Skip to main content

संस्कृती

अगर तूम मिल जाओ...

लेखक फटू यांनी सोमवार, 20/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
सहज तू नळी वर भटकत असताना "जहर" चित्रपटातील "अगर तुम मिल जाओ" या गाण्याचं पाकीस्तानी रुप पाहायला आणि ऐकायला मिळालं. हे गाणं त्यांच्या १९७४ साली आलेल्या त्यांच्या "इमानदार" या चित्रपटात होतं... गाण्याची मुळ गायिका तस्सवर खानुम... आवाज एकदम भारदस्त... श्रेया घोशालच्या गोड आवाजाहून पुर्णपणे वेगळा...

६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 16/10/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो या गोष्टीवर विष्वास बसत नाहिय्ये. पण आपली ड्रीमगर्ल हेमा मालिनी चक्क ६० वर्षांची होत्येय. अजूनही ती तितकीच सुंदर दिसते. तिच्या वयाच्या तारका आत्ता आज्जी झाल्यात. त्यांच्याकदे पाहुनही असे वातत नाही की खंडहरों से पता चलता है के कभी इमारत बुलंद हुवा करती थी. ऐन उमेदीची ती सर्वार्थाने ड्रीमगर्ल होती. मध्यम वय तीने सहजतेने स्वीकारले. ( आठवा तिच्या मुलीबरोबर जेट सुगंधी मॅट्ची जहिरात ) बिजवर माणसाशी लग्न केले त्याने समाजात तीला कधीच स्वतःबरोबर वागवले नाही. त्याची कोणतीही तमा खन्त न ठेवता तीने आपल्या मुलीना मोठे केले.

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

आपल कोल्हापुर

लेखक झकासराव यांनी बुधवार, 15/10/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची लिमिटेड लिस्ट माहिती असते. ह्यातच जर अजुन काहि भटकंती करणार्‍या लोकाना फार प्रसिद्ध नसलेल्या जागांविषयी माहिती कशी द्यावी?? किंवा मला तरी सगळ्या कोल्हापुरतील जागा माहित आहेत का?? मी प्राथमिक शाळेत असताना आमची एका दिवसाची सहल जात असे. अशा सहलीत मी कात्यायनी, खिद्रापुर अशा फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणी देखील जावुन आलो आहे. ही ठिकाण बाहेरच्या (कोल्हापुरच्या बाहेरच्या लोकाना जे तिकडे पर्यटनाला येतात) कोणालाच विशेष माहिती नसतात. मग त्याची माहिती कशी मिळेल. आपल्याकडच्या पर्यटन खात्याबद्दल काहि न बोललेलच बर.

कोजागिरी

लेखक धुमधडाका यांनी मंगळवार, 14/10/2008 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
धुमडाक्याचा धुमधडाक्यात नमस्कार !! अहो, तुम्हाला कोजागिरी निमित्त मनापासुन शुभेच्छा !! मिसळ पाव मस्तच मेजवानी आहे बरका,खुप छान आहे हे सगळ॑, मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही.

सीमापाश

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/10/2008 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज

मारती तुकाराम भोईर -आद्यात्मिक गुरु

लेखक ब्रिटिश यांनी गुरुवार, 09/10/2008 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मारती तुकाराम भोईर वय २७, रंग काला ,कडक हड्डी, बेरकी, गूनईशेश : पक्का बेवडा स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार माजा चुलतभाउ. अंगात रगत कमी दारु जास्त. आज्याचीच देन आनी म्हुन आज्याचा लारका. आज्यान ल्हानपनापासन बरोबर न्हेल्ता. आज्या टाईट झाल्याव उरलेली हा संपवाचा. पन पक्का हजरजबाबी.यकदा क बोलाय लागला क आयकाचा न्हाई. कूनालाबी आरवा करनार. यकदा सरपंचान त्याला समझवला व्हता "बाबा नूस्ता दारू पीवुन घरान परून रहातस जरा घरभायेर पड मंग समझल दुनया क हाय ती" तर हा म्हन्ला "सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला" तर असा हा मारत्या रोज दारु पीउन येनार न घरात तरास देनार.