Skip to main content

वाङ्मय

अरण्यबंध -छापील प्रत

लेखक नूतन यांनी रविवार, 25/11/2018 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पहिल्या ई पुस्तकासाठी केलेल्या अभिनंदन आणि शुभेच्छां साठी आभार. 'गतीशील' यांच्याप्रमाणे आणि माझ्या काही परिचितांनी केलेल्या मागणीमुळे मर्यादित संख्येत छापील प्रती काढण्याचे ठरवले आहे. छापील प्रत हवी असल्यास मला व्य नि ने कळविल्यास प्रतींची संख्या ठरवता येईल. तसेच प्रत आपल्यापर्यंत कशी पोहचेल हेही बघता येईल. मिपावरील आधीचा दुवा खाली देत आहे. https://www.misalpav.com/node/43651

पुलं "दैवत"

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 23/11/2018 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की.

माझं पहिलं ई - पुस्तक

लेखक नूतन यांनी सोमवार, 19/11/2018 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे. पुस्तकाविषयी थोडक्यात : कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक..... या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं...

ॲडमिशन Engineeringची : एक नाट्यछटा

लेखक चिगो यांनी शनिवार, 17/11/2018 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक : कोणी का असेना. स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे) पिता ( श्री. फा.र. चतापलेले) पुत्र ( संदर्भास) इतर सोयीनुसार पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत. ( पडदा वर जातो. सरकारी बाबू कार्यसिद्धी करताहेतसे दाखवून समयप्रलाप करीत आहेत.

गावातला आड

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/11/2018 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे पूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात). आड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं.

गावातली चावडी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/11/2018 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे गाव तिथं चावडी असायचीच. चावडीवर गावातले अनेक प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर होत असत. चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलवणे म्हणजे गावातल्या लोकांची बैठक. आजच्या भाषेत मिटींग. गावात दवंडी देऊन चावडीवर लोक बोलवले जात. गावाच्या भल्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर गावातल्या चावडीवर लोक जमत. चावडीत उलट सुलट चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाई. गावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चौ – वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी. चव्हाटी- चावडी.

लुब्री

लेखक गीतांजली टिळक यांनी सोमवार, 29/10/2018 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हो... कुत्रीच होती ती. या घरात आम्ही रहायला आलो. यायच्या आधी मागच्या अंगणाला गेट करुन घेतलं. दिवसा बिल्डींगच्या पार्किंगच्या आवारात इकडून तिकडे पळणारं एक कुत्रं दिसायचं वरचेवर.. भटकं.. रहायला आल्यावर काही दिवसानी नवीन करुन घेतलेल्या गेटला लागून असलेल्या भिंतीवर, नुकत्याच दिलेल्या पांढर्‍या रंगावर मातीचे घासल्यासारखे डाग दिसू लागले. आणि ते वाढायला लागले. कशाने त्या अडचणीच्या जागेत असं होतय काही कळत नव्हतं. मग एके दिवशी दुपारच्या वामकुक्षीच्या शांत वेळी मी काही कारणाने स्वयंपाकघराचे दार उघडून मागे अंगणात गेले.

बाजार – बजारना याळ

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/10/2018 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतो. मात्र प्रत्येक गावात बाजार भरत नाही. आजूबाजूच्या दहा पंधरा खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या थोड्या मोठ्या खेड्यात बाजार भरत असतो. आजूबाजूच्या गावांचे हे बाजार भरणारं गाव केंद्रच समजलं जातं. बाजाराभोवती देण्याघेण्याचे अनेक व्यवहार होत आले आहेत. ‍विशिष्ट बाजाराच्या गटातल्या गावांत मजूर लोकांची मजूरी प्रत्येक आठ दिवसांनी बाजाराच्या दिवशी चुकती करायची असते. बाजाराच्या दिवशी शेतमजूर दुपारपर्यंत एक पारग शेतात काम करतात. बाजारासाठी दुपारून सुट्टी घेतात.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 10/10/2018 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास Emotions drive people and people drive performance, हे बोधवाक्य वाचून काय समजते? भावना मनुष्याला गती देतात आणि मनुष्य कृतीशीलतेला गती देतो. प्रत्येक कृतीमागचं कारण कुठलीतरी भावना हेच आहे. पण emotions, हा शब्द वाचून मात्र आधी कुणाच्याही डोळयासमोर उभे राहणारे चित्र आहे ते, अश्रूंनी भरलेले डोळे अन् व्याकुळ भाव! जास्तीत जास्त माणसांच्या मनात खोलवर रुजलेली अन् नकोशीही असलेली अशी हीच भावना आहे - दु:ख, सल, बोच, त्रास.... तीच भावना मूळापासून शोधून, उकलून, स्पष्ट करून, अभ्यासून तो गुंता सोडवताना केलेला एक सर्वांगीण अभ्यास, आपल्यासमोर पुस्तकरूपानी आलेला आहे.