छप्पर उडून गेल्यानंतर
पाऊस घरात येतो
तोंडचा घास नाहीसा होतो
भणाणता आलेले वादळ
सारं उध्वस्त करीत जातं
वाटेत येईल ते पाडत जातं
मग ते काहीही असो
घर खांब छप्पर झाड माड
आणि मनही.
आणि मग..
घरात साठलेला पाऊस
मनात साठत नाही...
मनालाही त्याचे काही
अप्रूप राहत नाही...
पडलेल्या भिंती.. उडालेले छप्पर..
काहीच उरत नाही..
रात्र ओली दुःखाची
अन दिवस सरत नाही...
+1
खरं आहे. छान लिहीले!