ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे
ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे
प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची.
भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.)
या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.
कारण ही तसे तगडे आहे.एरवी आपली अती डावी आणि आणि प्रसंगी हिंदू द्वेशी अशी प्रतिमा निर्माण करणारा हा पत्रकार आपले विचार आणि संकल्पना यांचे जोडे बाहेर काढून ठेवतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो.अगदी नेहमीचे सुट टाय असा टिपिकल अटायर बाजूला ठेवून साध्या सुध्या वेषामध्ये अवतरतो. नेहमीचे झगमटाचे असलेले वातावरण सोडून कधी साध्या टेबल खुर्चीवर तर कधी चक्क बागेत वगैरे अशी जागा मुलाखती साठी निवडतो. ज्या पाहूण्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांना हा माणूस बोलते करतो आणि स्वत: कमी बोलतो. एकंदरीत सर्व मुलाखती मध्ये त्यांनी पाहूण्यांचा चांगला अभ्यास केलेला असतो. मुलाखत घेताना कोणतेही शोबाजी नसते. दोन माणसे एकत्र बसून गप्पा मारत आहेत असा एकंदरीत प्रकार असतो.
वारंवार येणाऱ्या लोकमतच्या जाहीराती थोडासा रसभंग करतात. पण व्यावसायिक अटळता म्हणून आपण दुर्लक्ष करायला हवे.
मला अत्यंत आवडलेल्या काही मुलाखती त्यांच्या पसंती क्रमानुसार देत आहे.(सर्वाता आवडलेली मुलाखत प्रथम याक्रमाने) पाहूण्यांचे नाव, आवडलेली थोडक्यात माहीती.
1. सिन्धूताई सपकाळ :- पदोपदी चपखल पणे बसणाऱ्या () सुरेश भटांच्या किंवा बहीणाबाइंच्या काव्यापंक्तींची या बाई पखरण करतात. या बाईच्या जीभेवर जणू सरस्वती आहे. सिंधूताईंना आइ म्हणून संबोधलेले आवडते. त्यांची वात्सल्यमूर्ती पाहून मला पण त्यांना आई म्हणून हाक मारावे असे वाटले.
2. गोपाळ बोधे:- विमानातून फिरत मोठ्या मोठ्या इमारतींचे छायाचित्रे काढणारा धाडसी माणूस. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडीयाचे शिखर हे डोम सारखे आहे ही माहीती प्रथम त्यांना मिळाली. तसेच रत्नागिरी आणि वेंगुर्ला इथले लाईट हाउस यांचे फोटो. आणखी खूप इंटरेस्टींग माहीती म्हणजे भारतात असे साहसी फोटो काढणारे दोनच लोक आहेत दोनीही मराठी . दुसरा माणूस उद्धव ठाकरे.
3. रामदास आठवले:- राजकीय पार्श्वभूमी असून ही आपली मते संथ लयीत आणि खर्जातील आवाजात स्प्ष्टपणे मांडणारा असा हा नेता. राजकीय प्रतिमा काही असो, माणूस मनाला भिडला. आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत ही नवीन माहिती म्हणजे सुखद धक्काच होय.
4. डॉक्टर अभंय बंग: यांची रूग्णाप्रती असणारी निष्ठा, त्यांनी वेगवेगळी मिळवलेली माहिती त्याचे शास्त्रीय विश्लेषण आणि सरकारी यंत्रणे बरोबर दिलेली झुंज. साधे राहणीमान
5. नाना पाटेकर वा वा खुपच छान मुलाखत अशोकसराफ बरोबरचे नानाचे सम्बध आणि नानाची दोन दैवते- बाळासाहेब आणि बाबा आमटे, त्याचे गणापती प्रेम आणि राजकारणातल्या लोकांबद्दलचे त्याची मते. दोघेही बहुधा एकाच वयाचे असावेत (निखिल आणि नाना) एकमेकांना अरेजारे करत असलेले पाहून ऐकायला मजा आली.
6. सदाशिव साठे : प्रख्यात शिल्पकर्मी ()याच्या मुलाखतीत एक विचार खुप म्हणजे खुपच आवडला. पुतळे आणि त्यांचे राजकारण चालू असताना त्याना वाटते की माणसांचे पुतळे करण्यापेक्षा एखाद्या कवीतेचे शिल्प करावे. माझ्यामनात कल्पना आली विंदाची " घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे" याचे शिल्प कसे करावे?
7. सुरेश खोपडे :-मुंबईचे अॅाडिशनल पोलीस कमिशनर भिवंडी दंगली वर पुस्तक लिहीणारा आणि मोहल्ला कमिटीची संकल्पना प्रत्यक्ष राबवणारा एक साधा माणूस. अमेरीका चिन सारख्या देशात यांना व्याख्यानासाटी आंमत्रण मिळते. विषय असतो सामाजीक स्वास्थ्य आणि दंगली होवू नयेत यासाठी करावे लागणारे प्रतिबंधात्मक उपाय. या मुलाखतीत मिळालेली माहिती त्याना शौर्य पदक झगडून मिळवावे लागले. बावीस वर्षे फरार असलेल्या दरोडेखोरांना यमसदनी पाठवल्याबद्दल पण ते मिळाले घटना घडल्यावर तब्बल अकरा वर्षांनी.
8. पोपटराव पवार आपले क्रिकेट मधील करिय़र सोडून एका हिवरे बाजार साठी कसे झटले. अंतरराष्टीय व्यासपीठावर सर्व जगातले लोक कसे आकृष्ठ होतात. या पोपटरावांची वाणी अगदी छान कोणताही अभिनिवेश न बाळगता पण आग्रही पणे आपली भूमिका मांडण्याची हातोटी अनोखी आहे.
9. विश्वास पाटील :-पानिपत,झाडाझडती,महानायक या पुस्तकांनी या माणसाने आपल्याला अगोदर वेड लावलेले आहेच. काही किस्से त्यांच्याच तोंडी ऐकणे हा एक वेगळा अनुभव आहे.
10. तुषार गांधी : प्रत्यक्ष बापूजींचा नातू त्यामुळे बाय डिफौल्ट आदर आहेच. पण तेवढेच त्यांचे करतुत्व नाही. ते एक मोठे विचारवंत आहेत.हू किल्ड गांधी असे काहीतरी त्यांच्या पुस्तकाचे नाव. सर्वात महत्वाचे म्हणजे ()त्याचे मराठी उच्चार आणि बोलण्याची ढब. काही उच्चारावरून त्यांचे अमराठीपण लपत नाही पण अस्खलीत काय म्हणतात तसे मराठी बोलतात.
मिपाकरांनो, हे दशक अख्यान इथेच संपवतॊ. वानगी दाखल काही फक्त नावे देतो.आणि आरती चे तबक आता खाली ठेवतो.
या हीऱ्याना सॅल्यूट, वंदन, सलाम, हॅटस ऑफ, काय म्हणाल ते.
आणि अशा लोकांच्या विविध गोष्टी आमच्यापर्यंत पोचविल्या बद्दल निखील वागळे यांचे विशेष आभार.
(विठ्ठल कामथ आणि संजय गायकवाड यांच्या मुलखती च्या लिन्का असल्या तर द्याव्या खुप उत्सुकता आहे.)
मिपाकरांची मते जाणण्यास उत्सुक
--कापूसकोंड्या
केवळ स्मरणशक्तिवर आधारीत असल्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी
यादी
1. अशोक सराफ
2. प्रेमांनंद रामाणी
3. शि.द.फडणीस
4. संजय गायकवाड
5. आनंद नाडकर्णी
6. भीमराव गस्ती
7. प्रविण ठिपसे
8. बाबासाहेब पुरंदरे
9. सुरेश वाडकर
10. प्रशांत दामले
11. आरती अंकलीकर टिकेकर
12. सचिन पिळगावकर
13. डॉ.प्रेमानंद रामाणी
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपाकर म्हणून माझे मत
कुशंका
छिद्रान्वेशी
नाना पाटेकर, विश्वास पाटील
शिर्शक वाचुन मला वाटले
माफ करा लेखक पण स्पष्ट
हाण्ण हाण्ण !!
सहमत आहे
बदल
इथे मनसे म्हणायचे आहे का
हाण्ण हाण्ण काय? तु देखील
एय भाऊ ! पण मी हांजी हांजी
तसं कोण म्हणत नाहीये .. आणि
वा वा गोड्बोलीया जबाब नही
मान्य
सायबा,
कोण निखिल वागळे?
+१
त्या वागळेचा खरंतर बाजार
कोण? वागळे?
वागळे हा माणूस जरा अति करतो
मी किती पूण्यवान आहे कारण मला
अहो आश्चर्यम ...
+१ जाहीर निषेध !!
स्वयंसंपादनाचा दोष वाचताय ना मित्र हो......!
लेख परत आला ! माझीच शॅम्पेन
मोठ्या मनाने माफ करावी
इट्स ओके. :)
म्हणूनच मी म्हणले की मला
ग्रेट भेट अन आजचा सवाल
पूर्ण निर्व्यसनी
आयला आमचा कुंद्या पण पूर्ण
आगायायाया
धन्यवाद
टोकाची प्रतिक्रिया.