Skip to main content

वाङ्मय

मुसाफीर

Published on गुरुवार, 15/01/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
शेवटी "मुसाफीर "वाचायला मिळालं . परत एकदा गोडबोले सरांची "range "बघून अवाकलो . त्यांचं प्रत्येक पुस्तक मराठी माणसाला घडवतंय . त्यांना आणि त्यांच्या व्यासंगाला आपला कुर्निसात . किमयागार , अर्थात ,बोर्डरूम ,मनात, मुसाफिर हि पुस्तकं प्रत्येक मराठी घरातल्या कुंकवाच्या करंड्या इतकीच महत्वाची आहेत . आधी "बालकांड" आणि आता "मुसाफीर "एकूणच "मनुवादी "(म्हणजे आडनावाने "मनुवादी"… विचारांनी नाही म्हणत मी)आत्माचारीत्रांना बरे दिवस आलेत असं दिसतंय . एवढ्या सगळ्या गोष्टी शिकताना ,अनुभवताना वेळ कसा मिळतो ? हे मला खरोखरच इंजिनीरिंग च्या कित्येक विषयान सारखं अनाकलनीय आहे .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2783

देव तिळीं आला

Published on बुधवार, 14/01/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन शुद्ध दशमीला दसरा, आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥ सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण.

याद्या 3892

उड उड रे

Published on बुधवार, 31/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला माझ्या एका राजस्थानी मित्राच्या घरी गेलो असतांना त्याने एक राजस्थानी लोकगीत लावले होते. अस्सल ग्रामीण ढंगाचा ठेका वगेरेमुळे लक्ष वेधले गेले. भाषा माहित नसल्याने अर्थ कळेल असे वाटत नव्हते पण एकदम वाटावयास लागले की, "अरे, हे गाणे आपल्या परिचयाचे आहे," मित्राच्या मुलीला सांगितल्यावर तिने ते लिहून दिले व वाचल्यावर लगेच लक्षात आले कीं असे कां वाटत होते !
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3874

मराठी कविता

Published on रवीवार, 28/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी! थोड्याच शब्दात मोठा आशय सांगण्याची किमया फक्त कवितेत असते. मराठी भाषेला काव्याची अतिशय सुंदर परंपरा आहे. अमृतानुभव असू दे, तुकारामाची संतवाणी, अभंग पंत तंत काव्य ते केशवसुत, रे. टिळकांचा जमाना. त्या नंतरचा सावरकर, पुढे कुसुमाग्रज, बोरकर, बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे ते ढसाळ, नायगावकर, म्हात्रे, संदिप खरे अश्या अनेक प्रकारच्या कवींनी मराठी वाङमय समृध्द केलंय. त्यातल्या तुम्हाला आवडणार्‍या कविता कोणत्या ते या भागात सांगायचंय. जमलं तर का आवडली कविता हे पण. आणि हो, नुसतेच कवितेचे नाव न देता थोड्या ओळी लिहु शकलात तर उत्तम! चला तर मग काव्यास्वाद घेऊ या.
लेखनविषय:

याद्या 40869

सारे तिचेच होते

Published on रवीवार, 21/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
उदंड रसिकता असलेल्या, जीवनावर रंगून जाऊन प्रेम करणार्‍या, एका साठीतल्या व्यक्तीच्या, आपण त्यांना रंगराव म्हणू , व त्यांच्या एका तरुण मित्राच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4401

चुन्नी मियां आणि बकरा

Published on शनीवार, 13/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
तीस -बत्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही जुन्या दिल्लीत नई बस्ती या भागात राहत होतो. शाळेला दसर्याच्या सुट्या सुरु होताच आम्ही भावंडे चुन्नी मियां केंव्हा आमच्या घरी येणार याची वाट पाहायचो. इंच टेप आणि घेतलेली मापे लिहिण्यासाठी एक जुनी फाटलेली वही घेऊन चुन्नी मियां घरी आले कि आमच्या आनंदाला उधाण येत असे. कारण वर्षातून एकदाच दिवाळी साठी नवीन कपडे मिळणार. शिवण्यासाठी कापड ते स्वत:च आणायचे, त्या मुळे कपडे शिवून आल्यावर, चुन्नी मियां यांनी शिवलेले कपडे घालणारे पोरें दुरूनच ओळखता येत होती. सर्वांचे कपडे एक सारखेच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3954

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

Published on बुधवार, 10/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.

याद्या 5727

शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी

Published on सोमवार, 08/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मा. शरद जोशी
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2167

कवितेचे रसग्रहण..... एक आनंदोत्सव

Published on रवीवार, 07/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
कवितेचे रसग्रहण.. एक आनंदोत्सव संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती ! व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात् ! विद्या वाटल्याने वाढते व स्वत:पाशीच साठवून ठेवली तर कमी होते. पण विद्याच कां ? आनंदाचेही तसेच आहे. एखादी कविता वाचल्यावर मला जर आनंद झाला तर मला वाटते हा आनंद माझ्या मित्रांनाही मिळाला पाहिजे. कवितेतून मला आनंद कसा मिळाला ते सांगावयास कविता व तिचे रसग्रहण. मिपावर कविता-रसग्रहणाला चांगले दिवस येत आहेत असे दिसते. श्री.आदित यांनी पहिल्यांदीच लिहून चांगली सुरवात केली. असेच आणखी लेखक मिळाले तर हे दालन समृद्ध होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9471

अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४

Published on सोमवार, 01/12/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ योगायोग, अकस्मात, अनपेक्षित हे शब्द आपण नेहमीच वापरत असतो. पण आजच्या दिवसाचे वर्णन कसे करावे तेच मला सुचत नाही. आजचा दिवस माझ्यासाठी अकल्पित आणि अफ़लातून ठरला आहे. आज "माझी गझल निराळी" चे समिक्षण दैनिक प्रहारमध्ये प्रकाशित झाले. आजच महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझी "ऊठ मर्दा ऊठ" ही कविता प्रकाशित झाली, आज दैनिक सकाळमध्ये "शतवर्ष नरा" ही कविता छापून आली आणि.... मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आजचे ठिय्या आंदोलन पोलिसांची एकही लाठी न खाता, बंदुकीची गोळी न खाताच सहजतेने सुखासुखी पार पडले. इतके सारे अनुकूल योगायोग एकाच दिवशी घडून येणे, हे फ़ारच विलक्षण आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 17461