Skip to main content

संस्कृती

चप्पल . .

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलच्या दुकानातंही आत चपला काढून शिरावं लागतं . धर्म नावाचं मूल्य मनात, असं खो Sssलपर्यंत जिरावं लागतं नुसतच," हे असं कसं !? " असं म्हणून भागत नाही . एकट्यानीच जगायचं . . ?, तर मग यापेक्षा काहीच लागत नाही . पण टोळीत जगणार ना तुम्ही ? मग द्यायला हवी हमी . पत्ते आवडत नसले खेळायला, तरी जमवावी लागेल रम्मी !

परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!

लेखक मार्गी यांनी रविवार, 28/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग' ✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम् ✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा! ✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण ✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप ✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात ✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव ✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 17/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 20/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का? कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले असतील. आजकाल, लोक नेहमी असं गृहीत धरतात की त्यांना इतरांबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत. परंतु खरोखर, इतरांबद्दल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, किंवा त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांना अजिबात सुगावा नसतो. मग भाऊसाहेब, लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?” असा प्रश्न कालच्या भेटीत मी प्रो.

एका कोळीयाने,

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 19/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बालडीत कपडे धुण्यासाठी साधारण कोमट पाणी भरून साबूची पावडर टाकून दोन्ही हात पाण्यात बुडवून साबूचा फेस बाथरुम मध्ये तयार करीत होतो. तेव्हड्यात मी एक काळा कोळी त्या साबूच्या फेसावर तरंगताना पाहिला.

माझ्या वहितला एक उतारा,-मनोदशा (mood ).

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वहितला एक उतारा.--- मला आठवतं हा उतारा लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो. शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती. वैताग आला होता. दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं. आजही तसंच वाटत होतं.म्हणून माझ्या वहितला उतारा वाचत होतो. “ मला असं वाटतं की,( मूड ) मनोदशा सतत बदलत असते आणि काही सेकंदात बदलली जाऊ शकते. जीवनातला एखादा क्षण पुसला किंवा बदलला जाऊ शकत नाही, परंतु केवळ आठवणींच्या संदर्भातून मागे वळून पाहिलं जाऊ शकतं.

अनमोल आहे जीवन अपुले मित्रांनो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवे वादळ आणू पाहात आहे जीवनाला परखूं पाहात आहे जे अपशब्दापायी बेचैनीत हरवले त्यांना पुन्हा शोधावे असे वाटे मला जीवनाशी प्रतिघात करता, जे थकले अशासंगे हसत रहावे असे वाटे मला अनमोल आहे जीवन अपुले, मित्रांनो उत्सवी उघडपणे राजी व्हावे वाटे मला सरहद्दीवर शव वस्त्र ओढून आहेत उभे, हिम्मत त्यांची वृद्धिंगत करावी वाटे मला जरका एखादा मोका मिळू शकला मला, मनुष्याचे दुःख विसरवीणे असे वाटे मला कवीला जरका नसेल कसले सामर्थ्य, शांती,सुरक्षा दुनियेत यावी असे वाटे मला *

लागट बोलणं

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 11/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली . धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो. एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो. जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला चिडवतो, धमकावतो तेव्हा तुमचे प्रत्येक मित्र त्यात सामील होऊन त

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/05/2024 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.