प्रकार आहे. ती दोषी असल्यास तिला योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. यावर नेहमीचे यशस्वी कलाकार- पुरोगामी विचारवंत काय म्हणतात ते बघायचे.
14 Feb 2021 - 3:49 pm | सॅगी
काय बोलणार? नेहमीप्रमाणे "व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला" वगैरे बोलत बांगड्या फोडणार...
लोकशाहीच्या नावाने गळे काढणार.
झालंच तर "कामना"मध्ये नेहमीप्रमाणे केंद्राच्या नावाने "रोखठोक" ढुसकी सुटणार...
बस्स, याव्यतिरिक्त काय जमतंय त्यांना?
14 Feb 2021 - 5:25 pm | Rajesh188
अर्णव आणि कंगना ला पण अटक करावी .
अर्णव दंगा भडकवणे,दोन समाजात वितुष्ट येतील अशा बातम्या देणे.
सरकारी यंत्रणेवर खोटे आरोप करणे,बेकायदेशीर गर्दी जमवणयासाठी
अशा विविध देश विघातक कृत्य केले बद्द्ल ताबोडतोप अटक करावी.
कंगना ला शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवल्या बद्घाल ,राज्य सरकार च्या कामात हस्तक्षेप केल्या बद्द्ल.विविध धार्मिक गटात वितुढत येईल असे वर्तन गेल्या बद्द्ल अटक करावी.
तर सरकार खरोखर न्यायप्रिय आहे असे म्हणता येईल.
14 Feb 2021 - 5:43 pm | सॅगी
अर्णबला तुमच्याच "न्यायप्रिय" महाराष्ट्र सरकारने अटक केली होती, काय झाले पुढे?
कंगना कित्येक वेळा तुमच्या "न्यायप्रिय" महाराष्ट्रात येऊन गेली, का नाही केली अटक? कोणी अडवले होते म्हणे?
14 Feb 2021 - 5:33 pm | चंद्रसूर्यकुमार
इतर ठिकाणचे नसले तरी मिपावरील नेहमीचे यशस्वी कलाकार बोलायला लागलेच. तुमचा अंदाज अगदी बरोबर होता :)
14 Feb 2021 - 5:28 pm | चंद्रसूर्यकुमार
दिशा रवीने दिल्लीतील न्यायालयासमोर म्हटले की तिने त्या टूलकिटमधील 'केवळ' दोनच ओळी एडिट केल्या. https://timesofindia.indiatimes.com/india/greta-toolkit-probe-activist-b...
म्हणजे--
१. असे कोणते टूलकिट आहे आणि त्याद्वारे भारतात गोंधळ घालायची काहीतरी योजना आहे हे तिला माहित होते.
२. ती स्वतः पर्यावरणाच्या क्षेत्रात 'काम' करत असल्याने तिला ग्रेटा थनबर्ग माहित नाही असे होणे शक्य नाही. तेव्हा ही टूलकिट कोणा सोम्यागोम्याने उगीच टाईमपास म्हणून बनवलेली नाही हे तिला कळायला हरकत नसावी.
असे असेल तर तिने आधीच पोलिसांना माहिती का दिली नाही की भारतात गोंधळ घालायचे कारस्थान शिजत आहे आणि त्याची माहिती तिच्याकडे आहे?
३. ही टूलकिट तिच्याबरोबर शेअर करण्यात आली होती याचा अर्थ ती गोंधळ घालण्याच्या कामात काहीतरी हातभार लावू शकेल याची खात्री नाही तरी निदान विश्वास तरी ते शेअर करणार्यांना असावा. मिपावरच्या कोणाबरोबर कशी ती टूलकिट शेअर झाली नाही? इतकेच नव्हे तर त्या टूलकिटमधील दोन ओळी का होईना तिने एडिट केल्या. म्हणजे भारतात गोंधळ घालायच्या आंतरराष्ट्रीय कारस्थानात ती सामील आहे असे म्हणायला जागा असावी.
ती २१ वर्षाची म्हणजे लहान असली तरी कायद्याच्या दृष्टीने सज्ञान आहे. त्यामुळे तिला तिच्या कृत्याची कडक शिक्षा मिळायलाच हवी.
अमेरिकेतील वगैरे मिलिएनल्स फुकाच्या समाजवाद, डावे विचार वगैरेंच्या आहारी गेले आहेत त्यातलाच हा प्रकार दिसतो. डावे विचार सगळीकडे घातकच असतात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये हिंसाचार माजवून कम्युनिस्ट राज्य स्थापन करायचा त्यांचा उद्देश असतो. जिथे राज्य स्थापन करतात तिथल्या लोकांवर अनन्वित अत्याचार करणे, विरोधकांना गुलागमध्ये पाठवणे किंवा फायरींग स्क्वाडमध्ये ठार मारणे, खाजगी मालमत्तेवर सामाजिक न्यायाच्या गोंडस नावाखाली टाच आणणे असले प्रकार कम्युनिस्ट राज्यात होतातच. मानवजातीला कलंक असलेल्या या तथाकथित विचारसरणीकडे जास्त प्रमाणावर तरूण आकर्षित होऊ नयेत म्हणून जे काही गरजेचे असेल ते सगळे केलेच पाहिजे.
15 Feb 2021 - 1:22 am | सुक्या
हळु हळु हे पत्ते ओपन होत आहेत. भारताचे दुर्दैव दुसरे काय ...
15 Feb 2021 - 2:15 pm | बाप्पू
तिची वकिली करून व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल गळा काढणारे लोकं आता गायब झाले.
14 Feb 2021 - 5:31 pm | Rajesh188
हिने केलेला कथित गुन्हा नक्की कोणत्या कायद्याने गुन्हा आहे हे तरी दिल्ली पोलिस ना माहीत असेल का?
ती आंतरराष्ट्रीय संस्थेची सभासद आहे पूर्ण जगाचे लक्ष त्या वर असणार आहे.
कोणी गरीब शेतकरी नाही आली लहर म्हणून कोणती ही कलम लावून अटक केली.
न्यायालयात दिल्ली पोलिस कोणते आकलेचे तारे तोडत आहे हे केस उभी राहिली तर माहीत पडेल च मग न्यायालय कसे ह्यांच्या अब्रू ची लक्तर कस वेशीवर सुकत घालतंय ते पण माहीत पडेल.
तो पर्यंत वाट बघता येईल.
14 Feb 2021 - 4:57 pm | काळे मांजर
खडसेंनी भाजपाचे 19 लोक फोडून नेले
14 Feb 2021 - 5:54 pm | आनन्दा
याचा महाराष्त्राच्या राजकारणावर फार दूरगामी परिणाम होणार असे दिसतेय..
हिंमत असेल तर ़खडसेंनी स्वत:च्या खासदार सुनेला फोडावे. मग आम्ही म्हणू खडसे खरेच आपल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत म्हणून.
गेला बाजार १९ आमदार तरी फोडायचे, नगरसेवक?
हा का ना का.
14 Feb 2021 - 7:51 pm | Bhakti
ये जो पब्लिक है ,वो सब जानती है.
14 Feb 2021 - 10:08 pm | काळे मांजर
आपल्याच घरचा फोडून काय करणार ? तो तर घरचाच आहे ना ?
15 Feb 2021 - 9:59 pm | सॅगी
पुढेमागे राष्ट्रवादीतून स्वतः निवडुन नाही आले तरी न फोडलेल्याला तरी लटकुन राहता येईल हाच विचार असेल.
15 Feb 2021 - 12:33 am | काळे मांजर
मोदी सरकारच्या काळात परदेशात स्थलांतरित व्हायचा दर वाढला
15 Feb 2021 - 12:44 am | Rajesh188
राहण्यास योग्य नाहीत .मुंबई असू नाही तर कोणते ही शहर आता श्रीमंत लोकांना राहण्यास योग्य वाटत नाहीत.
त्याचे महत्वाचे कारण जीवघेणे ट्रॅफिक आणि प्रचंड गर्दी.
स्वतःची गाडी असून सुद्धा प्रवास आरामदायी नाही ..
त्या मुळे श्रीमंत लोक दुबई किंवा बाकी ठिकाणी शिफ्ट होत आहेत
व्यवसाय भारतात असला तरी इथे राहण्यास ते तयार नाहीत.
ह्या मध्ये मोदी चा दोष नाही.
एकंदरीत भारताचे city planing चे १२ वाजले आहेत हे कारण आहे.
15 Feb 2021 - 1:20 am | सुक्या
ह्या मध्ये मोदी चा दोष नाही.
काय सांगता? असं कसं ?असं कसं ? बघा काही सापडते का ..?
15 Feb 2021 - 1:44 am | सुक्या
थोडे सिरियस . . .
भारताचे city planing हे कधी काळी इंग्रज लोकांनी केले. बस. नंतर त्यात कुणी जास्त हात ठेवला नाही. म्हणजे बघा ... मुंबै चे उदाहरण घेउ ... कोलकता पण असेच.
जे इन्फ्रा १०० वर्षापुर्वी होते तेच अजुनही चालु आहे. रोड नवीन होतात. पण फूटपाथ बनवत नाहीत. बनले तर लगेच हातगाड्या लाउन आंडाभुर्जी विकायला सुरुवात होते. रस्त्याच्या कडेला मोठे दुकान अगदी झगमगाट .. पण पार्किंगला जागा नाही. मग गाड्या रस्त्यावर पार्क करणार. यात प्रशासन हतबल होते ... नो पार्किंग च्या गाड्या उचलाव्या तर लोक बोंबल्नार ... फुट्पाथ मोकळे करावे तर दुकानदार बोंबलनार.
दुसरे ... एखाद्या शहरावरचा भार कमी करुन दुसरे क्लस्टर डेवलप करावे तर तो अगदी अस्मितेचा प्रश्न होतो. म्हणजे बघा ... मुंबईतील काही सरकारी / निम्न सरकारी कार्यालये दुसरीकडे हलवली कि यच्चयावत लोक अस्मिता जागवुण विरोध करतात .. मग त्या शहरावरचा ताण कमी न होता .. वाढतच जातो.
हे दुष्ट्चक्र कधीच थांबणार नाही जो पर्यंत एकतर प्रशासन कठोर होउन निर्णय घेत नाही भले कितीही विरोध झाला तरी किंवा लोकच शहाणे होउन विरोध करतील. दुसरी शक्यता फार कमी आहे.
तस्मात ... हे असेच चालेल .. अगदी दरवर्षी मुंबई तुंबली तरी .. किंवा शहर कोल्कता सारखे बकाल झाले तरी ... फक्त अस्मिता महत्वाची ... म्हणजे मुंबै म्हणजे मायनगरी किवा कोलकता म्हणजे सिटी ओफ जोय. मग अगदी रस्त्यावर लोक रहात असले तरी .....
15 Feb 2021 - 7:22 am | काळे मांजर
सिटी प्लांनिंग बोंबलले तर फक्त लोकच जबाबदार आहेत
दर पिढीत पोरे वाढवून शेत अन घराचे वाटण्या करून करून लोकांनी अप्पे पात्र करून ठेवले , तर त्याला प्रशासन कसे जबाबदार ?
15 Feb 2021 - 1:56 pm | राघव
प्रशासन आणि शासन दोघेही जबाबदार आहेत.
पुण्यातला शेवटचा अप्रूव्ड प्लॅन २००८ साली संपला.
साधारणपणे कोणताही नवीन प्लॅन हा जुना प्लॅन संपण्याआधी अप्रूव्ह व्हायला हवा.
आपले तसे नाही. २०१४ उजाडेतोवर यांनी प्लॅन बनवलाच नाही.. त्यावर चर्चा होऊन तो अप्रूव्ह होणे बाजूलाच.
माझ्या माहितीप्रमाणे अजूनही प्लॅन लागू झालेला नाही.
यात सर्वच पक्षांचा दोष आहे. अळिमिळी गुपचिळी. मनपा केवळ पैसे खाण्याचं साधन झालेलं आहे, बाकी काहीही नाही.
15 Feb 2021 - 8:37 am | पिनाक
बोंबलायची गरजच नाही. स्मार्ट सिटी ची योजना आणली तर त्याला स्थानिक नगरपलिकांनी च विरोध केला. मुंबई माझी म्हणून एक पक्ष ना मुंबई तली सत्ता सोडतो, ना मुंबई चा विकास करतो. मुंबई मेट्रो चे 3 - 13 कसे वाजवले पहा. एक वर्षात जितकी झाडे तोडली त्यांच्यातून जे प्रदूषण झाले ते रिकव्हर झाले असते. आता ते 4 वर्षे पुढे गेले आणि अजून ते कुठे होणारे ते नक्की नाहीच. सरकारने कामे करायची सोडून त्याला नको त्या विरोधामध्ये विरोधी पक्षाने गुंतवून ठेवलंय.
15 Feb 2021 - 12:06 pm | Rajesh188
पुण्याची अवस्था मुंबई पेक्षा खराब आहे नवी मुंबई किंवा बाकी नियोजन करून बसवलेली एक दोन शहर सोडली तर झाडून सर्व शहर बकाल ,आहेत.
शहराचा एकदा लहान हिस्सा फक्त ठीक असतो बाकी पूर्ण शहर .म्हणजे बकाल गाव च आहेत.
15 Feb 2021 - 11:29 am | चंद्रसूर्यकुमार
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी अमित शहा श्रीलंका आणि नेपाळमध्येही सरकार स्थापन करणार असल्याचे अजब वक्तव्य केले आहे. मार्च २०१८ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर बिप्लब देब यांनी पहिला महिनाभर अशी विचित्र विधाने करून पक्षाला अडचणीत आणले होते. माजी विश्वसुंदरी डायना हेडनवरही विनाकारण काहीतरी वक्तव्य केले होते. पण त्यानंतर जवळपास तीन वर्षे ते गप्प होते पण आता परत त्यांनी सुरवात केलेली दिसते. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने असे परदेशाशी संबंधित विधान करणे नक्कीच अयोग्य आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम बघणे सोडून फालतूची विधाने केल्याबद्दल त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल ही अपेक्षा. माझे वैयक्तिक मत हे की असल्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढायलाच हवे.
https://maharashtratimes.com/india-news/biplab-kumar-deb-claims-bjp-will...
15 Feb 2021 - 12:17 pm | सॅगी
सहमत...अशी वक्तव्ये करून आपल्याच पक्षाला अडचणीत आणून नेमके काय साध्य होते ते त्यांनाच ठाऊक..
15 Feb 2021 - 2:05 pm | श्रीगुरुजी
बेजबाबदार वक्तव्ये करणारे वाचाळ इतर पक्षांप्रमाणे भाजपत सुद्धा बरेच आहेत.
15 Feb 2021 - 12:26 pm | Rajesh188
राजकीय नेते जे बोलतात त्यावर जनता खुश होत असेल तर बाकी कोणत्याच गोष्टीचा राजकीय लोक विचार करत नाहीत.
सध्यातरी.
मान डोलवत हा जी हा जी म्हणणारी जनता आहे तो पर्यंत ह्या नेत्यांना कोणीच रोखू शकत नाही.
15 Feb 2021 - 6:17 pm | मुक्त विहारि
सरदार पटेल यांना डावलून, जवाहरलाल नेहरू, आले, तिथपासून हीच प्रथा पडली आहे...
त्यांना सगळे समजते.ही मानसिकता, समाजाचा घातच करते.
15 Feb 2021 - 6:34 pm | गणेशा
सरदार पटेल यांना डावलले गेले ह्याची खंत सरदार पटेल यांनी कुठे बोलुन दाखवली किंवा लिहून ठेवली आहे काय?
सरदार पटेल हे काँग्रेस चे होते आणि काँग्रेस चेच राहिले.. Bjp ला असा चेहरा नसल्याने त्यांनी सरदार पटेल यांचा चेहरा घेऊन काँग्रेस वरच हल्ला केला आहे.. पण ते विसरतात, पटेल आणी नेहरू यात पंतप्राधन कोण होणार हे काँग्रेस ठरवणार होती, लोक नव्हे..आणि दोन्ही काँग्रेसचेच होते.
आणि काँग्रेस ला पटेल यांच्या बद्दल आदर होता आणि आहेच.. उपऱ्या bjp ने आदर्शवादाचे धडे का द्यावे हा खरा प्रश्न...
जसे अटल बिहारी का अडवानी,
किंवा मोदी का कोणी इतर.
आणि गृहमंत्रिपद हे डावलले गेले त्यांना मिळते काय?
15 Feb 2021 - 8:09 pm | मुक्त विहारि
माझा प्रतिसाद वाचून, प्रतिक्रिया दिलीत, ह्याबद्दल मनापासून धन्यवाद ...
15 Feb 2021 - 8:17 pm | काळे मांजर
लोकांना भुलवायला भाजपाला सरदार पटेलांबद्दल पुतनामावशीचा पान्हा फुटत आहे
ह्याच भाजपाने गुजरात मधील विमानतळाला सरदार पटेलांचे नाव देण्यास विरोध केला होता
Shankersinh Vaghela, a former BJP chief minister of Gujarat, has revealed that the saffron party had once opposed renaming of Ahmedabad airport after Sardar Patel. Vaghela said that one should not have any impression that the BJP loved Sardar Patel.
http://www.jantakareporter.com/india/bjp-once-opposed-naming-of-ahmedaba...
15 Feb 2021 - 7:35 pm | गोंधळी
Petrol and diesel prices in Mumbai have reached all-time highs of ₹ 95.21 and ₹ 86.04
15 Feb 2021 - 7:54 pm | काळे मांजर
मोदी सरकार की तर्फ से अजमेर दर्गा को सातवी चादर भेट की
हर साल एक चादर देते है
और भकतो को सतरंजी देते है
15 Feb 2021 - 8:11 pm | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
16 Feb 2021 - 1:23 am | सुखीमाणूस
तेव्हापासुन जास्त वर्ष चोन्ग्रेस्स ची एक हाती सत्ता होती. तेव्हा जर योग्य कयदे केले असते, वेळेवर लोकसन्ख्या नियन्त्रण केले असते आणि सर्व धर्म सारखे वागवले असते तर ६० सालापासुन शिक्शित लोक भारता बाहेर जात आहेत ते गेले नसते. दाखवायला उदारमतवाद आणि प्रत्यक्श मात्र शेतकरि व कामगर यान्ची जास्त वाट लावली.
खासगिकरण जास्त करुन सरकारने जर अनुशासन अनि तत्सम बाबीवर जास्त भर दिला असता तर भारत खुप चान्गल्या परिस्थितित असता. सन्गणक आले म्हणुन नोकर्या आल्या. मध्यम्वर्गिया परदेशी जाउन कमवु लागले. भारतात परदेशी चलन आले. नाहीतर चोन्ग्रेस्स च्या सगळ्या कार्भारात सरकारी शिक्शण सन्स्था कमी अणी खासगी सन्स्था म्हनजे पुढार्यान्ची चराउ कुरणे.. मध्यम्वर्ग वाचला तो परदेशी जाण्याची सोय झाली म्हणून.. चोन्ग्रेस्स म्हण्जे आइ जेवु घलिना आणि बाप भीक मागु देइना अशी अवस्था झाली होती मध्यम वर्गाची. परत कर भरणार तो हाच वर्ग... त्यान्ची उत्पन्न वाढली म्हणुन चोन्ग्रेस्स ला मिरवायला आणि खैरात करायला पैसे मिळाले..
चोन्ग्रेस्स चा डन्का वाजवताना हे लक्शात घेतले पाहिजे की त्याना ६० वर्श राज्य करायला दिले आहे. त्याची फळ भोगतो आहोताच.
यात बदल हवा आहे आणि त्यासाठी वेगळ्या विचारसरणीचे सर्कार किमान ५० वर्श हवे आहे.
16 Feb 2021 - 6:14 am | सुखीमाणूस
मानसिकता अक्शर्शा शहारे आणते. स्वातन्त्र्य काय फक्त नेहरु व गान्धी यान्च्यामुळे मिळाले आहे का?
घराणेशाही का चालेल ? जितका सन्घ सन्कुचीत आहे तितके चोन्ग्रेस्स पण आहेच..
गान्धी कुटुम्बिया सोडुन कोणि का नाही नेत्र्रुत्व करु शकत चोन्ग्रेस्स चे?
राजकारणात का कुटुम्बासाठी राखीव जागा असाव्यात?
चोन्ग्रेस्स ला जर खरी सामाजिक समरसता आणायची असती तर आतापर्यन्त एकतरी पन्तप्रधान त्यानी मागास वर्गातुन आणला असता..
सन्घ काय आणि चोन्ग्रेस्स काय कोणीही मागास् वर्गिया नेत्रुत्व वाढु देणार नाही.
उलट आधिच्या मतलबी धोरणामुळे नव्याने इतर जातीना आरक्शण द्यावे लागले..
ना आधिच्या सरकारकडे काही ठोस धोरण होती. ऊलट नको तश्या सवलती देउन सरकारी तिजोरीचा खडखडाट केला..कर्जाचा डोन्गर उभा केला.
आणि लोकाना अडाणी व गरीब ठेवणे हेच चोन्ग्रेस्स व तत्सम पक्शान्चे ध्येय आहे. म्हणजे एक गठ्ठा मत मिळवणे सोपे..
एवढा गरिबान्चा पुळका होता तर कायदे कडक करायचे होते.तुम्हाला योग्य वातावरण देतो, कायद्याचे सरन्क्शण देतो कष्ट करा कमवा. ते केले नाही
मोदिचे अन्ध्भक्त आहेत तर गान्धीचे मन्द गुलाम
16 Feb 2021 - 8:54 am | सॅगी
लिंक
हरयाणातील महिला काँग्रेस नेत्याच्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. विद्या देवी असे या महिला काँग्रेस नेत्याचे नाव आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन पुनर्जीवित करण्यासाठी पैसा आणि दारु पुरवा असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. हरयाणातील जींदमध्ये त्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या.
ह्यांचा हात, पिझ्झा पार्टी आंदोलकोंके साथ...
16 Feb 2021 - 10:11 am | मुक्त विहारि
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत. काहींना बॅन्काॅक प्रिय, तर काहींना, बाॅलीवूड.
16 Feb 2021 - 12:10 pm | बाप्पू
टीप : . व्यक्तिस्वातंत्र्य आणि मत मांडण्याचे स्वातंत्र्य मला आणि इतर सर्वांना आहे. त्या हक्काचा आदर करावा ही विनंती. सदर प्रतिसादात कोणतीही माहिती "चुकीची" असेल तर मिपाने लेख खुशाल उडवावा
हिप्पोक्रसी म्हणजे काय -
मोदींच्या परदेशदौर्यावर टीका करणारे राहुलजींच्या बँकॉक आणि थायलंड बद्दल चूप असतात. मोदी संपूर्ण कार्यक्रम जनतेसमोर ठेवतात तर हे बँकॉक मध्ये नेमके कुठे जातात ते सांगत नाहीत.
मोदींच्या बायकोचे, त्यांच्या जुन्या व्यवसायाचे ( चहावाला ) अक्षरशः वाभाडे काढायचे पण वद्रा, सोनियाजी यांचे पूर्वाश्रमीचे व्यवसाय आणि धंदे काढले कि लगेच खाजगी आणि वयक्तिक गोष्टीत नाक खुपसले. म्हणजे तुमचे लाईफ म्हणजे खाजगी आणि मोदींचे लाईफ काय वाईल्ड लाईफ आहे का सारखं सारखं नाक खुपसायला. ?
मोदींचा जॅकेट, मोर इत्यादी बद्दल लेखांचा किस पडायचा.. पण राहुल जी यांचे लाखोंचे किंमती पोशाख, जॅकेट, प्रायव्हेट जेट इ कुठून आले विचारले कि बिळात लपून बसायचे.
मोदींनी जय श्री राम म्हणले कि कम्युनल. पण अल्लाह हूं अकबर म्हणणे.. आणि जाळीदार टोप्या घालून मिरवणे म्हणजे सेकुलर. मंदिरात पूजा करणे कम्युनल पण इफ्तार पार्ट्या झोडणे तेही सरकारी कार्यालयात.. म्हणजे सेकुलर.
बुरखा प्रोग्रेसिव्ह.. पण डोक्यावरचा पदर हा गुलामीचे लक्षण.
शिया, सुन्नी, अहमदिया, बोरखा हे सर्व मुस्लिम पण हिंदू आणि दलित वेगवेगळे..
लाखो बकरी, मुके प्राणी, बैल यांची कत्तल धार्मिक, पर्यावरण पोशक आणि सुंदर.. पण दिवाळी, दसरा , नागपंचमी, बैलपोळा, वटपौर्णिमा हे सगळं outdated आणि पर्यावरणासाठी हानिकारक.
कारवाचौथ, वटपौर्णिमा इ स्त्री गुलामीचे लक्षण पण हलला, तीन तलाक, बहुपत्नीत्व सर्व काही सुंदर आणि प्रोग्रेसिव्ह.
गणपती वेळी 4-5 दिवस गाणी वाजवणे कम्युनल. पण वर्ष्याच्या 365 दिवस मशिदीतून भोंगे वाजवणे म्हणजे सेकुलर. " अल्लाह शिवाय कोनताही दुसरा देव नाही आणि त्याच्याशिवाय दुसऱ्याला पुजणे म्हणजे पाप " असा संदेश मशिदीवरून सर्वांना ओरडून सांगणे म्हणजे सेकुलर. याला कोणी विरोध केला (सोनू निगम, अभिजित इ ) कि सगळे कम्युनल पण गणपतीत dj लावू नका म्हणणारे पुरोगामी.
मोदींना मौत का सौदागर, भगवा आतंकी, mass murderer म्हणणे म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य.. पण सोनिया जी यांना त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नावाने म्हणजे " अँटिनियो माईनो " म्हणणे म्हणजे त्याचा अपमान आणि वयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ...
26/11, 1992, 1984, 1947, 1979-80 इ हे सगळं कम्युनल व्हायोलन्स. कोणताही काँग्रेसी किंवा सरकार त्याला जबाबदार नही.. कोणतीही सुप्रीम कोर्ट कमिटी किंवा चौकशी नाही..
पण 2002 मोदींनी घडवून आणले. मोदी जबाबदार. हर एक प्रकारच्या चौकशी मधून गेले, कुठेही कोणताही पुरावा नाही.. तरीही तेच जबाबदार. पण बाकी सगळ्या घटनांच्या वेळी कोणताही मुख्यमंत्री, पंतप्रधान जबाबदार नाही. कोणतीही ठोस चौकशी नाही.
2002 वर चर्चा आणि आरोप यांचा पाऊस पडायचा पण ते ज्यामुळे घडले ते गोध्रा हत्याकांड सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करायचे.
Isis, लष्कर ए तोयबा, सिमी इ सर्व जिहादी संघटना यांचा इस्लाम शी घेणेदेणे नाही.. यांनी जगात कुठेही हल्ला केला तर लगेच.. दहशतवादास कोणताही धर्म नसतो, आणि रंग नसतो. पण जरा कुठेएखाद्या मुस्लिम व्यक्तीस खरचटले तरी लगेच भगवा दहशतवाद, हिंदू आतंकी असे शब्द शोधून काढायचे.
जर हिंदू खरंच आतंकी असता तर भारत आज या परिस्थितीत नसता. त्याचे लचके तोडले गेले नसते. त्याच्या सहिष्णुतेचा, सर्वांना आपलेसे करण्याच्या स्वभावाचा आणि सहनशीलतेचा पुरेपूर गैरफायदा घेतला गेला आणि शेवटी त्यालाच कालप्रिट ठरवले जातेय.
एक मंदिर जे कि हिंदू समुदायांने त्यांच्याच देशात मेजॉरिटी असून सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आणि तिथे मंदिरच होते ( पुरावा - archeology survey of india cha अहवाल ) हे सिद्ध करून पुन्हा ताब्यात घेतले. पण हजारो मंदिरे पाडली गेली , हजारो वर्ष्यापुर्वीचा वारसा असणारे स्टॅच्यू, मंदिरे, मुर्त्या जमीनदोस्त केली ते सर्व सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करायचे. त्यांना क्लीनचिट द्यायची. अगदी कालपरवा सुद्धा हजिया सोफिया बाबतीत हेच झाले.
26/11 चा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत होता हे गुप्तचर आणि तपास संस्था यांनी सिद्ध केले, कसाब जिवंत पकडला गेला. त्याने आपल्या जबाबात सर्व काही उघड केले पण तरीही मुद्दामहून याचा संबंध RSS शी जोडून हिंदूंना चिथावणी द्यायची. त्यांना विनाकारण आरोपी च्या पिंजऱ्यात उभे करायचे. हिंदू कसा आतंकवादी आहे हे खोटी उदाहरणे देऊन दाखवून द्यायचे. पुस्तके छापायची..
आरक्षण ही एक टेम्पररी व्यवस्था आहे हे प्रत्यक्ष बाबासाहेबांनी सांगितले तरीही त्याचा उपयोग वोट बॅक राजनीतीसाठी करणे ही प्रथा काँग्रेस ने सुरु ठेवली. आज त्या प्रथेचे लॉन्ग टर्म परिणाम भोगतोय. कोणताही पक्ष आता आरक्षणाला धक्का लावू शकत नाही. उलट दिवसेंदिवस सर्वच जाती आरक्षण मागायला लागलेत. हे 30-40 वर्ष्यापुर्वीच्या चुकीच्या पॉलिसी इम्प्लेंट केल्याचे परिणाम आहेत.
या सर्व कारणामुळे मी कधीही माझ्या आयुष्यात काँग्रेस आणि तत्सम विचारसरणी असलेल्या व्यक्तीला मत देत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे कि भाजपा किंवा संघ यांचा एजेंट आहे. योग्य ठिकाणी मी त्यांचाही समाचार घेतच असतो.
16 Feb 2021 - 12:13 pm | Ujjwal
+१११११११११११११
16 Feb 2021 - 12:13 pm | सॅगी
पण पण पण.....
.
.
....विचारवंतांच्या टकुर्यात उजेड पडेल काय???
16 Feb 2021 - 12:16 pm | Ujjwal
*विचारजंतांच्या
16 Feb 2021 - 12:36 pm | काळे मांजर
आरक्षण टेम्पररी आहे , असे आंबेडकर बोलले होते म्हणे
30 वर्षात आरक्षण सम्पवले नाही म्हणे
10000 वर्षे जातीव्यवस्था काँग्रेसने किंवा आंबेडकरांनी चालवली होती की काय ?
ते 10 वर्षे बोलले म्हणून 10 च वर्षे रहायला ते काय ज्योतिषी होते का ?
तसे तर मोदीही बोललेत , सौ दिन दो , झाले 100 दिवसात ?
वदरा , सोनिया ह्यांचे कोणते जुने धंदे बेकायदेशीर होते ?
16 Feb 2021 - 12:43 pm | सॅगी
म्हणे..
१०००० वर्षे असो किंवा १० करोड वर्षे असो...कायदे करून अनुचित व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सरकारचेच असते ना?
16 Feb 2021 - 1:40 pm | सॅगी
मग ६० वर्षे काँग्रेसने जे राज्य केले तेव्हाची त्यांची जबाबदारी काय? देशाला लुटायची का??
राम मंदिराची काळजी तुझ्यासारख्यानी करायची काही गरज नाही. आधी स्वतःचा शांतताप्रिय धर्माची काळजी कर...
16 Feb 2021 - 1:47 pm | काळे मांजर
भाजपच्या 15 वर्षात एकही काँग्रेसी तुरुंगात गेला नाही , उलट काँग्रेसचे लोक भाजपात जाऊन आमदार खासदार झाले
आणि म्हणे काँग्रेस भ्रष्ट
16 Feb 2021 - 1:50 pm | सॅगी
आहेच भ्रष्ट...त्यात काही शंकाच नाही..
16 Feb 2021 - 2:01 pm | काळे मांजर
आमच्या काँग्रेस वाल्यानी वेगळ्या जातीधर्मात तसेच आंतरराष्ट्रीय लग्ने केली आणि मुलांवर चांगले संस्कार केले
अजून काय उदाहरण देशासमोर ठेवायला हवे होते ? कायदा करून बळजबरीने अंतरजातीय लग्ने लावायची होती का ?
16 Feb 2021 - 2:08 pm | सॅगी
कसले संस्कार म्हणे?
आंदोलकांना दारुचा पुरवठा करण्याचे संस्कार?
की सैनिकांची मुंडकी पाकड्यांनी छाटल्यावर त्यांना प्रतिकार करण्यासाठी परवानगी न देण्याचे संस्कार?
की मिलीटरीसाठी साधनसामुग्री खरेदी न करण्याचे संस्कार?
पप्पुराजांचे उदाहरण आधीच आहे, अजून काय उदाहरण ठेवणार आहेत??
16 Feb 2021 - 2:25 pm | काळे मांजर
आमच्या काँग्रेसने सर्व जनतेला स्वातंत्र्य दिले
इंदिराबाईंनी 91000 पाकडे पकडले होते , एवढे शत्रू पकडायला मोदी शहाना 100 वर्षे लागतील
16 Feb 2021 - 2:38 pm | सॅगी
आणी मग स्वातंत्र्य मिळाल्यावर
हे अगाध संस्कार दिले..पप्पुशेठसारखे गिफ्ट पण दिले नाही का?
16 Feb 2021 - 1:44 pm | सॅगी
कोणी सांगितले मी व्यवस्था बदलायला चाललोय? प्रतिसाद नीट वाचला का? की तुमच्या चष्म्याचा फिल्टर हिरवेपणाकडुन काळेपणाकडे झुकतोय??
16 Feb 2021 - 1:25 pm | बाप्पू
हे 10, 000 हा आकडा कुठून आला . ? काही पुरावा?
आणि तुमचा आकडा खरा 10, 000 म्हणत असाल तर हिंदू धर्म किमान 10, 000 वर्षे जुना आहे हे मान्य करताय तुम्ही. . म्हणजे तुमच्या जन्माच्या आधी देखील हिंदू होते. आज स्वघोषित बाबर, हुमाँयू, अकबर आणि औरंगजेब पुत्र पण कधीकाळी हिंदूच होते हे मान्य करताय का मग?? कारण तुम्हाला फक्त 1400 वर्ष्याचा वारसा आहे. त्याआधीही जग आणि हिंदू धर्म होता हे मान्य करताय ना.. .. नाही तुम्ही 10, 000 असा आकडा सांगताय म्हणून विचारावे वाटले. .
असो
आणि खाली कोणलाही जातीवाचक आणि एकेरी नावाने तुम्ही कस काय बोलायताय?? तुम्हाला हे लायसन्स कोणी दिले?
16 Feb 2021 - 1:43 pm | काळे मांजर
हिंदू धर्म आसिंधु सिंधू होता , असे सावरकर साहेब म्हणालेत , त्यांना विचारा
16 Feb 2021 - 2:07 pm | काळे मांजर
16 Feb 2021 - 2:07 pm | काळे मांजर
10000 वर्षांपूर्वी हे होते , ते नव्हते ह्यातून काय दगड ज्ञान मिळते ?
10000 वर्षांपूर्वी केळीची पाने होती , रिलायन्सची कापडगिरणी नव्हती , मग आता काय रिलायन्सची गिरणी मोडून केळीची झाडे लावणार का ?
16 Feb 2021 - 3:01 pm | बाप्पू
नक्कीच नाही. केळीची साले नाही लावणार पण आम्ही केळीची साले वापरात होतो आणि काळासोबत इवोल्व होत आज कापड वापरतोय असा दावा नक्कीच करेल.
पण आम्ही जगाच्या निर्मितीपासून कापड वापरतोय.. कापडाचा शोध आम्हीच लावला.. आम्हीच श्रेष्ठ दुसरे सगळे बावळट ( काफिर ) असा भंपक दावा करणार नाही.
16 Feb 2021 - 1:17 pm | झेन
बिहार युपी ला आपण नावं ठेवतो. किबोर्ड नी एकमेकांशी हमरीतुमरीवर येतो.
असं एक्स्प्रेस हायवेवर यायचा विचार तरी करू शकतो का?
https://www.loksatta.com/pune-news/pune-gangster-gajanan-marne-rally-fro...
16 Feb 2021 - 3:00 pm | सॅगी
अहो एवढच नाही
टोल न भरता गेलेत एक्सप्रेसवेवरून
16 Feb 2021 - 1:21 pm | काळे मांजर
गांधी खानदांचा पंतप्रधान होऊन 30 वर्षे उलटून गेली आहेत
त्यात भाजपाचीही 12 वर्षे आहेत
तरी अजून गांधी मरत नाही
16 Feb 2021 - 3:27 pm | राघव
घडामोडींचा धागा.. पण घडामोडींबद्दल माहिती मिळण्यापेक्षा हेवेदावे/स्कोर सेटलिंग्/जाणीवपूर्वक चिथावणीखोर प्रतिक्रिया असंच जास्त दिसतं.
१०० प्रतिसादांत १० सुद्धा नवीन काही माहिती देणारे दिसत नाहीत.
16 Feb 2021 - 3:54 pm | चंद्रसूर्यकुमार
दुर्दवाने सहमत आहे. त्यासाठी काही विशिष्ट आय.डी विनाकारण कुरापत काढायला जे प्रतिसाद देत आहेत त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे आणि त्यांना अनुल्लेखाने मारावे हे सर्वच सदस्यांना (माझ्यासकट) आवाहन.