नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.
नमस्कार,
आज मिसळपाववर येणार्या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे.
असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.
मग अश्या वेळी काही लोक त्यांना सांभाळून घेऊन पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु) देतात तर काही लोक त्यांना चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमुळे त्या लेखकाचा लेखन करण्याचा उत्साह मारल्या जातो. ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे लोक आपला स्वत:चा सुरूवातीचा काळ विसरले आहेत की काय अशी शंका येते. प्रत्येक लेखावर चांगलेच लिहा असं मला म्हणायचे नाहीये. मला एवढेच म्हणायचे आहे की जे लोक नवीन आहेत, नुकतेच लिहायला लागले आहेत त्यांनी चांगलं लिहावं, उत्तम लिहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि पुढील लेख यापेक्षा चांगला येईल अशी मदत करावी ते राहीलंच. काही लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या अंगावर जाणार्या असतात की तो लेखक/लेखीका पुन्हा काही लिहीण्याचा प्रयत्नच करत नाही.
हे टाळता येऊ शकतं का? तर नक्कीच टाळता येतं. एखादा लेखक नवीन आहे तर त्याला त्याचे लेखन कसे सुधारावे याबद्दल मदत करा. काही प्रतिक्रिया असतील तर तो नवीन असे पर्यंत त्याला जरा सांभाळून घ्या. तो लेखक येथे जरा स्थिर स्थावर होऊ द्या आणि मग त्याच्या पुढील लेखांवर काय हव्या त्या प्रतिक्रिया द्या. म्हणजे तो लेखक बर्यापैकी येथील वातावरणाशी समरस झालेला असेल. आणि आपले मत उत्तम मांडू शकेल.
नवीन लेखकाने लिहीलेल्या लेखनाची चेष्टा करणे, त्याचा हिरमोड होईल अश्या प्रतिक्रिया देणे टाळावे अशी विनंती सर्वांना करीत आहे. काही लोक वारंवार असे करतांना दिसत आहे. या कारणांने त्यांच्यावर कारवाईसुध्दा होऊ शकते हे लक्षात घ्यावे.
सर्वांनी सोबत राहून मिपा पुढे नेऊया. मात्र काही लोकांना मिपा म्हणजे नवीन लोकांना त्रास देण्याची जागा आहे असं वाटत असेल तर यापुढे याबाबत कडक कारवाई होईल हे लक्षात घ्या.
याचा अर्थ मिपा नवीन लोकांकडून निघणारे एका ओळीचे धागे किंवा ऑरकुट सारख्या गप्पांचे धागे चालवून घेईल असे नाही. माझा रोख केवळ नवीन लोकांना लिहीतं करावं आणि त्यांनी चांगलं लिहायला लागावं यासाठी जूण्या लोकांनी प्रयत्न करावे अशी विनंती करावी एवढाच आहे.
कृपया याकडे लक्ष द्यावे. नवीन लोकांनी निश्चिंतपणे लिहायला लागा. हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे त्यामुळे आपल्या लिखाणावर चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रिया येतील हे गृहीत धरा. खरं तर त्यातच मजा आहे. मात्र कुणी उगाचच अती करून वाईटच प्रतिक्रिया देत असेल तर संपादक मंडळ त्याची काळजी घेईल.
- नीलकांत
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भले!
संपुर्ण अनुमोदन! आणि
पुलेशु !
हेच म्हणतो
नवीन लेखकाने लिहीलेल्या
सहमत आणी ह्या विषयाला हात
सहमत आणि विषयात हात
अगदी सहमत.आणि खुलासेवार लिहील्या बद्दल णीलकाण्टचे आभार.
सहमत आणी ह्या विषयाला हात
लेखकाशी सहमत. लोकांकडून
रेवतीताईंशी सहमत. नवीन
सहमत
सहमत
(No subject)
+१
अनुमोदन
पटले!
नवीन सदस्यांची एवढी काळजी
पूर्णत: सहमत. रेवती यांचा
नवीन लेखकाने लिहीलेल्या
नीलकांतची सुचना मान्य. एकदम
नीलकांतची सुचना मान्य. एकदम
बरोबर आहे
एकदम बराबर ... भाऊ
मुद्दा क्र.
पण आम्ही सांगलीहून त्यांजसाठी
गवीचे लेखन खुप खुप खराब
नकु..
बर्याच अंशी शमत आहे. शिवाय
सहमत. अगदी १०१% सहमत.. वैताग
कोण करत अस?
सहमत.
सहमत आहे. पण ज्या 'जुण्या'
कित्ती बै काळजी तुम्हाला
उत्तम लिहीले आहे.
हे
हा हा हा
टिका आणि प्रयोजन
१. लेख लिहुच लिहु .. (
+१
हा लेख प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक reminder म्हणून..
सहमत आहे. चेष्टा /टीका/मस्करी
सहमत
आन्ना
पटले...
सहमत ...
अगदीच....
सहमत आहेच!
कोणी का असेना
एंट्रीलाच मदत...