✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

घडामोडी नोव्हेंबर २०२०

म
माहितगार यांनी
Fri, 10/30/2020 - 15:44  ·  लेख
लेख
दोनेक युट्यूब पहाण्यात आल्या त्यांची नोंद घेण्याच्या निमीत्ताने आंतरराष्ट्रीय क्षितीजावरील घडामोडींचा बर्‍याच दिवसांनी आढावा घेण्याचा योग येतोय. या व्हिडीओत एक व्हिऑन या टिव्ही चॅनलच्या पलकी शर्मांच्या ग्रॅव्हीतास कार्यक्रमाचा आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण थोडक्यात पण लक्ष वेधक असते. आमेरीकेत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिदेन अध्यक्षीय निवडणूकीत व्यस्त असल्याने आंतरराष्ट्रीय राजकारण वृत्तांकनाचे लक्ष्य तिकडे स्वाभाविकपणे अधिक आहे. कोणीही निवडून आले तरी आमेरीका भारत सामरीक संबंधांची प्रगती साधली जातानाच आर्थीक आघाडीवर भारताचा फार मोठा सरळ फायदा अध्यक्ष बदलल्याने होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. अफगाणीस्तानातून बाहेर पडण्याची आमेरीकेची प्रक्रीया आस्ते कदम चालू राहील. त्याने पाकीस्तानचा अतीरेकी कारवायांपद्धतीवरील विश्वास अधिक वाढेल आणि अफगाणीस्तानातून मोकळे झालेले अतीरेकी भारतीय सीमेवर जुंपले जातील . युरोपाच्या काठावर अर्मेनीया विरुद्ध आझरबैजान असे नागोर्नो काराबाख या विषयावरून युद्ध चालू आहे. इराक आणि सिरीयातून मोकळे झालेले अतीरेकी तुर्कस्थान पडद्या मागुनच्या युद्धात वापरत असल्याच्या अर्मेनियाच्या दाव्यात अगदीच तथ्य नाही असे नसावे. याझीदींचे जे जेनोसाईड मागल्या सहा वर्षांपुर्वी झाले त्या पेक्षा अधिक भयंकर आर्मेनीयाने तुर्कस्थान कडून शंभर वर्षांपुर्विच भोगून झाले आहे, त्यामुळे नोगोर्नो काराबाख हा ख्रिश्चन बहुल भाग अझरबैजानला देण्यास आर्मेनीया तयार नाही यावरून हे युद्ध चालू आहे. रशियन हुकुमशहा स्टालीनने कोणत्या भरवश्यावर नोगोर्नो काराबाख अझरबैजानला कागदोपत्री जोडला हे माहित नाही पण सोव्हीएत संघाचे विसर्जन झाल्यापासून अझरबैजान अर्मेनीयाचे वितुष्ट मागच्या तीसेक वर्षात कायम चिघळत राहीला आहे. धार्मीक आधारावर भारताच्या विभाजनाचे समर्थन करणार्‍या पाकीस्तानला ख्रिश्चन बहुल नोगोर्नो काराबाख मात्र मुस्लिम बहुल अझरबैजानच्या मालकीत रहावा असे वाटते. दुटप्पी बोलण्यासाठी कोलांट उड्या किती सहज मारू शकतात याचे कुतूहल वाटते असा दुटप्पीपणा उघडा पाडण्यात भारतीय बर्‍यापैकी कमी पडतात. असाच निर्लज्जपणा पाकीस्तानच्या फवाद चौधरी नावाच्या मंत्र्याने पुलवामा अतीरेकीकांडात पाकीस्तानचा हात होता हे पाकीस्तानी संसदेत उघडपणे मान्य केले. भारतीय माध्यमांनी वृत्त देताच पुन्हा नरोवा कुंजरोवा केले हे पाकीस्तानचे जुनेच लक्षण आहे. फ्रान्स दोन कारणांनी बातम्यात आहे, कोविडने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केल्याने फ्रान्स कालपासून पुन्हा एकदा फुल लॉकडाऊनमध्ये गेले आहे. दुसर्‍या बातम्या फ्रान्समध्ये गेल्या पंधरा दिवसात अतीरेक्यांनी काही जणांच्या हत्या केल्या. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षात महिना दोन महिन्यात एखादी अतीरेकी कारवाई नित्याचीच झाली आहे. या वेळी एका शिक्षकाची हत्या झाल्याने फ्रान्सच्या जनता ते अध्यक्ष सर्वांनी सात्विक संताप व्यक्त करून जहाल गटांचे फ्रान्समधून समुळ उच्चाटनाचा पण घेतला तर नवल नसावे, कायदा हातात घेऊन हत्या करणार्‍या अतीरेक्यांचा निषेध करण्याचे सोडून तुर्कस्थानच्या एर्दोगन नावाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक बहुल देशांनी निषेध फ्रान्सच्या अध्यक्षांचा केला कारण त्याने फ्रान्सच्या राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेतली. मोर्चेकाढून फ्रान्सच्या अध्यक्षाच्या फोटोला बुटाने मारणेवगैरे फ्रेंच वस्तुंचा बहीष्कार त्यापलीकडेचे मलेशियाच्या अध्यक्षांनी सर्वात एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सचे अध्यक्ष ते फ्रान्सची सर्वसामान्य जनता या विरुद्ध अतीरेकी कारवाया करण्याची उघडपणे आवाहन केले असेच आवाहन मागे इराणच्या सर्वेसर्वाने सलमान रशदी विरोधात केले होते. यातील फ्रान्सच्या राजकीय भूमिकांची माहिती बातम्यातून येतेच पण मी आधी दुसरा जो युट्यूब पहाण्यात आल्याचा उल्लेख केला तो Caroline Fourest यां फेंच पत्रकाराच्या युट्यूब मुलाखतीचा यात फ्रान्समधील सेक्युलॅझमचे स्वरुप कसे वेग्ळे आहे, ते फ्रेंच लोक अभिव्यक्तीस्वातंत्र्य का आणि कसे जपू इछितात ते आमेरीकन सेक्युलॅरीझम आणि फ्रेंच सेक्युलॅरीझम मधील फरकाचे बारकावे इत्यादी रोचक आहे युटूब जरासा दीर्घ म्हणजे तासाभराचा आहे तरीपण जिज्ञासूंनी आवर्जून बघावा. युट्यूब दुवा France’s Fight Against Extremism *घडामोडींशी अनुषंगिक सोडून इतर अवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
88419 वाचन

💬 प्रतिसाद (314)

प्रतिक्रिया

माझ्या मते अश्या एखाद दुसऱ्या

रात्रीचे चांदणे
Sun, 11/08/2020 - 09:10 नवीन
माझ्या मते अश्या एखाद दुसऱ्या केस चा एका राज्याच्या निकालावर काही ही परिणाम होईल असे वाटत नाही. लोक स्थानिक प्रश्नांना जास्त महत्व देणार. जर नितीश कुमारांनी आणि भाजपा ने गेली 5 वर्ष काम केलं असेल तर लोक त्यानाच निवडून देणार आणि नसेल केलं दुसरा पर्याय तपासणार. एका अभिनेत्यासाठी कोण मतदान करेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

अभिनेत्यासाठी सगळी जनता मतदान

आनन्दा
Sun, 11/08/2020 - 10:35 नवीन
अभिनेत्यासाठी सगळी जनता मतदान करत नाही, पण लोकांचा फॅन क्लब असतो, काही लोक आंधळे प्रेम करणारे पण असतात. तसे नसते तर विशेष काही न करता धर्मेंद्र, शत्रुघ्न वगैरे कसे निवडून येतात. त्यामुळे यात काहीतरी दम असतो.. तसेही निवडणूक शेवटी 2-3 टक्के मतांवर फिरते, बाकीचा मतदार बहुतांशी पक्षाला बांधील असतो. आणि अश्या वेळेस 0.1टक्का जरी फरक पडणार असेल तर असगी रिस्क घ्यायला काहीच हरकत नसते. नाहीतर अर्णबला बिहारच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला किंवा बरोबर मतदान चालू असतानाच का अटक झाली याचे काय उत्तर? अनिल देशमुख केस ओपन करू असे म्हणाले होते 26 मे ला, मग इतके दिवस काय करत होते? यात काहीतरी काळेबेरे आहे हे नक्की.. तसाही कायदा या गोष्टीवर माझा विश्वास पण नाही. बळी तो कां पिळी, आणि काका वाक्यं प्रमाणं, यांच्यावरच माझा हल्ली जास्त विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

@ आनंदा,

गणेशा
Sun, 11/08/2020 - 13:03 नवीन
@ आनंदा, अर्णब चा अटकेचा बिहार निवडणुकीत कोणाला फायदा होऊ शकतो असे तुम्ही म्हणताय.. मला कळाले नाही नीटसे.. कारण देतो.. कारण एकीकडे तुम्ही म्हणता ठाकरे सरकार ची सामान्य लोकांच्यात बदनामी करण्यासाठी हि कारवाई केली गेली आहे. यात राष्ट्रवादी ने हि कारवाही केली आणि नाव शिवसेनेचे आणले असा अर्थ तुम्ही सांगताय असे वाटले होते. आता तुम्ही म्हणता अर्णब चा फॅन क्लब किंवा अंध समर्थक चिडून महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेचे सरकार ने जे केले त्या विरोधात मतदान करण्यासाठी बिहार मध्ये काँग्रेस - rjd या विरोधात म्हणजे bjp - jdu ला मतदान करतील मग तुम्हाला असे म्हणायचे आहे काय, कि bjp ने राष्ट्रवादी च्या मदतीने अर्णब ला आत टाकले.. आणि काँग्रेस सेनेला बदनाम करून बिहार मध्ये काही मते डायव्हर्ट केली.. आणि हे खरेच हास्यस्पद वाटत नाहीये का?
नाहीतर अर्णबला बिहारच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला किंवा बरोबर मतदान चालू असतानाच का अटक झाली याचे काय उत्तर?
बिहार ची निवडणूक तीन टप्प्यात झाली, 28 oct, 3 nov आणि काल 7 nov.. मग येव्हडीच मते फिरणार होती तर अटक 28 च्या अगोदर न करता 4 nov ला का केली? यावरूनच हे स्पष्ट होतेय arnab ला अटक बिहार निवडणुकी साठी झाली नाही.. आणि स्थानिक, पायाभूत सुविधा आणि विकास या मुद्द्यावर निवडणूक होत असताना ज्यांना असले राजकारण करणे भाग पडत असेल त्यांना सुज्ञ जनतेने उलट सबक शिकवलेच पाहिजे.. कसले फॅन following? उद्या मराठी पत्रकाराला त्याच्या वयक्तिक केस मुळे राजस्थान मधील काँग्रेस ने अटक केली तर येथील काही काँग्रेस ला वोट करणारे तिकडे राजस्थान सरकार मराठी पत्रकारतेवर हल्ला करून चुकीचे करत आहे म्हणुन ते महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी मतदान करतील हे सगळे मनाचे इमले वाटत आहेत.. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

बिहारचे निकाल वाचून तुम्हाला

आनन्दा
Wed, 11/11/2020 - 07:33 नवीन
बिहारचे निकाल वाचून तुम्हाला मी वरती बोललेल्या 0.01 टक्क्याचे महत्व कळले असेल अशी अपेक्षा ठेवतो.. आता अर्णब 4 दिवसात नक्की सुटेल असेल दिसतेय, करण सत्र न्यायालयाला 4 दिवसांची मुदत दिली आहे, नाहीतर हायकोर्ट हस्तक्षेप करेल. मेंटल harrasment चा पुरावा थेट अर्णब च्या नावाने नसेल, जसे की थेट फोन कॉल वगैरे, तर अर्णब ला थेट गुन्हेगार म्हणून अडकवणे सोपे नाही, त्यामुळे कोर्ट पोलिसांवर ताशेरे मारण्याची शक्यताच मला जास्त दिसतेय याच्यात. पण तरीही निकाल अजून येत नसल्यामुळे मी यावर आत्ता बोलणार नाही. अवांतर - मी उघडपणे प्रो भाजप भूमिका घेतो, पण म्हणून भाजप स्वच्छ आहे, वगैरे गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवत नाही. राजकारणाकडे मी तत्वापेक्षा अभ्यास म्हणून बघतो. म्हणून एकाच वेळेस मी पवार आणि मोदी दोघांचाही फॅन राहू शकतो. आणि ताकाला जाऊन भांडे लपवायची मला गरज पण पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

गणेशा भाऊ,

आनन्दा
Mon, 11/16/2020 - 10:50 नवीन
गणेशा भाऊ, अर्णब सुटला बऱ का, दुसर्‍याच दिवशी. आता तरी पटतय का मी काय सांगितले ते? मुळात विषय सुशांतसिंग ला न्याय देण्याचा होता, अर्णब ला त्याचा योद्धा बनवले होते, आणि अर्नब ला अटक म्हणजे सुशांत वरती अन्याय असे चित्र उभे केले होते. तुम्ही हसाल हे सगळे वाचून - बादरायण संबंध आहे म्हणून, पण बिहारमधल्या बर्‍याच जगांचे निकाल १०० ते १००० मतांनी लागले आहेत हे लक्षात घ्या म्हणजे त्या प्रकरणाचे महत्व कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

जर नितीश कुमारांनी आणि भाजपा

आनन्दा
Wed, 11/11/2020 - 10:41 नवीन
जर नितीश कुमारांनी आणि भाजपा ने गेली 5 वर्ष काम केलं असेल तर लोक त्यानाच निवडून देणार आणि नसेल केलं दुसरा पर्याय तपासणार.
या वाक्यावरती काय प्रतिक्रिया द्यावी असा मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

म्हणजे बिहार च्या लोकांनी

रात्रीचे चांदणे
Wed, 11/11/2020 - 12:16 नवीन
म्हणजे बिहार च्या लोकांनी कोणत्या मुद्द्यांवर मतदान केले हे तुम्ही हिथे बसून सांगणार. माझ्यामते तर लोक असल्या गोष्टी ला जास्त महत्व देत नाहीत. एक उदाहरण सांगतो, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आदी काँग्रेस सरकार ने मराठा समाज ला आरक्षण दिले, आमच्या भागात गारपीट झाली नसताना देखील भरपाई म्हणून भरपाई दिली, उसाला प्रत्येक टनाला की क्विंटल ला 100 रुपयाचे अनुदान दिलें ते ही मागणी नसताना. पण लोकांनी मतदान करताना गेल्या 5 वर्षातली म्हणजेच 2009 ते 2014 कामगिरी लक्षात ठेवून मतदान केले. नितीश कुमार जर गेली 15 वर्षे सत्तेत राहून पण पूर्ण बहुमताने पुन्हा निवडून येत असतील तर खरंच तिथं काहीतरी काम केले असेल. खुद्द बिहारचे विरोधी पक्ष पण म्हणत नाही की सुशांतसिंग केस मुळे हरलो ते EVM ला दोष द्यायला लागलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मी इतरत्र कुठेतरी इथेच ते ०

आनन्दा
Wed, 11/11/2020 - 12:32 नवीन
मी इतरत्र कुठेतरी इथेच ते ०.०१ टक्क्याचे गणित मांडले आहे.. तुमची ९०टक्के मते तशीदेखील बांधील असतात. प्रत्येक पक्षाकडे तसे बांधील मतदार असतात. ज्याच्याकडे असे बांधील मतदार असतात तो पक्ष जास्त स्थिर असतो. हा वर्ग बर्‍याच वेळेस विचारधारा, विकास वगैरे गोष्तीवर अवलंबून असतो. परंतु, बर्‍याच वेळेस निवडणूक जिंकायला हा मतदार पुरत नाही, अश्या वेळेस अन्य भावनिक मुद्दे तापवून जास्तीची २-३ टक्के मते मिळवायचा प्रयत्न केला जातो.. बिहारमध्ये यावेळेस अक्षरशः एक एक मताचा हिशोब झालाय, ते लक्षात घेता मी काय म्हणतोय हे लक्षात यायला हरकत नसावी. अजुन देखील तुम्हाला विकास धरुन बसायचा असेल तर माझा नाइलाज आहे. पण मुळात बिहारच्या निवडणूकांमध्ये विकासापेक्षा लोजपा हा मुद्द जास्त प्रभावी ठरला आहे, लोजपा युतीमध्ये असता तर ही निवडणूक आज देखील एकतर्फी झाली असती. जाता जाता एक आगाऊ सल्ला देऊन जातो - राजकारणाकडे भावनेपेक्षा एक व्यवसाय म्हणून बघा, बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मला नेमकं उलट वाटतं

अर्धवटराव
Mon, 11/09/2020 - 20:53 नवीन
सेनेच्या राडा पद्धतीचाच हा राजकीय अविष्कार आहे असं चित्रं प्रोजेक्ट झालय. रस्त्यावरच्या भांडणात सेना दगड उचलते. सत्तेत आल्यावर पोलिसांकरवी पत्रकाराला उचलते. संजय राऊत विरोधकांना बोचकारे काढतो ते स्वाभावीक राजकारणाचा भाग असु शकतो. पण मुख्यमंत्री देखील दसरा मेळाव्यात तिच भाषा वापरतात हे बघुन वैशम्य वाटतं. कंगनाला बिएम्सी ने हात लावायची अजीबात आवष्यकता नव्हती. त्याकरता मनोरंजन क्षेत्रातले सेना समर्थक मंडली पुरेसे होते. अर्णवला एकट्या संजय राऊतने लेखणीच्या जोरावर हाताळायला हवं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे या बाबतीत मराठी सारस्वत सेनेच्या मदतीला धावला असता. पण सेनेसे राज़्कीय ताकत वापरली. उद्धवरावांकडुन अशी अपेक्षा अजीबात नव्हती. उद्धव राव वेगळ्या धाटणीचे वाटायचे. पण सेनेची संस्कृती बदलायच्या ऐवजी तेच वाहावत चालले कि काय अशी शंका येते. याचा परिणाम सेनेच्या इमेजवर होतोय असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

खरं की काय?

सॅगी
Fri, 11/06/2020 - 08:25 नवीन
सेने सहित बाकी दोन्ही काँग्रेस चांगले मुरलेले खेळाडू आहेत.
दोन्ही काँग्रेस बद्द्ल माहित नाही, पण सेना इतकीच मुरलेली होती तर एवढी वर्षे युतीच्या (आणि आता भकास बिघाडीच्या) कुबड्यांची गरज का पडली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हा मुद्धा महाराष्ट्र च्या अस्मितेचा पण आहे

Rajesh188
Fri, 11/06/2020 - 10:22 नवीन
महाराष्ट्रावर सतत होणारी हिंदी न्यूज चॅनेल ची टीका मराठी लोकांना आवडत नाही. एक तर हिंदी आणि हिंदी भाषिक लोक एवढी डोक्यावर बसली आहेत नी महाराष्ट्र आणि मराठी लोकांना हिंदी विषयी तीव्र तिरस्कार आहे . आणि नेहमी महाराष्ट्र वर च टीका करणाऱ्या हिंदी न्यूज चॅनेल विषयी पण तिरस्कार आहे. इथे ठाकरे ऐवजी फडासविस जरी मुख्यमंत्री असते आणि त्यांनी अर्णव वर अशीच कारवाई केली असती तरी लोकांनी फडणवीस सरकार चे समर्थ न केले असते. Bjp maharashtra मध्ये हे अर्णव साठी आंदोलन करत आहे ते राज्य द्रोही काम आहे असेच येथील जनता मानते . आणि त्या मुळे ह्या प्रकरणाचा bjp ल maharashtra मध्ये बिलकुल फायदा होणार नाही. तोटा मात्र नक्की होईल.
  • Log in or register to post comments

Rajesh 188, प्रतिसादाशी सहमत,

रात्रीचे चांदणे
Fri, 11/06/2020 - 10:42 नवीन
Rajesh 188, प्रतिसादाशी सहमत, अर्णव फक्त महाराष्ट्र goverment वरती टीकाच करत नव्हता तर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत होता. आणि हेच लोकांना आवडणार नाही. काही जरी झाले तरी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आहेत. आवडो न आवडो त्यांना आदर द्यायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

काल टीव्ही वर , महाराष्ट्राचे

मराठी_माणूस
Fri, 11/06/2020 - 11:19 नवीन
काल टीव्ही वर , महाराष्ट्राचे एक मंत्री पत्रकारांना काही उत्तर देत असतांना, एक पत्रकार प्रश्न विचारुन हींदीत उत्तर द्या असे म्हणत होता. त्याला मंत्र्यांनी हींदीत उत्तर दिले. एरवी इथे राहाता तर मग इथली भाषा आली पाहीजे असे म्हणतो , मग पत्रकारांचे असे हट्ट का पुरवीले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ह्यांचे

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/06/2020 - 12:24 नवीन
ह्यांचे एके काळचे लाडके संजय राउत तर उर्दु/हिंदीत शेरोशायरी करत असतात. कोणत्याही भाषेबद्दल आकस्/तिरस्कार असता कामा नये. निदान भारतात तरी. पण गेले काही महिने मसाला पुरवण्याचे काम आपले मराठी पुढारीच करत आले आहेत. त्यामुळे पत्रकारांचे कोंडाळे तुमच्या भोवती तयार होते. उ.दा. "सुशांत सिंग रजपूतचा खूनच झाला" नारायण राणे "दिशा सालियनवर बलात्कार करून तिला मारण्यात आले" नारायण राणे/नितेश राणे "उखाड लिया" संजय राउत. कंगनाचे अनधिक्रूत बांधकाम तोडल्यावर प्रतिक्रिया "आमचे मंत्री खिशात राजीनामे घेउन फिरत असतात" २०१४-१९ ह्या कालातील शिवसेनेचे नेहमीचे वक्तव्य. ईतर राज्यातील मंत्र्यांच्या अशा प्रतिक्रिया कधी ऐकल्या आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

+१

अमरेंद्र बाहुबली
Fri, 11/06/2020 - 11:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एकट्या अर्णबमुळे काहींचे हात

मदनबाण
Fri, 11/06/2020 - 18:01 नवीन
एकट्या अर्णबमुळे काहींचे हात शिवशिवताना दिसत आहे...:))) ज्यांना हे नक्की काय चाललयं हे समजुन घ्यायंच असेल त्यांनी ६ महिने पूर्वीचा अर्णब नावाचा सापळा हा व्हिडियो नक्की पहावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?
  • Log in or register to post comments

ज्यांना हे नक्की काय चाललयं

मदनबाण
Sun, 11/08/2020 - 14:04 नवीन
ज्यांना हे नक्की काय चाललयं हे समजुन घ्यायंच असेल त्यांनी ६ महिने पूर्वीचा अर्णब नावाचा सापळा हा व्हिडियो नक्की पहावा. याचा भाग दोन कालच आलाय :- अर्णब गोस्वामी नावाचा सापळा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India launches earth observation satellite EOS-01, nine other satellites
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

Maharashtra HM launched

मदनबाण
Fri, 11/06/2020 - 18:25 नवीन
Maharashtra HM launched ‘Operation Arnab’, deployed 40 police personnel to arrest Arnab Goswami in 2018 suicide case: Read details

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Will Indian Army Get Access To Sensitive Maps Of Pakistan After India-US Signed Series Of Military Pacts?
  • Log in or register to post comments

पण

माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 11/06/2020 - 20:36 नवीन
पण गृहमंत्री राष्ट्रवादीचे आहेत ना? मग ते शिवसेनेचा फायदा करून देतील , एवढा? कारण अर्नब सह्सा राष्ट्रवादीवर ओझरती टीका करायचा. आणी राष्ट्रवादी व भाजपा दाखवायला शत्रू असले तरी एकमेकांमध्ये मधुर नाते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माई साहेब

Rajesh188
Fri, 11/06/2020 - 20:42 नवीन
राजकारणात कोणत्याच प्रसंग मधून सरळ अर्थ निघत नाही.जसे दिसते तसे ते नसते. राजकारणात ज्यांचा खूप अभ्यास आहे तेच राजकीय विश्लेषण करू शकतात. राजकारणात डाव वेगळ्याच पैलवणावर टाकलेला असतो आणि चीत पट दुसराच कोणता तरी पैलवान होतो. राजकीय विश्लेषण करणे एवढे सोप आणि सरळ काम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

राजकारणात ज्यांचा खूप अभ्यास

बाप्पू
Fri, 11/06/2020 - 20:50 नवीन
राजकारणात ज्यांचा खूप अभ्यास आहे तेच राजकीय विश्लेषण करू शकतात. राजकारणात डाव वेगळ्याच पैलवणावर टाकलेला असतो आणि चीत पट दुसराच कोणता तरी पैलवान होतो. राजकीय विश्लेषण करणे एवढे सोप आणि सरळ काम नाही
राजेश188 मग तुम्ही राजकारणातले प्रकांडपंडित आहात कि काय. ?? तुमचे मागचे प्रतिसाद पाहून असा प्रश्न पडला.. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सुशांतसिंग मध्ये व्हिडीओ डकवले

कपिलमुनी
Sat, 11/07/2020 - 13:40 नवीन
आता इथे पण तेच ! हवाबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अतिशय सुखद बातमी:

चौथा कोनाडा
Fri, 11/06/2020 - 22:19 नवीन
अतिशय सुखद बातमी: लुप्त झालेली अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्याच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे ! https://www.loksatta.com/maharashtra-news/revival-of-agrani-river-in-sangli-district-abn-97-2321436/lite/
  • Log in or register to post comments

मस्तच.. कौतुकास्पद.. !!

बाप्पू
Fri, 11/06/2020 - 22:23 नवीन
मस्तच.. कौतुकास्पद.. !! अश्या कितीतरी नद्या आणि ओढे शेवटच्या घटका मोजत आहेत.. तिथेही असे काम होणे आवश्यक आहे. रच्याकने : ही नदीजोड प्रकल्प काय होता /आहे?? यावर कुठे काही काम झालेय का आजवर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

धन्यवाद, बाप्पू.

चौथा कोनाडा
Mon, 11/09/2020 - 20:35 नवीन
धन्यवाद, बाप्पू. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प हा प्रचंड खर्चीक असल्याने त्यावर हळूहळू प्रयोग होत आहेत असे दिसते. काही चाचण्या यशस्वी होत आहेत ही आनंदाची बातमी आहे ! https://www.lokmat.com/national/successful-test-river-jodh-project-narmada-water-released-shipra-river/ https://www.esakal.com/ahmednagar/river-connection-project-successful-water-lake-first-rain-292931
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

उत्साहवर्धक बातमी

गामा पैलवान
Fri, 11/06/2020 - 23:28 नवीन
चौथा कोनाडा, उत्साहवर्धक बातमी आहे. हिच्यावरून डांबरखेडा येथे मोतीलाल पाटील यांनी गोमाई नदी नांगरून आजूबाजूच्या परिसराचा जलस्तर वाढवला होता त्याची आठवण झाली. संदर्भ : https://www.facebook.com/217103811726590/posts/1252976738139287/ यावरून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नदी नांगरण्याचे प्रयोग सफल झाले आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

व्वा गा.पै. जबरदस्त बातमी

चौथा कोनाडा
Mon, 11/09/2020 - 20:45 नवीन
व्वा गा.पै. जबरदस्त बातमी आहे. नदी नांगरण्या बद्दल प्रथमच वाचले. " वॉटर मॅन ऑफ शहादा " मोतीलाल पाटील यांचे मार्गदर्शन विविध जिल्ह्यात खुपच उपयोगी पडेल. मा. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्रप्रदेश राज्य शासनाने काही प्रकल्प राबवले होते, ते यशस्वी झाले असे वाचण्यात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

राष्ट्रप्रेमी पक्ष म्हणजे bjp

Rajesh188
Sat, 11/07/2020 - 15:55 नवीन
राष्ट्र प्रेमी एकमेव राजकीय पक्ष म्हणजे bjp आणि bjp चे डझन भर नेते म्हणजे देश असा एक चुकीचं पायंडा अर्णव आणि त्याच्या सारख्याच काही पत्रकार नी पाडला होता . त्यांच्या देशातील (म्हणजे डझनभर bjp che नेते) लोकांवर टीका केली की देशद्रोह असले काही तरी लॉजिक ते लावत होते. त्याचाच परिणाम म्हणून पत्रकार वरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. आणि अशा काही मीडिया ग्रुप मुळेच मीडिया चे स्वतंत्र पणाला लागत आहे. आणि नेहमी देशाविरुद्ध च बोलायचे नेहमी भारतीय संस्कृती वर टीका करायची अशी एक दुसरी जमात पण आहे त्यांची वेगळी मीडिया आहे. आणि ह्यांच्या स्पर्धेत सत्य कुठल्या कुठे पळून जात aahe. एकंदरीत मीडिया चा दर्जा खूपच खालावला आहे. हा कसला चोथा स्तंभ ह्यालाच आता आधार देवून उभा करायची वेळ आली आहे . जो कोणत्याच बाजूला न झुकता सरळ उभा राहील.
  • Log in or register to post comments

चोथा स्तंभ ;)

आनन्दा
Sat, 11/07/2020 - 16:51 नवीन
चोथा स्तंभ ;) शब्द जाम आवडला आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एक्दम ब्रोबर

डॅनी ओशन
Sat, 11/07/2020 - 17:08 नवीन
एक राजेशभौ फिल्टर लावायला पाहिजे, म्हणजे मीडिया काहीही आडवं तिडवं बोलणार नाही, सगळं Rajesh१८८ सर्टिफायड... पूर्ण सत्य. It ain't the truth if it ain't Rajesh१८८ approved ! Get your news approved, order now. Call 188-188-188-881 ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Lol....

बाप्पू
Sat, 11/07/2020 - 23:14 नवीन
Lol....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन

अर्णव

Rajesh188
Sun, 11/08/2020 - 10:00 नवीन
अर्णव ची रवानगी तळोजा जेल मध्ये झाली.
  • Log in or register to post comments

अर्थव्यवस्था

तुषार काळभोर
Sun, 11/08/2020 - 11:51 नवीन
@ माईसाहेब आजच्या लोकरंग मध्ये एक लेख आहे. त्यात तुमच्या अर्थव्यवस्थेविषयी शंकेची उत्तरे (अचूक आहेत का नाही माहिती नाही, पण तो मुद्दा लेखात हाताळलाय). - ऑक्टोबर मध्ये जी एस टी संकलन एक लाख कोटीहून अधिक झाले. - कारच्या विक्रीने मागील काही महिन्यांचा उच्चांक गाठला. अगदी corona पूर्व काही महिन्यात विकल्या गेल्या, त्याहून अधिक कार ऑक्टोबर मध्ये विकल्या गेल्या. - लॉक डाऊन मध्ये साधारण दोन आर्थिक गट होते. एक ज्यांचं उत्पन्नाचं साधन, स्रोत एकदम शून्य झाला. त्यांना गावी परतावं लागलं. त्यांची परिस्थिती खालावली. दुसरे, ज्यांचं उत्पन्न सुरू होतं. काही व्यावसायिक, बरेच शेतकरी, दुग्ध व्यवसायातील उद्योग, एक मोठा नोकरदार वर्ग ज्यांचं काम कदाचित बंद राहिलं पण पगार चालू राहिला. - मार्च ते जुलै - ऑगस्ट या दुसऱ्या गटातील लोकांकडे पैसा होता पण तो खर्च होत नव्हता. हे लॉक डाऊन मधील dolgona कॉफी, केक्स, जिलेबी वरून दिसलंच. एक (बहुसंख्य नव्हे) मोठा वर्ग खर्च करायला वाट बघत होता. साधारण ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत मार्केट बऱ्यापैकी चालू झालं. खर्च न केलेले लोक खर्च करू लागले. चार पाच महिने पैसा मुख्यत्वे खाण्या पिण्यावर खर्च होत होता. आता लोक मोबाईल व कार घेऊ लागले. ऑक्टोबर पासून जे विविध online सेल्स चालू आहेत त्यात हातोहात मोबाईल खपत आहेत. मोटासायकल खप वाढलेला नाही. कारचा खप मात्र खूप वाढलाय. यातून लक्षात येतं की खर्च कोणता वर्ग करतोय. लोकरंग मधील लेख. बोगदा अजून संपलेला नाही.. लेखक मंगेश सोमण
  • Log in or register to post comments

धन्यवाद

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/08/2020 - 13:24 नवीन
धन्यवाद रे पैलवाना. Bajaj Auto’s domestic sales rose by 11 percent from 2,42,516 units in October last year to 2,68,631 units in October this year. Suzuki Motorcycle India Pvt Ltd (SMIPL) recorded 76,865 unit sales in October 2020. Breaking last year’s festive record, SMIPL registered a 3% jump in October 2020 overall monthly sales as compared to the same month in the previous year. https://www.financialexpress.com/auto/bike-news/two-wheeler-sales-october-2020-bajaj-auto-suzuki-report-highest-ever-sales-tvs-up-by-22/2119405/ मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे असे दिसते आहे. मग दुचाकीची मागणी कुठे अडखळत आहे ते सोमण कोनत्या आधारावर म्हणतात? सणासुदीमुळे खरेदी जास्त झाली असे आता म्हणत आहेत. मग नंतर नव्या-वर्षाचे निमित्त म्हणून खरेदी जास्त झाली असे म्हणतील. असो. "आता लोक मोबाईल व कार घेऊ लागले" ते आधीही घेत होतेच. आणी आधी अर्थ्व्व्यवस्था 'अतिशय संकटात आहे" , अर्थ्व्यवस्थेने मान टाकलेली' आहे असे सगळे जण म्हणत होते. मग ही अशी ८/९ लाखाची खरेदी?.. सांगायचा मुद्दा- आपली अर्थ्व्यवस्था खरोखरच कधी खराब होती का ? ५०/६० हजारचे आय-फोन घेणारे लोक, ह्यांना नोकरी/धंद्याबद्दल काहीच चिंता वाटत नव्हती? जे ३०/४० लाखाच्या गाड्या घेतात त्यांना नक्किच हे असेच चालू राहील ह्याची खात्री असली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

ह्यांना नोकरी/धंद्याबद्दल काहीच चिंता वाटत नव्हती?

तुषार काळभोर
Sun, 11/08/2020 - 17:07 नवीन
एप्रिल मध्ये आमच्या पगारात कपात झाली तेव्हा अशी चर्चा होती की लोकांना काही पर्याय नाही, ते सोडून नाही जाऊ शकत. पण लोक दणादण राजीनामा देताहेत, त्यांना नव्या नोकऱ्या मिळताहेत, नवीन लोक आमच्या इथे येताहेत. साला मंदी फक्त आमच्या पगारात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/08/2020 - 22:25 नवीन
खरे आहे. हल्लि तो 'जॉयनिंग बोनस' वगैरेही देतात असे ऐकले आहे. पुर्वी ओळखीने कुणी नोकरीने लागला की "वशिल्याने" लागला म्हणून हिणवत. आता कुणी कुणाला नोकरीला लावला की 'रेफेरल बोनस' देतात असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मंदी फक्त आमच्या पगारात?

गोंधळी
Wed, 11/25/2020 - 13:15 नवीन
India in historic technical recession, signals RBI https://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/india-in-historic-technical-recession-signals-rbi-in-its-first-ever-nowcast/articleshow/79182603.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

देशाची लोकसंख्या किती गाड्यांची विक्री किती

Rajesh188
Sun, 11/08/2020 - 17:45 नवीन
देशाची लोकसंख्या किती 130 कोटी गाड्यांची विक्री किती लाखभर. गुणोत्तर बघा नंतर मत मांडा
  • Log in or register to post comments

+१

शा वि कु
Sun, 11/08/2020 - 19:23 नवीन
बरोबर. गाडी घेणारे लोकं नक्की किती वाढले हे नक्की कळायला हवं. हे आकडे सर्वसमावेशक कितपत आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

म्हणजे

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 11/08/2020 - 22:15 नवीन
विक्रीचे कोणतेही आकडे सांगितले तरी १३० कोटी पैकी एवढेच? असे म्हम्टले तर गेल्या ५० वर्षात काहीच झाले नाही असे म्हणावे लागेल. जर्मन कंपनी बॉश ही साधारण वर्षाला २५,००० डिश-वॉशर्स भारतात विकत असे. हल्ल्लिच विचारणा केल्यावर एका डीलरने सांगितले की सध्या एकूण मागणी पाच लाखाची आहे. सहा महिन्यात ५ लाखाची मागणी. करोनाच्या भीतीने हा आकडा नक्कि वाढला. पण ३५-४०००० रुपयांचा डीश-वॉशर घेण्याची एवढ्या लोकांची ऐपत आहे.
गाडी घेणारे लोकं नक्की किती वाढले हे नक्की कळायला हवं.
९०% लोकांची पहिलीच गाडी असते. मर्सेडिझ्/ऑडी वगैरे घेणार्यांची ती दुसरी/तिसरी गाडी असते. मुद्द्दा हा आहे की "लाखो नोकर्या जात आहेत.. व्यवसाय बंद पड्त आहेत.." असे अर्थतज्ञ सांगत असताना सगळीकडेच खरेदीसाठी एवढी झुंबड कशी? राजकीय भूमिकेतून बाहेर येउन ह्यावर उहापोह व्हावा ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

माई,

शा वि कु
Sun, 11/08/2020 - 22:55 नवीन
एक साधा गुगल सर्च केला. त्यात भारतात १००० व्यक्तींमागे २२ गाड्या असतात असे दिसून आले. बाकी १३०कोटीशी तुलना गंडली आहे, मान्य. पण तरीही 550 आणि 95000 इतकेच पुरेसे वाटत नाही. 95000 लोकांना नवीन गाडी घेणे परवडते ह्यातून मला खरंच काही वेगळं दिसत नाही. तुमचा प्रश्न नक्कीच योग्य आहे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त 22 गाड्या हजार मागे

Rajesh188
Sun, 11/08/2020 - 23:47 नवीन
त्या 22 पण कर्जाची सहज सुविधा आहे म्हणून. नाही तर गाडी घेण्याची ती पण आकडेवारी कमी होवू शकते. गाडी विकत घेतल्या नंतर त्या गाडीची सर्व्हिस,तिचे व्यवस्था करणे ह्या वर खर्च करण्याची क्षमता त्या गाडी मालक कडे नसते. पेट्रोल च्या दरात थोडी जरी वाढ झाली तरी ती सोसण्याची ताकत खूप गाडी वाल्या मध्ये नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

आज जुन्या ५०० आणि १०००

आग्या१९९०
Sun, 11/08/2020 - 18:10 नवीन
आज जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटांची ४ थी पुण्यतीथी. त्यांचे बलिदान सार्थकी लागले का? https://www.moneycontrol.com/news/business/demonetisation-4-years-on-a-look-at-what-it-achieved-and-didnt-6086571.html
  • Log in or register to post comments

विक्री वाढण्याचे हे पण कारण असू शकत

Rajesh188
Sun, 11/08/2020 - 22:44 नवीन
घरगुती वापराच्या वस्तू 0 रुपये भरून हफ्त्याने घरी घेवून जावू शकता जवळ जवळ सर्वच वस्तू वर ही सुविधा आता आहे. आणि त्या मुळे लोकांकडे पैसे नसले तरी चैनी च्या वस्तू खरेदी करण्याकडे जोर आहे. ज्या वस्तू वर अशी सुविधा नाही त्या वस्तूंच्या विक्रीत बिलकुल वाढ झालेली नसणार. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत हे सत्य च आहे. अनेक कंपन्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. अनेक व्यवसाय बंद पडलेले आहेत. बँकांचा नफा प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे. Apr मध्ये सर्वच कंपन्या नफा तोटा जाहीर करतील तेव्हा अजुन चित्र स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 11/09/2020 - 07:41 नवीन
कॅनरा बँकेचा नफा ४४४ कोटी. गेल्या वर्षी त्याच तिमाहीत नफा होता-३६४ कोटी. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/earnings/canara-bank-q2-results-reports-net-profit-of-rs-444-crore/articleshow/78934220.cms एच डी एफ सीचाही नफा वाढला- https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/earnings/hdfc-bank-q2-results-profit-rises-18-to-rs-7513-cr-beats-street-estimates-nii-up-17-at-rs-15776-cr/articleshow/78719153.cms एस बी आयचा नफाही वाढला- https://www.livemint.com/companies/company-results/sbi-net-profit-rises-to-rs-4-574-crore-in-q2-11604477572869.html आता हे आकडे फसवे आहेत असे म्हणणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हे सगळं बोलयच्या आधी तुम्ही

बाप्पू
Mon, 11/09/2020 - 08:21 नवीन
हे सगळं बोलयच्या आधी तुम्ही नेमका काय अभ्यास केलाय?? पप्पू ची भाषण ऐकलीत कि सामना चा अग्रलेख वाचला.. ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

माझा वरील प्रतिसाद राजेश 188

बाप्पू
Mon, 11/09/2020 - 08:22 नवीन
माझा वरील प्रतिसाद राजेश 188 यांच्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

अर्णव चा जामीन अर्ज फेटाळला

Rajesh188
Mon, 11/09/2020 - 16:02 नवीन
भारतीय न्याय व्यवस्था ही रामशास्त्री प्रभुणे ची वारस आहे . न्यायालय पेशव्यांना ओळखत नाही असे सांगणारे रामशास्त्री प्रभुणे . बकवास नाटक बाज अर्णव चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
  • Log in or register to post comments

भारतीय न्याय व्यवस्था ही

मामाजी
Wed, 11/11/2020 - 09:59 नवीन
भारतीय न्याय व्यवस्था ही रामशास्त्री प्रभुणे ची वारस आहे . आपण कोणत्याही भ्रमात रहा पण अशी हास्यास्पद विधानं करून लोकांची दिशाभुल करू नका. या अधुनिक रामशास्त्र्यांच्या नेमणूका कशा होतात हे माहीत नसेल तर अभिषेक मनू सिंघवी हे नाव आठवा. या पद्धतीने लायकी नसतान वर चढवलेल्या या अधुनिक रामशास्त्र्यां कडुन कपिल सिब्बल सारखे वकिल तीस्ता सेटलवाड साठी फोन वरून जामिन मिळवतात. .यांच्या कडून याकुब मेमन या आतंकवाद्याची फाशी स्थगीत करण्या साठी रात्री 2 वाजता कोर्ट बसवले जाते. यांच्य कडून चिदंबरमला 22 वेळा जामिन मिळतो. याच्या पैकीच एक अभय ठिपसे हे नाव ऐकले असेल. निवृत्ती नंतर या अधुनिक रामशास्त्र्यांनी कॅांग्रेस मधे प्रवेश केला व त्यांना नीरव मोदीचे होउ घतलेले प्रत्यार्पण थांबवण्या साठी कायदेशीर सल्लागार म्हणून पाठवण्यात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

भारतीय न्यायव्यवस्था

तुषार काळभोर
Mon, 11/09/2020 - 18:14 नवीन
ही ब्रिटिश राज मधील न्यायव्यवस्थेची वारस आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा