Skip to main content

संस्कृती

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/08/2015 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

हरवलेल्या गोष्टी .....शाईचे पेन !

लेखक गोगट्यांचा समीर यांनी मंगळवार, 18/08/2015 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली बरेचदा असे जाणवते की काही गोष्टी नहीशा होऊ लागल्या आहेत , अर्थात बऱ्याच नव-नवीन गोष्टींची पण काही कमी नाही. पण या नाहीशा होऊ घातलेल्या गोष्टी अथवा विस्मृतीत जाणाऱ्या गोष्टी आठवल्या की मन थोड़सं हळवं होतं आणि आठवणीत रमतं . उदा. शाईचे पेन. स्मार्टफोन / Tab / Laptop च्या जमान्यात कागदावर लिहायला तसं कोणी जातं नाही ,वेळ आलीच तर बॉलपेन असते . पण त्या महिन्या महिन्याला बदलणाऱ्या , कंपनीच्या स्टेशनरितुन उचललेल्या किंवा रिफील न होणाऱ्या पेनात काही आपलेपणा वाटतं नाही ,जो लहानपणी जपलेल्या एखाद्या शाई पेनामध्ये होता. माझी सुरुवात पाटी आणि पेन्सिलीने झाली .

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरी गंगेच्या काठावरती...

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/08/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

लेखक मार्गी यांनी सोमवार, 17/08/2015 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापुरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद. निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़ १. ढगफुटी तर केदारनाथला झाली, मग पिथौरागढला जाऊन काय करशील? २. आता तर सर्व लोकांना वाचवलं‌ गेलं आहे, रिलिफ काम संपलं आहे, आता तिथे जाऊन काय करशील? ३.

(चरस गांजा अता मिळाल्या)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 14/08/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला* करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला --(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद *गवत*= ग्रास

(स्पर्धेसाठी नाही) क्लोज

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 12/08/2015 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
भोसले, एक बी पंटर सुटला नाय पायजे. चारी बाजूनी प्याक करायचे, काय? होय सर. तिज्यायला रतनखत्रीची औलाद. एकबी चिट्ठी दिसायला नाय पायजे. मटका बंद म्हण्जे बंद. होय सर. चला सुटा. +++++++++++++++++++++ उचल उचल भाड्याला. भोसले ते पिवळा शर्टवालं गाबडं पळालं बघा. आपल्याच व्हॅनकडं पळतय. धरा त्येला. +++++++++++++++++++++ भाडखाऊ कुठं पळतो बे? न्हाय साहेब. तुमच्याच गाडीकडं आलो की. कुत्र्या, पळायला काय झालं सांग अन बस आत नीट. व्हय साह्येब. मागच्या टायमाला जागाच मिळाली नाही व्हॅनमदी. पार जेलरोडपत्तर उभ्याने नेलता मला. तुझ्यातर आयला. भडव्या ओपनला काय आज? साह्येब तिर्री सत्ती. उभा राहा भेनचोद आता.

हरिद्वारची कावड यात्रा - एक उन्माद

लेखक दा विन्ची यांनी मंगळवार, 11/08/2015 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज घडीला आपल्या भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी आहे आणि त्यापैकी अंदाजे तीन कोटी हिंदू शिव भक्त १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या बारा दिवस चालणाऱ्या कावड यात्रेसाठी देवभूमी उत्तराखंड मधील हरिद्वार मध्ये येवून गेले . एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के लोक्स . आपल्या सगळ्यांना आपल्या आषाढी वारी आणि त्या गर्दीचे भारी कौतिक . यावर्षी बहुधा ५ ते ६ लाख लोक विठू माउलीच्या दर्शनासाठी आले असतील . हि तुलना फ़क़्त या यात्रेची भव्यता समजावी म्हणून पण मला एक फरक जाणवला. वारीमध्ये एक प्रकारचे पावित्र्य, शिस्त आणि भक्तिभाव सहज जाणवतो . या उलट कावड यात्रा म्हणजे एक गुर्मी , उन्माद , आक्रस्ताळेपणा.

कोकणस्थांची कुलदेवता अंबेजोगाई

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 10/08/2015 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पहिलेच स्पष्ट करतो की मला या धाग्यात श्रद्धा ,अंधश्रद्धा,नियती,नशीब,कर्तुत्व वगैरे बाबींचे घोळ घालायचे नाहीयेत.ज्याने त्याने आपापल्या परीने अर्थ घ्यावा. आपण प्रत्येक जण थोड्या फार फरकाने शिक्षण ,नोकरी, लग्न,मुले या चक्रातून फिरता असतो.हळूहळू वय वाढता असते .अनेक चिंता विवंचना मागे लागलेल्या असतात .कधी त्यावर तात्पुरता उपाय काढला जात असतो तर कधी त्या प्रलंबित ठेवल्या जातात .अशातच कधीतरी कोणी घरातील अथवा बाहेरील वयस्कर माणूस सुचवतो की वर्षातून एकदा किंवा जेव्हा जमेल तेव्हा ,घरात मंगलकार्य झाले किंवा ठरले असल्यास कुलदेवतेला जाऊन या .आणि मग बरीच वर्षे मनात घोळत असलेला बेत डोके वर काढत

आमचीबी चालुगिरी…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 10/08/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा…. आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा.. त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्‍या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो.

सत्यकथा .. अध्याय - ३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 07/08/2015 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- सत्यकथा .. अध्याय १ आणि २ सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले.