पुलवामा : काही प्रश्न
लोकहो,
काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत.
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का?
२. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का?
३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते.
४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय?
५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय?
झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील?
६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147
यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं.
क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो.
च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं.
ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो.
या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल?
असो.
जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत.
धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मोगा खान,तुमच्या आवाक्यातला
एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक
राहुल गांधी राजकारणी आहेत पण
माझ्या मते आपण घटनेतलं ३७०
370 कलम रद्द करण्याचा अधिकार सरकारला आहे का
खरे आहे
@माईसाहेब
अनुच्छेद ३७० रद्द करणेविषयी
धन्यवाद
सन्या नाही हो, जकाउन्या आहे ते
माईजि
हा हा हा
शिवराज पाटलांनी चार दिवसात राजिनामा दिला होता.
Blackcat ,
....
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे
बघा प्लॉट घ्यायचा असेल तर
छान
तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि
आणि डोंगराळ भागात भरपूर वैदू
370 रद्द करणे हा मार्ग घातक आहे
सखोल अभ्यास करून प्रश्न सोडवणे दोन्ही देशाच्या हिताचे
१९८९ पर्यंत भारतातील
१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद
बरेच विसरभोळे आहात तुम्ही
हो का ?
९०,००० सैनिक युद्धबंदी होते
९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.
त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?...
त्यांना (९००० लोकांना) एक वेळ
तेच तर
इतिहास वाचलेलाच दिसत नाही.
त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.
त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.नो नो नो... Blackcat
१९८९ पर्यंत भारतातील
क़ाय पण काळी माउ !
व्यावसाईक आणि वैयक्तिक
@ Blackcat
सुबोध खरे-"उचलली बोटे आणि
माईसाहेब ,
छान
सुंदर
छान
| माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
परत तेच
छान
छान..!
साहेबांनी केलेला विमानाचा उपयोग
होय का??
हो
हम्म