माझ्या आठवणीत

माहीराज जे न देखे रवी...
गेलो कधी सोडून तरी     मला कधी विसरु नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। हाती हात तुझाच होता        आता कोणती आस प्रीत माझी अखंड राहील        थांबेल जरी श्वास नाही दिली जन्माची साथ     म्हणून राग मनी धरू नकोस सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।। जीवन होते माझे तरी      आधार तु जगण्याचा  प्रश्नच आता उरत नाही      मी तुला विसरण्याचा जीवन माझे संपले तरी      नाते आपुले तोडू नकोस .. सदैव तुझ्या सोबत असेन    आठवणीत माझ्या रडू नकोस  ।।
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

7 टिप्पण्या 1,956 दृश्ये

Comments

शार्दुल_हातोळकर नवीन

मी महाविद्यालयात असताना लिहिलेल्या माझ्या कविता आठवल्या मला!!